Sunday, May 19, 2019

सावधान! वंचित बहुजन आघाडीमध्ये घुसखोरी होत आहे.*

🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
*(वंचित बहूजन दिन विशेष)*

 *सावधान! वंचित बहुजन आघाडीमध्ये घुसखोरी होत आहे.*

                        *डॉ प्रभाकर लोंढे*

              20 मे 2018 महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकीय पटलावर एक महत्वपूर्ण दिवस म्हणून ओळखला जाणार याची चिन्हे दिसू लागली आहे. या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्योत्तर काळात प्रस्थापित झालेली घराणेशाही व प्रस्थापितांच्या राजकीय षडयंत्राचा परिणाम म्हणून येथील अनेक जाती जमाती राजकीय प्रवाहापासून दूर फेकल्या गेल्या. आपल्या अधिकारापासून वंचित राहिल्या. सत्यता ही आहे की, काहींना तर हेतुपुरस्सर वंचित ठेवले गेले आहे. परिणामतः या महाराष्ट्रातील फार मोठा वर्ग अन्यायग्रस्त भावनेतून या दिवशी एकत्र आला. *यापैकी एक मोठा वर्ग म्हणजेच धनगर जमात* .
           या दिवशी महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या धार्मिक स्थळी अन्यायग्रस्त धनगर जमातीच्या पुढाकाराने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या वंचित उपेक्षित जमातींचे अनेक नेते कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले. विचार मंथनातून *राजकीय सत्ता संपादनाची भाषा आम्ही सुद्धा करू शकतो,* अशा प्रकारचा आत्मविश्वास व संदेश घेऊन घरी परत गेले. तिथून त्यांच्या अंतर्मनात निर्माण झालेली राजकीय सत्तेची आस येथील प्रस्थापितांचे आराखडे व झोप उडवणारे ठरले. वंचित बहुजनांवरील वर्षानुवर्षाच्या अन्यायग्रस्त भावनेला वाचा फोडणारी हक्काची राजकीय आघाडी व नेतृत्व लाभल्याचे समाधान अख्या महाराष्ट्रात व्यक्त होवू लागले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. परिणामतः अख्ख्या महाराष्ट्रात या वंचित बहुजन आघाडीचीच चर्चा होऊ लागली. प्रसारमाध्यमांना सुद्धा अपेक्षित नसताना अपरिहार्यपणे यांना चर्चेत घ्यावं लागलं. जशी की सत्तेची समीकरणे बदलविण्यामध्ये ही आघाडी नक्कीच आपला प्रभाव दाखवणार. त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी ला गृहित धरून आपली समीकरणे बदलावी लागली.
           महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती एवढी बदलली की, एकेकाळी टीका करणारे सुद्धा या वंचित बहुजन आघाडी कडे वळू लागले आहे.  बीजेपी-शिवसेने मधून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये किंवा रा.का- काँग्रेस मधून बीजेपी शिवसेनेमध्ये सत्तेसाठी पक्षांतर करणारे (गीरगीट) हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. परंतु या पक्षांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला आपली आघाडी म्हणून मानणारे व विचारांसाठी नाही तर केवळ उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये येणारे अनेक नेते आज वंचित बहुजन आघाडी च्या दारावर पादत्राणे झिजवितांना दिसत आहे.
               दिवसेंदिवस वाढतं वलय व राजकीय हालचाली पाहून काहींनी तर *बाळासाहेब आंबेडकर, हरिभाऊ भदे व अन्य धनगर नेते, असरउद्दिन ओवेसी* यांच्यावर अनेकांनी चांगलंच तोंडसुख घेतलेलं आहे. असो काहीही परंतु *वंचित बहुजन आघाडी ला फालतूपणा (माझ्याशी फोनवर बोलताना) म्हणणारे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी च्या तिकिटावर उभे राहिलेले मी पाहिले आहे.* त्यामुळे शिव्या खात का असेना निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी ही ताकदवान आहे. हे सिद्ध होते.
        *वंचित बहुजन आघाडी साठी सोशल मीडिया च्या माध्यमातून लिखाण करणाऱ्या लेखकांना सुद्धा काही महाभागांनी काही वेळा टारगेट केलेलं आहे.* वाईट याचं वाटतं की, यामध्ये पिढ्यानपिढ्या राजकीय दृष्ट्या पिचल्या गेलेल्या धनगर जमातीचे बीजेपी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आपली वफादारी जपणारे *अनेक धनगर नेते, कार्यकर्ते आहेत* . परंतु त्यांना सुद्धा सत्य स्वीकारण्याची वेळ आलेली आहे.
           लवकरच तीन दिवसानी २३ मे ला लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित केले जाते. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणारच असे जरी म्हणता येत नसले तरी एवढं मात्र नक्की की या आघाडीच्या उमेदवारांनी एकूण महाराष्ट्रात घेतलेली मतसंख्या ही विक्रमी राहणार आहे. त्यामुळे ही मतसंख्या लोकसभा निवडणुकी पेक्षा येत्या भावी काळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपला प्रभाव नक्कीच दाखवेल. याचे चित्र मात्र  लोकसभेचा निकाल स्पष्ट करणार आहे.
         याशिवाय हे वेगळे सांगण्याची गरज नाही कारण  अनेक संधीसाधू या वंचित आघाडी कडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी येऊ नये, असं कधीच कोणी म्हणणार नाही. कारण ही आघाडीच वंचितांची आहे, ज्यांना कुठेच राजकीय सत्तेसाठी थारा मिळाला नाही, उमेदवारी मिळाली नाही,  ज्यांचा नेहमीच प्रस्थापितांकडून वापर केला गेला आहे. अशां सर्वानाच या आघाडीमध्ये येता येईल. ( *येतांना मात्र केवळ स्वार्थाने नाही तर विचाराने या आघाडीमध्ये सामील व्हावे)* परंतु यांच्या येण्यामुळे वंचित बहुजन आघाडी चे *खरे आधारस्तंभ ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या कृतीतून, ज्यांच्या सत्यवादी धोरणातून तन-मन-धनाने ही वंचित बहुजन आघाडी उभी राहिली, ते मात्र या आघाडीपासून वंचित होणार नाही,* याची काळजी फक्त घेतली जावी हीच या ठिकाणी अपेक्षा !!
      भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

जय मल्हार

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Tuesday, May 14, 2019

धनगरानो ! खरंच .......दम असेल तर प्रस्थापितांविरुध्द लढा.*

🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺
*धनगरानो ! खरंच .......दम असेल तर प्रस्थापितांविरुध्द लढा.*             
                       
 *डॉ प्रभाकर लोंढे*

          *ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनू शकतो.* असा संदेश आपल्या दैनंदिन जगण्यातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तुत्वाचा नाही पण रक्ताचा वारसा सांगणारी जमात म्हणून धनगर जमात सर्वत्र ओळखली जाते. परंतु महापुरुषांना किंवा कर्तुत्वान पराक्रमी योद्ध्यांना कधीच कोणती जात नसते ना धर्म असतो. केवळ कर्माच्या भरोशावर ते लोकाभिमुख जगत असतात. त्यापैकी एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांनी आपल्याकडे असलेल्या सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला. परंतु अशा या लोककल्याणकारी सत्ताधिश राणीचा वारसा सांगणारी धनगर जमात आज मात्र सत्ताहीन झालेली आहे.
          आज लोकशाही असली तरी घराणेशाही प्रस्थापित झालेली आहे. धनगरांचे छोटे मोठे नेते संपवण्याच्या मागे प्रस्थापित लागले आहे. धनगरांमध्ये नवीन नेता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वत्र घेतली जात आहे. नवखा रोहित पवार असो की सुप्रिया सुळे असो किंवा पुन्हा कोणी यांना मात्र धनगर नेतृत्व संपवूनच मोठे व्हायचे आहे असं वाटायला लागले आहे. प्रस्थापित पक्ष कोणताही असो मात्र त्यांना धनगर नेतृत्व उभंच राहू द्यायचं नाही आहे. त्या पक्षांमधून वास करणारी एक अदृश्य शक्ती हे धनगरांच्या जीवावर उठले आहे, आणि ते सत्य आहे. ही बाब प्रत्येक धनगर नेता, कार्यकर्ता व सर्वांनी ओळखणे आवश्यक आहे.
            असं असताना धनगर नेते कार्यकर्ते यांना ते कसं काय कळत नाही हाच मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. कदाचित ते कळत असलं तरी आचरणातून दिसत नाही हा त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे.  काही धनगर आपल्याच माणसांना ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्यात गुंग आहे. काही प्रस्थापितांची दलाली करताना दिसत आहे. काहींना तर धनगर नेतृत्वामध्ये आपले परस्पर शत्रुत्व दिसत आहे. काही आपल्याच धनगर नेतृत्वाची जिरवण्याची संधी शोधत आहे.. माझ्यापेक्षा तू कसा मोठा होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही तर पोटजातीचे विष कालविण्यात मस्त आहे. काहीतर खाऊन पिऊन मस्त सुस्त झालेले आहे. या कामात धनगरांची खर्च होणारी शक्ती जर वाचली व संघटितपणे काम करून एकत्र आली तर हा धनगर या व्यवस्थेवर राज करू शकतो याची जाणीव येथील प्रस्थापितांना असल्यामुळेच ते या धनगरांच्या भांडणाच्या आगीत पुन्हा तेल टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
