Thursday, November 21, 2019

केवळ धनगरांचीच हालत अशी का?

केवळ धनगरांचीच हालत अशी का?

                     डॉ प्रभाकर लोंढे

महाराष्ट्रातील धनगर जमात बहूसंख्य, ऐतिहासिक दृष्ट्या संपन्न, तरीही वर्तमानात राजकीय दृष्ट्या ती इतकी अस्पृश्य का? हा प्रश्न प्रत्येकालाच पडणे सहाजिकच आहे.

           आपणा सर्वांना एक माहिती आहे की एखाद्याला नियंत्रणात ठेवण्याची इच्छा आहे, परंतु त्याच्या अफाट ताकतीची जाणीव आहे, त्याच्या त्या ताकदीपुढे आपण टिकू शकणार नाही याची हमखास भिती आहे. तेव्हा समोरच्याला त्याच्या ताकदीची व त्याच्या अधिकाराची जाणीवच होणार नाही. यासाठी प्रयत्न केले जातात. दुसरीकडे त्याला संधीच मिळणार नाही यासाठी हेतुपुरस्सर डावलण्याचे तसेच त्याची शक्ती कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू असतात. त्याच्या कमजोरी शोधून त्याबाबतीत त्याला पुन्हा कमजोर कसा करता येतील यावर जोर दिला जात असते, कारण त्यांना माहित असते की, हे शक्य झालं तरच आपण समोरच्याला नियंत्रणात ठेवून त्याचा आपल्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे वापर करू शकतो. याचं उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर बैल या पाळीव प्राण्यांचं घेता येईल.

                मानवी विकास प्रक्रियेत त्याला बैलाची मिळालेली साथ समस्त मानव जात कधीच विसरू शकत नाही, परंतु त्याला नाकात व्यसन घातल्याशिवाय व त्याला निर्बीज केल्याशिवाय माणूस त्याच्या ताकतीचा वापर करण्याची हिंमत सुध्दा करू शकत नाही, हे माणसाला माहीत असल्यामुळेच माणूस स्वार्थापोटी बैलावर ही दोन अमानुष ( वेसन- नाकात दोरी घालणे व नपुसक करणे) कृत्य करीत असतो. तो बैल आपल्या नियंत्रणात (वेसन)राहिल  व त्याला त्याची क्षमता (नपुसक) सुद्धा वापरता येणार नाही. याची काळजी मानवाने घेतली. म्हणूनच पिढ्यानपिढ्या पासून मानवाची गुलामी  स्वीकारून बैल इमानेइतबारे मानवाच्या सेवेत रुजू आहे. एवढंच काय गुलामीची हद्द तेव्हा ओलांडली जेव्हा बैलाने नंदीबैल म्हणून माणसाच्या चरणी  संपूर्ण समर्पण केलं.
            यामध्ये त्या बैलावर अन्याय होत आहे हे जरी मानवाधिकारांच्या व प्राण्यांच्या हक्काच्या गोष्टी करणाऱ्या माणसाला मान्य असलं तरी त्याशिवाय बैलाच्या शक्तीचा वापर करण्याची लायकी आपल्यात नाही,  याची जाणीव/ भीती माणसाला वाटत असल्यामुळेच तो बैलांसाठी वेसनमुक्तीचा जाहीरनामा हा पशूप्रेमी माणूस कधीच प्रसिद्ध करणार नाही. बैलाच्या  नाकातील ती वेसन काढणार नाही. कारण मानवाने हे ओळखलं आहे की, त्यावरच यांच्या स्वामित्वाचं व बैलाच्या गुलामीचं सुत्र आधारलेलं आहे तसेच मानवी विकासाचं गुणसुत्र अवलंबून आहे.
   
