Thursday, May 17, 2018


महाराष्ट्रातील​ तिसरी आघाडी :: प्रस्थापित विरुद्ध विस्थापित..
-------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे
-----------------------

महाराष्ट्रातील सत्ताकारणामध्ये​ संयुक्त पुरोगामी आघाडी व राष्ट्रीय लोकशाही आघाडी ला पर्याय म्हणून अलीकडे तिसरी आघाडी निर्माण होताना व जोरदार पाठिंबा मिळतांना दिसून येत आहे. आतापर्यत महाराष्ट्रातील संपूर्ण सत्ता पहिल्या दोन आघाड्यांमध्ये प्रमुख​ पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना या पक्षानींच उपभोगलेली आहे. या सर्व पक्षांची विचारधारा यापेक्षा कृती कार्यक्रम येथील विशिष्ट प्रस्थापितांना प्रस्थापित करणारा आहे.  त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी मोठी सामाजिक दरी निर्माण झालेली आहे.
         अशा  या परिस्थितीत असलेल्या महाराष्ट्रीयन लोकसमुदायाचे/ समाजाचे, कार्ल मार्क्स च्या मते "आहे रे (have's)"  आणि "नाही रे(have's not)" असे स्पष्ट वर्गीकरण करता येते. यातील "आहे रे" हा वर्ग नेहमीच सत्ताधीश तर "नाही रे" वर्ग नेहमीच सत्ताहीन राहिलेला आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रात पॅकेज, मदतीच्या,  दयेवर, आशेवर उपेक्षित जगत आला व  जगताना दिसून येतो आहे. महाराष्ट्रातील​ कष्टकरी वर्ग, छोट्या-मोठ्या जातीं जमातीं या रूपाने  जगत  आहे.  हे वर्ग देशात लोकशाही व लोकशाही संविधान असतांना सुध्दा संविधानिक अधिकारांसाठी, सत्ताधारी (आहे रे) वर्गाकडून अपेक्षा  करीत उपेक्षित जगत आहेत. राजकीय सत्तेत प्रस्थापित असलेला आहे रे,  हा वर्ग संख्येने फार थोडा असून बहुसंख्य असलेला विस्थापित/नाही रे, हा वर्ग सर्वच बाबतीत वंचित राहिलेला आहे. ही स्थिती वरवर पाहता लक्षात येत नसली तरी लोकशाहीच्या तळाशी याचे भयान अस्तित्व लक्षात येते.  त्यामुळेच या महाराष्ट्रा पुरता विचार करता, महाराष्ट्रात लोकशाही पूर्णता रुजली आहे असे म्हणता येत नाही. हा विस्तापित वर्ग सत्ताहीन असल्याने विचारांने संघटित नसला तरी आज त्याला आपल्या शोषणा विषयी संपूर्ण जाणीव निर्माण झालेली आहे.
     असा तो महाराष्ट्रातील "आहे रे" वर्ग हा बीजेपी, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या माध्यमातून आतापर्यत नेहमीच सत्तेमध्ये राहिलेला आहे.  सत्ता प्राप्तीच्या दृष्टीने हा वर्ग या पक्षांच्या माध्यमातून नेहमी विकासाचा आशावाद, धार्मिक भावना, धार्मिक प्रश्न, वाद, जातीयवाद, दंगली, संप्रदायवाद, प्रादेशिकवाद, अंधश्रद्धा, अशा मुद्दांचा आधार घेतात, असे दिसून येते. या सर्व मुद्यांवर महाराष्ट्रातील संपूर्ण उपेक्षित/ नाही रे वर्ग भावनिक होवून या सर्व पक्षांच्या माध्यमातून प्रस्थापित/आहे रे वर्गानी आपल्या पाठीशी लावून ठेवलेला आहे. यांचे मतदान या चार पक्षांपेक्षा इतरांना जाणार नाही,  किंवा तसा इतर पर्याय निर्माण होणार नाही, याची वेळोवेळी​ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आज पर्यंत यांच्या व्यतिरिक्त सत्ता इतरत्र गेलेली​ नाही.
                   राजकीय सत्तेचा वापर करून या वर्गाने स्वतःची केवळ सत्ताकेंद्र काबीजच नाही तर मजबूत केली आहे. या सर्वच पक्षांनी येथील सत्ता हस्तगत करून येथील, आहे रे वर्गाला त्यांनी संगनमताने प्रस्थापित केले आहे.
           यासाठी या पक्षांनी, विस्थापित, नाही रे वर्गातील काही तितरं (आपल्या उपेक्षित वर्गाचं/उपेक्षित जाती-जमातींच प्रतिनिधित्व करण्याचं सोंग करण्यात पटाईत असलेले, प्रसंगी प्रस्थापित वर्गाशीच बांधीलकी जपणारे) आपल्या हाताशी पकडलेले आहे. व त्यांच्या माध्यमातून हे पक्ष, नाही रे वर्गाला आपल्याशी बांधून ठेवण्याचा/ बांधीलकी जपण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असतात. ही बाब विस्थापित/नाही रे वर्गातील जाणकारांना अलीकडच्या काळात लक्षात आलेली आहे.
        याच जाणिवेतून महाराष्ट्रात या वर्गात अस्मितेचे वारे वाहू लागले आहे. त्यातूनच तिसरी आघाडी जन्माला येण्याची पार्श्वभूमी तयार झाली.  यामुळे बारा बलुतेदारांची, उपेक्षित, वंचित, भटक्या-विमुक्त, दलित-आदिवासी, मुस्लीम, इतर मागासवर्गीय घटकांची राजकीय सत्तेसाठी महत्त्वाकांक्षा वाढली. त्यातूनच महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडी ची संकल्पना वास्तविक रूप धारण करू लागली. सामाजिक-राजकीय आराखडे, खलबते आखण्यास सुरुवात झाली. अनेक मतप्रवाह विचारप्रवाह असलेल्या विविध सामाजिक राजकीय संघटना या आघाडीमध्ये समाविष्ट होताना दिसू लागल्या. हा तिसऱ्या आघाडीचा प्रवाह नक्कीच प्रलयात रूपांतरित होईल, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. येणाऱ्या काळात ही आघाडी प्रस्थापित बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या अनीतीमत्तेवर नक्कीच विजय मिळवेल, हा विश्वास  महाराष्ट्रातील एकूण वातावरण बघता लक्षात येते.
              येत्या 2019 च्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये  महाराष्ट्रात ही आघाडी सत्ताधारी बनेलच हे सांगता येत नसले तरी ती येथील राजकीय समीकरणे बदलविण्यास ती नक्कीच समर्थ ठरणार आहे. पिढ्यान् पिढ्यां गारद झाल्यानंतर उपेक्षितांमध्ये राजकीय सत्तेच्या आकांक्षा निर्माणच नाही तर वास्तवामध्ये स्वप्न साकार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उपेक्षितांच्या विकासाचे सोंग​ करणाऱ्या, स्ववर्गाच्या हितासाठी उपेक्षितांना त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या, मुजोर अल्पसंख्यांक​ प्रस्थापित,आहे रे वर्गाला (ज्यांच्याकडे सर्वच आहे) हे समस्त उपेक्षित, नाही रे वर्ग(ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही ) लोकशाहीतील मतदान या शास्त्राच्या माध्यमातून आपल्या मतसंख्येच्या आधारे मोठा धक्का देणार आहे.

