Tuesday, November 26, 2024

प्रा. राम शिंदे व शिलेदार खंडेराव होळकरांचा राजकीय पराभव सेम ... सेम ... सेम....सेम

 प्रा. राम शिंदे व शिलेदार खंडेराव होळकरांचा राजकीय पराभव 
सेम ... सेम ... सेम....सेम

डॉ प्रभाकर लोंढे


(याला ऐतिहासिक संदर्भ

प्रथम हा लेख वाचा.

https://sanjaysonwani.blogspot.com/2020/04/blog-post.html )


    महाराष्ट्राच्या विधानसभा २०२४ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रा. राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मधील पराभव कोणालाही पचनी न पडणारा व महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्यांना विचार करायला लावणारा आहे.. याशिवाय येथील विकृत प्रवृत्तींना उजाळा देणारा आहे.

   महाराष्ट्र विधानसभा २०२४ ची निवडणूक महायुती व महाआघाडी या दोन प्रामुख्याने  आघाड्यामध्ये लढली गेली हे सर्वांना माहीत आहे.

      प्रा. राम शिंदे महायुतीचा उमेदवार म्हणून कर्जत जामखेड मधून रिंगणात होते. असे असताना त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांचा पक्ष (बीजेपी ) व घटक पक्षांच्या नेत्यांवर होती. याचा अर्थ त्यांच्यासाठी वेळ देणे, प्रचार सभा घेणे, प्रचारासाठी आवश्यक ती मदत करणे हे प्रथम देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे परम कर्तव्य होते. परंतु असं झालेलं दिसत नाही.. याची खंत खुद्द राम शिंदे सरांनी व्यक्त केलेली आहे.

      त्यांना दिल्ली कार्यालयातून सुद्धा मदत मिळाली नाही.  फडणवीस साहेबांनी सुध्दा कर्जत जामखेड मध्ये सभा घेतली नाही. अजित पवारांनी तर राम शिंदे सरांना प्रतिसादच दिला नाही. यविषयी राम शिंदे सरांनी खेदपुर्वक आपबिती सांगितली... त्यामुळे सभा घेण्याचा प्रश्नच नाही. उलट राम शिंदे सरांचे प्रतिस्पर्धी महाआघाडीचे उमेदवार रोहीत पवार यांच्या विजयासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. हे सिद्ध झालेले आहे. व त्यांनी ते अप्रत्यक्ष कबुल सुद्धा केलेलं आहे.

    ही सर्व परिस्थिती पहाता,  राम शिंदे यांना स्वबळावरच आपला मतदारसंघ लढावा लागला. ( आधुनिक पेशवा देवेंद्र फडणवीस व मराठा सरदार अजित पवार यांच्या नाटकीय सहकार्याला सांभाळत मतदारांपर्यंत जाणे. आपलं अस्तित्व निर्माण करणे. ते टिकवून ठेवणे,  त्याला मतदानात व मतदानानंतर आपल्याला अपेक्षित निकालात परावर्तित करून घेणे, केवळ पवार घराण्यालाच शक्य असलेलं काम राम शिदे साहेबांना शक्य झालं नाही.. आणि राम शिंदे सरांचा पराभव झाला हे त्यांना न पचणारं सत्य स्विकारावं लागलं.

       साम-दाम-दंड- नीतीभेद याचा वापर करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झालेल्या मतदारसंघात आपला नातू रोहित पवार ला निवडून आणणे, यासाठी कोणत्याही खालच्या पातळीवर जायला तयार असलेल्या सन्माननीय शरद पवारांच्या सुपरीचित नीतीला भेदणे , अहील्याबाईंचा रक्त व तत्वशील वारसा जपणाऱ्या प्रा राम शिंदे यांना शक्य झालेलं दिसत नाही. यात राम शिंदे साहेब कमजोर होते असं कदापिही नाही.. 

