Monday, July 25, 2016

*नवाकाळ* *वृत्तपत्रांञातील बोधकथा. संबंधाने...........*                                 .          

          प्रथमतः या घटनेचा जाहीर निषेध... तो करावा तेवढा कमीच आहे..  त्यावर धनगर तरुणानी फोन करुन संपादका ला दिलेली समज ही अभिनंदनीय फार मोठी बाब आहे.  त्याचवेळी ती अशा प्रवृत्तीच्या संपादक , लेखक तसेच धनगराना वाईट नजरेन बघणार्या सर्वच घटकांना धडकी भरविणारी धडक आहे.....   धनगर किंवा त्यांचे कर्तबगार पुरुष यांना बदनाम करणे. ही बाब त्यांच्यासाठी नवीन नाही .. आपण इतिहासातून अभ्यासलच असेल.. या किंवा अशा बदनामीकारक लिखाणाशिवाय असे असे संपादक , लेखक  त्यांच्या महापुरुषांची????? महानता सिद्ध करुच शकत नाही.... धनगरांच कर्तृत्व एवढं महान आहे कि त्यापेक्षा अधिकच कर्तुत्व हे करुच शकत नाही... अशा परिस्थितीत स्वतःच्या खुज्या कर्तृत्वाला श्रेष्ठ दाखविण्यासाठी तुम्हाला बदनाम करणार नाही तर काय? करतील..  प्रश्न तो तुमच्या बदनामीचा नाही तर तो त्यांच्या अस्तित्वाचा आहे.           

          थोडे ईतिहासात जा . यांनी आपल्या कर्तबगारांना एकतर देव बनवून संपविल. दुसरं त्यांना बदनाम करुन संपविल. त्यासाठी खोटे आरोप लावले, खोटया बोधकथा लिहिल्या. पुराण लिहीली.  ते त्यांचे त्यांच्या साठी महान काम त्यांनी आपल्या पध्दतीने आपल्या माणसांना मोठ करण्यासाठी केलं. भलेही ते आपला अपमान करणार असेल.  त्याचं काय  देण घेण त्यांना??? तो त्यांच्या प्रवृत्तीचा भाग आहे...... या  प्रवृत्तीचा प्रभाव भारताच्या   इतिहासावर दिसून येतो हे अभ्यासकाना लक्षात येत असेलच.  आम्ही लढायच ठरविलं तर आम्हाला अशा प्रवृत्ती विरुध्द लढाव लागणार आहे. त्यासाठी आम्हाला त्यांनी वापरलेल्या साधानांचा वापर करीत लढाव लागणार आहे.. *"साहित्य संस्कृती वर अधिराज्य "*हाच अंतिम इलाज आहे.  तोपर्यंत अशा प्रकारची दहशत निर्माण करणे व टिकवून ठेवणे हा उत्तम इलाज आहे... हा प्रयत्न करणाऱ्या सर्वच धनगर बांधवांच अभिनंदन !!!!!!!! सलाम त्यांच्या सैनिकी वृत्ती ला                                                             ---------------------------------------------    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏                *डाँ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर*
सत्यधर्म
-----------

जगी असावा एकची
माणूसकीचा धर्म
सत्याने वर्तावे
हेच त्याचे मर्म ....

सत्य हाच देव
मानावा सदैव
असा ज्याचा भाव
त्याचाच खरा देव ......

देव नाही दगडी
बदलावा मनोभाव
देवाचा सहवास
मनालाच ठाव.......

जाणून ब्रम्हांड
सोडा सर्व पाखंड
होतील सर्व थंड
जगातील धर्ममार्तंड.

एकची पिता परमेश्वर
सांगी सर्व धर्म
आचरावा सर्वांनी
सार्वजनिक सत्यधर्म.........

