Monday, October 10, 2022

धनगर नेते मतदार संघावर केंद्रित का होत नाही?

 धनगर नेते मतदार संघावर केंद्रित का होत नाही?


डॉ प्रभाकर लोंढे


            परळी म्हणलं तर मुंडे, संजय राठोड - दारव्हा, नारायण राणे परिवार-सिंधुदुर्ग कोकण, पवार परिवार- पुणे बारामती,  गोंदिया+भंडारा- प्रफुल्ल पटेल, नाशिक- भुजबळ परिवार, गडकरी- नागपूर, फडणवीस- नागपूर, सांगोला-स्व गणपत आबा देशमुख, अकोला- प्रकाश आंबेडकर, नवनीत रवी राणा- अमरावती अशी अनेक मतदार संघ आपल्याला सांगता येईल की; ज्यांची ओळखच त्या राजकीय नेत्याच्या नावाने झालेली आहे. याचा अर्थ त्यानी त्या मतदारसंघाला आपला बालेकिल्ला बनवलेला आहे. आपली स्वतःची ओळख त्या मतदारसंघाच्या माध्यमातून करून घेतलेली आहे. त्या त्या मतदारसंघांमध्ये जनसंपर्क वाढवून स्वतःची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यांच्याकडे केवळ आपला जातीच्या नाही तर विविध समाजातील कार्यकर्त्यांची फौज आहे..‌‌         

      जेव्हा जेव्हा राजकीय सत्ता मिळाली तेव्हा राजकीय सत्तेचा वापर करून तेथील विकास कामांना महत्व देऊन सामाजिक समीकरणे आपल्याला पोषक करून घेतलेली आहे. जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. तेथे आपला सातत्याने विजय होत राहील याची काळजीच नाही तर नियोजन केलेला आहे. परिणाम तर त्या त्या मतदारसंघातून त्यांना हरविणे कठीण नसले तरी सहज शक्य होत नाही.. 

      या ठिकाणी सांगायचं हेच आहे की त्या त्या नेतृत्वाची तेथील जनमाणसामध्ये

राजकीय सत्तेत असो वा नसो एक छबी निर्माण झाली, त्यांनी त्या मतदारसंघात आपला सत्तेत जाण्याचा मार्ग निश्चित केलेला आहे. 

      त्यांनी कधीही आपल्या जातीचं, जातीच्या प्रश्नांचं, जमातीच्या भावनांचं भांडवल केलेलं दिसून येत नाही, किंवा आपल्या जातीचे भावनात्मक मुद्दे घेऊन त्यांनी कधी स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेलं नाही. (याचा अर्थ ते त्या विशिष्ट जाती जमातीचे नाहीत असा होत नाही),  त्यामुळेच ते विशिष्ट जातीचे नेते आहेत, या आधारे त्यांना कधी जनतेने स्वीकारले नाही. विविध जाती जमाती मध्ये त्यांचे असलेले कार्यकर्ते हाच त्यांच्या सर्वांगीण शक्तीचा उगम स्त्रोत असतो.

         धनगर जमातीच्या विद्यमान नेत्यांमध्ये काही विशिष्ट अपवाद नेते सोडले तर ते केवळ धनगर जमातीच्या प्रश्नांचं भांडवल करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  आपण त्या धनगर जमातीचा महाराष्ट्राचा मोठा नेता आहो.  किती मोठ्या प्रमाणात धनगर माझ्या पाठीमागे आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. हे ते का करतात? त्यांचं त्यांनाच माहित. परंतु पक्षश्रेष्ठीला खुश करून जमातीच्या बहुसंख्येच्या आधारे आपल्याला एखादं राजकीय पद मिळावं, ही अपेक्षा नाकारता येत नाही. 

        आणि आज पर्यंतच्या बहुतांश धनगर नेत्यांचा तो छुपा अजेंडा राहिलेला आहे, हे अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे. तेव्हा हे नेते अखंड महाराष्ट्रामध्ये धनगरांचे नेते म्हणून मिरवत बसण्यापेक्षा एखाद्या मतदारसंघांमध्ये आपलं वजन का निर्माण करीत नाही??  एखाद्या मतदारसंघातील सामाजिक समीकरणे का बांधत नाही?? त्या विशिष्ट मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना घेऊन पक्षश्रेष्ठींकडे का जात नाही?? मतदारसंघांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन त्या मतदारसंघात आपली स्वतःची ओळख का निर्माण करून घेत नाही??

जमातीच्या प्रश्नांच्या भांडवलाच्या आधारे एखाद्या वेळेस आमदारकी खासदारकी उपभोगल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच भावनात्मक मुद्द्यांच्या आधारे स्वतःचं राजकीय स्वहित का साध्य करू इच्छितात?

         विधानसभा राज्यसभेच्या माध्यमातून मिळालेल्या राजकीय सत्तेतून किंवा अन्य मार्गातून मिळालेला अमाप पैसा, त्यातून कार्यकर्ता निर्माण झाला असताना एखाद्या मतदारसंघावर ते केंद्रित का होत नाहीत? त्यांना लोकमताच्या आधारे निवडून जाण्याची हिंमत का होत नाही??हा मोठा प्रश्न निर्माण होतो व वैतागून समर्पक उत्तरासाठी सार्वजनिक करावासा वाटतो..


उत्तराच्या अपेक्षेत! प्रतिक्षेत!!


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर नेतृत्व आणि राजकीय जागृतीचा अभ्यासक)

Thursday, September 29, 2022

महाराष्ट्राची नीती समजून घेतल्याशिवाय धनगरांचा राजकीय उध्दार नाही.

 महाराष्ट्राची नीती समजून घेतल्याशिवाय धनगरांचा राजकीय उध्दार नाही.


डॉ प्रभाकर लोंढे

          हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराया नंतरचा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच पेशवाईचा इतिहास होय. आणि पेशवाईचा इतिहास म्हणजेच होळकरांच्या तलवार आणि मुसद्देगिरीच्या बळावर विस्तारित झालेला आणि शिंदे यांची कुबडी मिळाल्याने मजबूत झालेल्या पेशवाईचा झेंडा अटकेपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या वीरानी केलं तो वीर म्हणजे " सुभेदार मल्हारराव होळकर."

      शिंदे यांचे मूळ पुरुष राणोजी शिंदे यांना "पागा" म्हणून    

पेशवाई मध्ये स्थान ज्यांनी मिळवून दिलं व पागा म्हणून पेशवाईत प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या करंगळीला पकडून मल्हारराव होळकरांनी ज्याला मोठा केलं  हेच ते "राणोजी शिंदे" पुढे पेशवाईचा होळकरा नंतरचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनले.. या महाराष्ट्राच्या नाहीतर संपूर्ण भारताच्या राजकीय पटलावर शिंदे राजघराण्याचा उदय झाला.

