Friday, April 13, 2018

पुजा कर विचारों की..

भलेही मत ले नाम मेरा
तू पुजा कर विचारों की,
दुनिया याद करेगी तुझे
इसकी जिंदगी थी काम की!

है यहा तू जिंदा तो
बात कर विचारों की,
बदल जायेगी जिंदगी तेरी
बनेगी बडे काम की!

ना रख नाता तू जात से
सोच तू पूरे मानवता की,
यही श्रध्दांजली होगी मुझे
मेरे सब सच्चे सपुतो की!

मेरा वंशज है वही
जो सोच रखे समानता की.
संकुचित विचार तोडकर
जो बात माने अपनी बाप की!!
_______________________
डॉ.प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर

  • ९६७३३८६९६३

Friday, April 6, 2018

धनगरांनो! राजकीय पर्याय उभारा

----------------------------------------------------------------
"यदा यदाही धनगरश्य ग्लानिर्भवती भारतमं, मा अभ्युत्थानमं धनगरश्य पराक्रममं"
---------------------------------------------------------------

         बांधवांनो! काही दिवसांपूर्वी "धनगर जमात राजकीय पर्यायांच्या प्रतीक्षेत." अशा शिर्षकाचा लेख लिहिला, त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी फोन करून विविधांगी विचार व्यक्त केले. बहुतेकांनी राजकीय पर्याय विचारला. त्यावेळेस मला राजकीय पर्याय सुचवणे अशक्य नसले तरी संयुक्तिक वाटले नाही. योग्य पर्याय माझ्यासारख्या एकट्याने ठरवून चालणार नाही, जोपर्यंत उपलब्ध परिस्थिती सार्वजनिक स्तरावर लक्षात घेऊन विचार विनिमयातून एक सार्वजनिक अजेंडा सर्वसंमतीने निर्माण होत नाही, तोपर्यंत व्यक्तीच्या वैयक्तिक मताला काही किंमत नाही व नसावी. एकट्याने हा पर्याय सुचविणे मला संंयुक्तिक वाटले नाही. मात्र महाराष्ट्रातील धनगरांच्या राजकीय दुरावस्थेत राजकीय पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी, शिवसेना या पक्षात असूच शकत नाही.
          काही बांधवांना, नेत्यांना प्रश्न पडतील, मला मुर्खात काढतील व ते विश्वासाने सांगतील. याशिवाय महाराष्ट्रात दुसरा कोणताही पर्याय निर्माण होऊच शकत नाही. कदाचित ते सत्यही असेल. यावर विश्वास ठेवायला ही कोणाची हरकत नसावी. महाराष्ट्रातील​ उपलब्ध परिस्थिती वर्षानुवर्षांच्या सत्ताभोगामुळे याच राजकीय पक्षांना पोषक असेल. त्यामुळे इतर राजकीय पर्याय तग धरू शकेल की नाही हा एक मोठाच प्रश्न आहे. असे असले तरी हेही मात्र सत्यच आहे की, या प्रश्नाचे उत्तर शोधल्या शिवाय धनगराचा राजकीय जिर्णोद्धार शक्य नाही. ही बाब त्याच वेळी स्विकारल्या शिवाय गत्यंतर नाही.

 एखादी जूनी इमारत( कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजे पी, शिवसेना​ ) खूप सुंदर व मजबूत असेल,
तुम्हाला- मला त्याचं खूप आकर्षण ही असेल पण त्या इमारतीत तुम्हाला उभं राहण्यासाठी जागाच (उमेदवारी) दिली जात नसेल, तर दारात उभं राहून कशाला त्यांची रखवाली करायची? मला माहित आहे आमचे नेते अशातले नाही, ते रखवाली करणारे नसले तरी तेथे आमच्या नेत्यांना तशी वागणूक दिली जात असेल (या पक्षात दबदबा असलेल्या धनगर नेत्यांचं विशेष स्वागत) तर नेत्यांनी अशा पक्षात रहायचं असेल तर नक्कीच रहावं. पण सामान्य धनगर बांधवांनी अशा धनगर नेत्यांच्या मागे का रहावं? हा प्रश्न सहज उत्पन्न होतो व ते साहजिकच आहे.
     धनगर बांधवांनो! खरच आपल्या रक्तावर विश्वास असेल आणि आपल्या पराक्रमी इतिहासाची ख़रोखर जाण असेल तर विपरीत परिस्थितीमध्ये अपेक्षित परिणाम घडवून आणल्याचे तुमच्या रक्ताचे असंख्य​ ऐतिहासिक दाखले आहेत. व ते आपण नेहमीच छाती फुगवून सांगत असतो. अशा परिस्थितीत स्वतःच्या कर्मावर, क्षमतेवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे.   त्यासाठी फक्त आपल्या क्षमता ओळखण शिकावं लागेल. हा आपला पहिला प्रयोग असला तरी तो महाराष्ट्राला कर्नाटक प्रमाणे धनगरमय करण्यासाठी पुरकच नाही तर प्रभावी ठरेल. हे मात्र नक्की!!

