🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
*न्यायालयीन लढा व स्वाभिमानी राजकीय राडाच देवू शकतो धनगरांना न्याय.*
*डॉ प्रभाकर लोंढे*
-------------------------------------------------------------
" *न्याय* " हा शब्द छोटा जरी असला तरी त्यामध्ये अभिप्रेत असलेला अर्थ मात्र पराकोटीचा गहन आहे. तो शब्द सर्वपरिचित असला तरी सर्वांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती उपलब्ध करून देणारा तो असामान्य शब्द आहे. बरेचदा या शब्दाचा अर्थ सामान्य अर्थाने घेतला जात असतो, त्यामध्ये अभिप्रेत असलेल्या अर्थापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न बऱ्याचदा केला जात नाही. तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने त्याला स्वतःला अपेक्षित असलेला अर्थ काढत असतात. परंतु *"न्याय" या संकल्पनेमध्ये "सर्वोदय" अभिप्रेत आहे.* प्रत्येकाला त्याचे अधिकार व प्रत्येकाला विकासाची समान संधी उपलब्ध होणे हे सुद्धा अपेक्षित आहे. कोणीही कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करणार नाही. कोणाचही कोणावर वर्चस्व प्रस्थापित होणार नाही. मात्र सर्वांमध्ये समन्वय प्रस्थापित होईल. आणि हा समन्वय सर्वांना हवाहवासा राहील. कोणामध्येही अन्यायाची भावना राहणार नाही, कोणीही अन्यायायाविरुद्ध पेटून उठणार नाही. असाच तो समाज न्याय आधारित समाज म्हणून ओळखला जाईल. आणि अशाच समाजात सर्वांची न्यायाची अपेक्षा पूर्ण होण्याची खात्री देवू शकतो. न्यायाची अपेक्षा ठेवू शकतो.
धनगर जमात भारतीय लोकशाहीमध्ये अन्यायाच्या छत्रछायेखाली सातत्याने वावरत आलेली आहे. सातत्याने होणाऱ्या अन्यायामुळे, न मिळणाऱ्या घटनात्मक अधिकारामुळे आज त्यांच्यामध्ये सरासरी न्यूनगंड, नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे. मात्र जमातीला ना मिळालेला बरोबरीचा राजकीय वाटा, ना घटनात्मक अधिकार, समाजात ना बरोबरीचे स्थान, या सर्व बाबींची जाणीव आजच्या धनगर तरुण पिढ्यांमध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांच्या मनात अन्यायाची चीड व न्यायाची चाड(अपेक्षा) निर्माण झालेली आहे. त्यामुळे तरूण वर्ग न्यायाची अपेक्षा ठेवून त्यासाठी तो प्रयत्न करू पहातो आहे. परंतु धनगरांची एकूण परिस्थिती त्याला त्याच्या प्रयत्नांमध्ये साथ देईल, असे वाटत नाही. कारण आज जमातीमध्ये अनेक विचारप्रवाह क्रियाशील झाल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी कोणता प्रवाह उत्तम याचे योग्य उत्तर मिळत नसल्याने धनगर तरुणांनी कोणत्या मार्गाने जावे, याची दिशा निश्चित होत नाही. मात्र तो मार्ग/ दिशा निश्चित होणे अत्यावश्यक आहे. त्यापैकी येथील *प्रस्थापितांचा मार्ग मात्र धनगरांच्या राजकीय उध्दाराचा मार्ग होवूच शकत नाही कारण त्या मार्गाने धनगरांचा स्वाभिमानी राजकीय प्रवास होणेच शक्य नाही.*
धनगरांमधील विद्यमान प्रवाह/ मार्ग जवळपास सर्वच बरोबर आहे. सर्वच धनगरांना कमी अधिक यश देणारे आहेत. मात्र सर्वाधिक लाँग टर्म यश देणाऱा मार्ग कोणता? हाच मोठा व वादग्रस्त प्रश्न आहे. माझ्या मते मात्र सर्वाधिक यश फक्त आरक्षण अंमलबजावणी साठी न्यायालयीन लढाई व स्वाभिमानी राजकीय लढाई हे दोनच मार्ग धनगरांना शाश्वत(दिर्घायु) न्याय देवू शकते. शेवटी हे माझे मत आहे ते सर्वमान्य व्हावे असा माझा आग्रह मुळीच नाही. मी मात्र माझ्या मतावर नेहमी ठाम आहे. कारण धनगरांचे सर्वच प्रश्न आज प्रस्थापितांकडून राजकारणाचे विषय बनविले गेलेले आहे. त्यामुळे धनगर नेतृत्व स्वाभिमानी मार्गाने राजकीय सत्तेत गेल्याशिवाय आरक्षणासह सर्वच प्रश्नावर सत्तेचं राजकीय वजन बणूच शकत नाही. आणि धनगरांनी आजपर्यंत न स्विकारलेलं पुर्णसत्य आहे की, धनगरांचं व्यवस्थेवर राजकीय वजन हे प्रस्थापीतांच्या मार्गाने निर्माण होणे शक्यच नाही.
