Sunday, November 24, 2019

एकूण राजकीय घडामोडी मध्ये धनगर कुठे?

👁👁👁👁👁👁👁👁👁
राजकीय घडामोडी मध्ये धनगर कुठे??*

               *डॉ प्रभाकर लोंढे*

            अख्खा महाराष्ट्र होरपळून निघत आहे, नाट्यमय घडामोडी घडत आहे. मात्र सत्ता कोणाची हे अजून निश्चित झालेलं नाही.  प्रत्येक चेहऱ्यावर, प्रत्येक मनामध्ये, प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच चर्चा,  प्रत्येकाच्या शब्दाचा आधार महाराष्ट्रातील राजकीय सत्ता व राजपटावर कोण बसणार? किती काळ बसणार? कोणाची महत्त्वाची भूमिका असणाऱ? या चर्चेमध्ये गल्ली बोळात, घरातल्या घरात, वाड्या-वस्त्यांवर, शेतात, जनावरां मागे *होणाऱ्या चर्चेत कदाचित धनगर सुद्धा सहभागी असेल. की जो आज राजकीय बाबतीत प्रवाहापासून दूर फेकला गेला* आहे.  पण या सत्तेचा हक्कदार कोण ठरणार? हे मात्र धनगर सह बहुजनांच्या हातात काहीही दिसत नाही.
                   मागे पडला आरक्षणाचा प्रश्न, संपून गेला उमेदवारीचा प्रश्‍न, मागे पडला शेतकऱ्यांचा प्रश्र्न, मागे पडला याचा प्रश्र्न, मागे पडला त्याचा प्रश्न, *आता फक्त प्रश्र्न व चर्चा . पवार, फडणवीस, ठाकरे, -------- आणि सत्ता व राजपद ? पण या सर्वांच्यामध्ये कुठेही धनगर रक्ताचा माणूस दिसत नाही.*
           कोणी म्हणेल महाराष्ट्र बदलला. आता लोकशाही आहे. नकळत मान्य करावेच लागेल. मात्र *सरंजामी थाटात वागणारे घराणे आजही महाराष्ट्रात दिसून येत आहे.* तेही स्विकारावे लागेलच. पूर्वी *पेशवे, होळकर, शिंदे, पवार, भोसले यासोबतच पांढरे , देवकते, आणि अनेक मरहट्टी धनगर सरदार घराणे या महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आपली महत्त्वाची भूमिका बजावत होते* . याठिकाणी त्याकाळी *धनगर सत्तेचे वाटेकरी होते,* एवढेच सांगायचे आहे.
                   तो काळ पेशवाईचा होता, पेशवे सर्वेसर्वा असले तरी महाराष्ट्रातील *पेशवाईच्या गादी पासून तर ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या राजगादीवर कोण बसेल? याचा निर्णय, तो राजकीय प्रश्न सोडवणे थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रभावात्मक अधिकार कक्षेत होता.*  यासंबंधाने सुभेदार मल्हारराव होळकरांचा निर्णय, शब्द व सल्ला शिरसावंद्य मानला जात होता.  त्यामुळे त्यांचा सल्ला हा त्यावेळच्या केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील सत्ताकारणाला दिशा देऊ शकत होता. *एवढी ताकद व व्यवस्थेवर प्रभाव, तो तसा सन्मान सुभेदार मल्हारराव यांच्या शब्दाला होता.* हे मी कल्पनेवरून नाही तर त्यांच्या पराक्रमाचा परिणाम म्हणून लक्षात आलेल्या बाबी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  हे आपल्याला मराठेशाहीच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल, की येथील वारसा हक्काचे व राजगादीचे अनेक प्रश्न, किल्ल्यांवरील अधिकाराचे प्रश्न, सुभेदार मल्हाररावांनी सल्लामसलत करून, प्रसंगी बळाचा वापर करून सोडविण्याचे अनेक दाखले मल्हाररावांच्या विषयी इतिहासामध्ये दिसून येतात.
                        यावरून मला एवढेच लक्षात आणून द्यायचं आहे, की *तत्कालीन पेशवाईमध्ये होळकर व इतर सरदारांच्या माध्यमातून तत्कालीन धनगर हा दखलपात्र होता. त्याचा तेव्हा दरारा होता. त्याचा या व्यवस्थेवर प्रभाव होता. महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये धनगरांचा फार मोठा मोलाचा वाटा होता.* या धनगर रक्ताला विचारात घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील निर्णय पूर्णत्वाकडे जात नव्हता. एवढा व्यवस्थेवर राज करणारा *धनगर आजच्या काळात पूर्णतः बेदखल कसा काय झाला ????* हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. प्रत्येक वाचकांने करावा, हिच या लेखामागची अपेक्षा आहे.
         आजच्या एकूण राजकीय घडामोडी व सत्ताकारणात धनगर कुठेच दिसत नाही.  सत्य आहे की, काळ बदलतो, व्यवस्था बदलते पण बदलत्या परिस्थितीत स्वत:ला प्रवाहित ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. काळाबरोबर पेशवाई गेली. *आज लोकशाही (घराणेप्रधान) प्रस्थापित झाली.* सत्तापद बदलली पण पदावरील मक्तेदारी मात्र कायम आहे, असं म्हटल तर चूकीचे होणार नाही.  या महाराष्ट्रातील पेशवाई पासून येथे राज करणारे पेशवे (ब्राम्हण), मुळ पेशवाईत दुय्यम स्थान असणारे मराठे आज सत्तेच्या आखाड्यात प्रथम स्थानी दिसून येतात. *आज मराठे व ब्राम्हण हे दोन्ही आज सत्तेची सुत्रे हालवितांना दिसून येतात.* तेव्हा येथील इतिहास पाहिला तर *धनगर, मराठे व ब्राम्हण या तिन समुदायांनीच महाराष्ट्रातील इतिहास घडविला ही बाब लक्षात येते.*
             पाणीपत युध्दात मराठ्यांचा पराभव झाला, या पराभवाचं खापर फोडण्यापुरतेच मल्हारराव मराठ्यांच्या इतिहासात नव्हते. अरे *पेशवाईचा खडा न खडा मल्हाररावांच्या विश्वासाने सुरक्षित होता. पेशवाईच्या बेंबीच्या देठापासून मल्हारराव पेशवाईला जाणत होते.* कारण तिचा मुख्य आधारस्तंभच मल्हाररावच होते.
            परंतु ऐतिहासिक प्रभावशाली असलेला धनगर मात्र आज सत्तेच्या आखाड्यात कुठेच दिसत नाही. ही गंभीर बाब होळकरांच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या धनगर व इतरांना विचार करायला लावणारी आहे.
 *सर्वांनी याचा विचार करावा. याची कारणं मिमांसा तपासून पहावी हिच या लेखाची पार्श्र्वभूमी....*


खूप खूप शुभेच्छा!!


 *एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश* .
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment