Thursday, January 31, 2019

रा. नेतृत्व विकासाची क्षमता होळकरशाहीच्या इतिहासातच

🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹
*रा. नेतृत्व विकासाची क्षमता होळकरशाहीच्या इतिहासातच!*   

                 डॉ प्रभाकर लोंढे

         भारतातील धनगर जमातीसह सर्वच बहूजन समाजाची अवस्था पाहीली तर या समाजाला *राजकीय क्रांतीची गरज आहे* . त्याशिवाय त्यांची प्रगती होणे शक्य नाही, हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. असे असले तरी ही *क्रांती रक्तविहीन क्रांती होणे* आवश्यक आहे. कारण भारतात लोकशाही आहे. लोकशाही मध्ये राजकीय क्रांती ही केवळ निवडणूकीच्या माध्यमातून शक्य आहे. येथे प्रत्येक निवडणूक जनमताच्या आधारे जिंकली जात असते, असं म्हटलं जातं, त्यामुळे येथील *धनगर सह बहूजन उमेदवारांपासून तर कार्यकर्ते व मतदारांना एका व्हिजन (दृष्टी)ची गरज आहे.* त्यांना एका कल्याणकारी विचारसरणीची आवश्यकता आहे. अशी ही *समाजोपयोगी, सर्वकल्याणकारी दृष्टी विकसित करण्याची ताकद मात्र फक्त होळकरशाही, तिचा इतिहास व तिच्या त्या नऊ रत्नांमध्ये आहे.* याची ग्वाही होळकरांचा इतिहास व तत्कालीन समाजव्यवस्था आपणा सर्वांना देते. त्यासाठी सर्वांनी तो इतिहास वाचनाची आवश्यकता आहे.
            भारतीय समाजातील धनगर सह बहूजनांपैकी आजच्या प्रत्येक नेत्यांना त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्या राजकीय अस्मिता जपायच्या असेल तर *स्वबळावर शून्यातून विश्व निर्माण करणारे थोर सुभेदार मल्हारराव होळकर डोक्यात ठेवावे लागेल..... त्यांचा स्वबळावर स्वअस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प  समजून  घ्यावा लागेल.  त्यांच्या सारखी पराक्रमाची  शर्थ लावावीे लागेल. त्यांचा गनिमी कावा लक्षात घेऊन तो तलवारीच्या नाही तर मतसंख्येच्या भरोशावर वास्तवात उतरवावा लागेल. मल्हाररावांचा बानेदारपणा, कठोर परिश्रम करण्याची तयारी, समय सुचकता, ध्येयाप्रती निष्ठा व निष्ठेपोटी असलेली कटीबध्दता* समजून घेणे आवश्यक आहे.
         आज धनगर सह बहुजन समाजामध्ये समाजहित केद्रित नेत्यांची कमतरता आहे, असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही कारण नेतृत्वाच्या कर्तुत्वाचा परिणाम दिसत नाही. व वास्तविकता ही आहे की, हा बहुजन समाज राजकीय सत्तेपासून व त्याच्या लाभापासून आजही वंचित आहे. त्याला केवळ नेतेच जबाबदार नाही तर येथील परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. मात्र या परिस्थितीवर मात करूनच बहूजन समाजाचा विकास शक्य आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने संघटित प्रयत्न होणे आवश्यक आहे. असे प्रयत्न करण्याची ताकद देण्याची क्षमता फक्त होळकरशाहीच्या इतिहासात आहे.  विपरीत व प्रतिगामी सामाजिक, राजकीय परिस्थिती असताना खाजगी जीवनातील दुःखाचे भांडवल न करता राजकीय सत्ता  हातात घेऊन *बहुजन नेत्यांना स्वबळावर लोकाभिमुख, लोकहितवादी  राज्यकारभार करायचा असेल व लोकांच्या गळ्यातील ताईत बनायचे असेल तर महाराणी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श पुरेसा आहे...*
                   होळरशाहीतील महापराक्रमी *यशवंतराव होळकरांचा इतिहास तर आजच्या सर्वच प्रश्र्नांचे उत्तर देणारा आहे* . सोबतच लढण्याची ताकद निर्माण करणारा आहे. स्वराज्यातील संकटांच्या मालिकांमुळे स्वराज्याची घडी विस्कळीत झालेली असताना स्वबळावर स्वराज्य पुनर्गठित  करण्याचे कार्य पराक्रमी यशवंतराव होळकरांनी केले. राष्ट्रीय भावना जपत समान दुखितांना संघटित करून  शत्रुवर वार करण्याचे कार्य केले. हे सर्व समजून घेण्यासाठी  मात्र शूरवीर यशवंतराव वाचावा लागेल.
       स्वजनांच्या उद्धारासाठी काही करायची खरी इच्छा असेल, धनगरांच्या घरातील दुरावस्थे बरोबरच जमात व राष्ट्रावर आलेली संकटे ओळखून राष्ट्र वाचवायचे असेल सोबतच *आजच्या संकटसमयी एकत्र येऊन शत्रूवर जरब निर्माण कराविशी वाटत असेल तर  मन, मनगट व मस्तकात महाराजा यशवंतराव होळकर व त्यांचा पराक्रम, दुर्दम्य आशावाद, प्रचंड इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.*
              थोडक्यात सांगायचे झाले तर धनगर जमातीच्या नेते, कार्यकर्ता यांनी होळकरशाहीच्या संस्थापकाची दूरदृष्टी व पराक्रम, मातोश्री अहिल्यामातेची लोकाभिमुखता व कल्याणकारी दृष्टीकोन, यशवंतरावांचे प्रसंगावधान व धडाडी सोबतच राष्ट्रीय भावना समजून घेतले तर *धनगर सोबतच सर्वच बहूजन जमातीतून सक्षम नेतृत्व विकसित होऊ शकते.* ..... *प्रस्थापितांची मुजोरी खतम होवू शकते...*