त्यामुळे स्वयंभू व स्वाभिमानी मार्गाने राजकीय सत्तेत गेलेले धनगर नेतेच धनगरांच्या प्रश्नांवर राजकीय दबाव व त्या दबावातून जमातीचा व्यवस्थेवर प्रभाव निर्माण करू शकतात. व प्रभावातून जमातीचे प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते वातावरण निर्माण करू शकतात. (जे आजच्या धनगर नेत्यांना कितीही वाटत असले तरी ते त्यांना शक्य झालेले नाही ही वास्तविकता.) त्यासाठीच स्वाभिमानी राजकीय राडा (प्रवाह) निर्माण झालाच पाहिजे कारण प्रस्थापित पक्ष धनगरांना न्याय देऊ इच्छित नाही, तशी त्यांची देण्याची नियत नाही हे वास्तव त्या त्या पक्षात काम करणाऱ्या सर्व धनगर बांधवानी/नेत्यांनी स्वीकारलेच पाहिजे.
सर्वच धनगर रक्ताच्या आत्मियतेचा प्रश्न असलेला प्रश्न म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी! हा प्रश्न सोडविण्याचे सर्वच मार्ग आज पर्यंत धनगरांनी पडताळून पाहीलेले आहे. त्यातून काय यश हाती आलं? हे सर्वांना माहीतच आहे. त्याआधारे किती राजकारण झालं, आमच्या किती पिढ्या बरबाद झाल्या हे मी सांगण्याची गरजच नाही आहे. प्रत्येक प्रस्थापित पक्षात काम करणाऱ्या समजदार धनगर बांधवानी आपल्या राजकीय पक्षांचा धनगर जमाती संबंधी लेखाजोखा सामान्य धनगरांच्या निदर्शनास आणून दिला तर फार मोठी सामाजिक बाब होईल. त्यामुळे त्या पक्षांची स्वच्छ प्रतिमा धनगर बांधवांपुढे येईल.
धनगर आरक्षण अमलबजावणीच्या प्रश्नावर राजकारण न होता तो सोडवण्याचा एकच मार्ग आज धनगरांच्या हाती उरलेला आहे. आणि माननीय मधु शिंदे डॉ. जे पी बघेल साहेब व टीमने संपूर्ण धनगरांसाठी धनगरांच्या साथीने आज धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने न्यायालयामध्ये केस दाखल केली आहे. ते सर्वांच्या साथीने न्यायालयाचा मार्ग चोखाळत आहे. त्यामधून यश येईल याची खात्री बाळगण्यास काही कुणाची हरकत नसावी. काहींच्या मध्ये तो मार्ग यशाचा नसेल परंतु त्यापेक्षा सरस, सुयोग्य, आशादायी, हमखास इतर कोणताही मार्ग आता धनगरांपुढे उरलेला नाही असं मला वाटतंय. हे जेवढं सत्य आहे तेवढेच न्यायालयाच्या मार्गातून मिळालेला निर्णय सरकारद्वारा अमलात आणावा, यासाठी सरकारवर दबाव निर्माण करणारे धनगर राजकीय नेतृत्व विधिमंडळात असणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई ला पोषक असे राजकीय नेतृत्वाचा विकास होणे अत्यावश्यक आहे. या दोन्ही मार्गातून यश मिळवण्यासाठी धनगरांनी निर्णायक व नियोजनबद्ध काम करण्याची गरज आहे. तरच धनगरांना या व्यवस्थेकडून न्याय मिळू शकतो. त्यासाठी एक होऊन सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. नाहीतर लक्षात ठेवा धनगरांनो! प्रत्येक रात्र ही आज वैऱ्याची आहे.