       परंतु वयस्कर शरद नितीचा शब्द मोडेल, एवढे राजकीय नैतिक सामर्थ्य आज तरी देवेंद्र फडणवीस कडे आहे, असं मला वाटत नाही..  (मागील लोकसभेत सुप्रियाताई सुळेंच्या विरोधात महादेव जानकर साहेब यांच्या साठी सुद्धा मा्. नरेंद्र मोदी साहेबांनी सुध्दा सभा घेतली नाही ) (यावेळी तर घरातच नाटकीय विरोध तयार करून-सुप्रिया×सुनेत्रा, अजित×युगांत अशी सत्ता घरातच ठेवण्याची नाटकीय कला जर कोणाला जमली असेल तर मा. शरद पवार साहेबांचं नाव प्रथम येतं) 

     राम शिंदे सर आपलं युद्ध हे कुंभेरीच्या युद्धासारखं होतं. ज्याप्रमाणे या युध्दात पेशवा रघुनाथराव व मराठा सरदार जयाजी शिंदे हे दोघेही सुभेदार मल्हारराव व शिलेदार खंडेराव होळकर यांच्या सोबत असले तरी प्रतिस्पर्धी शत्रू सुरजमल जाटाशी जवळीकता साधून होते,  युध्दानंतर सुरजमल जाटाला संरक्षणाची हमी देणारे जयाजी शिंदेच होते. व त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेणारे पेशवा रघुनाथराव होते. परिणाम होळकरांना भोगावे लागले. सुभेदार मल्हाररावांचा कर्तबगार वारस गमवावा लागला... त्यांना पचनी न पडणारा दुःख पचवावं लागलं.

      तुमच्या कर्जत जामखेडच्या 2024 च्या युद्धात अजित पवार तुमच्या सोबत असले तरी ते तुमचे कधीच नव्हते.  देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच बघ्याची भूमिका घेतली कारण ते आतून शरद पवारांच्या आज्ञेचा सन्मान राखणार होते.

 कुंभेरीच्या लढ्यात पराक्रमी खंडेरावांचा बळी गेला.  सुदैव की तुम्ही जिवंत आहात. सत्तेसाठी आम्ही कोणत्याही स्तरावर जाणार .... हा येथील महाराष्ट्रीयन काही प्रवृत्तींचा गुणधर्म आहे.....

 यापूर्वी आदरणीय महादेव जानकर साहेबांना सुद्धा अशाच प्रकारे बारामती मध्ये एकाकी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा वारसा तुम्हाला भोगावा लागला.. शिंदे साहेब वाईट वाटण्याची गरज नाही कारण तो तुमचा नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न होता....

  लोकशाहीमध्ये तुम्ही जिवंत आहात.. जिएंगे तो और भी लडेगे!!!!

आता प्रश्न आहे फक्त ...

भारतीय जनता पक्ष / मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि!  आपलं राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे करतय?


  खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय जागृतीचा अभ्यासक)

9673386963



 








                  

Thursday, May 30, 2024

राजमाता अहिल्याबाई होळकरांचं हिंदूत्व नाही तर आध्यात्मिकत्व...

 राजमाता अहिल्याबाई होळकरांचं हिंदूत्व नाही तर आध्यात्मिकत्व...


डॉ प्रभाकर लोंढे


     भारताच्या इतिहासात राजमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव जे काही अतुलनीय आहे, त्यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजेच त्यांची आध्यात्मिकता .त्यांचा नेहमीच विशेषत्वाने उल्लेख केला जाते. 

      त्यांना मिळालेली पुण्यश्लोक पदवी किंवा त्यांनी जीवनभर केलेला धार्मिक स्थळांचा, त्यातही सर्वाधिक मंदिरांचा जीर्णोद्धार. याशिवाय त्यांचा दैनंदिन चालणारा दानधर्म,  व्रतवैकल्य, पुजा अर्चा , शिव शंकरा प्रती असलेली श्रद्धा या सर्व बाबी पाहता बहुतेक लोक त्यांना हिंदू किंवा अलीकडे तर काही महाभाग हिंदुत्ववादी, हिंदू धर्मरक्षक इथपर्यंतची विशेषण लावण्यासाठी उतावीळ झालेले पाहायला मिळतात. 

