Thursday, May 21, 2020

आ. गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आ. *गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..* 
            (कोणीही भावनात्मक होवून वाचू नये)

                 *डॉ. प्रभाकर लोंढे* 

               इतिहासात महाराष्ट्रातील पेशवाईचा काळ सर्वांना अभिमानाची बाब आहे. म्हणून तो समजून घेण्याची  गरज आहे. कारण भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमानाची पावलं भविष्याकडे टाकत असताना आजची व्यवस्था तशी समजून घेतली तर पेशवाईची पूनर्स्थापना होत आहे. *मराठे सरदार पहीलेच मजबूत बनले आहे. ते पेशव्यांना हातात घेऊन प्रसंगी त्यांची मुंडी मुरगाळून सत्ता उपभोगत आहेत.*  याबाबीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 
          फडणवीस साहेबांनी यापूर्वी मागील पाच वर्षे जी सत्ता उपभोगली तेव्हा *त्यांनी धनगरांना इतकं महत्व दिलं नसलं तरी धनगरांचा साथ मात्र घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.* धनगरांचा आधार घेऊन मराठा सरदारांना शह दिला जाऊ शकतो असा विश्वास त्यांना वाटला आहे म्हणून खोटे  का असेना आरक्षणाचे आश्वासन देऊन जानकर साहेब व शिंदे साहेब यांना मंत्री पदापर्यंत सोबत घेऊन आपली पेशवाई मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.  तेव्हा त्यांनी हा विचार केला की येथील मराठा सरदारांना शह देण्यासाठी धनगर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ *त्यांनी पेशवाई व मल्हारराव यांचा पुरेपूर अभ्यास केला आहे.*  तेव्हा त्यांनी ही सुद्धा दक्षता घेतलेली आहे की या *धरगरांमधून पेशवाईवर प्रभाव, दबाव आणि वर्चस्व असलेला नवीन मल्हारराव घडणार नाही.* आणि म्हणूनच त्यांनी पुढचं पाऊल टाकत (माजी मंत्री शिंदे साहेब व इतरांना टाळून) गोपीचंद पडळकर नावाच्या तरुण, उत्साही व्यक्तीला,  *धनगरांना भावनात्मक करू शकेल, तरुणांमध्ये उत्साह भरू शकेल अशा  धनगर उमेदवाराला विधान परिषद दिलेली आहे.*  
          ही विधान परिषद केवळ आणि केवळ धनगर म्हणून दिलेली आहे असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण ज्याप्रमाणे राजश्री *मल्हाररावांशिवाय येथील मराठीशाही किंवा पेशवाईचा झेंडा मातीमोल होता.* (मल्हाररावांनी एकट्याच्या भरोसावर नाही तर आपल्या विविध धनगर सरदारांच्या भरोशावर एवढा वचक निर्माण केला होता. जागोजागी त्यांनी आपली माणसं पेरली होती.) त्याप्रमाणे आजच्या बीजेपीचा झेंडा धनगरांशिवाय उभा राहू शकत नाही. म्हणून ते मल्हाररावांप्रमाणे धनगरांच्या काही उमेदवारांना हाताशी बाळगत असतात. त्यांना आजच्या लोकशाहीत धनगर मजुरांकडून मल्हाररावांचा पराक्रम अपेक्षित आहे पण वर्चस्व मात्र नक्कीच नाही. *त्यामुळेच ते वारंवार सरदार बदलत असतात.* 