        हे सर्व गुणसूत्र महाराष्ट्रातील आजच्या धनगर जमातीच्या बाबतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लागू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. या भारतातील सर्वांगीण दृष्टीने सर्वाधिक बलवान जमात कोणती असेल तर धनगर जमात आहे, इतिहास,  समाज, संस्कृती, पराक्रम, धैर्य, मेहनत, व अत्यंत महत्त्वाची लोकाभिमुखता याबाबतीत परिपूर्ण असलेली महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारतातील धनगर जमात येथील समाजव्यवस्थेच्या विकासाचा आधारभूत केंद्रबिंदू आहे. हे या धनगर जमातीचं प्रमुख बलस्थान आहे.
                या देशातील संपूर्ण इतिहास व ऐतिहासिक पराक्रम, राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे याच जमातीच्या सभोवताल फिरतात. ही या जमातीची प्रमुख वास्तविकता. ती त्यांची ताकद येथील विशिष्ट गैरधनगर लोकांनी ओळखलेली आहे. ही बाब धनगर जमातीच्या लक्षात येवू म्हणून ते या जमातीच्या बाबतीत सातत्याने षडयंत्र रचून तिला दुर्बल करण्याचा प्रयत्न करतात. या जमातीला संधीच मिळणार नाही याची दक्षता घेतात.
        याठिकाणी आपण अलीकडील काळाचा विचार करू, पेशवाईच्या काळानंतर येथील प्रस्थापित व्यवस्था सुव्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी या धनगर जमातीतील लोक गुलाम मानसिकतेत, अदृश्य गुलाम म्हणून जगत राहले तरच ह्या व्यवस्थेतील विशिष्ट प्रस्थापितांच्या अस्तित्वाची सूत्र जुळते. ते सुत्र सतत कायम रहावे यासाठी या धनगर जमातीला अंधश्रद्धेच्या माध्यमातून, त्यांच्या पराक्रमी इतिहासापासून अनभिज्ञ ठेवून, तो इतिहास नष्ट-भ्रष्ट करून, यांच्या कर्तबगार स्त्री पुरुषांना देव- देवी बनवून, त्यांच्यासंबंधी दैविक, चमत्कारिक आख्यायिका बनवून,  त्यांच्यामध्ये कर्तबगार पुरुष निर्माण होणारच नाही याची दक्षता घेऊन केवळ वैचारिक नपुसक, आज्ञाधारी गुलाम पिढी जन्माला येईल अशी परिस्थिती सातत्याने टिकवून ठेवली जाते
                  त्या परिस्थितीमुळे धनगरांना स्वतःची, स्व अस्तित्वाची, स्वपराक्रमाची, स्वताच्या क्षमतांची जाणीवच होत नाही, परिणामी धनगर जमातीतील बहूतांश वर्ग मान्य करीत नसला तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक गुलाम म्हणून जगत असताना दिसून येतो. यावर काहींचा आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी सामाजिक आत्मपरीक्षणा शिवाय आपणाकडे पर्याय उरत नाही.
                 दुसरं असं की, या जमातीतील जे लोक सामाजिक दृष्ट्या धडपडतात, काही तरी करण्याची आकांक्षा ठेवतात, त्यापैकी काहींना नियंत्रित सत्तापद, संपत्ती, नोकरी याचे लाभ देवून किंवा काही वेळा नुसती प्रलोभने देऊन कायमची गुलामी लादण्याचा प्रयत्न सुरू असतो. जमातीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे गुलामांची फौज निर्माण होत राहील व ती सातत्याने टिकून राहील याचा सातत्याने प्रयत्न या प्रस्थापितांकडून सुरू असतो. त्यासाठी धनगर लोकांमधील काशिराव (कच्चे दुवे Under control लाभार्थी) हाताशी धरून स्वयंनिर्भर/स्वाभिमानी विठोजीचा राजकीय खून केला जातो.  आणि लाभार्थीच्या माध्यमातून संपूर्ण जमातीला भावनिक आव्हाने केली जातात व त्या बेसवर संपूर्ण जमात स्वत्व विसरून भावनिक होवून प्रस्थापितांच्या मागे फिरतात. याची उदाहरणे आज मी देण्याची गरजच नाही. प्रत्यक्ष अनुभवू शकता.
              म्हणूनच. आज गुलामीच्या वेसनी कापून अंधश्रद्धा, अंधभक्ती, प्रलोभने यांच्याआधारे हेतूपुरस्सर लादले  जाणारे राजकीय नपुंसकत्व ओळखून धनगरांच्या सामाजिक, ऐतिहासिक ताकदीची जाणीव करून देणारे विचार व नेतृत्वच धनगरांची राजकीय हालत सुधारू शकतात.
तेव्हा आपणास शून्यातून विश्व निर्माण करणारे मल्हारराव प्रेरणा देवू शकतात. पेशवाईचे शडयंत्र जाणणाऱ्या राजमाता अहिल्याबाई जगण्याचा संदेश देतात. सर्वांची पराक्रम गाजविण्याची क्षमता जाणणारे यशवंतरावच परिस्थितीवर मात करण्यासाठी मार्ग दाखवू शकतात.
           तेव्हा परिस्थितीला शरण जायचं व माझं भलं होईल याची अपेक्षा करीत स्वकियांना लाथाडून शडयंत्राला बळी पडत काशिराव म्हणून जगायचं?  की ती विदारक परिस्थिती लाथाडून यशवंतरावांसारखं पुणर्उत्थान करायचं?  ज्याचं त्यांनी ठरवायचं.......

