Tuesday, January 7, 2020

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.
 
डॉ प्रभाकर लोंढे.

"उष:काल होता होता, काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली."

         धनगर जमातीच्या राजकीय नेतृत्वाची दुरावस्था आज सार्वत्रिक तसेच सर्वमान्य झालेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका धनगर जमातीने अनुभवलेल्या आहेत. आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका धनगर जमातीच्या हातात आहे. जमातीला  सर्वांगीण सक्षम बनविण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थावर अधिराज्य निर्माण होणे तसेच जमातीने भावी राजकीय वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणे यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका धनगर जमातीसाठी एक संधी स्वरूपात आहेत.
          लोकसभेतील तसेच विधानसभेतील धनगर उमेदवारांचा दारुन झालेला पराभव, निवडून आलेला एकमेव आमदार हा धनगरांचा विजय म्हणावं की पराभव?????  हा प्रश्र्नच असतांना कोट्यावधी धनगरांचा सार्वत्रिक पराभवच झाला आहे असं प्रत्येकाने म्हटलंच पाहिजे व तो पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागलाच पाहिजे. तरच यापुढे धनगर राजकीय अस्मिता पुनर्जीवित करणे शक्य आहे.
                धनगर राजकीय अस्मितेची वारंवार लाजिरवाणी पडझड सुरू असतांनाच, महाराष्ट्रातील धनगर "संवेदनाशून्य धनगर" आहे, असं म्हणणं चुकीचं ठरलंच पाहिजे. त्यासाठी जिथे कुठे संवेदना शुन्य धनगर लक्षात येईल तेथे सामाजिक संवेदना जागवायला कोणाची हरकत नसावी. तसा प्रयत्न प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. अशा प्रयत्नांचा सार्वजनिक व मिशन स्वरूपात प्रत्येकाने स्विकार केलाच पाहिजे.  राजकीय सत्ता किती महत्त्वाची आहे, हे अलीकडेच महाराष्ट्रातील पार पडलेल्या प्रस्थापितांच्या (प्रस्थापित पक्षांच्या) राजकीय नाट्यावरून लक्षात येईल. सत्तेच्या भरोश्यावर जीवनभर केलेली पापं कसे धुता येते.  याचे प्रमाण/ सबुत गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात पहायला मिळते. तेव्हा सत्तेचे महत्त्व धनगरांनी समजून घेवूनच जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जावे.
           सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहे. किंवा येणाऱ्या भावि काळात लवकरच त्या होणार आहे. जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालय समजले जाते. यामध्ये आपला प्रतिनिधी असेल तर छोट्या का होईना सत्तेच्या विकेंद्रीकरणातून सत्तेचा फायदा जमातीला होवू शकतो. भावी काळात निर्माण झालेले जिल्हा परिषद मधील धनगर  नेतृत्वाच्या जाळ्याच्या सहकार्याने किंवा त्यांच्या पैकीच काही विधानभवनात आमदार, संसदेत खासदार  म्हणून नक्कीच पाठविता येतील.
     उभरत्या धनगर नेतृत्त्वाला परस्पर सहकार्याने आपला स्वत:चा तसेच जमातीचा राजकीय विकास करता येईल. राजकीय सत्तेपासून वंचित असलेली, हेतूपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या गेलेली धनगर जमात राजकीय प्रवाहात येईल. दिवसेंदिवस जमातीची चाललेली राजकीय परवड, पडझड थांबविता येईल. तुमच्या छोट्याच्या प्रयत्नातून धनगर राजकीय अस्मितेचे पुनर्जागरण झाल्याशिवाय राहणार नाही.
               म्हणून धनगर असाल तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये धनगर उमेदवार दिसेल तिथे, त्यालाच मतदान केल्या शिवाय राहू नका. "विसरून सारे भेद- धनगर सारा एक" या म्हणीप्रमाणे एक जीवाने संघटित होऊन तन-मन-धनाने मतदान करून सर्वांना प्रोत्साहित करून भावी धनगर नेतृत्वाचे पाय मजबूत करा....
वैचारिक मतभेद का असेना रक्ताचा माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवा.  जिल्हा परिषद,पंचायत समितीतून, ग्रामपंचायत मधून धनगर समाजाच्या राजकीय नेतृत्वाचे आणि राजकीय अस्मितेचे पुनर्भरण करा.
    त्यावेळी लक्षात ठेवा!!! मोठ्या कामाची सुरुवात छोट्या पासूनच होत असते. थेंबा थेंबाने तळे साचत असते. शतकांपासून गमावलेली राजकीय अस्मिता पुनर्जीवित करण्यासाठी कदाचित पुढील शतक सुद्धा लागण्याची शक्यता असेल.  परंतु या कार्याची सुरुवात करणारे तुम्हीच असाल. म्हणून जगायचं तर स्वतःसाठी!! स्वतःच्या माणसांसाठी!! स्वतःच्या राजकीय अस्मितेसाठी!! स्वतःच्या भावी पिढ्यांच्या सुंदर जगण्यासाठी, आवश्यक असलेल्या व्यवस्था परिवर्तनासाठी!!! 
    उठा!! जागे व्हा!! जागवा आणि मतदान करा!! आपल्यासाठी!! आपल्याच माणसांना!! आपल्या सर्वांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी!!
,
खूप खूप शुभेच्छा!!!

अरे!
उष:काल होता होता,काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......

___________________________&__
जय यशवंतराव !! जय मल्हार

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment