Wednesday, April 29, 2020

धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*

📚🖊️🖊️📚📖🖊️🖊️📚📚🖊️🖊️🖊️📚
 *धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*

           *डॉ प्रभाकर लोंढे.*

   या महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या जडणघडणीत सर्वाधिक पराक्रमी सर्वगुणसंपन्न म्हणून नावलौकिक असलेले राजे/ राजकीय वंशांचा विचार केल्यास त्यापैकी बहुतांश धनगर वंशाचे आहेत असा उल्लेख करावा लागतो. हे *मी जातीय अस्मिता म्हणून नाही तर वास्तविकतेच्या आधारे बोलतो आहे.* (ज्यांना कुणाला यावर आक्षेप असेल त्यांनी थोडे इतिहासात डोकावून पाहावं ही विनंती) असे असले तरी मी येथे सर्व वंशांचा उल्लेख करणार नाही. परंतु याच शृंखलेतील *मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ असलेले संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर व त्यांच्यापासून सुरु झालेल्या होळकर वंशातील राजपुत्र खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, शूरवीर महाराजा यशवंतराव यांना इतिहासकारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा वारंवार बदनाम/संकुचित करण्याचाच प्रयत्न केलेला आहे* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
              *तेव्हा प्रश्न निर्माण होतं की असं का झालं???*

याचे उत्तर आपल्याला प्रथमतः

 🖊️१) राजमाता अहिल्याबाई होळकर यांनीच दिलेलं आहे. " *आम्हा कडील लोकांची कामे यथास्थित होतात. परंतु उजेडात आणणार कोणी नाही. न होत्याचे उजेडात येते. असो दिवस असेच आहेत"* (महेश्वर दरबारची बातमीपत्रे पान-१९) याचा अर्थ तेव्हापासून असं चालत होतं आणि आजही ते बंद झालं आहे, असं म्हणता येत नाही.
 *🖊️२) "होळकरांची कैफियत"* म्हणजे होळकर यांच्या पराक्रमाचा आलेख आहे. ती *भाऊसाहेबांच्या बखरीच्या तोडीची आहे, परंतु ती मागे पडण्याची दोन कारणे ये. ना. खेडकर यांनी आपल्या प्रस्तावना मध्ये दिलेली आहेत.*
 *अ) मराठी इतिहासकारांनी शिंदे* होळकर घराण्याची वारंवार तुलना करून होळकरांची कृती सारी स्वार्थ मुलक तर शिंद्यांची कृती तेवढी सारी उदात्त, असे रंगवण्याचा प्रघात पाडला. यामुळे होळकर बदनाम झाले.
 *ब) "भाऊसाहेबांची बखर" अप्रत्यक्षपणे पेशव्यांची बखर म्हणून प्रसिद्ध झाली, याला कारण लेखन कलेवर त्यांचे असलेले प्रभुत्व. ही बखर भाऊसाहेबांची बखर नावाने ओळखली जात असली तरी त्यामधून शिंद्यांचा उदोउदो करण्यात आलेला आहे.* (हे असं का झालं? याचा सर्वांनी विचार करावा). तुलनेने होळकरांच्या पराक्रमाच्या इतिहासाला, शिंदे व पेशव्यांच्या उदात्तीकरणाच्या दृष्टीने दडपण्याचाच किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. *यामध्ये होळकरांचा इतिहास किंवा पराक्रम कमजोर होता हे कदाचित त्यांना सुद्धा मान्य होणार नाही. पण त्यादृष्टीने त्यांची लेखणी मात्र चालली नाही. याला कारण इतिहासामध्ये शिंद्यांपेक्षा होळकरांना श्रेष्ठ दाखवण्याची त्यांच्यामध्ये तेवढी हिम्मत नव्हती. यापुढे जाऊन त्यांची तशी नियत नव्हती असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एकूणच मराठा साम्राज्यातील इतिहासाचे हिरो असलेले होळकर हे खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला आहे.* त्यामुळे येथे आपल्याला संशोधनासाठी खूप मोठा वाव आहे ही बाब समजून घेतल्याशिवाय पुढचं कार्य करता येणार नाही.

🖊️ *३) माझ्या मते, साधारणता* समाजात जेव्हा एखाद्याची गुणवत्ता आपल्या लक्षात येते, तेव्हा त्याच्याशी स्वतःची तुलना करता आपण त्याची बरोबरी करू शकत नाही हे तो मान्य करतो,पण ते त्याला सहन होत नाही.  तिथूनच तो त्या व्यक्तीच्या बदनामीला सुरुवात करतो. यामध्ये समोरच्याला बदनाम करणे हा त्याचा  मुख्य उद्देश नसतो तर आपण त्यापेक्षा कमजोर दिसू नये एवढीच तो दक्षता घेत असतो.व त्याच्यासाठी त्याचा सर्व खटाटोप चाललेला असतो. हेच होळकरांच्या इतिहासाच्या बाबतीत झालेलं नाकारता येत नाही.