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*
*न्यायालयीन लढा व स्वाभिमानी राजकीय राडाच देवू शकतो धनगरांना न्याय.*
*डॉ प्रभाकर लोंढे*
-------------------------------------------------------------
" *न्याय* " हा शब्द छोटा जरी असला तरी त्यामध्ये अभिप्रेत असलेला अर्थ मात्र पराकोटीचा गहन आहे. तो शब्द सर्वपरिचित असला तरी सर्वांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती उपलब्ध करून देणारा तो असामान्य शब्द आहे. बरेचदा या शब्दाचा अर्थ सामान्य अर्थाने घेतला जात असतो, त्यामध्ये अभिप्रेत असलेल्या अर्थापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न बऱ्याचदा केला जात नाही. तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने त्याला स्वतःला अपेक्षित असलेला अर्थ काढत असतात. परंतु *"न्याय" या संकल्पनेमध्ये "सर्वोदय" अभिप्रेत आहे.* प्रत्येकाला त्याचे अधिकार व प्रत्येकाला विकासाची समान संधी उपलब्ध होणे हे सुद्धा अपेक्षित आहे. कोणीही कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करणार नाही. कोणाचही कोणावर वर्चस्व प्रस्थापित होणार नाही. मात्र सर्वांमध्ये समन्वय प्रस्थापित होईल. आणि हा समन्वय सर्वांना हवाहवासा राहील. कोणामध्येही अन्यायाची भावना राहणार नाही, कोणीही अन्यायायाविरुद्ध पेटून उठणार नाही. असाच तो समाज न्याय आधारित समाज म्हणून ओळखला जाईल. आणि अशाच समाजात सर्वांची न्यायाची अपेक्षा पूर्ण होण्याची खात्री देवू शकतो. न्यायाची अपेक्षा ठेवू शकतो.
धनगर जमात भारतीय लोकशाहीमध्ये अन्यायाच्या छत्रछायेखाली सातत्याने वावरत आलेली आहे. सातत्याने होणाऱ्या अन्यायामुळे, न मिळणाऱ्या घटनात्मक अधिकारामुळे आज त्यांच्यामध्ये सरासरी न्यूनगंड, नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे. मात्र जमातीला ना मिळालेला बरोबरीचा राजकीय वाटा, ना घटनात्मक अधिकार, समाजात ना बरोबरीचे स्थान, या सर्व बाबींची जाणीव आजच्या धनगर तरुण पिढ्यांमध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांच्या मनात अन्यायाची चीड व न्यायाची चाड(अपेक्षा) निर्माण झालेली आहे. त्यामुळे तरूण वर्ग न्यायाची अपेक्षा ठेवून त्यासाठी तो प्रयत्न करू पहातो आहे. परंतु धनगरांची एकूण परिस्थिती त्याला त्याच्या प्रयत्नांमध्ये साथ देईल, असे वाटत नाही. कारण आज जमातीमध्ये अनेक विचारप्रवाह क्रियाशील झाल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी कोणता प्रवाह उत्तम याचे योग्य उत्तर मिळत नसल्याने धनगर तरुणांनी कोणत्या मार्गाने जावे, याची दिशा निश्चित होत नाही. मात्र तो मार्ग/ दिशा निश्चित होणे अत्यावश्यक आहे. त्यापैकी येथील *प्रस्थापितांचा मार्ग मात्र धनगरांच्या राजकीय उध्दाराचा मार्ग होवूच शकत नाही कारण त्या मार्गाने धनगरांचा स्वाभिमानी राजकीय प्रवास होणेच शक्य नाही.*
धनगरांमधील विद्यमान प्रवाह/ मार्ग जवळपास सर्वच बरोबर आहे. सर्वच धनगरांना कमी अधिक यश देणारे आहेत. मात्र सर्वाधिक लाँग टर्म यश देणाऱा मार्ग कोणता? हाच मोठा व वादग्रस्त प्रश्न आहे. माझ्या मते मात्र सर्वाधिक यश फक्त आरक्षण अंमलबजावणी साठी न्यायालयीन लढाई व स्वाभिमानी राजकीय लढाई हे दोनच मार्ग धनगरांना शाश्वत(दिर्घायु) न्याय देवू शकते. शेवटी हे माझे मत आहे ते सर्वमान्य व्हावे असा माझा आग्रह मुळीच नाही. मी मात्र माझ्या मतावर नेहमी ठाम आहे. कारण धनगरांचे सर्वच प्रश्न आज प्रस्थापितांकडून राजकारणाचे विषय बनविले गेलेले आहे. त्यामुळे धनगर नेतृत्व स्वाभिमानी मार्गाने राजकीय सत्तेत गेल्याशिवाय आरक्षणासह सर्वच प्रश्नावर सत्तेचं राजकीय वजन बणूच शकत नाही. आणि धनगरांनी आजपर्यंत न स्विकारलेलं पुर्णसत्य आहे की, धनगरांचं व्यवस्थेवर राजकीय वजन हे प्रस्थापीतांच्या मार्गाने निर्माण होणे शक्यच नाही.