उपेक्षित एकता-- उपेक्षित भाग्यविधाता !!!

एकच ध्यास  --- उपेक्षितांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

सत्ता अभंग

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हार चा गजर!धृ!
सत्तेची आस घेऊन येती.
त्यात अहिल्येची मूर्ती.
पंढरपुरी जाहला हो.
ऐक्याचा गजर.

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर.!धृ!

यशवंत-भीम घोष
कानी येती.
त्यात विठ्ठलाची मूर्ती.
स्वाभिमानी रंगले हो
चंद्रभागा तीर..

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर.!धृ!

नैराश्य  हे
गळूनी जाती,
धनगराला या
प्रेरणा मिळती.
पंढरपुरी आले हो
स्वाभिमानी धनगर.

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर!धृ!

-----------------------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
९६७३३८६९६३
कर्तव्यदक्ष जवान

मी राष्ट्रसेवक
मीच खरा देशभक्त
राष्ट्रसेवेच्या अग्नीकुंडात
सदा अर्पितो माझं रक्त.

देश असो वा परदेश
सदा शत्रू कडेच लक्ष.
राष्ट्र कार्यातच दक्ष मी.
मात्र संसारातच दुर्लक्ष​.

राष्ट्रच माझं कुटुंब,
तेच जीवनाचे मर्म.
माणूसकीला जपणारे
सदा करतो मी कर्म.

राष्ट्रसेवा-जनसेवा
हाच मी मानतो स्वधर्म
सीमेवर लढतांना
फक्त जानतो राष्ट्रधर्म.

_________________________
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
__________________________

Monday, May 7, 2018

*डॉ. महात्मे साहेब, एकदा खासदारकीच्या राजिनाम्याचा विचार करूनच पहा!*
-------------------------------------------
-------------------------------------------
(वाचकाने, ही माझी मागणी नाही विचारार्थ सुचना आहे.हे गंभीरपणे समजून घेवूनच वाचण्यास सुरूवात करावी. ही विनंती )

 समस्त धनगर बांधवानो! हे वाचून डॉ. साहेबांचे भक्त नाराज होतील. अनूयायी विचार करायला लागतील, विरोधक आनंदी होतील. तो त्यांचा प्रश्न आहे, पण एवढं नक्की  सांगतो,

१) या महाराष्ट्रातील व्यवस्था हालल्या शिवाय राहणार नाही. 