       पुढे होळकर - शिंदे यांची जोडी त्यांच्या युद्धनीती व पराक्रम यासाठी संपूर्ण भारतात ओळखली जाऊ लागली. दोघांनी मिळून पेशवाईचा झेंडा अटकेपार फडकविला... मराठ्यांचा इतिहास तलवार आणि युद्धनीतीच्या जोरावर घडविला. प्रसंगी दिल्लीच्या बादशहाला घाबरविणारा आणि स्वामिनिष्ठा व नैतिकता असल्याने दिल्लीच्या तख्तावर बसण्याची संधी सोडणारा थोर सुभेदार मल्हारराव होळकर जीवनभर शिंदे,पवारां सह मराठा सरदारांना मान, स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठा शिकवित राहीला.

     यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की, शिंद्यांना पेशवाई मध्ये राजकीय सत्ता आणि सरदार म्हणून स्थान व महत्त्व मिळवून देण्याचं काम सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केलं. स्वतःच्या मुलाप्रमाणे राणोजी शिंदे यांच्या मुलांना रणांगण व राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासाठी राजकारण युद्धनीतीचे डावपेच शिकविले, त्याच शिंदेंचा मुलगा जयप्पा शिंदे यांनी सुभेदार मल्हाररावांचा एकुलता एक पुत्र शूरवीर खंडेरावांना ज्या सुरजमल जाटानी मारलं, त्या सुरजमल जाटाला अभय देण्याचं विश्वासघातकी काम केलं.                    

          "सुरजमल जाटाचा शिरछेद करून कुंभेरीची माती यमुनेत टाकीनं तरच जन्मास आल्याचे सार्थक! नाही तर प्राणत्याग करीन!," या आपल्या प्रतिज्ञेवर, मराठ्यांमध्ये एकोपा टिकून राहावा, या राष्ट्रीय भावनेला जपण्यासाठी महापराक्रमी मल्हाररावांनी पाणी सोडलं. स्वतःच्या एकुलता एक मुलाच्या मृत्यूचं दुःख, घोर अपमान, विश्वासघात राष्ट्रहितासाठी पचविला. स्वतःला सांभाळात स्वामीनिष्ठा जपत पुन्हा राष्ट्र रक्षणासाठी स्वतःला झोकून दिलं.... 

       स्वतःची गादी सांभाळण्यात मग्न असणाऱ्या स्वामी पेशव्याशी जिवनात कधीही गद्दारी केली नाही. सहकाऱ्याचा वाटा न्यायाने दिल्याशिवाय राहीला नाही. "न्यायाला न्याय आणि दुश्मनालाही सन्मान" यासाठी दुश्मनाचाही सन्मान जनक अंतिम संस्कार ज्यांनी केला, तो थोरणी मुत्सद्दी सुभेदार मल्हारराव!

          दुश्मनाच्या स्त्रियांनी सुद्धा आपली इज्जत धोक्यात असताना लज्जा रक्षणासाठी   "मल्हार! तू कहा है?," या विश्वासानी आठवण करावी, प्रसंगी स्वतःच्या कमरेचा शेला  दुश्मनाचे(बादशहाच्या) स्त्रियांच्या लज्जा रक्षणासाठी ज्यानी दिला.. परिणामी, "मल्हार, आप यहा होते, तो हमारे उपर ऐसा गजहब नहीं होता!" अशा शब्दांत ज्या मल्हाररावां विषयी परस्त्रियांनी विश्वास व्यक्त केला,

         तो नीतीवंत मल्हारराव जीवनभर नैतिकता, स्वामीनिष्ठा, पराक्रम, बुद्धीचातुर्य, राष्ट्राभिमान, राष्ट्रनिष्ठा, परस्त्री सन्मान, स्वअस्तित्व निर्माण यासाठी जगला आणि स्वतःचा प्रत्येक श्वास मराठेशाही, पेशवाई जिवंत ठेवण्यासाठी खर्ची घातला. अशा त्या सुभेदार मल्हारराव होळकरांना जीवनाच्या शेवटच्या काळात पानिपतच्या युद्धातील मराठ्यांच्या पराभाचे खापर फोडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.. 


वाचकांनी समालोचनात्मक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन आपल्या सद्सद्विवेक बुद्धीच्या आधारे महाराष्ट्रातील सर्वांगीण नीती समजून घेण्याचा प्रयत्न करावा.. एवढीच अपेक्षा..




डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

Saturday, September 10, 2022

धनगरांना कपडे नाही तर नीती बदलण्याची गरज

 धनगरांना कपडे नाही तर नीती बदलण्याची गरज


डॉ प्रभाकर लोंढे


       शीर्षक वाचता बरोबरच काही बांधवांना या माझ्या विचारांचा कदाचित राग सुद्धा आलेला असेल, काहीतर फालतू लिखाण करत अकलेचे तारे तोडण्याचा आरोप सुद्धा माझ्यावर करून स्वतः मोकळे होण्याचा प्रयत्न करेल. असो! प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्यामुळे तो प्रत्येक वेळी प्रत्येकाने वापरलाच पाहिजे. अशा मताचा मी आहे. त्याचाच आधार घेऊन मी हे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.

         धनगर ऐतिहासिक समृद्ध जमात, धनगर सामाजिक सांस्कृतिक राजकीय वारसा लाभलेली जमात, असं प्रत्येक जण सांगताना दिसतोय, त्या आधारे छाती फुलवताना/ फुलवताना पण दिसून येतोय, खरच तो त्याचा अधिकार आहे, तो सुद्धा वापरलाच पाहिजे परंतु त्याचं तसेच धनगरांच्या प्रश्नांचं भांडवल करून स्वतःची पोळी भाजणारा धनगर दिसून येतो तेव्हा तो त्याच्या वारशावरच प्रश्नचिन्ह स्वत:च निर्माण करतो. हे करीत असताना कदाचित त्यांना याची कल्पना येत नसेल किंवा कल्पना येत असली तरी त्याच्या वाईट परिणामाची जाणीव नसल्याने? कदाचित ते तसे वागत असावे. 