              आज धनगरांना सरदारकी देत असताना आजच्या लोकशाहीतील लोकमताचा भावी काळासाठी विचार करून ते धनगरातील सरदार निवडत असतात.  आज त्यांच्या दृष्टीने असा उपयोगी सरदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत. ते *वकृत्वाच्या भरोशावर धनगर तरुणांना आपल्या कहेत नक्कीच घेऊ शकतात. तेवढी त्यांची क्षमता सुद्धा आहेत, असं म्हटलं तर चुकीचं आहे असं सिद्ध होऊ शकत नाही. परंतु ते सर्व गोपीचंद पडळकर साहेबांच्या पुढील धोरण व महत्वाकांक्षा यावर अवलंबून आहे.* 
          थोर सुभेदार राजश्री मल्हारराव उदयास आले, तेव्हा त्यांनी तत्कालीन *धनगर सरदारांचा साथ घेतला होता. त्यांनी बुळे, वाघमोडे, पांढरे, धायगुडे, .......   अशा अनेक धनगर सरदारांना मोठं केलं होतं.* एवढेच नाही तर अनेकांचं  सत्तेत बस्तान बसविलं होतं. अनेकांना आपल्या साम्राज्यात प्रस्थापित केलं होतं.  त्यामुळेच मल्हारराव आपल्या राज्यकारभारात व पेशवाईत यशस्वी झाले होते. त्याच भरोश्यावर त्यानी अटकेपार झेंडे फडकावले होते. ते *त्यांना एकट्याच्या भरोशावर करता आलं नसतं.* 
         आज गोपीचंद पडळकर साहेबांना मल्हाररावांच्या भूमिकेत हाताशी पकडलं असलं तरी शिंदे साहेब, गणेश हाके साहेब यासह अनेक जुने सरदार बीजेपी मध्ये विद्यमान कार्यरत आहेत. आ. महादेव जानकर साहेब तर गोपीचंद पडळकर साहेबांचे गुरु आहेत. मंत्री दत्ता मामा भरणे राष्ट्रवादीत असले तरी ते राष्ट्रवादीतील धनगरांचा प्रमुख सरदार आहे. त्यांच्या नेतृत्वात सुध्दा एक महत्त्वाची फळी उभी आहे. याशिवाय गोपीचंद पडळकर साहेबांची ४९  भावी आमदारांची तरुण तुर्क फौज सुध्दा सोबत तयार आहे. 
          सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याने व स्वतःच्या धोरण निर्धारण व अचूक पावले टाकून गोपीचंद पडळकर साहेबांना आधुनिक पेशवाई मधील सुभेदार राजश्री मल्हारराव बनणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रथमता आपला सर्वांचा शत्रू असलेली मानसिकता ओळखून त्याविरोधात लढण्याची सांघिक नीती निर्धारित होणे आवश्यक आहे तरच *गोपीचंद पडळकर साहेबांना  मल्हाररावांच्या सरदारकीचा सन्मान व स्वराज्याचे वैभव नक्कीच प्राप्त होणार आहे. नाही तर आमदार गोपीचंद साहेबांमधून, शेंडगे, डांगे, महात्मे मात्र नक्कीच घडणार आहे.* 