२) पंचवार्षिक मध्ये धनगराना काय दिलं याचा विचार सरकार व तुमचा बीजेपी पक्ष केल्या शिवाय राहणार नाही.

३) बीजेपीला जो आपल्या माध्यमातून धनगरांना मार्गाने लावल्याचा/  लावण्याचा विश्वास वाटतो आहे,  तो खंडित झाल्याशिवाय राहणार नाही.

४) आपण स्थापन केलेल्या  धनगर आरक्षण संघर्ष समीतीचे  बीजेपीशी काहीही देणेघेणे लागत नाही हे सिध्द होईल.

५) धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी आपणास खासदार बनविलं की बी.जे पी पक्षासाठी हे सुद्धा स्पष्ट होईल.

६) खासदारकीचा राजिनामा दिल्याने धनगर समाजाचं किंवा डॉ. साहेबांचं  खूप काही खाजगी  नुकसान होईल असं वाटत नाही. पण आपण स्विकारलेला पक्ष, सरकार, व ही व्यवस्था यांच्यावर धनगर जमातीचा नक्कीच दबाव निर्माण होईल.

७)  धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी धनगरानी ठरविलेला समाजनेता ही आपली मूळ भूमिका कायम राहील. व त्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सिध्द होईल.

८) आपण खासदारकी सोडल्याने आपल्या कार्यशैली तसेच  कार्यक्षमतेत कमी होईल असे नक्कीच वाटत नाही.

९) आपण समाजासाठी विशेष नेञतज्ञ पद्मश्री डॉ विकास महात्मे  म्हणून सन्माननिय आहात व नेहमीच असाल. त्यापेक्षा मोठ काम आपल्या हातून खासदार म्हणून ही व्यवस्था किंवा सरकार किंवा बीजेपी पक्ष होवू देईल असं आजतरी  मला वाटत नाही.

१०) विदर्भात महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असतांना व सोबतच धनगरांनी बीजेपीला मते दिल्याने सरकार स्थापन झाल्यानंतर, विदर्भात धनगर खासदार असतांना आपल्या बीजेपी पक्षाकडून धनगरांचा खूप मोठा राजकीय  फायदा झाला आहे. असे वाटत नाही,

११) विदर्भातील एकाही महानगरपालिकेत (विशेषतः नागपूर/चंद्रपूर) आपल्या  बीजेपी पक्षाने एकही उमेदवार धनगर दिला नाही. (नागपूर म. पालिका स्विकृत सदस्यत्वासाठी काय झालं हे आपल्यालाच माहित आहे)

 १२) जिल्हा परिषद /पंचायत समिती साठी इच्छुक धनगर नेत्यांनी उभे राहू नये  यासाठी आपणावर किती दबाव आला होता, हे मी आपणास सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

१३) आपल्या शब्दाचा/ खासदारकीचा मान राखून बीजेपी पक्षाने धनगर नेत्यांना उमेदवारी दिली, असं कधी लक्षात आलं नाही.

१४) आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आमच्या  (डॉ. तात्या साहेब लहाने यांच्या तोडीचा)  नेञतज्ञाला आदर्श मेंढीफार्म स्थापन करायला लावण्यास (धनगरांनी मेंढ्याच राखल्या पाहीजे) हे सरकार यशस्वी झाले , ही या सरकारने धनगरांना दिलेली सर्वात मोठी देणगी मला वाटायला लागली आहे. याचा सुद्धा विचार करावा.

१५) माझ्या या सुचना विचारात घेतल्याच पाहीजे ही बळजबरी नाही. माञ न पटल्यास क्षमा असावी.

१६) अशा सुचना करण्याचा मला व्यक्तीगत काहीही अधिकार नाही. पण धनगरांची ताकद पाहून बीजेपी ने आपणास खासदार बनविलं, याची आपणास जाणीव असल्याने व मी केवळ धनगर जमातीचा राजकीय अभ्यासक एवढाच माझा अधिकार वापरून मी या सुचना केलेल्या आहे.

ही माझी सुचना केवळ धनगर जमाती संबंधाने त्यांच्या पक्षापुरती जबाबदारी डॉ साहेबांवर, डॉ. साहेबांचा दबाव आता केवळ बीजेपी पक्षावर निर्माण व्हावा. दबावातून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर विदर्भातील तरी धनगर नेत्यांचा राजकीय विकास व्हावा. (विदर्भातील धनगर राजकीय सत्तेत नगन्य आहे)  एवढाच माझा निष्कलंकित हेतू आहे....


*जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!*

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*आपलाच*
*धनगर बांधवांचा शुभचिंतक*
डॉ. प्रभाकर लोंढे
गोंदिया-चंद्रपूर
९६७३३८६९६३
एक धनगर -लाख धनगर

धनगर  बांधवांनो! (नेते,कार्यकर्ते)

१)काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे राजकीय पक्ष धनगरांना उमेदवारीच देत नाही तर धनगरांनी या पक्षांमध्ये का रहावं.???