           ते आपले ध्येय, निर्णय एका धनगर विरोधी विशिष्ट व्यवस्थेला पोसणारे आहेत हे सामान्य धनगरांपर्यंत पोहचूच देत नाही, कळू सुद्धा देत नाही. किंवा ते लपवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. त्यासाठी जमातीच्या प्रश्र्नांची लत्करे (स्वत:च  केलेली) पांघरूण नव्या रुपात नव्या उत्साहाने नि: संकोचपणे जमातीत फिरायला तयार होतात..... फिरताना दिसतात... फिरतात.

          या ठिकाणी त्यांनी ज्याप्रमाणे कपडे बदलावे त्याप्रमाणे त्यांचा तो कार्यक्रम चालू असतो. यावर काहीच हरकत नाही, कोणी किती वेळा कपडे बदलायचे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे परंतु जमातीला, जमातीमध्ये इमानेइतबारे काम करणाऱ्या स्वयंसेवी आणि समाज धार्जिण्या जमात बांधवांना नागडं करून कपडे बदलण्याचा यांचा कार्यक्रम जमातीसाठी पुढच्या पिढीला खूप घातक आहे.  तो जमातीच्या व इतर कोणाच्याच हिताचा नसतो. गुलामांची पिढी पैदा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारा त्यांचा उपक्रम मात्र नक्कीच सिध्द होतो. 

               धनगर आरक्षणाच्या नावावर कपडे बदलणारे जमातीला सुपरिचित झाले. राजकीय सत्तेसाठी कपडे बदलणारे सर्वांनी पाहीले. एका खासदारकीसाठी कायदेशीर धनगर आंदोलनाचे, आंदोलनातील सच्च्या कार्यकर्त्यांचे सामान्य धनगरांचे कपडे फाडणारे पाहीले, आज अख्या धनगर जमातीच्या ईज्जतीची लत्करे वेशीवर टांगून ठेवणारे नवीन कपडे घालून जमातीत फिरण्याच्या तयारीत दिसत आहेत.  त्यांना धनगर हित रक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा! म्हणूनच हा लेख प्रपंच.

          त्यापुर्वी मात्र सामान्य धनगर बांधवांच्या वतीने एकच विनंती आहे, तुम्हाला काय काय बदलायचे आहे ते बदला, परंतु त्याअगोदर बहूतेकांना आपली नीती बदलणे आवश्यक आहे. 


        विद्येविना मती गेली

        मती विना नीती गेली

        नीती विणा गती गेली

         गती विना वित्त गेले.

         वित्ताविणं शुद्र खचले

         इतके अनर्थ एका अविद्येने केले.

        

          हा महात्मा फुले यांचा विचार समस्त शुद्रांच्या अधोगतीची कारणमीमांसा स्पष्ट करणारा मूलमंत्र प्रत्येक धनगरांनी समजून घेणे आवश्यक आहे. धनगरांना शुद्र माणायचं की नाही हा मोठा प्रश्न असला तरी जमातीची आजची अवस्था दयेवर जगणारी आहे. याचना करणारी आहे. मागुन खाणारी आहे. ही जमात आज राजकीय दृष्ट्या अतिशुद्र या प्रवर्गात मोडते, ही दुरावस्था घालविण्यासाठी प्रत्येकाला आपल्या नीती, कृतीमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे.

           जमातीची दुर्गती मतीहीन लोकांच्या नीतीहीन अनुनयाचा परिणाम आहे. त्यामुळेच जमात विकासाच्या बाबतीत गतीहीन (प्रवाहातून बाहेर फेकल्या गेली)  झाली.

जमात जागच्या जागी थांबली. निसर्गाचा नियम (थांबला तो संपला) आहे की, ज्याची गती ( बदलाचा वेग) थांबली, तो हळूहळू संपतो. 

म्हणून संपण्याच्या आधी धनगर जमातीने सावरणे आवश्यक आहे. त्यासाठी जमातीच्या प्रश्र्नांची जाण ठेवून दिर्घायुषी नीती निर्धारण म्हणजेच ध्येयधोरण व कृती कार्यक्रम आवश्यक आहे. तरच भावी पिढीला न्याय मिळण्याची शक्यता आहे.....


धन्यवाद!!!!


डॉ.  प्रभाकर लोंढे 

धनगर राजकीय नेतृत्व 

आणि 

जाणीव-जागृतीचे अभ्यासक

९६७३३८६९६३

Friday, September 9, 2022

राजमाता अहिल्याबाई होळकर यांची वैश्विक अद्वितीयता,

 राजमाता अहिल्याबाई होळकर यांची वैश्विक अद्वितीयता,

डॉ प्रभाकर लोंढे


          इतरांवर अधिराज्य गाजवण्याची प्रत्येकामध्येच नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतरांवर प्रभाव निर्माण करण्याची अभिलाषा प्रत्येकच अंतर्मनात असते. यातूनच राजकीय सत्ता प्राप्त करून स्वतःला अपेक्षित असा जगाला आकार देण्याची उपभोग प्रामाण्यवादी अघोरी वृत्ती सुद्धा निर्माण होऊ शकते.

       यातूनच जग जिंकण्यासाठी निघालेला नेपोलियन असो की सिकंदर, मुस्लिम शासक बाबर असो की अकबर, चंद्रगुप्त मोर्या पासून कलिंगच्या युद्धापर्यंतचा सम्राट अशोक असो, किंवा शिवरायांनी निर्माण केलेल्या शिवशाहीच्या वारसांना हटवणारे पेशवे असो, एवढेच नाही तर इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणाच्या माध्यमातून स्वतःच्या साम्राज्यवादी नितीने जगात दबदबा निर्माण करणारे इंग्रज, राणी एलिझाबेथ शिवाय वारेन हेस्टिंग सारखे अनेक इंग्रज अधिकारी असो, किंवा आजच्या वर्तमानातील भारत, महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेसाठी चाललेली नितीभ्रष्टता असो, या सर्वांच्या पायाशी स्वार्थ, उपभोगवादी वृत्ती असून त्यासाठीच त्यांनी जीवन घालवलेले आहेत. त्यांच्या सर्वांच्या जीवनाचा अर्थच तसा निघतो आहे... 

     असे हे साम्राज्यवादी आणि अतिक्रमणकारी भूमिका असणारे भौतिकतावादाला  प्राधान्य देणारे जागतिक सम्राट जगाच्या लवकर लक्षात आले, जगाच्या नजरेत चटकन भरले. परंतु संपूर्ण जगाचा सर्वांगीण इतिहास लक्षात घेतला तर जगाच्या पाठीवर स्वतःच्या जीवनधर्म, कर्म, आणि बुद्धीप्रामाण्य यांच्या आधारे संपूर्ण जगात सुख, शांती आणि मानवतेची महती गाणारे, स्वकर्मातून मानवतेला अलंकारित करणारे राजे, महाराजे आणि त्यामध्येही महाराण्या यांना मात्र आपल्याला विशेष समजून घेणे आवश्यक ठरते.

      जगाच्या इतिहासामध्ये आपल्या कर्माने नावलौकिक कमाविणाऱ्या महाराण्यांचा शुक्ष्म अभ्यास केल्यास त्यामध्ये  मध्ययुगीन कालखंडात भारताच्या  इंदोर संस्थानात होऊन गेलेल्या महाराणी अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख जागतिक पातळीवर प्रथमस्थानी करावाच लागतो.  त्याशिवाय महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.

     देश-विदेशातील ऐतिहासिक संदर्भाचा अभ्यास केल्यास महाराणी अहिल्याबाई होळकरांचा इ.सन १७६६ ते १७९५ असा २९ वर्षाचा माळवा प्रांतातील राज्यकारभार असला तरी तो संपूर्ण भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्त्री कर्तुत्वाला परमोच्च शिखरावर नेऊन पोचविणारा आहे. 

        स्वतःच्या वैयक्तिक सुख-दुःखाकडे लक्ष न देता, त्याच्यावर मात करीत धर्म, जात, लिंग, प्रांत या संकुचित भावनांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानव जातीच्या सुखात स्वतःच सुख शोधणं,  स्वतःकडे असलेल्या राजकीय सत्तेचा वापर लोककल्याणासाठी करीत असताना स्वतःच्या उत्तरदायित्वाचं स्थान 'स्वतःच' ईश्वराला निर्धारित करणं, त्याच्या साक्षीने सर्व लोकोपयोगी कार्य प्राधान्याने करणं, न्यायाधारित समाज निर्मितीला प्राथमिकता देत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, कोणीही दलित, शोषित, पिडीत, वंचित, उपेक्षित राहणार नाही, या सर्व बाबींची काळजी घेणारी आदर्श राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा विक्रम जर जगाच्या इतिहासामध्ये कोणत्या देशाच्या नावे दिसत असेल तर तो आहे भारत व त्यातही लोकमाता अहिल्याबाई होळकर या नावाचाच उल्लेख करावा लागतो.

      राजमाता अहिल्याबाई होळकरांनी धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारणाला लोककल्याणाचा मार्ग बनवले,  प्रत्येक हातात कौशल्य, कौशल्य पूर्ण हाताला काम व कामाचे उचित दाम, या तत्त्वावर राज्याचा आर्थिक, सामाजिक विकास साध्य करण्याचे मॉडेल अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यात तयार केले होते की, जे आजही जगाला दिशादर्शक आहेत. 

     चूल- मुल आणि उपभोग्य वस्तू याच्या पलीकडे तत्कालीन सामाजिक वास्तव तसेच परिस्थिती नसलेल्या त्या काळातील स्त्रियांच्या मनगटाबरोबर भयग्रस्त मनात बळ भरण्याचे कार्य करणारी, स्त्रियांच्या हातात तलवार देवून महिलांची फौज निर्माण करणारी जगातील पहिली राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकरांच्या नावाचा इतिहासात उल्लेख येतो . ही जगाच्या इतिहासामध्ये स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी  बदल घडवून आणणारी  सर्वप्रथम बाब होती.

     राजमाता अहिल्याबाई होळकरांनी स्वतःपासून स्त्री शिक्षणास सूरवात केली व स्त्रियांच्या हातात सर्वप्रथम "शास्त्र" आणि स्त्रियांच्या फौजेच्या माध्यमातून "शस्त्र" दिले ही समाजाच्या व स्त्रियांच्या जीवनातील अतिशय मोठी ऐतिहासिक क्रांतिकारी घटना होती. 

    संपूर्ण भारताचा विचार केल्यास भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सर्वांगीण उच्च पदास इतर कोणतीही भारतीय ऐतिहासिक स्त्री पोहचू शकली नाही. म्हणजेच तिच्याशी तुलना करू शकेल अशी कुठलीही भारतीय स्त्री भारताच्या इतिहासात दिसत नाही.

          अशा या महान सर्वांगीण महीला क्रांतिकारी राज्यकर्त्यीची तुलना जागतिक पातळीवर जर करायची ठरविली तर ती केवळ ऑस्ट्रियाची राणी  "मारीया थेरेसा" हिच्याशीच होऊ शकते.

       मारीया थेरेसा आणि अहिल्याबाई होळकर या जवळपास समकालीन होत्या. राणी मारीया युरोप मध्ये तर राणी अहिल्या आशियाई भारतात होवून गेली. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म इ.स.१७२५ मध्ये मे महिन्यातील ३१ तारखेला तर मारीया थेरेसा चा जन्म १७१७ मध्ये मे महिन्यातील १३ झाला होता. दोन्हीच्या जन्मामध्ये नऊ वर्षाचा फरक होता. राणी अहिल्या इ.स १७६६ मध्ये राजगादीवर आली तेव्हा ती ४१ वर्ष वयाची होती तर मारीया थेरेसा इ.स. १७४० मध्ये राजगादीवर आली तेव्हा ती तरुण केवळ २४ वर्ष वयाची होती. 

      मारीया थेरेसाने इ. सन१७४० ते  इ. सन १७८० असा ४० वर्ष राज्यकारभार केला तर अहिल्याबाई होळकरांनी इ.सन १७६६ ते इ.सन १७९५ असा २९ वर्षे राज्यकारभार केला. दोघीही राजगादीवर आल्या तेव्हा निराधार अवस्थे मध्येच आल्या. त्यांना अबला समजून त्यांची राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न दोन्ही कडे झाला. अहिल्याचे राज्य गिळंकृत करण्याचा राघोबा दादा पेशव्याने प्रयत्न केला तर तिकडे मारीयाचे जीवनात तसा प्रयत्न प्रशियाचा राजा फ्रेडरिक याने  केला. परंतु असा हा प्रयत्न आपल्या मुसद्देगिरीने दोघींनीही हाणून पाडला आणि शेवटपर्यंत स्वबळावर राज्यकारभार केला.


      मारिया जन्मताच राजघराण्यातील होती. ती रोमन सम्राट "चार्ल्स सहावा" याची मुलगी होती, त्यामुळे तिच्यावर जन्मताच राजसंस्कार झाले होते परंतु अहिल्याचा जन्म एका सामान्य माहदाजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला.  मेंढपाळ कुटुंबात जन्म झाल्याने तिचे बालपण सामान्य असले तरी तिच्या विवाह नंतर तिच्या जिवाला फार मोठी कलाटणी  मिळाली. सासरे सुभेदार मल्हारराव होळकर व सासू गौतमाबाई होळकर यांच्या सर्वांगीण संस्कारामुळे व शिलेदार खंडेराव होळकरांची पत्नी म्हणून त्यांच्यावर जे संस्कार झाले ते त्यांना उच्च पदावर नेऊन पोचविण्यासाठी कारणीभूत ठरले.

    मारियाचा एकुलता एक भाऊ अकाली मृत्यू पावल्यामुळे व राज्याला वारस नसल्यामुळे ती राज पदावर आली होती तर अहिल्या सुद्धा एकुलता एक मुलगा मालेरावांच्या मृत्युनंतर होळकर राजगादीवर आली होती. म्हणजेच त्या काळामध्ये महिलांना राजगादी सामाजिक दृष्टीने फार मोठा समस्या होती. अशाही परिस्थितीमध्ये दोघींनीही आपल्या राज्याला सुव्यवस्थित सांभाळण्याचे एवढेच नाही तर एक राजकीय आदर्श निर्माण करण्याचे कार्य केले.

       त्यांच्या कार्यकाळात राज्यविस्ताराची अभिलाषा दोघींनीही कधीच बाळगली नाही. त्यामुळे इतर राज्यांना गिळंकृत करण्याचा दोघींनी कधीच प्रयत्न केलेला नाही. मात्र  सैन्य व्यवस्था दोन्हीकडे मजबूत होती, ती केवळ स्वसंरक्षणासाठी होती. 

          मेरिया थेरेसाचा विचार केला तर सुरुवातीला तिच्याकडे केवळ १५००० इतकी फौज होती. ती वाढत जावून तिच्या शेवटच्या काळात १ लाख ७०००० वर पोहचली होती. या सैनिकी शक्तीचा वापर करून ती आपल्या राज्याच्या सीमा विस्तारू शकत होती परंतु तिने तिच्या शक्तीचा वापर इतर राज्यांना गिळंकृत करण्यासाठी किंवा साम्राज्य विस्तारासाठी कधीच केला नाही. 

        त्याच प्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकरांचा जर विचार केला तर तुकोजी होळकरांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडे सुद्धा मोठी फौज होती. याशिवाय त्यांच्याकडे महिलांची स्वतंत्र अशी फौज होती. महिलांची फौज निर्माण करणे जगातील पहिली महाराणी म्हणून अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख करावा लागतो, 

          असं असलं तरी त्यांनी आपल्या राज्याची धनशक्ती सैन्यावर किंवा फौजेवर अतिरेकी खर्च करण्याचा त्यांच्या मानस नव्हता. त्यामुळे मेरीया थेरेसा च्या तुलनेत त्यांच्याकडे कमी फौज असली तरी त्यांना ती कधीच कमजोरी वाटली नाही. किंवा आवश्यक तिथे त्या कधीच कमी पडल्या नाही.

       अहिल्याबाईंनी युद्धाला कधीच प्राधान्य न दिल्यामुळे किंवा मानवी जीवनात त्यांना युद्ध नको असल्यामुळे त्यांनी केवळ स्वसंरक्षणासाठी अत्यावश्यक असेल तिथेच युद्ध स्विकारले. मात्र परराज्याला अंकित किंवा गुलाम बनविण्याच्या हेतूने कधीही कोणत्याही परराज्यावर आक्रमण केलेले नाही.

       दोघींच्याही धार्मिक जीवनाचा विचार केल्यास दोन्ही आपापल्या ठिकाणी धर्मात्मा होत्या. मेरिया कथालिक धर्माची तर अहिल्या हिंदू धर्माचे अनुपालन करणारी होती, असे असले तरी त्या कधीच एकाच धर्माच्या पुरस्कर्त्या नव्हत्या. किंवा धर्मांध नव्हत्या. त्यांचे वैयक्तिक, सार्वजनिक तसेच राजकीय अधिष्ठान धर्माच्या पलीकडे जाऊन होते. त्या दोघीही प्रत्येक धर्माला समान महत्त्व देत होत्या. असे असले तरी दोघींमध्ये अहिल्याबाई श्रेष्ठ ठरते.  धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे, यावर त्यांचा त्यातही अहिल्याबाईचा विशेष विश्वास होता.  तशी दैनंदिन जीवनात ती लागली सुद्धा...      

      खाजगी जीवनात प्रत्येकाने परस्परांच्या धर्माचा आदर केला पाहिजे यावर त्यांची ठाम निष्ठा होती. त्यांनी त्यांच्या हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मांच्या हार्दिक शुभेच्छा तेवढेच महत्त्व दिले एवढेच नाहीतर इतर धर्माच्या धर्मिक स्थळांची बांधकाम सुद्धा केली. 

         यामुळेच अहिल्याबाईंचा राज्यकारभार धर्माच्या पलीकडे जाऊन रजसत्तेला आध्यात्मिक अधिष्ठान देऊन मानवतेच्या कल्याणासाठी उभारलेला व चालवलेला तो एक "महायज्ञ" होता. जागतिक पातळीवरचा "आदर्श राज्याचा नमुना" होता म्हणूनच जगात त्यांची तुलना केवळ मारीया थेरेसा सारख्या महान राणीशी होऊ शकते, प्रसंगी अहील्या तिच्यापेक्षा काही बाबतीत श्रेष्ठ ठरते. असे ते श्रेष्ठत्व जपणारी, सर्वांगीण दृष्टीने महानत्व सिद्ध करणारी, पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावर देश विदेशातील इतिहासकारांनी, लेखकानी स्तुती सुमने उधळल्याचे इतिहासाच्या पानापाणी लक्षात येते..... ते त्यांच्या निष्काम सेवा व कर्माचे फलित आहे..


---------------------------


डॉ प्रभाकर रामाजी लोंढे

        ९६७३३८६९६३


Wednesday, August 24, 2022

ऐतिहासिक श्रध्दास्थानांवरील अतिक्रमण थांबवा.

 ऐतिहासिक श्रध्दास्थानांवरील अतिक्रमण थांबवा.


डॉ प्रभाकर लोंढे


    या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात बहुतांश तिर्थक्षेत्र​ मुळात धनगरांचे कर्मस्थान व श्रद्धास्थान राहीलेले आहे.  या श्रद्धास्थानावर काळानुसार विविध प्रकारे अतिक्रमण झाल्याचे दाखले इतिहासाच्या अभ्यासावरून लक्षात येते. हे अतिक्रमण धार्मिक आधारावर मोठ्या प्रमाणात झालेले आहे. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास पंढरपुरचा विठोबा व क्षेत्राचे देता येईल. 