त्यामुळे स्वयंभू व स्वाभिमानी मार्गाने राजकीय सत्तेत गेलेले धनगर नेतेच धनगरांच्या प्रश्नांवर राजकीय दबाव व त्या दबावातून जमातीचा व्यवस्थेवर प्रभाव निर्माण करू शकतात. व प्रभावातून जमातीचे प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते वातावरण निर्माण करू शकतात. (जे आजच्या धनगर नेत्यांना कितीही वाटत असले तरी ते त्यांना शक्य झालेले नाही ही वास्तविकता.) त्यासाठीच स्वाभिमानी राजकीय राडा (प्रवाह) निर्माण झालाच पाहिजे कारण प्रस्थापित पक्ष धनगरांना न्याय देऊ इच्छित नाही, तशी त्यांची देण्याची नियत नाही हे वास्तव त्या त्या पक्षात काम करणाऱ्या सर्व धनगर बांधवानी/नेत्यांनी स्वीकारलेच पाहिजे.
सर्वच धनगर रक्ताच्या आत्मियतेचा प्रश्न असलेला प्रश्न म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी! हा प्रश्न सोडविण्याचे सर्वच मार्ग आज पर्यंत धनगरांनी पडताळून पाहीलेले आहे. त्यातून काय यश हाती आलं? हे सर्वांना माहीतच आहे. त्याआधारे किती राजकारण झालं, आमच्या किती पिढ्या बरबाद झाल्या हे मी सांगण्याची गरजच नाही आहे. प्रत्येक प्रस्थापित पक्षात काम करणाऱ्या समजदार धनगर बांधवानी आपल्या राजकीय पक्षांचा धनगर जमाती संबंधी लेखाजोखा सामान्य धनगरांच्या निदर्शनास आणून दिला तर फार मोठी सामाजिक बाब होईल. त्यामुळे त्या पक्षांची स्वच्छ प्रतिमा धनगर बांधवांपुढे येईल.
धनगर आरक्षण अमलबजावणीच्या प्रश्नावर राजकारण न होता तो सोडवण्याचा एकच मार्ग आज धनगरांच्या हाती उरलेला आहे. आणि माननीय मधु शिंदे डॉ. जे पी बघेल साहेब व टीमने संपूर्ण धनगरांसाठी धनगरांच्या साथीने आज धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने न्यायालयामध्ये केस दाखल केली आहे. ते सर्वांच्या साथीने न्यायालयाचा मार्ग चोखाळत आहे. त्यामधून यश येईल याची खात्री बाळगण्यास काही कुणाची हरकत नसावी. काहींच्या मध्ये तो मार्ग यशाचा नसेल परंतु त्यापेक्षा सरस, सुयोग्य, आशादायी, हमखास इतर कोणताही मार्ग आता धनगरांपुढे उरलेला नाही असं मला वाटतंय. हे जेवढं सत्य आहे तेवढेच न्यायालयाच्या मार्गातून मिळालेला निर्णय सरकारद्वारा अमलात आणावा, यासाठी सरकारवर दबाव निर्माण करणारे धनगर राजकीय नेतृत्व विधिमंडळात असणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई ला पोषक असे राजकीय नेतृत्वाचा विकास होणे अत्यावश्यक आहे. या दोन्ही मार्गातून यश मिळवण्यासाठी धनगरांनी निर्णायक व नियोजनबद्ध काम करण्याची गरज आहे. तरच धनगरांना या व्यवस्थेकडून न्याय मिळू शकतो. त्यासाठी एक होऊन सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. नाहीतर लक्षात ठेवा धनगरांनो! प्रत्येक रात्र ही आज वैऱ्याची आहे.
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*
No comments:
Post a Comment