२) धनगरांनी या पक्षाना साथ का द्यावी? धनगर नेत्यांच्या शब्दाला मान देऊन सामान्य धनगरांनी या पक्ष्यांच्या नेत्यांना मतदान का करावे???

३) ज्यांनी गेल्या पासष्ट सत्तर वर्षात तुमचे घटनात्मक आरक्षण मिळू दिला नाही त्यांच्यासोबत राहून तुम्ही काय साध्य केलं???

४) या पक्षांमध्ये काम करणाऱ्या धनगर नेत्यांना कार्यकर्त्यांना तुमच्या माध्यमातून धनगरांचं राजकीय शोषण या पक्ष्यांनी केलं यापुढेही असेच होणार असेल तर तुम्ही त्यामध्ये का काम करावं????

५) धनगर नेत्यांनो तुमच्या या पक्षांनी तुमच्या असलेल्या निष्ठेमुळेच भूतकाळात धनगरांची राजकीय बरबादी झाली ती यापुढेही आपण सहन करणार आहात काय? आणि किती दिवस होऊ देणार आहात???

६) या पक्ष्यांमधील काही राजकीय नेते तुमच्या बाबतीत विरोधी भूमिका घेऊन मजुरी करतात त्यांना कधी तुम्ही धडा शिकवणार आहात काय???

७) तुम्ही स्वाभिमानी धनगर आहात ही बाब त्यांना कधी    लक्षात आणून देणार आहात???

८) ह्यापुढे आपल्या भूमिका स्पष्ट करून आपल्या पक्षात काम करणार आहात की नेहमीप्रमाणे use & through???

९) आपल्या अस्तित्वाची जाणीव पक्षांना करून देण्यासाठी आपण अजेंडे आखले आहेत काय??????

१०) यापुढे तरी आपल्या पक्षातून धनगरांना उमेदवारी मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न होणार आहेत का????

 (या प्रश्नांची उत्तरे स्वतःच स्वतःशी द्यावी ही विनंती)

धनगर राजकीय नेतृत्व आणि राजकीय जाणिवा जागृती चांगला अभ्यासक

                           डॉ.प्रभाकर लोंढे.
धनगर जमातीला योग्य राजकीय पर्यायाची प्रतिक्षा...


         महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा विचार केला असता जातीय राजकारण हा येथील राजकारणाला लागलेला अतिशय मोठा कलंक आहे. या कलंकाचे अनेक दुष्परिणाम आज महाराष्ट्रात दिसायला लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे येथील धनगर सारख्या बहुसंख्य जमातीवर अनन्वित अत्याचार झाले आहे. राजकारणात निर्णायक मतसंख्या असलेल्या या जमातीला ना राजकीय सत्तेत वाटा वा शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी अपेक्षित वातावरण मिळाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, सदैव रानोमाळ भटकंती, परिणामतः वंचित घटक म्हणून जीवनात आलेली उपेक्षा. या बाबींमुळे येथील व्यवस्थेला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. प्रस्थापितांनी मात्र त्यांच्या  मतसंख्येच्या भरोशावर आपली सत्ताकेंद्र मजबूत केली. या  सत्ताधार्‍यांनी सत्तेचा अतिरेक एवढा केला की त्या आधारे धनगरांचे घटनात्मक अधिकार सुद्धा त्यांना मिळू दिले नाही.

     भारतीय संविधानाने  धनगरांना दिलेले घटनात्मक अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलू शकते. प्रस्थापितांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होऊ शकते. या भीतीपोटी या जमातीला राजकारणापासून हेतुपुरस्सर अलिप्त ठेवण्यात आले. याचा परिणाम ही जमात विकासापासून वंचित आहे, ही बाब लक्षात येताच या महाराष्ट्रात राज्यघटनेची कितपत अंमलबजावणी झाली यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.

      मात्र गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर या जमाती मधील राजकीय अस्मिता प्रचंड जागृत झाल्याने त्यांच्यामधून आज अधिकाराची भाषा केली जात आहे हे उघडपणे लक्षात येते. इतिहासात राजकीय सत्ता गाजवणाऱ्या या जमातीला स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वांगीन​ शोषण तसेच सत्तेच्या विरहाने त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाल्याची तिव्र जाणीव या लोकांना आज झालेली आहे.