       मुळात पशुपालक असलेला कानडा विठ्ठल एक पराक्रमी पुरुष होय. त्याच्या पराक्रमाविषयी धनगरांच्या मनात प्रचंड आस्था व स्वाभिमान. काळाबरोबर पुढे ते धनगरांचं आराध्य दैवत बनले. त्याच्या प्रति जनमानसात असलेल्या श्रद्धेपोटी व असलेल्या आत्मिक-व्यावसायिक नात्यातून या महाराष्ट्रात आषाढी-कार्तिकीची वारी सुरू झाली. ती मुळात धनगरांनी सुरू केली. प्रत्येक धनगर आषाढी कार्तिकी ला पंढरपुरात न चुकता जावू लागला. 

        पुढे हीच वारी समाजप्रबोधनासाठी महाराष्ट्रातील संत परंपरेने वापरली. पंढरीचा विठ्ठल हा जनसामान्यांच्या मनातील ताईत असल्याने प्रबोधनासाठी संतांनी आपल्या अभंगांचा आधार विठ्ठलाला बनवले. विठ्ठलाला साक्षी ठेवून आपले विचार जनमाणसात पेरले.  पुढे हव्यासापोटी याच विठ्ठल मंदिराचा कब्जा बडव्यांनी आपल्याकडे घेतला. जनसामान्यांच्या संपुर्ण शोषणाचे केंद्रच हे पंढरपुरचे मंदिर बनले. शेवटी बडव्यांच्या हातून या देवस्थानची सुटका करून घेण्यासाठी न्यायालयातच जावे लागले. 

           असे ते पंढरपूरचे देवस्थान मुळात धनगरांचे श्रद्धास्थान असताना तो रानोमाळ भटकत राहणारा धनगर त्याच्या मूळ अवस्थेतच राहीला पण या देवस्थानचा फायदा मात्र इतरांनीच लुटला. आज ती ट्रस्ट सुध्दा इतरांच्याच अधिपत्याखाली काम करते हे वास्तव! त्याचा अध्यक्ष सुध्दा इतरांच्याच मर्जीने निश्चित होत असते. हे अतिक्रमणाचं एक ऐतिहासिक उदाहरण झालं .

               वर्तमान काळातील अतिक्रमणाचं ज्वलंत उदाहरण...

        धनगरांचं दुसरं अतिशय महत्त्वाचं श्रद्धास्थान म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे गांव आहे. या ठिकाणाचा महिमा म्हणजे जगात पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला नगण्य स्थान असताना स्त्रीचं कर्तुत्व काय असते याचे ज्वलंत उदाहरण, स्त्रीजन्माची यशोगाथा असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे हे जन्मगाव!! ज्यानी सामाजिक राजकीय परिस्थिती विपरीत असताना 28 वर्ष राज्य केलं. इंदोर सारख्या बलाढ्य संस्थानाच्या राज्यकारभाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. भारत भूमीच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या कर्तुत्वाच्या पाऊलखुणा निर्माण केल्या. सामाजिक कल्याणासाठी राजकीय सत्तेचा वापर करून राज्यकारभार केला. याचाच परिणाम जनमाणसामध्ये त्यांची प्रतिमा लोक कल्याणकारी लोकमाता अशा प्रकारची उंचावली. व तो इतिहास कधीही विसरला जाऊ शकत नाही. 

          याचाच परिणाम म्हणून अलीकडे चौंडी या त्यांच्या जन्मगावामध्ये राजमाता अहिल्याबाई चे स्मारक तयार करण्यात आले. ही जरी योग्य बाब असली तरी  तिथे बसविण्यात आलेले बारा राशींचे पुतळे खूप मोठा प्रश्न निर्माण करतात. यातून काय सांगायच आहे/ काय सिद्ध करायचं आहे, हे जरी मला समजलं नसलं तरी त्यातून समस्त होळकरशाहीच्या कर्तुत्वाचा सहसंबंध त्या राशीभविष्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे की काय?असा प्रश्न सहज निर्माण होतो.  

         राजमाता अहिल्याराणीच्या व होळकरशाहीच्या कार्यकर्तृत्वावर अतिक्रमणाची सुरवात झाली आहे असं कोणी म्हटलं तर चुकीचं  होणार नाही..

         आद्य समग्र क्रांतीकारी महीला राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाला नतमस्तक होण्यासाठी आलेला त्यांच्या विचारांचा अनुयायी या राशी चक्रापासून काय प्रेरणा घेणार आहे. व या राशीचक्राचा राजमाता अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा कशाप्रकारे सहसंबंध जोडणार आहे, हाच मोठा अनाकलनीय प्रश्न मला पडला आहे. सर्वानाच पडावा ही अपेक्षा!!! जेणेकरून त्याचे उत्तर सार्वजनिक पातळीवर मिळू शकेल. परंतु हे राशीचक्र/राशींचे पुतळे अहिल्या मातेच्या स्मारकापुढे तयार करण्याची कारण मिमांसा जर कुणाला माहित असेल,  खरंच त्या राशीचक्राचा अहिल्या मातेच्या जीवन व कार्य कर्तुत्व मध्ये महत्त्वाचा वाटा असेल आणि ते राशीचक्र अगदी प्रवेशद्वारावर तयार करण्याचे औचित्य ज्याना कोणाला माहित असेल त्यांनी जर ते सार्वजनिक केले तर एका कर्तुत्ववान महिलेच्या जीवनामध्ये असलेले राशीचक्राचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येतील व आम्हा सर्व बहुजनांच्या महिलांना अहील्या मातेच्या आदर्श जीवनकार्यापेक्षा राशी चक्रात गुंतवून त्याचा निश्चितच उद्धार करता येतील. 

     परंतु माझ्या अल्पबुध्दी, अल्पमतीनुसार हे राशीचक्र, राशीपुतळे अहिल्या मातेच्या स्वावलंबी, कर्मण्यवादी, सत्यशीलाधारित न्यायप्रिय लोकराणीच्या कार्यकर्तृत्वाला न्याय देणारे नाही. त्याचा कोणताही संबंध राजमाता अहिल्याईच्या जीवनाशी नाही. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नको ती वेगळी झालर चढविण्याचा नको तो प्रयत्न केला जातो आहे, असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. असा हा प्रकार सरळ सरळ त्यांच्या कर्तृत्व-व्यक्तित्व/ जीवन चरित्रावर श्रद्धा असणाऱ्या जनमानसाच्या श्रध्देवर व श्रद्धास्थानावरच अतिक्रमण आहे. येथील राशी चक्रापासून भावी पिढीला काय संदेश जाणार आहे किंवा कोणता संदेश अपेक्षित आहे, ही बाब सर्वांनाच लक्षात घ्यावी लागेल. अनावश्यक वाटत असेल तर ते हटविणे अत्यावश्यक आहे.

    हे झालं धार्मिक अतिक्रमणाचं उदाहरण!!! दुसरं उदाहरण म्हणजे इंदोरमधील राजबाग पेलेस. यावर मी काही दिवसांपूर्वी स्वतंत्र लेख लिहिला होता.



सदर लेखन प्रपंच करीत असताना इतिहासावर होणारं अतिक्रमण थांबवून त्याचं विकृतीकरण होणार नाही, यादृष्टीने चिकित्सक वृत्तीने वाचकांनी प्रत्येक गोष्टीचे समीक्षण करावे व सत्य जाणून घ्यावे एवढीच अपेक्षा..


__________________________


डॉ प्रभाकर लोंढे

गोंदिया

९६७३३८६९६३

Tuesday, May 3, 2022

धनगरांच्या संघटना आत्महत्या का करतात?

 धनगरांच्या संघटना आत्महत्या का करतात?


                  डॉ प्रभाकर लोंढे


              शिर्षक वाचून प्रथम दर्शनी काहीना आश्चर्य वाटेल की संघटना सुद्धा आत्महत्या करतात? तेव्हा आज पर्यंत च्या अनुभव आणि अभ्यासावरुन मी त्यांना म्हणेल "होय". धनगर संघटना आत्महत्याच करतात... तसं यामध्ये त्यांना आश्चर्य वाटण्यात कोणतीही मोठी गोष्ट नाही कारण आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या , तरुणांच्या आत्महत्या, सुनेची आत्महत्या अशा खाजगी जीवन संपविणाऱ्या आत्महत्या ऐकलेल्या आहेच, परंतु  त्यांनी "आत्महत्या" हा शब्द केवळ एका व्यक्तीशी संबंधित आहेत, या अर्थाने ऐकलेला आहे हे नक्की...  आता संघटना सुद्धा "आत्महत्या" करीत असते, हा विचार कदाचित त्यांना प्रथम दर्शनी नवीन असल्याने.. आश्र्चर्यकारक वाटू शकतो.


         साधारणतः "आत्महत्या" तो करीत असतो, जो आत्मबल गमावून बसतो. तशी आत्महत्या ही एक मानसिक प्रक्रिया असते,  त्याच्या असण्या- नसण्यात, त्याच्या जगण्या- मरण्यात त्याला काहीच रस उरत नसतो. तो विवेकशून्य होवुन जातो आणि नकळत स्वतःच स्वतःला संपवून घेतो. स्वत:ला संपविण्यासाठी तो स्वत:च जबाबदार असतो. कधी कधी यामागे कारणीभूत भलेही दुसराच कोणीतरी वाटत असेल तरी आत्महत्येची जबाबदारी मात्र त्याच्यावरच निश्चित होत असते. कारण आत्मबल, आत्महत्या ह्या बाबी व्यक्तीच्या मनोबलाशी संबंधित असतात. मनोबलाच्या नकारात्मक अवस्थेचा अंतिम परिणाम "आत्महत्या" हा असतो. 

           प्रत्येकाच्या मनोबलाची अवस्था ही त्याची विचारक्षमता तसेच वैचारिक गुणवत्ता आणि वैचारिक दिशा यावरून निर्धारित होत असते. आणि या सर्व बाबींचा प्रमुख आधार असतो तो "विचारप्रणालीचा".... साधारणतः व्यक्तिगत पातळीवर विचार केल्यास व्यक्तीच्या खाजगी जीवनात आध्यात्मिकतेला किंवा भौतिकतेला प्राधान्य देणारी विचारसरणी जीवनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आधार असतो... विचारसरणी खाजगी जीवनाचा अतिशय महत्त्वाचा पैलू असतो. आणि तिला अनुसरण्याच्या प्रमाणावरून जीवनाच्या आलेखाची दिशा व अंत निर्धारित होत असतो.

         हाच विचार किंवा हिच सत्यता संस्था, संघटना, चळवळीच्या बाबतीत सुद्धा लागू होत असते.  त्यामुळे  संस्था, संघटना, चळवळी मोडित का निघतात? याचा विचार करतांना मी म्हणेल, काही संघटना तर नकळत स्वतःच आत्महत्या करीत असतात... स्वत:च्या कार्यपद्धतीतून अनपेक्षित, अनभिज्ञपणे स्वत:च स्वतःच्या आत्महत्येची बीजं पेरतात. आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की, ती संघटना काही काळाने आपोआप अंतिम घटका मोजायला लागते.. आणि नामशेष होवून जाते. 

          यालाच संघटनेची "आत्महत्या" असे म्हणता येईल. असे मला वाटते. आणि धनगर जमातीतील विविध संघटनांच्या बाबतीत ऐतिहासिक अभ्यास केला तर अशा अनेक संघटनांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. किंवा वर्तमानातील बहूतांश संघटना आता आत्महत्येच्या मार्गावर आहेत. आर.एस.एस आणि बामसेफ यांच्या धनगर जमातींमध्ये घुसलेल्या "विंग" सोडल्या तर  इतर बहुतेक धनगर संघटना (स्वत;ला बुध्दिजीवी समजणाऱ्यांच्या सुद्धा)  आत्महत्येच्या मार्गावर आहे, असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.. थोडक्यात सांगायचे झाल्यास, दीर्घायुष्यी धनगर संघटनां दिसत नाही.... हे समाजाची खंत आहे. (हे माझं विश्लेषणात्मक मत आहे, काहीच्या बाबतीत चुकीचे असण्याची दाट शक्यता आहे.. त्यांनी संशोधन करावे)

              धनगर संघटनांच्या आत्महत्ये मागे अनेक कारणे कारणीभूत असली तरी, त्यापैकी काही निवडक, ठळक, महत्त्वाची कारणं पुढील प्रमाणे मांडता येईल.


१) अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वस्थाच्या भावनेचा अभाव...


२) निर्मिती मागचा छुपा संकुचित दृष्टिकोन...


 ३) एका निश्चित सर्वसमावेशक विचारसरणीचा कमी अधिक अभाव, 


४) दुरगामी ध्येयवृत्तीचा अभाव,


५) स्वामीत्वाच्या छुप्या भूमिकेत असलेले संघटनेचे मालक ठरवेल तीच अंतिम कार्यपद्धती... 