        यामध्ये काही चुकीचं आहे असं म्हणता येत नसलं, कोणाला चुकीचे ठरवणे हा माझा अधिकार नसला तरी या शब्दांच्या माध्यमातून राजमाता अहिल्याबाईंच्या जीवनाला मात्र मर्यादित केलं जात आहे, असं माझं नक्कीच स्पष्ट मत आहे. कारण त्या हिंदू धर्मात जन्माला आल्या.  हिंदू धर्मानुसार जीवनभर जगल्या.  हिंदू देवता शिवाशंकराच्या त्या भक्त असल्या तरी मात्र त्या केवळ हिंदू धर्माच्या होत्या. त्यांनी केवळ हिंदू धर्माचे रक्षण केलं. त्या हिंदुत्वासाठी जगल्या. त्या हिंदुत्ववादी होत्या, असं म्हणणं चुकीचं आहेत. कारण त्यांना कुठेही हिंदू धर्माची रक्षा करायची नव्हती, त्यांना मात्र मुळ हिंदू जीवन पद्धती मान्य होती,  त्याच वेळेस इतर धर्म पद्धती सुद्धा मान्य होती.त्या पध्दतीनुसार  जगणाऱ्या सुध्दा प्रत्येक माणसाच्या जगण्यामध्ये काहीतरी स्वारश्य निर्माण व्हावं, प्रत्येकाला आनंदानी जगता यावं. त्यांच्या जगण्यातील आनंद द्विगुणीत व्हावा, तो आनंद सातत्याने टिकून राहावा. त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करता यावी. प्रत्येकाचं जगणं सुखर व्हावं, या सर्व बाबी मात्र अहिल्याबाई होळकर यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन केलेल्या आहेत. त्या कधीच धार्मिक नव्हत्या, तर त्या धर्माच्या पलीकडे जाऊन त्या प्रचंड आध्यात्मिक होत्या.  

        त्यामुळे धर्म ही बाब त्यांना  जीवनामध्ये मर्यादित कधीच करु शकत नाही. धर्म ही प्रत्येकाची स्वतंत्रपणे खाजगी बाब असून  धर्म ही प्रत्येकाच्या घरची बाब आहे. 

       जेव्हा आपण समाजामध्ये जगत आहोत, त्यावेळेस जगत असताना आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे. माणूस म्हणून जगत असताना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ज्या आवश्यक आहे, त्या प्रत्येकाला मिळाल्याच पाहिजे. हा माणुसकीचा विचार त्यांच्या जीवनकार्याचा आधारस्तंभ होता.

          प्रत्येकाच्या ज्या दैनंदिन गरजा आहे त्या पूर्ण झाल्याच पाहिजे. त्या पूर्ण करताना कुठलाही त्रास होणार नाही मग तो व्यक्ती कुठल्याही धर्माची असो.  त्याला माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते ते देण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याचं काम राजमाता अहिल्याबाई होळकरांनी जीवनभर केलं. 

       ते हिंदू धर्माची म्हणून केलेलं नाही. कुठल्या हिंदूंसाठी केलेलं नाही. प्रत्येक माणूस हा माणूस असून मग ते धर्माने मुस्लिम का असेना,जैन का असेना, बौद्ध का असेना प्रत्येक धर्माच्या माणसासाठी ते होतं. 

                    थोडक्यात सांगायचं झालं तर अहिल्याबाई होळकरांच्या कार्याला एका धर्मामध्ये बांधून त्यांना मर्यादित करण्यासारखं होणार आहे. म्हणून हिंदुत्वाचे लेबल अहिल्याबाई होळकरांवर लावणं ही खऱ्या अर्थाने चूक आहे्  त्यांना हिंदुत्वामध्ये मर्यादित करून त्यांची जी वैश्विक दृष्टी, किर्ती आहे.  त्यांचा जो सर्वधर्मसमभाव आहे. त्यांचा जो काही वैश्विक दृष्टिकोन आहे. विश्व कुटुंबाच्या दृष्टिकोन आहे, तो मात्र हिंदुत्वामध्ये बांधून मर्यादित करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे केला जातो,  हे आम्ही केव्हा समजून घेणार आहोत..????



(२९९ जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन व आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!)



डॉ प्रभाकर लोंढे

नागपूर