          महाराष्ट्राच्या तत्त्वहीन राजकारणात अपेक्षा ठेवत हक्काच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी या जमातीने अनेक आंदोलने केली परंतु हेतुपुरस्सर त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रात घडताना त्याना स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला असता लक्षात येते की बरेच वर्ष या महाराष्ट्रात राजकीय सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या जमातीचा केवळ मतदानासाठी वापर करून घेतला यामुळे या जमातीमध्ये संतापाची लाट पसरली. त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चिड व 2014 च्या निवडणुकी प्रसंगी भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांसारख्या पक्षांनी या धनगर जमातीला दिलेली आश्वासने यावर विश्वास ठेवुन महाराष्ट्रात सत्तांतरामध्ये महत्वाची भूमिका या जमातीने बजावली.
            आजचे माझे बीजेपी प्रणित  सरकार धनगरांमुळे प्रस्थापित झाले आहे ही बाब मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः कबूल केली. मात्र ज्या आश्वासनाच्या आधारे हे सर्व घडलं, ती आश्वासने मात्र या सरकारने हेतुपुरस्सर कूटनीती तून मार्गाला लावली. मात्र या बाबीची प्रचंड चीड आज या धनगर जमातीतील तरुण व जागृत धनगर बांधवांमध्ये दिसून येते. ही चीड  उत्पन्न होणे सहाजिक आहे कारण ज्या आशेवर व लेखी आश्वासनांवर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनीच विश्वासघात केला. कुणाशी दगाबाजी न करणारी ही जमात या दगाबाजी ची बळी पडली. त्यामुळे आज महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह बीजेपी शिवसेना या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची पण इभ्रत वेशीवर टांगल्या गेली .

    येत्या 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. प्रत्येकानी आपापले अंदाज बांधणे सुरू केले. रणनीती आखण्यास सुरुवात झाली. धनगर जमातीच्या ओटबँक संबंधाने विशेष योजना आखताना आता राज्य सरकार दिसत आहे. या जमातीचे कोणतेही प्रश्न न सोडवता हे राजकीय पक्ष या जमातीकडून मतदान घेता येईल यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करू लागले आहे. प्रत्येक पक्षामध्ये असलेल्या या जमातीचे नेते-कार्यकर्ते त्यासाठी काम करू लागले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना या पक्षाचे नेते, कार्यकर्ते या जमातीचा जखमी विश्वास संपादन करण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण कारण संपूर्ण जमात यापेक्षा वेगळ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे लक्षात येते.

आश्वासनावर विश्वास ठेवत जमातीची अख्खी पंचवार्षिक गेली.  (अपेक्षा, आश्‍वासनावर विश्‍वास, प्रतिक्षा व आपल्या माणसांचा मानसन्मान करण्यात....... ) ना सुटला आरक्षणाचा प्रश्न! ना सुटला नामांतराचा प्रश्न! वेळ मारून नेण्यासाठी केलेल्या हरकती, नेत्यांनी दिलेले स्टेटमेंट, प्रत्येक प्रश्नाला दिलेला राजकारण्याचा रंग, या सर्व बीजेपी सरकारच्या उपक्रमांमुळे जरी धनगर जमात आश्वस्थ असली तरी अंधविश्वास मात्र ठेवणारी राहीलेली नाही. राजकीय समीक्षा व सरकारी अजेंड्यांची सत्यता समजून घेण्याइतपत आज या जमातींमध्ये राजकीय जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पावले टाकणे, हा या जमातीतील  जाणकार लोकांचा मनोदय दिसून येतो आहे.

अशा परिस्थितीत यात धनगर जमातीला जर वेगळा सक्षम असा राजकीय पर्याय मिळाल्यास ही जमात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय क्रान्तिकारी बदल घडवून आणू शकते. तशा प्रकारची मानसिक तयारी व मनोबल या जमातींमध्ये विकसित झालेले असून अशा सक्षम पर्यायांच्या शोधात ही जमात दिसून येत आहे. मात्र असा पर्याय उभारणे हा महाराष्ट्रात अशक्य जरी नसला तरी फार कठीण परिस्थितीतून तो उभा  राहू शकतो. त्यादिवशी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ही धनगर जमातीच्या हातून फिरल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असेल यात कोणीही शंका घेऊ शकणार नाही. त्यादृष्टीने विचार, नियोजन व अंमलबजावणी साठी शुभेच्छा!!!


--------------------------------------------------------
धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक


डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
9673386963
धनगर जमातीला योग्य राजकीय पर्यायाची प्रतिक्षा...


         महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा विचार केला असता जातीय राजकारण हा येथील राजकारणाला लागलेला अतिशय मोठा कलंक आहे. या कलंकाचे अनेक दुष्परिणाम आज महाराष्ट्रात दिसायला लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे येथील धनगर सारख्या बहुसंख्य जमातीवर अनन्वित अत्याचार झाले आहे. राजकारणात निर्णायक मतसंख्या असलेल्या या जमातीला ना राजकीय सत्तेत वाटा वा शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी अपेक्षित वातावरण मिळाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, सदैव रानोमाळ भटकंती, परिणामतः वंचित घटक म्हणून जीवनात आलेली उपेक्षा. या बाबींमुळे येथील व्यवस्थेला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. प्रस्थापितांनी मात्र त्यांच्या  मतसंख्येच्या भरोशावर आपली सत्ताकेंद्र मजबूत केली. या  सत्ताधार्‍यांनी सत्तेचा अतिरेक एवढा केला की त्या आधारे धनगरांचे घटनात्मक अधिकार सुद्धा त्यांना मिळू दिले नाही.