 ६) एखाद्या संघटनात्मक पदावर आरूढ होऊन, पदांची झालर चढवून पद, प्रतिष्ठा प्राप्त करण्याची मनिषा...


७) सभासदांचा  विचार, संघटनेप्रती धारणा, दृष्टिकोन यांना स्थान न देता संघटनेची होणारी एककल्ली,- एकवल्ली सरंजामी वाटचाल. 

८) एखादा व्यक्ती, संकुचित प्रवृत्ती संबंधात बटीक वृत्ती


या कमी अधिक अभावात्मक परिस्थितीमध्ये केवळ भावना(काहितरी दिव्य करण्याची) व स्वार्थ (पदांची लालसा, प्रसिद्धीची भूक किंवा प्रासंगिक/संघटनांत्मक प्रतिशोध/व्यक्तिगत विरोध) यांच्या आधारे संघटना जन्म घेते. भावनात्मक आधार घेऊन संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्य यांच्या मनाला भावेल अशी ती "संघटना" ही संघटनेची व्याख्या होऊ लागते, तिचा विस्तार सुद्धा संकुचित ध्येयासह मनाच्या समाधानासाठी एककल्ली मार्गाने होवू लागते, तेव्हा ती संघटना ----------- लिमिटेड & कंपनी सिध्द होते. संघटनेविषयी मालकीची भावना निर्माण होते व  बळावते. विचारसरणी पेक्षा स्वार्थाला/ व्यक्तीला महत्त्व दिले जाते. 

         अशी ती संघटना काही प्रमाणात श्वास घेत असली तरी तिचा प्रवास मात्र सर्वनाशा कडे सुरू झालेला असतो. केवळ स्वार्थाने चिपकलेली माणसं त्या संघटनेचे पायिक नाही तर "वाहक"  या अर्थाने कार्य करीत असतात. स्वाभिमानी (Self respect) माणसं कधीचेच दूर झालेले असतात.

          गाय मरताच गेचूडांनी पलायन करावे, या भूमिकेत असलेले स्वार्थपिपासू संघटनेच्या अंतिम घटकेला सोबत राहीलच याचा नेम नसतो.. शेवटी संघटनेचा मालक स्वरूपात असलेला अध्यक्ष किंवा इतर वाहक संघटनेच्या आत्महत्येचा साक्षिदार ठरतो. हा संघटनेच्या निर्मितीपासून पेरल्या गेलेल्या बिजांकूराचा परिणाम असतो.


         असले बिजांकूर वेळीच ओळखले नाही तर फार मोठं सामाजिक व खऱ्या समाजहित चिंतकांच खूप मोठं नुकसान होत असतं.... कारण जीवनातील वेळ, पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होतो... अनपेक्षित चुकीच्या प्रवृत्तींना बळ मिळतं.. यातून एखादा "ढेंड्या" मोठा होतो आणि समाजाचा लिलाव होतो...  समाज प्रवाहाबाहेर फेकला जातो. 

         असला प्रकार संघटनेच्या बाबतीत कुठे होऊ नये कारण, "संघटना" कुठल्याही समाजाचा आत्मा असतो. संघटनांच्या माध्यमातून संघटित झालेला समाज एक कृतिशील तसेच आत्मनिष्ठ आणि कार्यप्रवण प्रगल्भ समाज असतो. अशा त्या संघटना समाजामध्ये सातत्याने परिवर्तन तसेच प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य करीत असते. अशा संघटना म्हणजे काय याचा विचार केला तर एका "विशिष्ट विचारसरणीच्या आधारे संघटित होऊन विशिष्ट कार्यपद्धतीनुसार विशिष्ट ध्येयासाठी कार्य करणारा संघटित प्रवाही गट म्हणजेच संघटना होय"


धनगर संघटनांना आत्मपरीक्षणार्थ, समाजहितार्थ सदर लेखन प्रपंच....

यामध्ये काही आक्षेप असल्यास कृपया

९६७३३८६९६३ या क्रमांकावर संवाद साधू शकता....




डॉ प्रभाकर लोंढे

Wednesday, November 3, 2021

शहीद दिवाली

 शहीद दिवाली


पुरा देश मना रहा है पापा 

आज देश का त्योहार दिवाली

हर घर मे है घरवाला और घरवाली

अपना ही तो घर है पापा 

जहाँ आपकी आस मे मा जी रही अकेली 

फिर भी पापा आप सीमा पर 

क्यु खेल रहे हो होली.


समज सकता हू पापा 

आपका ईमान और राष्ट्रभक्ती 

पर यहा कौन जान रहा है 

आपके जिंदगी की क्या है 

होली और दिवाली 

फिर भी पापा आप सीमा पर

क्यू खेल रहे हो होली..


सालोसाल बीते पापा आपके 

सरहद्द और सीमा पर 

करते देश और दुनिया की रखवाली 

क्या कभी सवाल आया पापा ?

कितनी सुरक्षित है आपकी घरवाली 

फिर भी पापा आप सीमा पर 

क्यू खेल रहे हो होली?


एक तो दिन निकालो पापा 

मनाने हमारे साथ दिवाली 

अब तुम्हारी छकुली भी नही रही 

वह भोली भाली.

उसको भी सहा नही जाता अब

आपके बिना ये घर खाली 

फिर भी पापा आप सीमा पर 

क्यू खेल रहे हो होली.


यहा तो सब जी रहे पापा

 मदमस्त वह जिंदगानी 

गुजरता है हर दिन उनका

जैसे मना रहे दिवाली.

पर आपको लडते हुए देखकर पापा 

बंद हो जाती है मेरी बोली.

 फिर भी पापा आप सीमा पर 

क्यू खेल रहे हो होली.


आप तो नही थे इतने

बेवकूफ या पत्थरदिल पापा.

जब मै आप की लाडली छकुली थी

मेरे चिकने चिल्लाने की आवाज 

आपको लगती थी जैसे 

दुश्मन की बंदूक से आयी गोली.

फिर भी पापा आप सीमा पर 

क्यु खेल रहे हो होली?


आज तो आये हो पापा 

क्या मनाऊ गम या खुशीयाली 

पर आपकी बंद सासे ही बता रही है मुझे

मेरी हुई है झोली खाली  

ऐसे मे आपही बताओ पापा 

क्या मनावू मै?

मेरे जिंदगी की होली 

या आपकी शहीद दिवाली....



शब्द प्रभू

डॉ प्रभाकर लोंढे