🖊️ ४) " *बोलक्याचे बोंड खपते, मुक्याचे मोती लपते"* ही एक म्हण आहे. ती होळकरांच्या इतिहासाला समर्पकपणे लागू होते. मराठी इतिहासकारांना वगळून इतर संदर्भ लक्षात घेता मराठी इतिहासकारांच्या इतिहास लेखनावर संशय निर्माण होतो. त्यामुळे होळकरांच्या इतिहासलेखनासंबंधी ची आत्मियता असणाऱ्या *इतिहासकारांची संख्या मोठ्या प्रमाणात असती तर कदाचित होळकरांच्या इतिहासाला न्याय मिळाला असता. होळकरांच्या इतिहासाला बदनाम होण्याची वेळ आली नसती.*

🖊️ *५) या चार बाबींबरोबरच ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की समाजातील जागृत लोकांचाच समाजावर, संस्कृतीवर, राजकीय व्यवस्था व अर्थव्यवस्थेवर नेहमी प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे लेखन सुद्धा त्याच अंगाने झालेल्या आहेत. तेव्हा प्रश्न निर्माण होतो कि, धनगर जमातीचे किती लोक इतिहास लेखनाच्या बाबतीत जागृत होते व आहे ??*

 🖊️ *६)  दैनंदिन जीवनात व्यक्ती म्हणून एखाद्या व्यक्तीच्या चुका होणे, ही बाब स्वाभाविक आहे. आणि जो कर्तुत्वप्रधान जगत असतो, त्यांच्याकडून तर चुका नक्कीच होतं असतात. त्यामुळे होळकर राजांकडून चुका झाल्या असेल तर ते नक्कीच कर्तुत्व प्रधान होते. म्हणून त्याच्या चुका दाखवत असताना त्यांच्या कर्तुत्वाची सुद्धा तेवढ्याच प्रगल्भ नजरेने मांडणी होणे आवश्यक आहे. पण ती होता ना किंवा झालेली दिसत नाही*

🖊️७) *इतिहास लेखन करताना आपण ज्याप्रमाणे होळकरांच्या इतिहासाविषयीची जे आत्मीयता दाखवतात* त्याप्रमाणे तत्कालीन मराठी इतिहासकारांना होळकरी इतिहासा पेक्षा पेशवे आणि शिंदे यांच्या इतिहासाशी जवळीकता वाटली असेल आणि त्यातून जर ते इतिहास लेखन झाले असेल तर त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. तर *तो आत्मियता असणाऱ्यांच्या निष्क्रियतेचा परिणाम असल्याचे मान्य व स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.*
             ही बाब सत्य असताना एखाद्याच्या नकळत झालेल्या चुकांचा अतिरंजितपणा किंवा राईचा पर्वत करून त्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची बाजू , व्यक्तिमत्वाचे विविधांगी समाजोपयोगी व कर्तबगार पैलू याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते तेव्हा *ऐतिहासिक दृष्ट्या त्या व्यक्तीत्वावर नक्कीच अन्याय होत असतो. आणि होळकर राजवंशाचे बाबतीत हे नक्कीच झालं आहे,* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. 
       आणि याची आपणास उशिरा का होईना *जाणीव झाली असेल तर इतिहास संशोधना बरोबरच इतिहास लेखन शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही....*


 *धन्यवाद*
------------------------------------
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यासक*

🖊️ *डॉ. प्रभाकर लोंढे*🖊️
          ९६७३३८६९६३

Saturday, April 18, 2020

राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*

🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
*राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*

