🇧🇦🇧🇦🇧🇦🇧🇦🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇦🇹🇦🇹
*धनगरानो! पुन्हा एखादा महान आत्मा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या..*
*__ डॉ प्रभाकर लोंढे__*
________________________
सर्वसाधारणतः धनगर समाज भावना प्रधान समाज आहे. त्यामुळे आपल्या जमातीला चिकित्सक विचार लवकर पटत नाही. *मात्र एखादा भावनिक मुद्दा/नेता आपल्या लोकांकडून लवकर डोक्यावर घेतला जातो. व त्यासंबंधी अंधभक्त म्हणून कामाला लागतो.* त्यामुळे या जमातीला लवकर फसवता येते, असा समज(गैर) महाराष्ट्रात सर्वत्र पहायला मिळतो. हा समज २०१४ मध्ये पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात धनगरांच्या बाबतीत हे सातत्याने घडत आल्याचे पहायला मिळते. परंतु आता हे अंतिम असावं, यासाठीच हा लेखनप्रपंच....
घटनात्मक आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भावना. पण ते कसं मिळेल याचा तिळमात्र विचार न करता आपण समोरच्यावर अंधविश्वास ठेवून मोकळे होतो. आणि इथेच धनगरांचं घोड मारं खातं. *अशा अंधविश्वासाच्या संबंधाने कोणी चिकित्सक विचार मांडले तर त्याला आपण मुर्खात काढतो...त्याचा अवाजवी विरोध केला जातो. हा धनगरांचा सर्वात महाभयंकर महारोग.. की ज्या रोगामुळे समाजरत्न बी. के. कोकरेंचा बळी गेला... यापुढे ही जाणार नाही हे सांगता येत नाही. जोपर्यंत आपल्या या प्रवृत्ती आपण बदलणार नाही तोपर्यंत धनगरांची फसवणूक होत आलेली आहे व होत राहणार आहे. म्हणून आमच्या वृत्ती मध्ये बदल होणै गरजेचे आहे*
भावनेच्या भरात प्रस्थापितांवर किंवा त्यांच्या धनगर तितरांवर आपण बिनधास्त विश्वास टाकतो. हा विश्वास चिकित्सकपणे ठेवला तर आपण आपल्या अजेंड्यामध्ये नक्की यशस्वी होवू शकतो.. पण चिकित्सक विचार करणेच आम्हाला जमत नाही. त्यामुळे भावनेच्या भरोश्यावर घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची दाट शक्यता असते. भावनेच्या भरोशावर तिच्या आहारी जाऊन आपण २०१४ च्या निवडणुकीत निर्णय घेतले. भाजपाला आपला हक्काचा पक्ष म्हणून विश्वास टाकला. परंतु भाजपा एवढ्या खालच्या पातळीवर जावून धनगरांशी भावनिक खेळ खेळेल, याचा आपण विचारही केला नाही. भावनेच्या भरात आपण बीजेपीला भरभरून मते दिली.
त्याचवेळी आपण आपला नेता म्हणून स्विकारलेला अराजकीय सामाजिक, उच्च विद्या विभूषित व्यक्तीत्व म्हणून नेता पुढे केला....जीवनातील पैसा, वेळ त्यासाठी बिनधास्त खर्च केला. जिथे (मेळावे, मोर्चे,सभा) बोलावले तिथे आपण उपस्थित राहलो. फक्त समाज हीत याशिवाय कोणताही वैयक्तिक विचार केला नाही त्यावेळी नेतृत्वाच्या व्यक्तीत्वाच्या छुप्या अजेंड्यावर चिकित्सक पणे विचार मांडणाऱ्यांच्या विचाराला पायदळी तुडविला. त्याचवेळी धनगरांचा नेता धनगरांच्या भावना, विश्वास, हीत यापेक्षा एखाद्या राजकीय पक्षाला, त्याच्या ध्येय धोरणाला बांधील होईल, समाजातील सामान्य माणसाच्या लोकमताची/लोकहीताची अवहेलना करून स्वार्थाला प्राधान्य देईल याचा सामाजिक स्तरावर आपण कधी विचार सुध्दा केला नाही. होता तो फक्त अंधविश्वास!!!!