                अशा परिस्थितीत हे सर्व समजून न घेण्याइतपत येडी असलेली धनगर जमात आज कोणालाच अपेक्षित नाही, कोणालाच मान्य नाही, असं असताना हे असं का घडतं? याचा विचार करतांनाही फारसा कोणी दिसत नाही. आज योग्य संकेत आहे की धनगरांमध्ये नवीन स्वाभिमानी नेतृत्वाचा उदय होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना जुन्या परस्परांमध्ये आपसात लढण्याच्या प्रवृत्ती धनगरानी सोडल्या नाही तर नवीन नेतृत्व सुद्धा निर्माण होण्याच्या आधीच ते संपल्या शिवाय राहणार नाही.
              आज धनगरांना आपसात नाही तर प्रस्थापितांशी लढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रस्थापितांचे मनसुबे ओळखून वाटचाल करण्याची गरज आहे. *महादेव जाणकार साहेब, राम शिंदे साहेब, दत्तामामा भरणे* अशा धनगर नेत्यांना संपवण्यासाठी प्रस्थापितांचे चाललेले षडयंत्र ओळखण्याची व एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. तेथे या नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही तर तो धनगरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे.  म्हणून तेथे पोटजाती आड येणार नाही, कोणाचा दुराभिमान आड येणार नाही, मात्र जातीय अस्मिता जपण्याच्या प्रयत्नांमध्ये परस्परांना सहकार्य करणे हेच आज प्रत्येक नेत्याचे व कार्यकर्त्याचे आद्य कर्तव्य आहे. धनगरांच्या एका नेत्यावर आलेलं संकट  परस्पर सहकार्याने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. प्रस्थापित व्यवस्थेतील धनगरांचे असलेले विरोधक हेरून त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. राजकीय सत्ता हस्तगत करण्याची अपरिहार्यता आहे.
         तेव्हा खरंच धनगरांनो ! मनगटात दम असेल व स्वतःला सुभेदार मल्हारराव, पराक्रमी यशवंतराव व सर्वगुणसंपन्न अहिल्याई चे वारस मानत असाल तर प्रथमतः प्रस्थापितांशी लढण्यासाठी दंड थोपटा *. "अपने गली मे तो कोई भी शेर बनता है!* " म्हणून आप आपसांत विरोधक निर्माण न करता, परस्पर सहकार्याने प्रस्थापितांना आपला दम दाखवा. की ज्यांनी पिढ्यानपिढ्या तुमच्याशी वैरत्व करून तुमच्या पिढ्या बरबाद केल्या आहेत. लोकशाहीतील तुमचे घटनात्मक अधिकार/ हक्क यापासून तुम्हाला वंचित ठेवलेले आहे. एक वंचित उपेक्षित जमात म्हणून तुमचं अस्तित्वच धोक्‍यात आणलं आहे. हे सर्व त्यांना यासाठी शक्य झाले आहे, कारण आपण आपसात लढलो. आपण आपल्या माणसाला शत्रु समजत आलो. त्यामुळे खरा शत्रु आपण ओळखू शकलो नाही. आज आपण सर्वांना आपल्या शत्रुची ओळख पटलेली आहे. तेव्हा *आपल्याला पावले उचलायची आहे ती, केवळ सत्तेसाठी!*
*तर उठा!  लढण्यासाठी! परस्परांच्या हक्कासाठी!! भावी पिढ्यांच्या रक्षणासाठी!!*

जय मल्हार

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

दुसरा लेखसंग्रह

दुसरा लेखसंग्रह