साहेब! माझा सुध्दा पाठिंबा कसा काय जाहीर केला?
एक सामान्य धनगराचा प्रश्र्न..
भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. हे मतदान कोणाला करायचे? निवडणूकीत कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु "मानिकराव ठाकरे यांना धनगर समाजाचा संपूर्णता पाठिंबा!* या नावाखाली पत्रके पाहून खरंच आश्चर्य वाटले.
तेव्हा सामान्य धनगर म्हणून काही प्रश्न पडले कि,
१) धनगर समाजाचा सरसकट पाठिंबा कसा काय मिळाला?
२) असं कोणतं काम केलं कि, त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला?
४) यवतमाळ जिल्ह्यातील एकाही धनगर नेत्याला मोठं होवू न देणाऱ्या व्यक्तित्वाला धनगर समाजानी कसा काय पाठींबा दिला?
५) विशिष्ट लोकांनी संपूर्ण समाजाचा निर्णय घेण्याचा अधिकार अजूनही कसा काय संपला नाही?
३) वैयक्तिक फायद्यासाठी समाजाला विकण्याची प्रवृत्ती धनगर जमातीत अजूनही कशी काय जिवंत आहे?
६) अशा प्रकारचा लाचारीचा निर्णय समाजात स्वाभिमान निर्माण करणार आहे काय?
७) अशा प्रकारचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचा तुमचा निर्णय सामान्य धनगर लोकांनी का स्विकारावा ?
८) तो उमेदवार ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षानी धनगर जमाती संबंधीचे कोणते चांगले निर्णय घेतले आहे?
९) त्यांच्या पक्षाने किती धनगरांना उमेदवारी दिली आहे?
१०) त्या उमेदवाराचा धनगर आरक्षणाच्या बाबतीत काय अजेंडा आहे?
११) त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सभागृहात किती वेळ मांडला आहे?
१२) त्यांच्या भोवताल फिरणारे कोण कोण मोठे धनगर नेते? कशासाठी जमा झाले आहेत?
आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर या प्रश्र्नांची उत्तरे आम्हा सामान्य धनगरापर्यंत येवू द्यावे. ही विनंती..
आपणचारात घेत नसलेला
आपलाच सामान्य धनगर बांधव
एक सामान्य धनगराचा प्रश्र्न..
भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. हे मतदान कोणाला करायचे? निवडणूकीत कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु "मानिकराव ठाकरे यांना धनगर समाजाचा संपूर्णता पाठिंबा!* या नावाखाली पत्रके पाहून खरंच आश्चर्य वाटले.
तेव्हा सामान्य धनगर म्हणून काही प्रश्न पडले कि,
१) धनगर समाजाचा सरसकट पाठिंबा कसा काय मिळाला?
२) असं कोणतं काम केलं कि, त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला?
४) यवतमाळ जिल्ह्यातील एकाही धनगर नेत्याला मोठं होवू न देणाऱ्या व्यक्तित्वाला धनगर समाजानी कसा काय पाठींबा दिला?
५) विशिष्ट लोकांनी संपूर्ण समाजाचा निर्णय घेण्याचा अधिकार अजूनही कसा काय संपला नाही?
३) वैयक्तिक फायद्यासाठी समाजाला विकण्याची प्रवृत्ती धनगर जमातीत अजूनही कशी काय जिवंत आहे?
६) अशा प्रकारचा लाचारीचा निर्णय समाजात स्वाभिमान निर्माण करणार आहे काय?
७) अशा प्रकारचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचा तुमचा निर्णय सामान्य धनगर लोकांनी का स्विकारावा ?
८) तो उमेदवार ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षानी धनगर जमाती संबंधीचे कोणते चांगले निर्णय घेतले आहे?
९) त्यांच्या पक्षाने किती धनगरांना उमेदवारी दिली आहे?
१०) त्या उमेदवाराचा धनगर आरक्षणाच्या बाबतीत काय अजेंडा आहे?
११) त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सभागृहात किती वेळ मांडला आहे?
१२) त्यांच्या भोवताल फिरणारे कोण कोण मोठे धनगर नेते? कशासाठी जमा झाले आहेत?
आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर या प्रश्र्नांची उत्तरे आम्हा सामान्य धनगरापर्यंत येवू द्यावे. ही विनंती..
आपणचारात घेत नसलेला
आपलाच सामान्य धनगर बांधव