खूप खूप शुभेच्छा!!


एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Saturday, October 26, 2019

धनगर जमातीत आता कोण यशवंतराव जन्माला येतो एवढेच बाकी..*

‌🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
 *धनगर जमातीत आता कोण यशवंतराव जन्माला येतो एवढेच बाकी..*
  (हडपसर युद्ध दिनविशेष)

                    *डॉ प्रभाकर लोंढे*

                     महाराष्ट्र विधानसभा निवडणूकाचा निकाल, त्यापूर्वीचे प्रचार, त्यापूर्वीच्या जागावाटप, त्यापूर्वीच्या धनगर नेते- लोकांच्या सभा,  त्यापूर्वीचे धनगर नेतृत्वाचे स्वतःचे निर्णय, कदाचित कोणी त्यांना ...... सुद्धा म्हणतील. निर्णय कुठलेही असो त्या निर्णयाची यथार्थता निकालानंतरच कळत असते. कधी नव्हे तेवढे धनगर उमेदवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. पण *निकाल काय तर .... सर्वांना माहीतच आहे.... लज्जास्पद!?*
          शेवटी धनगर बड्या नेत्यांचा पराभव, अख्या महाराष्ट्रातून एकमेव धनगर उमेदवार निवडून येणे, आ. महादेव जानकर साहेबांशी झालेली धोकाधडी, अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार निवडून येणे.
             धनगरांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महत्वाच्या पदावर असलेले धनगर नेतृत्व, शंभर उमेदवारी देण्याची घोषणा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी ने धनगरांना २0 उमेदवारी देणे, ऐनवेळी वंचित बहूजन आघाडीकडून महत्त्वाच्या धनगरांना तिकीट नाकारणे, वंचित बहूजन आघाडीचे काही धनगर मातब्बर  रणांगणातच न उतरणे, वंचित बहुजन आघाडीने ऐन वेळेवर आपली संशयास्पद रननिती बदलविणे,  आ. *आ. हरिदासजी भदे* सारख्या प्रगल्भ राजकीय नेतृत्वाचा पराभव होणे व त्यासाठी समस्त प्रस्थापित एक होणे, धनगरांचा बुलंद आवाज व स्वबळावर किल्ला लढवितांना निसटता पराभव पत्करावा लागला असे ते *आ. अनिल अण्णा गोटे* बीजेपी व प्रस्थापितांना पुरून उरले नसले तरी जिगरबाज लढले. संपते की काय अशा परिस्थितीत गेले.
         *नारायण आबा पाटील* यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारणे, अपक्ष लढले असता थोड्याफार फरकाने पराभव पत्करावा लागणे, *आदरनीय राम शिंदे* साहेबांच्या विरोधात पवार घराण्याने उमेदवार टाकणे व राम शिंदे सारखा बीजेपी मधील मजबूत धनगर चेहरा असलेल्या धनगर नेतृत्वाला पराभव पत्करावा लागणे. धनगर आरक्षणाच्या नावाखाली खासदार झालेल्या *डॉ महात्मे* साहेबांच्या भावाला सुध्दा बीजेपीने उमेदवारी नाकारणे. धनगरांच्या मतांवर मजबूत झालेल्या बीजेपीने अख्या धनगर जमातीलाच कमजोर बनविणे.
        सलग अकरा वेळा आमदारकीचा विक्रम करणाऱ्या *आ. गणपत आबा देशमुख* यांचा वारसा संपुष्टात येणे,
धनगरांच्या पन्नास पोरांना आमदार करण्याची वल्गना करणाऱ्या *गोपीचंद पडळकरांनी* बीजेपीला शंभर दिवसात बेजार करून धनगरांना एसटी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे नावावर धनगरांना मागे फिरवणे, शेवटी *बीजेपी व्हाया वंचित बहुजन आघाडीतून -बीजेपी मध्ये लोटांगण घेणे व बीजेपी म्हणेल तिथे म्हणजेच बारामती मध्ये उमेदवारी घेतल्याने स्वत:च डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत धनगरांच्या इज्जतीची लत्करे वेशीवर टांगणे.*
          धनगरांना उमेदवारी मिळवून देण्याच्या नावाखाली वंचित बहूजन आघाडी धनगरांच्या पुढाकाराने सुरू झालेली असताना,  धनगर नेतृत्व निर्णय प्रक्रियेत असतांनाच २० धनगर उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून न येणे.
           कोट्यावधी धनगरांचं विधानसभेत एकमेव प्रतिनिधित्व करणारे *आ्. दत्ता मामा भरणे* आमदार निवडून येणे, यामागे दत्ता मामांचं स्वतःचं वलय, स्वतःची कार्यशैली यासोबतच दौंड इंदापूर मध्ये *जानकर साहेबांचे* कार्यकर्ते बीजेपीवर नाराज असण्याचे परिणाम असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