एक उच्च विद्या विभूषित व्यक्तित्व म्हणून आदराची भावना बाळगणारी ही जमात राजकीय बाबतीत नेतृत्व या अर्थाने भावनिक झाली. अशा प्रकारची भावना जपत असतानाच आपण बुद्धीचा वापर करून जर विचार केला असता तर आज फसवणूक झाल्याची खंत कदाचित आपल्यात दिसली नसती. असो! इतिहास उगळायचा नसतो, तो गिळायचा असतो.. एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्यातच खरा शहाणपणा असतो.
आज कोणी म्हणतात, धनगरांचं आंदोलन चिरडलं गेलं, धनगरांचं घटनात्मक आरक्षण अंमलबजावणीचं स्वप्न भंग झालं, धनगरांना देशोधडीला लावलं, टिसच्या अहवालाने धनगर पुर्णतः नाउमेद झाले. ते कदाचित कोणाला खरंही वाटत असेल. परंतु ते मला खरं वाटणार नाही कारण सामान्य धनगर, खरे समाजहीतवादी, यांच्या अंतरात्म्याची आग मात्र अजूनही पेटतांंनी दिसत आहे. त्यांचा सत्याच्या विजयावरचा विश्वास आजही दृढ आहे. त्याच आत्मविश्वासाने, त्याच ताकदीने तो लढायला तयार आहे. फक्त त्याने धनगर जमातीमधील तितरं ओळखायला शिकणे आवश्यक आहे... त्यांना खऱ्या नेत्याची गरज आहे. ते आजही त्या प्रतिक्षेत आहे.
काही धनगर नेते कदाचित शांत झाले असेल, काही नेते इमानेइतबारे जमातीच्या भल्यासाठी काम करीत आहे. काहीं धनगर नेत्यांना स्वतः च्या राजकीय अस्तित्व निर्मिती साठी समाजाच्या भावनेचा वापर करण्याची ऊर्मी निर्माण झाली असेल. काहीतर प्रस्थापितांच्या इशऱ्यावर नाचत आहे (जमातीतील जानकार लोकांना हे लक्षात आलं आहे.) त्यामुळे धनगरांच्या भावनेशी खेळण्याची इच्छा, हिम्मतही ते करत असेल तर त्यातून खऱ्या नेत्याला ओळखण्याची गरज निर्माण झालेली आहे. व ते सहज शक्य आहे.
प्रस्थापितांनी आपली पिलावळ धनगर जमातीत निर्माण केलेली आहे. पद, पदांची लालच, पैसा, छुपा अजेंडा देवून धनगरांना फसविण्यासाठी तयार केलं आहे, अशा या कामात आपली काही नेते मंडळी माहीर आहेत. धनगर जमातीमध्ये ते सक्रीयपणे काम सुध्दा करीत आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे जमात विभाजित होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे.असं असलं तरी धनगर निष्ठेपुढे मात्र प्रस्थापितांचे दलाल उघडे पडतील, हे निश्चित आहे. कारण सामान्य धनगर आता स्वाभिमानाला जागायला लागले आहेत.
स्वाभिमानी लढाई तो जाणायला लागला आहे. त्यामुळे प्रत्येक लढा तो स्वतःच्या हक्कासाठी लढतो आहे. लाचारी ची त्याला चिड आली आहे. तो गद्दारांना धडा शिकवायला तयार आहे. म्हणूनच तो स्वाभिमानाचे लढे उभारतो आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुढे यावे, याचीच केवळ वाट तो पाहतो आहे....अशाच नेतृत्वानी समोर यावे, जमात त्या नेत्यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहायला तयार आहे. *फक्त पुन्हा एखादा महान आत्मा पुढे येणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.*
कारण
दर पाच वर्षांनी धनगरांमध्ये
पुढे येतो एक नेता महान.
पाच वर्षांसाठी जमातीला
बिनधास्त ठेवून जातो गहान.
तेव्हा दक्ष राहून येवू द्या
सर्वांना याचे भान.
स्वाभिमानी धनगरानो!
आता पेटवा तुम्ही रान.
सत्तेशिवाय धनगरांना
मिळणार नाही कुठे सन्मान.
मात्र त्यासाठी झुकवू नका
आपली स्वाभिमानी मान.
संघटित होऊन तुम्ही
आता करा मतदान.
इतिहास लिहीलं तेव्हा
तुमचं ते सुवर्णाक्षरी पान.