 *त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!* 


 *डॉ.  प्रभाकर लोंढे* 
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचे अभ्यासक* 
९६७३३८६९६३

Wednesday, May 13, 2020

गोपिचंद ला गोपीनाथ बणण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

गोपीचंद ला गोपीनाथ बणण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

डॉ प्रभाकर लोंढे

         धनगर नेते म्हणून ब्रँडिंग झालेले मा. गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळताच धनगर समाजामध्ये काही प्रमाणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.  प्रथमतः गोपीचंद पडळकर यांचे त्रिवार विशेष अभिनंदन!!!  ही धनगर जमातीसाठी अभिनंदनाची बाब असली तरी ही  विधान परिषदेची उमेदवारी मिळवून घेण्यासाठी त्यांना बारामती मध्ये येऊन स्वतःच डिपॉझिट जप्त करून घ्यावं लागलं ही बाब अतिशय विचार करायला लावणारी आहे. . धनगर बहुल बारामतीमध्ये येऊन धनगर उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणं ही जमातीसाठी अभिमानास्पद बाब आहे, असं मला तरी वाटत नाही. परंतु ते बारामतीत का आले? हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी सांगली(जिल्हा) सोडली नसती तर कदाचित ही वेळ आली नसती.
              गोपीचंद म्हणजे एका सामान्य धनगर कुटुंबातील माणूस पण त्यांनी "50 धनगरांना आमदार व तीन महिन्याच्या आत एस.टी.चे सर्टिफिकेट" या मुद्यांवर उत्तम वकृत्व शैलीच्या आधारे धनगर तरुणाईला भारित केलं.  असं एक व्यक्तित्व म्हणून बीजेपी ने गोपीचंद पडळकरांना पुन्हा जवळ केलं. त्याआधारे बीजेपीला जी काही मत मिळायची ती मिळाली. तसा गोपीचंद पडळकर यांचा प्रवास हा अत्यंत खडतर, त्यांना प्रस्थापितांच्या कट कारस्थानांच्या बाबतीत चांगला अनुभव आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी स्वत:ला चांगल्या प्रकारे स्थीर ठेवलं. काही प्रमाणात का होईना स्वत:ला आर्थिक राजकीय बाबतीत सक्षम केलं.
          प्रस्थापितांनी त्यांच्याशी कसेही वागले तरी धनगर लाटेला वळविण्याचं काम गोपीचंदनी उत्तम प्रकारे केलं किंवा करू शकतो हा विश्वास बीजेपीला वाटल्यामुळे तसेच धनगरांचा नवीन पत्ता खेळण्याच्या दृष्टीने ही उमेदवारी दिलेली आहे, असं मला वाटते. शेवटी हे माझं मत आहे. पण विधान परिषदेतील उधारीच्या सभासदत्वाची धनगर संख्या एक ने वाढेल. त्याबद्दल धनगर जमातीचे विशेष अभिनंदन!!
          गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच मात्र अनेकांनी त्यांची तुलना गोपीनाथ मुंडेशी केली. बीजेपी तील गोपीनाथ मुंडे बनण्याची संधी, ओबीसी नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची संधी अशा आशयाची प्रतिक्रिया वाचली. आनंद झाला. डोक्यात  विचार आला. मन गंभीर झालं आणि त्यानी ठरवून टाकलं. की मी लिहून देतो, गोपीचंद पडळकरांना गोपीनाथ मुंडे बनण्याचे मार्ग पूर्णता बंद झालेले आहे. 