     *या सर्व गोष्टींचा विचार करता पुढीलप्रमाणे बाबी समोर येते*

१) प्रस्थापितांनी धनगरांच्या राजकीय सत्यानाशाचा सुनियोजित कट केला होता.
२)धनगर उमेदवार व नेते सक्षम होणार नाही याची पुर्णतः दक्षता घेतली गेली होती.
३) धनगरांमध्ये असलेल्या -------आमिषाला बळी पडणाऱ्यांचा पुरेपूर वापर केला गेला आहे.
४) यापुढे धनगरांचा राजकीय लढा येथील धनगर विरोधी प्रवृत्तीशी लढणे आवश्यक आहे.
५) धनगर नेतृत्वाची ताकद भक्कम आहे. पण  नियोजन तसेच परस्पर समन्वय यांचा अभाव यामुळे ती नेहमी प्रमाणेच विभाजित झालेली आहे.
६) धनगरांच्या मतविभाजनाची काळजी सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यात वं. ब. आघाडीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ मिळाली आहे.
७) एकूण विचार करता धनगरांचा राजकीय खून केला गेला  आहे.
८) या निवडणुकीनंतर धनगर राजकीय अस्मिता धोक्यात आली आहे
९) धनगर अस्मितेवर गंभीर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे
१०) आतातरी रडणं बंद करून लढाईला सुरुवात करण्याची वेळ आली आहे
११) खऱ्या अर्थाने यशवंतराव समजून घेवून पराक्रम गाजविण्याची वेळ आली आहे
          *_आजच्या (२५ आक्टोबर) दिनी थोर पराक्रमी यशवंतरावांनी हडपसर मध्ये आपला भाऊ विठोजीराव यांच्या खूनाचा व होळकरशाहीवर वाकडी नजर ठेवणाऱ्या पेशवे व शिंदेचा बदला घेतला.  (२४ आक्टोबर २०१९ ला आधुनिक पेशवे आणि मराठे यांनी यशवंतरावाच्या वंशजाचा सत्यानाश केला) आज भारतीय लोकशाहीच्या आखाड्यात धनगर नेतृत्वांचा खून केला गेला आहे.  हा यशवंतराव होळकरांच्या रक्ताचा अपमान आहे. म्हणून ही निवडणूक धनगर अस्मितेवर प्रश्न निर्माण करणारी आहे._*
              *यावर लोकशाही मार्गाने बदला घेणारा स्वाभिमानी यशवंतराव व स्वाभिमानी धनगर मावळ्यांचीच गरज आहे. त्यासाठी कर्मप्रधान स्वाभिमानी राष्ट्रप्रेमी यशवंतराव वाचणे, समजून घेणे अत्यंत आवश्यक व प्रेरणादायी असणार आहे.*

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Wednesday, October 23, 2019

दोस्ती

दोस्ती

उन दोस्तो की मैफिल मे
मै जिता जागता रहा हर दिन.
ऐसे भी मिले दोस्त
जो जी न सके मेरे बिन.
फिर भी एक दिन ऐसा आया
जो न था मेरा और न किसी का.
दोस्तो से होकर भी घेरा,
मै पड गया था अकेला.
मौत ने छिन लिया इसे,
ऐसा कह रहा था हर दोस्त मेरा.
पर कुछ नहीं कर पाया
बन गया था वो बेचारा.
मौन हो कर देख रहा था मै
वह मेरे दोस्त कि हालात.
सिर्फ मौत से ही बचा न सका था,
मुझे वो जिगरवाला दोस्त मेरा.


उन मेरे दोस्तो को सलाम
जो मेरे व्यवहार को नही
मेरी सोच को मानते है!
मेरी वाणी को नही
जीवन का बदलना जानते है!

लक्षवेध

लक्षवेध

पाजळ तुझी शस्त्रास्त्र
अन् येऊ दे त्यास धार.
एकवटून सारं बळ
नेम धरून अचूक कर वार.
होवू दे आर या पार.
चालेल एकदाची व्यवस्था
झालेली थंडगार.
पुन्हा एकदा सांगतो,
असेल तुझ्यात हिम्मत
तर न चुकता
तो कोथळा बाहेर काढ.
येथील विकारग्रस्त व्यवस्थेचा.
जिथे अनेक मुखवटे
पोसले आहेत खाण्यासाठी भाड.
मात्र हे करताना
एकच लक्षात ठेव,
तुला ते करायचं आहे
तर ते केवळ
निर्विकार समाज अन्
निष्कलंकित मानवी मनासाठी.

   डॉ प्रभाकर लोंढे

संधीसाधू

संधीसाधू

याला बोलता येत नाही.
कुठे काय बोलायचं?
समजत नाही,
असं म्हणणारे,
वेळ येताच
तुमच्या बोलण्यावर
अलगद भाळून जातात.
संधी मिळताच तुमच्या
मार्गावर चालून जातात.
तेव्हा तो
तुमच्या वाणीचा नाही तर
यशस्वी कहाणीचा दोष आहे.
कारण
त्यांना तुमच्या
बोलण्यावर नाही
तर क्रियाशीलतेवर रोष असतो.

डॉ प्रभाकर लोंढे गोंदिया

अनुबंध

अनुबंध

समजत नाही तू अशी
नाकावर का खाजवतेस?
असं तर नाही ना?
हृदयातून तू मला खिजवतेस.

की नुसतच ब्युझी
असल्याचे वारंवार भासवते.
तुझं ते खाजवणं मात्र
हृदयातून मला फसवते.

तुझं नाक, माझं हृदय
तुझंच हृदय, तुझंच नाक
याचं सुत्र तू जूळवते
असं तर नाही ना
मला पाहून नाक तुझं खवळते.

विचार विद्रोही

विचार विद्रोही

तुम्ही बना गांधी
आम्ही बनतो इथे,
गरज पडेल तेव्हा
तो नत्थू , तो राम.

शांती, अहिंसा, सत्य
या तत्वांच्या पुजक
राज्यातील कदाचित
महाभयंकर हराम.

पण खबरदार!
आम्हाला हरामखोर म्हणणाऱ्यानो!
तुम्ही आम्हाला जास्तच गांधी
समजावत राहिलात तर
तुमचंही भारी करू काम.
कारण तो नत्थू, तो राम
आम्हीच जन्माला घातला आहे.