                             *डॉ प्रभाकर लोंढे*

     मराठेशाहीच्या इतिहासामध्ये होळकर संस्थान बलाढ्य संस्थान म्हणून सर्वपरिचित होतं. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचा खुद्द पेशवे तसेच इतर सरदार यांचेवर  तसेच अखंड भारतामध्ये सर्वत्र दबदबा होता.  मल्हाररावांना विश्वासात घेतल्याशिवाय पेशवाईतील कोणताही निर्णय होत नव्हता. अशा या महान सुभेदारांचा एकुलता एक मुलगा खंडेराव यांना इतिहासामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. त्या इतिहासाची वास्तविकता सत्तेच्या आधारे पुढच्या काळामध्ये सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्पूर्वी *खंडेरावांचा कुंभेरीच्या युद्धामध्ये मृत्यू झाला तो काही संदर्भांवरून संशयास्पद वाटतो.*
                 सुरजमल जाट कुंभेरीचा किल्ला बळकावून बसला होता. त्यावेळी पेशवा रघुनाथराव, जयाजी शिंदे व मल्हारराव होळकर यांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला. तसा हा किल्ला जिंकण्याचा आग्रह सुभेदार मल्हाररावांचाच होता. त्यावेळी *रघुनाथराव व जयाजी शिंदे होळकरांच्या सोबत असले तरी आतून ते जाटांसोबत मिळाले होते.* त्यामुळे ते होळकरांना मदत करीत नव्हते. व ते स्पष्ट दिसत होते.
         तत्पूर्वी मल्हारराव होळकर यांचा पुत्र *खंडेराव होळकर चारशे स्वरांच्या पथकासोबत दिल्ली स्वारी आटोपून जानेवारी १७५४ च्या आरंभी होडाळ येथे आपला तळ ठोकून बसला होता.* जाट वाड्यातील जाटांची त्यांच्या केंद्रापासून दूर असलेली ठाणी उठवून लावण्याचे कामावर तो होता. (कदाचित हा मल्हाररावांचा युद्धनीतीचा भाग असावा) असे असताना या पथकाने आता कुंभेरी च्या वेढ्यात येऊन सामिल व्हावे, असा पिताश्री मल्हारराव कडून त्याला आदेश मिळाला. त्याप्रमाणे खंडेराव होळकर कुंभेरीच्या वाटेने निघाला. वाटेत मेवातचे ठाणे लुटून तो कुभेरीला पोहोचला.(इथे प्रश्न निर्माण होतात की,
 *१) मल्हाररावांना कुभेरीच्या वेढ्यात खंडेरावांना का बोलावावं लागलं?*
*२) जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे त्यावेळी काय करीत होते?*
    एकाकी लढा देत असताना  कुंभेरी चा प्रदेश रेताळ असल्याने लांब पल्ल्यांच्या तोफांची आवश्यकता मल्हाररावांना वाटली. त्याची पूर्तता व्हावी म्हणून दिल्ली दरबार कडे *तोफांची मागणी केली परंतु दिल्ली दरबारने ती नाकारली. (दिल्ली दरबारातील गोंधळ शांत करण्यासाठी आपल्या मुलाच्या(खंडेराव) नेतृत्वात सेना पाठवणाऱ्या मल्हाररावांना दिल्ली दरबार/ बादशाहाने ही मदत का नाकारली? हा येथे मोठा प्रश्न निर्माण होतो)*
         त्यावेळी जाटां विरुद्ध लढण्यासाठी इमाद उल- मुल्क तसेच अकितब यांना मल्हाररावानी बोलावून घेतले. बोलण्यावरून ते लढ्यात सामील झाले. *खंडेराव सुद्धा नेटाने लढत होते. अतिशय बिकट परिस्थिती असताना खंडेरावांनी किल्ल्याच्या तटा पर्यंत झाकलेल्या भुयारा सारख्या खंदकातून जाणाऱ्या निरुंद वाटा तयार केल्या होत्या व तो किल्ल्याच्या तटा पर्यंत जाऊन पोहोचला होता.* हा खंडेरावाचा इतिहास खंडेरावांवर आक्षेप घेणाऱ्यांसाठी अतिशय चपराक देणारा आहे.
           सुरजमल जाट कुंभेरीच्या किल्ल्यात दबा मारून बसला होता. पेशवा रघुनाथराव व जयाजी शिंदे वेढयात उपस्थित असले तरी त्यांचे सहकार्य मिळत नव्हते. ते दोन्ही आतून सुरजमल जाटाशी जवळीक साधून होते. (नंतरच्या काळात रघुनाथराव पेशवा जाटाशी तह करून २२ मे १७५४ ला कुंभेरीची छावणी मोडून निघून गेला.) त्यामुळे कुभेरीचा संपूर्ण लढा होळकरांना लढावा लागला.         
         *मल्हारराव आणि खंडेराव यांचेकडून सर्वतोपरीने लढा सुरू असताना त्यांना जाटा सह अंतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागत होता. अन्नाशिवाय पोट भरणे व शस्त्राशिवाय युद्ध जिंकणे कठीण जाते.  कुंभेरीच्या रेताळ प्रदेशावर लढण्यासाठी होळकर पिता-पुत्रांना लांब पल्ल्याच्या तोफा जर बादशहा किंवा कुठून मिळाल्या असत्या तर कदाचित कोणत्याही परिस्थितीत होळकर मराठा साम्राज्याचा झेंडा कुभेरीवर फडकला असता.*