           गोपीनाथ मुंडेंचा ज्या परिस्थितीमध्ये राजकीय जन्म झाला, ती राजकीय परिस्थिती बीजेपी मध्ये गोपीचंद यांना नक्कीच मिळणार नाही. याशिवाय गोपीचंदची जमात धनगर, महाराष्ट्रात हेतुपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या जात असलेली धनगर. (आजचा अलिखित नियमच बनून गेला आहे की या महाराष्ट्रात धनगर नेतृत्व सदासर्वकाळ सत्तेत किंवा नेतृत्वात राहूच द्यायचा नाही) आजच्या महाराष्ट्रातील धनगर नेतृत्वाचा इतिहास पाहिला तर धनगरांचा कोणताही पत्ता(नेतृत्व) फूल टाइम वापरला गेला नाही. (आबा अपवाद) धनगरांच्या नेत्याला शह देण्यासाठी नवीन दुसरा धनगर नेता शोधणे व त्याला पुढे करून जमातीला बांधून ठेवणे, ही येथील प्रस्थापित पक्षांची नीती. पडळकरांना  उमेदवारी देण्यामागचा कदाचित हा उद्देश असण्याची दाट शक्यता आहे.  बीजेपीला पडळकरांची राजकीय ताकद वाढवायची असती तर विधानसभेसाठी बारामतीत नेऊन त्यांची डिपॉझिट जप्त होऊ दिली नसती.  
           गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. लोकांना माहीत नसलेला बीजेपी पक्ष त्यांनी घराघरात नेऊन पोहचविला. ती बीजेपी ची गरज होती.  त्यामुळे त्यांची नाळ ही अठरापगड जातीशी व घरात पत्नी महाजन (प्रमोद महाजन ची बहिण) घराण्याची होती. त्या
मुळे गोपीनाथ  मुंडे साहेबांना शेवटचे गोपीनाथ मुंडेसाहेब बनण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली. तशी संधी आज गोपीचंदजीना बीजेपी मध्ये उपलब्ध आहे, असं मला तरी वाटत नाही. 
            तसं पाहिलं तर प्रस्थापितांनी गोपीचंद पडळकरांची  महाराष्ट्रातील विधिमंडळात /राजकारणात सुरुवातच विधानसभेची  डिपॉझिट जप्त करून विधानपरिषदे पासून केली . (याचा अर्थ असा काढू नका की, गोपीचंद पडळकर निवडून येवू शकत नाही ) मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की त्यांच्यासाठी ही परिस्थिती हेतुपुरस्सर निर्माण केल्या गेली. 
             गोपीचंद पडळकरना मिळालेली उमेदवारी ती मागावी लागली. येथे मिळलेली उमेदवारी ही धनगर समाजाला आहेत की गोपीचंद पडळकरांना आहे?, हा मोठा प्रश्र्नच आहे. पडळकर साहेबांच्या कार्याचं ? की धनगर जमातीच्या त्यागाचं फलित? म्हणून ही उमेदवारी मिळालेली आहे. (यापूर्वी धनगरांच्या त्यागाच फलित म्हणून धनगरांना खासदारकी मिळाली आहे)
            या ठिकाणी प्रश्न कितीही असले तरी आलेली संधी मात्र गोपीचंद पडळकर साहेबांच्या राजकीय जीवनाचे सार्थक करू शकते. आलेले कटू अनुभव व योग्य पावले पडली तर धनगर जमातीच्या राजकीय पटलावर एक नेतृत्व म्हणून विधानमंडळात महत्त्वाची भूमिका बजावू होऊ शकते. 
   त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!


डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३

जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!*

🥈🥉🥈🥉🥈🥉🥈🥈🥈🥉
*जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!* 
 
                    *डॉ प्रभाकर लोंढे.* 

                 माणूस जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतःच्या क्षमतेनुसार जगत असतो, असं असलं तरी त्याचा दृष्टीकोन त्याला त्याच्या जगण्याची दिशा ठरवण्यासाठी मदत करीत असतो. हा त्याचा दृष्टीकोन त्याच्यावरील संस्कार, उपलब्ध परिस्थिती व त्याने जीवनामध्ये पाहिलेल्या स्वप्नांवरून ठरत असतो. यापुढे त्याने आपल्या दृष्टिकोनाला सांभाळत असताना केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख हा त्याच्या जीवनाचा दर्जा ठरवित असतो, प्रसंगी त्याच्या/ तिच्या व्यक्तित्वाला अमरत्व प्राप्त करून देत असतो. तेच अमरत्व इतर सामान्य माणसांच्या दृष्टीने त्याला महापुरुषाचा दर्जा प्राप्त करून देत असतो. व त्याच्या प्रेरणेतून सामान्य माणूस संपूर्ण जीवन जगत असतो.
        असे *कर्तुत्ववान प्रेरणादायी महापुरुष पैदा करता येत नाही तर ते घडविता येतात. महापुरुष हा विचारांनी व कर्तुत्वानी घडत असतो,*  त्यामुळे स्वतःच्या जीवनातील आचारपद्धती व स्वप्न साकार करण्यासाठी इतिहासात घडून गेलेल्या महापुरुषांची कार्य पद्धती व जीवन कार्य सामान्यांना जीवनामध्ये आधारस्तंभ दीपस्तंभ यासारखे कार्य करीत असते.  समाजात घडून गेलेले महापुरुष समाजात सातत्याने दीपस्तंभासारखे जळत राहावे, सर्वसामान्यांपर्यंत जगण्याची दृष्टी देत राहावे, यादृष्टीने महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या समाजामध्ये साजरा करावयाच्या असतात. 
             *पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर हे व्यक्तित्व समाजामध्ये अनेक अंगाने मार्गदर्शक असून जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जगण्याची ऊर्जा देऊन जात. संपूर्ण जग दुःखमय असताना दुःखातही सुख शोधण्याची वृत्ती निर्माण करतं. खाजगी जगत असताना सार्वजनिक, सर्वकालिक होण्याची प्रेरणा देतं. सर्वधर्मसमभाव यातून सामाजिक समतोल साधण्याची एक विचार प्रेरणा घेऊन जगण्यासाठी माणसाला प्रेरित करतं. सत्तेचा माज उतरवून समाजामध्ये सेवाभावी दृष्टीने जगण्यासाठी मजबूर करतं.* म्हणून ज्याप्रमाणे एकलव्याने द्रोनाचार्याचा पुतळा बनवला होता तो पुतळा एकलव्या तील सर्व स्कील विकसित करण्यासाठी प्रेरणा देत होता. त्यातूनच तो उत्तम धनुर्धारी बनला. यातून मला एवढेच सांगायचे आहे की महापुरुषांचे पुतळे, चित्र, स्मृती ह्या बाबी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं जीवन जगण्यासाठी व स्वतःतील गुण कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक ती मदत करीत असतात. 
                 त्यासाठीच यावर्षीची राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे २०२० ला सर्व सामाजिक व राजकीय बंधन पाळून आपण आपल्या घरी वाड्या-वस्त्यांवर राहून उत्साहात साजरी करू शकतो. यावेळी कोणीही शासकीय निर्बंध,नियम, कायदा तोडणार नाही, याची संपूर्ण खबरदारी घेऊनच जयंती साजरी करावी. व ते सर्वांवर बंधनकारक आहे. परंतु याचा असा एक फायदा आहे की, त्यामुळे दरवर्षी जयंतीसाठी मोठ्या खर्च होणारा पैसा वाचणार आहे. *हा वाचलेला पैसा खर्च झालाच पाहिजे, असं बंधनकारक नाही. परंतु त्या मधून भुकेलेल्यांना अन्न, पैशावाचून शिक्षण थांबणाऱ्यांना शिक्षणाच्या सोयी, बिमारांना आर्थिक मदत, समाजातील अन्याय, अत्याचारग्रस्त यांना मदत, याशिवाय प्रत्येकाच्या मनात असलेले समाज उद्धारक नवोउपक्रम राबवण्यासाठी या जयंतीचा वापर करून खऱ्या अर्थाने आपण दानदात्या राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वारस असल्याचे सिद्ध करू शकतो.* 
        याशिवाय लॉक डाऊनचा काळ असल्यामुळे कुठे सार्वजनिक स्थळी राजमाता *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी न करण्याचं शल्य मनात येऊ न देता पारंपारिक उत्साह जोश कायम ठेवून त्याला मात्र वेगळ्या वळणावर परिस्थितीसापेक्ष निर्णय घेऊन यावर्षीची जयंती साजरी केली तर ती अविस्मरणीय राहणार आहे.*         

अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विविध चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वाड्या-वस्त्या यांना महापुरुषांची नावे देण्याची ट्रेंड प्रचलित होताना दिसत आहे. सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक अंगाने मार्गदर्शक जीवन असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा चौक, रोड, रस्ता उड्डाणपूल दिसत नाही किंवा ऐकायला मिळत नाही.  *यावर्षीच्या जयंती निमित्ताने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव एखाद्या चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वार्ड, मोहल्ला, वाड्या-वस्त्यांना  देऊन, त्याची ३१ मेला तत्वतः घोषणा करून सर्वांनी आपल्या घरीच राहुन ऑनलाइन पद्धतीने विचारविनिमय करून ऑनलाइन पद्धतीनेच त्याची घोषणा केली तर लाकडाऊन नंतर त्याची अंमलबजावणी करता येईल.* या लाकडाऊनच्या निमित्ताने ती अविस्मरणीय बाब ठरणार आहे. 
       सर्वांनी सार्वजनिक व खाजगी आरोग्याची काळजी घेऊन लाकडावून चे पालन करण्यासाठी शासनाला व प्रशासनाला संपूर्णतः सहकार्य करावे. *राष्ट्र प्रथम कर्तव्य समजावे.* .. ही विनंती..

 *त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!* 


 *डॉ प्रभाकर लोंढे*
*गोंदिया* 
९६७३३८६९६३