जय मल्हार
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*
*धनगरानो! पुन्हा एखादा महान आत्मा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या..*
*__ डॉ प्रभाकर लोंढे__*
________________________
सर्वसाधारणतः धनगर समाज भावना प्रधान समाज आहे. त्यामुळे आपल्या जमातीला चिकित्सक विचार लवकर पटत नाही. *मात्र एखादा भावनिक मुद्दा/नेता आपल्या लोकांकडून लवकर डोक्यावर घेतला जातो. व त्यासंबंधी अंधभक्त म्हणून कामाला लागतो.* त्यामुळे या जमातीला लवकर फसवता येते, असा समज(गैर) महाराष्ट्रात सर्वत्र पहायला मिळतो. हा समज २०१४ मध्ये पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात धनगरांच्या बाबतीत हे सातत्याने घडत आल्याचे पहायला मिळते. परंतु आता हे अंतिम असावं, यासाठीच हा लेखनप्रपंच....
घटनात्मक आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भावना. पण ते कसं मिळेल याचा तिळमात्र विचार न करता आपण समोरच्यावर अंधविश्वास ठेवून मोकळे होतो. आणि इथेच धनगरांचं घोड मारं खातं. *अशा अंधविश्वासाच्या संबंधाने कोणी चिकित्सक विचार मांडले तर त्याला आपण मुर्खात काढतो...त्याचा अवाजवी विरोध केला जातो. हा धनगरांचा सर्वात महाभयंकर महारोग.. की ज्या रोगामुळे समाजरत्न बी. के. कोकरेंचा बळी गेला... यापुढे ही जाणार नाही हे सांगता येत नाही. जोपर्यंत आपल्या या प्रवृत्ती आपण बदलणार नाही तोपर्यंत धनगरांची फसवणूक होत आलेली आहे व होत राहणार आहे. म्हणून आमच्या वृत्ती मध्ये बदल होणै गरजेचे आहे*
भावनेच्या भरात प्रस्थापितांवर किंवा त्यांच्या धनगर तितरांवर आपण बिनधास्त विश्वास टाकतो. हा विश्वास चिकित्सकपणे ठेवला तर आपण आपल्या अजेंड्यामध्ये नक्की यशस्वी होवू शकतो.. पण चिकित्सक विचार करणेच आम्हाला जमत नाही. त्यामुळे भावनेच्या भरोश्यावर घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची दाट शक्यता असते. भावनेच्या भरोशावर तिच्या आहारी जाऊन आपण २०१४ च्या निवडणुकीत निर्णय घेतले. भाजपाला आपला हक्काचा पक्ष म्हणून विश्वास टाकला. परंतु भाजपा एवढ्या खालच्या पातळीवर जावून धनगरांशी भावनिक खेळ खेळेल, याचा आपण विचारही केला नाही. भावनेच्या भरात आपण बीजेपीला भरभरून मते दिली.
त्याचवेळी आपण आपला नेता म्हणून स्विकारलेला अराजकीय सामाजिक, उच्च विद्या विभूषित व्यक्तीत्व म्हणून नेता पुढे केला....जीवनातील पैसा, वेळ त्यासाठी बिनधास्त खर्च केला. जिथे (मेळावे, मोर्चे,सभा) बोलावले तिथे आपण उपस्थित राहलो. फक्त समाज हीत याशिवाय कोणताही वैयक्तिक विचार केला नाही त्यावेळी नेतृत्वाच्या व्यक्तीत्वाच्या छुप्या अजेंड्यावर चिकित्सक पणे विचार मांडणाऱ्यांच्या विचाराला पायदळी तुडविला. त्याचवेळी धनगरांचा नेता धनगरांच्या भावना, विश्वास, हीत यापेक्षा एखाद्या राजकीय पक्षाला, त्याच्या ध्येय धोरणाला बांधील होईल, समाजातील सामान्य माणसाच्या लोकमताची/लोकहीताची अवहेलना करून स्वार्थाला प्राधान्य देईल याचा सामाजिक स्तरावर आपण कधी विचार सुध्दा केला नाही. होता तो फक्त अंधविश्वास!!!!