-------------------------- --------
डाँ . प्रभाकर  लोंढे. गोंदिया-चंद्रपूर
----------------------------------------

Sunday, July 10, 2016

" धनगरांचा राजकीय अरुणोदय  "
  ------------------------------------------
        वर्षानुवर्षापासून उपाशी असलेल्या  माणसाला एकदम पंचपक्वानाचं जेवण मिळाव... आणि तो बेचैन होवुन  त्याला अनेक प्रश्न पडावे. अशा अवस्थेत आज धनगर जमातीचा जागृत माणूस असल्याचा मला भास होतो आहे.      
            वर्षानुवर्षापासून  राजकीय सत्ता , घटनादत्त अधिकार  यांच्या पासून वंचित असलेल्या लोकांना एकदम राज्यसभेत खासदार, राज्य मंञिमंडळात राज्यमंञी असलेल्या बांधवाला कँबीनेट मंञी,  स्वतःच्या खाजगी  जीवनाला डावावर लावून समाज बांधवांमध्ये राजकीय अस्मिता निर्माण करणाऱ्या माणसाला अपरिहार्यपणे कँबीनेट मंञी पद मिळण. हा प्रकार  व काळ नक्कीच या जमातीसाठी विचार करायला लावणारा , अनेक प्रश्न निर्माण करणारा व समर्पक असे उत्तर शोधून  भावी नितीनिर्धारणासाठी पोषक काळ आहे.
                   यापरिस्थितीचे अनेकांनी अनेक अन्वयार्थ काढले असतील यात शंका नाही.....  पण प्रत्येक कार्यात प्रवेश जेवढा महत्त्वाचा तेवढ्यात प्रमाणात पुढील विकासात्मक पावले महत्त्वाची असतात.आजपर्यंतच्या महाराष्ट्रात  माञ राजकीय स्थैर्याच्या दृष्टीने स्वाभिमाना सोबतच तडजोड आवश्यक असते ही बाब महत्त्वाची.. धनगराँनी आतापर्यंत स्वाभिमानापेक्षा तडतोडीलाच  अधिक महत्त्व दिले.. परीणामतः इतरांच्या ओंजळीनेच पाणी पित राहीले. यात धनगरांचा सतत वापर झाला. आज त्यांच्या  स्वअस्तित्वाच्या, स्वाभिमानाच्या गोष्टी चालु  झाल्या.  धनगरांनी आ.महादेव  जानकरांपासून स्वाभिमान तर आ. राम शिंदे साहेबांकडून तडजोड शिकली पाहीजे तसेच दोघानाही तेवढयाच बरोबरीने सोबत ठेवल पाहीजे. आमचा हा स्वाभिमान  बी.जे.पी ला जोडून ठेवण्याच्या प्रयत्नात बीजेपीने आ. राम शिंदे साहेबांना राज्यमंञी पद दिले. आ. महादेव जानकर साहेबामुळे सत्ता आली अस मान्य करणाऱ्या सरकारने इतके दिवसांनंतर  अपरीहार्यपणे कँबीनेट मंत्री पद दिलं. उशीरा मंञीपद देण हेच त्यांच प्रस्थापितांमधील वजन सिद्ध करते. सोबतच शिंदे साहेबांना सुध्दा बढती देत मंञिमंडळात फेरबदल केले....    या सर्व उपक्रमात शिंदे साहेब सातत्याने जानकर साहेबांपेक्षा धनगरापुढे कमजोर ठरु नये यासाठी बी.जेपी सर्व काही करायला तयार आहे असा निष्कर्ष काढल्यास कोणत्याही पातळीवर चुकीचा ठरु शकणार नाही.... अस मला वाटत आहे.                                            
           यापुढे धनगरांची निती निर्धारण यशस्वी झाल्यास आणि धनगर नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी एक दुसऱ्या च्या सहकार्याने कार्य केल्यास हे दोन्हीही नेते महाराष्ट्रातच काय संपुर्ण भारताच नेतृत्व करू शकतील .. हा माझा विश्वास  आहे.... तशी दोघांचीही क्षमता आहे......    फक्त सर्वांचा आशीर्वाद तसेच सोबत अपेक्षित आहे.....    
  +------------------------------------------+
धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणिव जागृतीचा अभ्यासक....       " डाँ . प्रभाकर लोंढे. चंद्रपूर-गोंदिया"