"यदा यदाही धनगरश्य ग्लानिर्भवती भारतमं, मा अभ्युत्थानमं धनगरश्य पराक्रममं"

     इतिहास काय देतं? हा खूप मोठा गहन प्रश्न आहे. असं असलं तरी जो जे मागेल ते देण्याची क्षमता मात्र इतिहासात असते व ती तुमच्या इतिहासात भरलेली आहे. इतिहासावर तुम्ही जशी नजर टाकाल तशा प्रकारची अस्मिता जागृत होणे स्वाभाविक आहे.
बांधवानो!! तुमच्या इतिहासावर तुमची स्वाभिमानी नजर रोखा, तुमचा इतिहास तुमचा स्वाभिमान जागृत केल्याशिवाय राहणार नाही. की जे आजपर्यंत आपण कधीच केलेले नाही. लक्षात ठेवा! आजपर्यंत न मिळालेलं मिळवायच असेल तर आजपर्यंत न केलेलं करावच लागेल.
         या भारत भूमीतील​ इतिहास सर्वाधिक पराक्रमी जर  कोणाचा असेल तर धनगर वंशाचा आहे.  प्रत्येक परिवर्तन, विकास प्रक्रियेचा साक्षीदार हा धनगर आहे. मग धर्म प्रसार असो वा धर्मपरिवर्तन, किंवा राजकीय अराजकता संपवून व्यवस्था​ सुरळीत करण्याचे कार्य असो, यामध्ये महत्वपुर्ण कार्य धनगर पराक्रमी महापुरुषानीच केलेले आहे. तुमच्या त्या पराक्रमी रक्ताचा आलेख म्हणजे भारताचा जवळपास प्राचीन, मध्ययुगीन भारतीय इतिहास आहे..  आधुनिक (भारतीय लोकशाही तील) इतिहासास आपलं काय योगदान आहे हे सर्वानाच अलिकडे समजून चुकलेलं आहे.
म्हणूनच म्हणावेसे वाटते....
"यदा यदाही धनगरश्य ग्लानिर्भवती भारतमं, मा अभ्युत्थानमं धनगरश्य पराक्रममं"

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
धनगर राजकीय नेत्रुत्व व राजकीय जाग्रुती चा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
९६७३३८६९६३