     भारतीय संविधानाने  धनगरांना दिलेले घटनात्मक अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलू शकते. प्रस्थापितांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होऊ शकते. या भीतीपोटी या जमातीला राजकारणापासून हेतुपुरस्सर अलिप्त ठेवण्यात आले. याचा परिणाम ही जमात विकासापासून वंचित आहे, ही बाब लक्षात येताच या महाराष्ट्रात राज्यघटनेची कितपत अंमलबजावणी झाली यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.

      मात्र गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर या जमाती मधील राजकीय अस्मिता प्रचंड जागृत झाल्याने त्यांच्यामधून आज अधिकाराची भाषा केली जात आहे हे उघडपणे लक्षात येते. इतिहासात राजकीय सत्ता गाजवणाऱ्या या जमातीला स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वांगीन​ शोषण तसेच सत्तेच्या विरहाने त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाल्याची तिव्र जाणीव या लोकांना आज झालेली आहे.

          महाराष्ट्राच्या तत्त्वहीन राजकारणात अपेक्षा ठेवत हक्काच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी या जमातीने अनेक आंदोलने केली परंतु हेतुपुरस्सर त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रात घडताना त्याना स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला असता लक्षात येते की बरेच वर्ष या महाराष्ट्रात राजकीय सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या जमातीचा केवळ मतदानासाठी वापर करून घेतला यामुळे या जमातीमध्ये संतापाची लाट पसरली. त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चिड व 2014 च्या निवडणुकी प्रसंगी भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांसारख्या पक्षांनी या धनगर जमातीला दिलेली आश्वासने यावर विश्वास ठेवुन महाराष्ट्रात सत्तांतरामध्ये महत्वाची भूमिका या जमातीने बजावली.
            आजचे माझे बीजेपी प्रणित  सरकार धनगरांमुळे प्रस्थापित झाले आहे ही बाब मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः कबूल केली. मात्र ज्या आश्वासनाच्या आधारे हे सर्व घडलं, ती आश्वासने मात्र या सरकारने हेतुपुरस्सर कूटनीती तून मार्गाला लावली. मात्र या बाबीची प्रचंड चीड आज या धनगर जमातीतील तरुण व जागृत धनगर बांधवांमध्ये दिसून येते. ही चीड  उत्पन्न होणे सहाजिक आहे कारण ज्या आशेवर व लेखी आश्वासनांवर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनीच विश्वासघात केला. कुणाशी दगाबाजी न करणारी ही जमात या दगाबाजी ची बळी पडली. त्यामुळे आज महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह बीजेपी शिवसेना या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची पण इभ्रत वेशीवर टांगल्या गेली .

    येत्या 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. प्रत्येकानी आपापले अंदाज बांधणे सुरू केले. रणनीती आखण्यास सुरुवात झाली. धनगर जमातीच्या ओटबँक संबंधाने विशेष योजना आखताना आता राज्य सरकार दिसत आहे. या जमातीचे कोणतेही प्रश्न न सोडवता हे राजकीय पक्ष या जमातीकडून मतदान घेता येईल यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करू लागले आहे. प्रत्येक पक्षामध्ये असलेल्या या जमातीचे नेते-कार्यकर्ते त्यासाठी काम करू लागले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना या पक्षाचे नेते, कार्यकर्ते या जमातीचा जखमी विश्वास संपादन करण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण कारण संपूर्ण जमात यापेक्षा वेगळ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे लक्षात येते.

आश्वासनावर विश्वास ठेवत जमातीची अख्खी पंचवार्षिक गेली.  (अपेक्षा, आश्‍वासनावर विश्‍वास, प्रतिक्षा व आपल्या माणसांचा मानसन्मान करण्यात....... ) ना सुटला आरक्षणाचा प्रश्न! ना सुटला नामांतराचा प्रश्न! वेळ मारून नेण्यासाठी केलेल्या हरकती, नेत्यांनी दिलेले स्टेटमेंट, प्रत्येक प्रश्नाला दिलेला राजकारण्याचा रंग, या सर्व बीजेपी सरकारच्या उपक्रमांमुळे जरी धनगर जमात आश्वस्थ असली तरी अंधविश्वास मात्र ठेवणारी राहीलेली नाही. राजकीय समीक्षा व सरकारी अजेंड्यांची सत्यता समजून घेण्याइतपत आज या जमातींमध्ये राजकीय जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पावले टाकणे, हा या जमातीतील  जाणकार लोकांचा मनोदय दिसून येतो आहे.