            होळकर पिता पुत्राचे जिकरीचे प्रयत्न सुरू असतानाच *१५ मार्च १७५४ ला खंडेराव जेवणानंतर खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता अचानकपणे किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरु झाला.* जंबरुकचा एक गोळा लागून *खंडेराव मारला गेला* .... एकुलता एक खंडेराव मृतप्राय झाला याची माहिती कळताच मल्हारराव देहभान विसरले. या सर्व प्रकारात कुंभेरीचा लढा अर्धमेला झाला खरा.  तरी त्याठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात.  १. *) खंडेराव खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता किल्ल्यावरून अचानक तोफांचा मारा कसा काय झाला?*
 *२) सुरजमल जाटाशी संबंध जोडून असलेल्या जयाजी शिंदे व खुद्द रघुनाथराव पेशवे यांनी मल्हाररावांचा काटा काढण्यासाठी सुरजमलला माहिती पुरवून खंडेरावांचा मृत्यू घडवून तर आणला नाही ना?*
               परिस्थिती काहीही असो, खंडेरावाच्या मृत्यूने मल्हारराव पुर्णतः खचून गेले होते. अशाही परिस्थितीत *रघुनाथराव व जयाजी शिंदे पातशहाचा दबाव दाखवून जाटांशी मेळ घालण्यासाठी मल्हाररावांना बोलू लागले. दबाव टाकू लागले.* परिस्थितीने अगतिक असलेले मल्हारराव एकीकडे मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने व्याकुळ होते. तेव्हा मल्हारराव उदास होऊन *जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे यांना बोलले "आपण धनी व शिंदे मुखत्यार सरदार, सांगाल ती चाकरी करू!* असे उद्विग्न होवून मल्हारराव बोलले व कोणतीही पूर्वसूचना न देता खंडेरावाच्या मृत्यूचे उत्तरकार्य निमित्त मथुरेला निघून गेले..
          *मुलाच्या मृत्यूचे दुःख पचवून बाहेर येणार नाही तो सुभेदार मल्हारराव कसला?* खंडेरावाचे उत्तर कार्य आटोपून मल्हाररावांनी मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतली." _*सूरजमल जाट याचे शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेत टाकीन. तरीस जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राण त्याग करिन."*_
             यावरून आपल्याला मल्हाररावांना पुत्रमृत्यूचं किती दुःख झालं होतं, हे लक्षात येईल. *यावेळी मल्हाररावांचं दुःख एकट्या मल्हाररावांचं न राहता सर्व मराठा सरदारांचं व ज्यांचं अस्तित्व मल्हाररावाच्या तलवार व भरोशावर निर्माण झालं होतं त्या पेशव्यांना व्हायला पाहिजे होतं. परंतु तसं झालेलं दिसत नाही.* (याचा अर्थ खंडेरावाच्या मृत्यू संबंधाने संशयास जागा आहे) *सर्व मराठा सरदार व पेशवे यांनी एकत्र येऊन मल्हाररावांवर आलेला प्रसंगाचा बदला घेण्यासाठी त्यांना साथ द्यायला पाहिजे होती. सर्वांनी मिळून सुरजमलला धडा शिकवायला पाहिजे होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही.*
       मात्र मल्हाररावांच्या प्रतिज्ञेने तिकडे सुरजमल जाट पूरता घाबरून गेला होता. त्याने *जयाजी शिंदे कडे आपल्या वकिलामार्फत पगडी व पत्र पाठवून, माहिती मिळेल त्या मार्गाने बचाव करावा, अशी विनंती केली. त्यावर जयाजी शिंदेनी जाटाना बेलभंडार व अभयपत्र पाठवले. दोघेही पगडी बंधू बनले. जयाजी शिंदेनी जाटाची बाजू घेतली व संरक्षणाची हमी दिली.*
   यावेळी प्रश्न निर्माण होतो
     १) सुरजमल जाटानी जयाप्पा शिंदेनाच संरक्षण का मागितले?
     २) जयप्पा शिंदेना खंडेरावाच्या मृत्यूचं दुःख झालं नव्हतं काय?
३) मल्हाररावांच्या दुःखाशी जयप्पा मराठा सरदार म्हणून त्यांच काही नातं नव्हतं काय?
४) खंडेरावाचा मृत्यू संगनमताने तर झाला नव्हता ना?
५) रघुनाथरावानी "पेशवा" या नात्याने मल्हारराव च्या बाजूने उभे न राहता जाटाशी तह करण्याचा आग्रह का धरला?
६) या दोघांना मल्हाररावांपेक्षा जाट जवळचे का वाटले?
 *असे अनेक प्रश्न निर्माण करून*
                  *कुंभारीचा लढा संपला.*
                 खंडेराव मारला गेला.
                 पराक्रमी मल्हारराव काही अंशी खचला.
         *पण हा सर्व प्रकार मला संशय निर्माण करून गेला, की, खंडेरावाच्या मृत्यूमागे येथील प्रवृत्तीचा तर हात नव्हता ना??*
(सत्यता तपासणीच्या दृष्टीने लेख आपणास पाठवित आहे)

------------------------------------
 *डॉ. प्रभाकर लोंढे*
*९६७३३८६९६३*