Thursday, April 5, 2018

*राष्ट्रवादी काँग्रेस,  कांग्रेस, बीजेपी शिवसेना  या पक्षामधील माझ्या बांधवानो!!* ☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻
*फक्त असू द्या.. आत्मभान!! आत्मविश्वास!! अन् करा आत्मरक्षण... मग पहा..*
----------------------------------------
            *डॉ. प्रभाकर लोंढे*
--------------------------------------
संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय सत्ता व कारकीर्द याचा विचार केला असता सातत्याने येथील राजसत्ता  महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी व शिवसेना याच पक्षांच्या हातात राहिलेली आहे. या पक्षांनी  राजकीय सत्तेचा वापर विकासाभिमुख केला असला तरी तो सार्वत्रिक पातळीवर समाजाभिमुख केला आहे,असं म्हणता येत नाही.  या राजकीय कारकिर्दीमध्ये बहुतांश उपेक्षित समाज राजकीय प्रवाहाबाहेर फेकल्या गेला,हे या यशस्वी कारकिर्दीचे अप्रत्यक्ष फलित आहे. मात्र ही बाब लोकशाहीच्या दृष्टिने फार मोठी घातक आहे. जेव्हा अशा प्रकारचा बहुसंख्य वर्ग राजकीय प्रवाहापासून दूर फेकला जातो, तेव्हा ते लोकशाहीचे अपयश तर असतेच शिवाय भविष्यकाळाच्या दृष्टिने ते घातक असते.
       या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सत्ताकारणाचा परिणाम म्हणून सत्तेचा वापर सातत्याने विशिष्ठ वर्गांना राजकीय द्रुष्टीने प्रस्थापित करण्यासाठी झाला आहे,असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही. महाराष्ट्रातील सत्ता स्थानिक पातळीपासून तर केंद्र पातळीपर्यंत, साखर कारखाने- दूध महासंघ पासून  तर पतसंस्था पर्यंत हे विशिष्ट जातींची मक्तेदारी होती, परिस्थिती पाहता अशी शंका येते. याचा अर्थ या महाराष्ट्रातील सत्ता विशिष्ट जातींनी विशिष्ट जातींकडे ठेवून काही उपेक्षित जाती-जमातींना हेतुपुरस्सर त्यापासून दूर लोटलेले आहे. हे सिद्ध होते. याचा परिणाम महाराष्ट्रात अनेक जाती जमाती संख्येने जरी बहुसंख्य असल्या तरी  राजकीय प्रवाहात येऊ शकलेल्या नाहीत. याच उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या मानाने बहुसंख्य असलेल्या धनगर जमातीचं देता येईल. गेल्या इ.स. २०१३ पासून चाललेली या जमातीची आंदोलने व आंदोलनामागची पार्श्वभूमी पाहीली तर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष व सरकारांनी या जमातीला राजकीय प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी हेतू पूरस्सर संविधानद्रोह केल्याची गंभीर बाब लक्षात येते. हे केवळ धनगर जमातीच्याच बाबतीत नसून असा अनेक जमातवर अन्याय केलेला आहे. त्यामुळेच या जमाती आपलं राजकीय अस्तित्वच गमावून बसलेल्या आहेत.
       याचा अर्थ धनगर व कोळी, गोवारी, हलबा, व तत्सम जमातीमध्ये आतापर्यंत राजकीय नेते निर्माण झालेच नाही किंवा ते होऊ दिले नाही. तशा प्रकारची क्षमता जमातीच्या या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाही असा आभास कदाचित पक्षश्रेष्ठीमध्ये निर्माण झाला असावा. किंवा आपल्यामध्ये असलेल्या क्षमता धनगर व इतर कार्यकर्त्यांनी/ नेत्यांनी दाखवल्याच/सिद्ध केल्याच नसाव्यात. सत्य काय ते अनुभवी नेते/ कार्यकर्ते सार्वजनिक करतीलच ही अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. एवढं मात्र निश्चित की, या जमातीतील सोबतच इतर उपेक्षित समाज घटकातील नेतृत्व विकासास पोषक असं वातावरण आजपर्यंत महाराष्ट्रात उपलब्ध होवूच दिलं नाही.
 अशा या ऐतिहासिक महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आज तरी फार बदललेली आहे असं दिसत नाही. त्यामुळे धनगर व तत्सम उपेक्षित जमात नेत्यांना महाराष्ट्रातील राजकारणात यश प्राप्त करणे सहज शक्य नसले तरी ते अशक्यप्राय नाही.
       कोणी माझ्या या राजकीय समिक्षण पर लेखांवर "जातीय नजरेतून लिहिलेला लेख"  असा शिक्का मारतील. चालेल!!!  त्यांनी फक्त महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या बाबी जातीधारित घडत नाही याची यादी तयार करावी. सर्वाच्या निदर्शनास आणून द्यावी. *"प्रस्थापितांच्या किंवा सत्तेच्या विरोधात बोलणारा कास्टवादी आणि सत्तेचा बाजूने बोलणारा राष्ट्रवादी* अशी भूमिका असलेल्या महाराष्ट्रीयन राजकारणात आजपर्यंत सर्वकाही जातीय समिकरणातूनच घडलेले आहे.हे मात्र नक्की! असा हा आजपर्यंतच्या महाराष्ट्रीयन राजकीय कारकिर्दीचा शुक्ष्म आढावा मिळेल.

 आतापर्यंत सत्ता उपभोगलेल्या सरकारच्या काळात जात आणि महाराष्ट्रातील राजकारण हे अतिशय जवळचे समीकरण असल्याचे सिद्ध होते. याचे अनेक वाईट परिणाम समाजावर दिसून येत असले व हा एक कलंक असला तरी धनगर सह प्रत्येक उपेक्षित घटकांनी अपरिहार्य पणे याच समिकरणाचा आधार घेऊन यापुढे सत्तेचा आस्वाद घेणे सहज शक्य आहे...  त्यासाठी उपेक्षित वर्गांच संघटन हाच एक पर्याय आहे.  आजपर्यंतच्या सत्ताधारी पक्षांच्या संकुचित व्रुत्तीला व त्यामधील जातीयवादी मक्तेदारीला संपविण्याची ताकद केवळ याच उपेक्षित जमातींमध्ये आहे.... *फक्त असू द्या.. आत्मभान!! आत्मविश्वास!! अन् आत्मरक्षण... मग पहा.. कसं होतं तुमच्या जमातीचं संरक्षण.......*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

धनगर राजकीय नेत्रुत्व व जागृतीचा अभ्यासक
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर* ९६७३३८६९६३