अशा परिस्थितीत यात धनगर जमातीला जर वेगळा सक्षम असा राजकीय पर्याय मिळाल्यास ही जमात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय क्रान्तिकारी बदल घडवून आणू शकते. तशा प्रकारची मानसिक तयारी व मनोबल या जमातींमध्ये विकसित झालेले असून अशा सक्षम पर्यायांच्या शोधात ही जमात दिसून येत आहे. मात्र असा पर्याय उभारणे हा महाराष्ट्रात अशक्य जरी नसला तरी फार कठीण परिस्थितीतून तो उभा  राहू शकतो. त्यादिवशी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ही धनगर जमातीच्या हातून फिरल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असेल यात कोणीही शंका घेऊ शकणार नाही. त्यादृष्टीने विचार, नियोजन व अंमलबजावणी साठी शुभेच्छा!!!


--------------------------------------------------------
धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक


डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
9673386963
धनगर जमातीला योग्य राजकीय पर्यायाची प्रतिक्षा...


         महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा विचार केला असता जातीय राजकारण हा येथील राजकारणाला लागलेला अतिशय मोठा कलंक आहे. या कलंकाचे अनेक दुष्परिणाम आज महाराष्ट्रात दिसायला लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे येथील धनगर सारख्या बहुसंख्य जमातीवर अनन्वित अत्याचार झाले आहे. राजकारणात निर्णायक मतसंख्या असलेल्या या जमातीला ना राजकीय सत्तेत वाटा वा शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी अपेक्षित वातावरण मिळाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, सदैव रानोमाळ भटकंती, परिणामतः वंचित घटक म्हणून जीवनात आलेली उपेक्षा. या बाबींमुळे येथील व्यवस्थेला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. प्रस्थापितांनी मात्र त्यांच्या  मतसंख्येच्या भरोशावर आपली सत्ताकेंद्र मजबूत केली. या  सत्ताधार्‍यांनी सत्तेचा अतिरेक एवढा केला की त्या आधारे धनगरांचे घटनात्मक अधिकार सुद्धा त्यांना मिळू दिले नाही.

     भारतीय संविधानाने  धनगरांना दिलेले घटनात्मक अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलू शकते. प्रस्थापितांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होऊ शकते. या भीतीपोटी या जमातीला राजकारणापासून हेतुपुरस्सर अलिप्त ठेवण्यात आले. याचा परिणाम ही जमात विकासापासून वंचित आहे, ही बाब लक्षात येताच या महाराष्ट्रात राज्यघटनेची कितपत अंमलबजावणी झाली यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.

      मात्र गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर या जमाती मधील राजकीय अस्मिता प्रचंड जागृत झाल्याने त्यांच्यामधून आज अधिकाराची भाषा केली जात आहे हे उघडपणे लक्षात येते. इतिहासात राजकीय सत्ता गाजवणाऱ्या या जमातीला स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वांगीन​ शोषण तसेच सत्तेच्या विरहाने त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाल्याची तिव्र जाणीव या लोकांना आज झालेली आहे.

          महाराष्ट्राच्या तत्त्वहीन राजकारणात अपेक्षा ठेवत हक्काच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी या जमातीने अनेक आंदोलने केली परंतु हेतुपुरस्सर त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रात घडताना त्याना स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला असता लक्षात येते की बरेच वर्ष या महाराष्ट्रात राजकीय सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या जमातीचा केवळ मतदानासाठी वापर करून घेतला यामुळे या जमातीमध्ये संतापाची लाट पसरली. त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चिड व 2014 च्या निवडणुकी प्रसंगी भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांसारख्या पक्षांनी या धनगर जमातीला दिलेली आश्वासने यावर विश्वास ठेवुन महाराष्ट्रात सत्तांतरामध्ये महत्वाची भूमिका या जमातीने बजावली.
            आजचे माझे बीजेपी प्रणित  सरकार धनगरांमुळे प्रस्थापित झाले आहे ही बाब मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः कबूल केली. मात्र ज्या आश्वासनाच्या आधारे हे सर्व घडलं, ती आश्वासने मात्र या सरकारने हेतुपुरस्सर कूटनीती तून मार्गाला लावली. मात्र या बाबीची प्रचंड चीड आज या धनगर जमातीतील तरुण व जागृत धनगर बांधवांमध्ये दिसून येते. ही चीड  उत्पन्न होणे सहाजिक आहे कारण ज्या आशेवर व लेखी आश्वासनांवर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनीच विश्वासघात केला. कुणाशी दगाबाजी न करणारी ही जमात या दगाबाजी ची बळी पडली. त्यामुळे आज महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह बीजेपी शिवसेना या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची पण इभ्रत वेशीवर टांगल्या गेली .

    येत्या 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. प्रत्येकानी आपापले अंदाज बांधणे सुरू केले. रणनीती आखण्यास सुरुवात झाली. धनगर जमातीच्या ओटबँक संबंधाने विशेष योजना आखताना आता राज्य सरकार दिसत आहे. या जमातीचे कोणतेही प्रश्न न सोडवता हे राजकीय पक्ष या जमातीकडून मतदान घेता येईल यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करू लागले आहे. प्रत्येक पक्षामध्ये असलेल्या या जमातीचे नेते-कार्यकर्ते त्यासाठी काम करू लागले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना या पक्षाचे नेते, कार्यकर्ते या जमातीचा जखमी विश्वास संपादन करण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण कारण संपूर्ण जमात यापेक्षा वेगळ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे लक्षात येते.