एक उच्च विद्या विभूषित व्यक्तित्व म्हणून आदराची भावना बाळगणारी ही जमात राजकीय बाबतीत नेतृत्व या अर्थाने भावनिक झाली. अशा प्रकारची भावना जपत असतानाच आपण बुद्धीचा वापर करून जर विचार केला असता तर आज फसवणूक झाल्याची खंत कदाचित आपल्यात दिसली नसती. असो! इतिहास उगळायचा नसतो, तो गिळायचा असतो.. एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्यातच खरा शहाणपणा असतो.
आज कोणी म्हणतात, धनगरांचं आंदोलन चिरडलं गेलं, धनगरांचं घटनात्मक आरक्षण अंमलबजावणीचं स्वप्न भंग झालं, धनगरांना देशोधडीला लावलं, टिसच्या अहवालाने धनगर पुर्णतः नाउमेद झाले. ते कदाचित कोणाला खरंही वाटत असेल. परंतु ते मला खरं वाटणार नाही कारण सामान्य धनगर, खरे समाजहीतवादी, यांच्या अंतरात्म्याची आग मात्र अजूनही पेटतांंनी दिसत आहे. त्यांचा सत्याच्या विजयावरचा विश्वास आजही दृढ आहे. त्याच आत्मविश्वासाने, त्याच ताकदीने तो लढायला तयार आहे. फक्त त्याने धनगर जमातीमधील तितरं ओळखायला शिकणे आवश्यक आहे... त्यांना खऱ्या नेत्याची गरज आहे. ते आजही त्या प्रतिक्षेत आहे.
काही धनगर नेते कदाचित शांत झाले असेल, काही नेते इमानेइतबारे जमातीच्या भल्यासाठी काम करीत आहे. काहीं धनगर नेत्यांना स्वतः च्या राजकीय अस्तित्व निर्मिती साठी समाजाच्या भावनेचा वापर करण्याची ऊर्मी निर्माण झाली असेल. काहीतर प्रस्थापितांच्या इशऱ्यावर नाचत आहे (जमातीतील जानकार लोकांना हे लक्षात आलं आहे.) त्यामुळे धनगरांच्या भावनेशी खेळण्याची इच्छा, हिम्मतही ते करत असेल तर त्यातून खऱ्या नेत्याला ओळखण्याची गरज निर्माण झालेली आहे. व ते सहज शक्य आहे.
प्रस्थापितांनी आपली पिलावळ धनगर जमातीत निर्माण केलेली आहे. पद, पदांची लालच, पैसा, छुपा अजेंडा देवून धनगरांना फसविण्यासाठी तयार केलं आहे, अशा या कामात आपली काही नेते मंडळी माहीर आहेत. धनगर जमातीमध्ये ते सक्रीयपणे काम सुध्दा करीत आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे जमात विभाजित होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे.असं असलं तरी धनगर निष्ठेपुढे मात्र प्रस्थापितांचे दलाल उघडे पडतील, हे निश्चित आहे. कारण सामान्य धनगर आता स्वाभिमानाला जागायला लागले आहेत.
स्वाभिमानी लढाई तो जाणायला लागला आहे. त्यामुळे प्रत्येक लढा तो स्वतःच्या हक्कासाठी लढतो आहे. लाचारी ची त्याला चिड आली आहे. तो गद्दारांना धडा शिकवायला तयार आहे. म्हणूनच तो स्वाभिमानाचे लढे उभारतो आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुढे यावे, याचीच केवळ वाट तो पाहतो आहे....अशाच नेतृत्वानी समोर यावे, जमात त्या नेत्यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहायला तयार आहे. *फक्त पुन्हा एखादा महान आत्मा पुढे येणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.*
कारण
दर पाच वर्षांनी धनगरांमध्ये
पुढे येतो एक नेता महान.
पाच वर्षांसाठी जमातीला
बिनधास्त ठेवून जातो गहान.
तेव्हा दक्ष राहून येवू द्या
सर्वांना याचे भान.
स्वाभिमानी धनगरानो!
आता पेटवा तुम्ही रान.
सत्तेशिवाय धनगरांना
मिळणार नाही कुठे सन्मान.
मात्र त्यासाठी झुकवू नका
आपली स्वाभिमानी मान.
संघटित होऊन तुम्ही
आता करा मतदान.
इतिहास लिहीलं तेव्हा
तुमचं ते सुवर्णाक्षरी पान.
जय मल्हार
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*