                त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

           जय मल्हार
 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Friday, January 11, 2019

धनगराना आता राजकीय क्रांतीशिवाय पर्याय नाही!*

*धनगराना आता राजकीय क्रांतीशिवाय पर्याय नाही!*

    *डॉ प्रभाकर लोंढे*

     धनगर जमातीच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख लक्षात घेता या जमातीच्या सर्व प्रश्‍नांचे मूळ जमातीच्या राजकीय सत्तेपासून दूर असण्यामध्ये आहे. सोबतच जमात नेतृत्वाच्या राजकीय आकांक्षेच्या अभावात आहे. त्यामुळे जमातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजकीय सत्ता अत्यावश्यक असताना या जमातीने स्वतःला राजकीय सत्तेपासून अनपेक्षित अनभिज्ञ ठेवलेले आहे.  परिणामतः भारतीय लोकशाहीमध्ये बहुसंख्येने असलेली धनगर जमात एक राजकीय उपेक्षित जमात असल्याचे आजही लक्षात येते *. "धनगर जमात वेडी" की "प्रस्थापितांची खेळी" असो काहीही, मात्र आज धनगर जमात व्यवस्थेच्या नेहमीच गेली बळी....* 
          अलीकडे धनगर जमात वेडी तर राहीलेलीच नाही शिवाय त्यांनी आज प्रस्थापितांची खेळी ओळखली आहे. त्यामुळे आता बळी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
              धनगर तरुणाईचा ध्यास व भारतीय राजकारणाचा अभ्यास या दोन गोष्टी मुळे धनगर जमाती मध्ये राजकीय नवचैतन्य निर्माण होताना दिसत आहे. धनगर जमातीने अभ्यासातून आज महाराष्ट्रीयन राजकारणाची नस ओळखली आहे. धनगर जमातीच्या सर्वच प्रश्नाचे आकलन व कारणमिमांसा या पर्यंत धनगर जमातीचे अभ्यासक जावून पोहचलेले आहे.  त्यांच्या अध्ययन, संशोधन, विश्लेषण व लेखन यातून धनगर जमातीला विकासाचा एक सूर गवसलेला आहे. व यापुढे राजकीय सत्तेशिवाय धनगर जमातीला पर्याय नाही, हा निष्कर्ष धनगर नेतृत्वापासून सामान्य धनगर माणसांपर्यंत जावून पोहोचला आहे.  सोबतच सर्वांनी तो सहजपणे स्विकारलेला आहे. आता पर्यंत झालेल्या चुका, अन्याय, अत्याचार, नुकसान या सर्व बाबींची खंत वाटायला लागली आहे. त्यांनी धनगर जमातीचे नुकसान करणारे जंत ओळखलेले आहे. त्या जंताच्या अंतातूनच धनगराचा  राजकीय उदय आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे धनगर जमातीमध्ये राजकीय क्रांती शिवाय दुसरा पर्याय नाही, हा आत्मविश्वास धनगर जमातीमध्ये अलीकडे सातत्याने पहायला मिळतो आहे.
            तरुण धनगर नेतृत्वांची राजकीय सत्तेच्या दृष्टीने लोकशाहीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुध्दा झालेली आहे. यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात धनगरांचा मोठा राजकीय प्रलय निर्माण होणार हे निश्चित आहे. यामध्ये प्रस्थापित धनगर नेत्यांसह अनेक बड्या गैर धनगर नेत्यांचे राजकीय गणित कोलमडणार हे नक्की आहे. धनगरांचे प्रस्थापित नेतृत्व व नवोदित नेतृत्व यांच्या मधील समन्वयातून धनगर राजकीय क्रांती शक्य आहे.
     एवढं मात्र निश्चित की, यापुढे धनगरांच्या राजकीय क्रांती शिवाय पर्याय नाही, ही बाब सर्वमान्य झालेली आहे. त्यामुळेच धनगर समाजानी आता केवळ राजकीय सत्तेसाठी आपली नीती आखावी. आरक्षणासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करीत असतांनाच राजकीय सत्तेसाठी आपले तन, मन, धन संघटितपणे खर्च करणे आवश्यक आहे. परस्पर सामंजस्य व सहकार्य या तत्त्वावर आधारित समाजाचा राजकीय जाहीरनामा प्रसिद्ध करून जमातीच्या  योजनाबध्द वाटचालीतून धनगरांची ही राजकीय क्रांती शक्य आहे..

                     *जय मल्हार*

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*