आश्वासनावर विश्वास ठेवत जमातीची अख्खी पंचवार्षिक गेली.  (अपेक्षा, आश्‍वासनावर विश्‍वास, प्रतिक्षा व आपल्या माणसांचा मानसन्मान करण्यात....... ) ना सुटला आरक्षणाचा प्रश्न! ना सुटला नामांतराचा प्रश्न! वेळ मारून नेण्यासाठी केलेल्या हरकती, नेत्यांनी दिलेले स्टेटमेंट, प्रत्येक प्रश्नाला दिलेला राजकारण्याचा रंग, या सर्व बीजेपी सरकारच्या उपक्रमांमुळे जरी धनगर जमात आश्वस्थ असली तरी अंधविश्वास मात्र ठेवणारी राहीलेली नाही. राजकीय समीक्षा व सरकारी अजेंड्यांची सत्यता समजून घेण्याइतपत आज या जमातींमध्ये राजकीय जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पावले टाकणे, हा या जमातीतील  जाणकार लोकांचा मनोदय दिसून येतो आहे.

अशा परिस्थितीत यात धनगर जमातीला जर वेगळा सक्षम असा राजकीय पर्याय मिळाल्यास ही जमात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय क्रान्तिकारी बदल घडवून आणू शकते. तशा प्रकारची मानसिक तयारी व मनोबल या जमातींमध्ये विकसित झालेले असून अशा सक्षम पर्यायांच्या शोधात ही जमात दिसून येत आहे. मात्र असा पर्याय उभारणे हा महाराष्ट्रात अशक्य जरी नसला तरी फार कठीण परिस्थितीतून तो उभा  राहू शकतो. त्यादिवशी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ही धनगर जमातीच्या हातून फिरल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असेल यात कोणीही शंका घेऊ शकणार नाही. त्यादृष्टीने विचार, नियोजन व अंमलबजावणी साठी शुभेच्छा!!!


--------------------------------------------------------
धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक


डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
9673386963
धनगर जमातीला योग्य राजकीय पर्यायाची प्रतिक्षा...


         महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा विचार केला असता जातीय राजकारण हा येथील राजकारणाला लागलेला अतिशय मोठा कलंक आहे. या कलंकाचे अनेक दुष्परिणाम आज महाराष्ट्रात दिसायला लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे येथील धनगर सारख्या बहुसंख्य जमातीवर अनन्वित अत्याचार झाले आहे. राजकारणात निर्णायक मतसंख्या असलेल्या या जमातीला ना राजकीय सत्तेत वाटा वा शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी अपेक्षित वातावरण मिळाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, सदैव रानोमाळ भटकंती, परिणामतः वंचित घटक म्हणून जीवनात आलेली उपेक्षा. या बाबींमुळे येथील व्यवस्थेला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. प्रस्थापितांनी मात्र त्यांच्या  मतसंख्येच्या भरोशावर आपली सत्ताकेंद्र मजबूत केली. या  सत्ताधार्‍यांनी सत्तेचा अतिरेक एवढा केला की त्या आधारे धनगरांचे घटनात्मक अधिकार सुद्धा त्यांना मिळू दिले नाही.

     भारतीय संविधानाने  धनगरांना दिलेले घटनात्मक अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलू शकते. प्रस्थापितांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होऊ शकते. या भीतीपोटी या जमातीला राजकारणापासून हेतुपुरस्सर अलिप्त ठेवण्यात आले. याचा परिणाम ही जमात विकासापासून वंचित आहे, ही बाब लक्षात येताच या महाराष्ट्रात राज्यघटनेची कितपत अंमलबजावणी झाली यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.

      मात्र गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर या जमाती मधील राजकीय अस्मिता प्रचंड जागृत झाल्याने त्यांच्यामधून आज अधिकाराची भाषा केली जात आहे हे उघडपणे लक्षात येते. इतिहासात राजकीय सत्ता गाजवणाऱ्या या जमातीला स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वांगीन​ शोषण तसेच सत्तेच्या विरहाने त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाल्याची तिव्र जाणीव या लोकांना आज झालेली आहे.

          महाराष्ट्राच्या तत्त्वहीन राजकारणात अपेक्षा ठेवत हक्काच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी या जमातीने अनेक आंदोलने केली परंतु हेतुपुरस्सर त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रात घडताना त्याना स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला असता लक्षात येते की बरेच वर्ष या महाराष्ट्रात राजकीय सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या जमातीचा केवळ मतदानासाठी वापर करून घेतला यामुळे या जमातीमध्ये संतापाची लाट पसरली. त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चिड व 2014 च्या निवडणुकी प्रसंगी भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांसारख्या पक्षांनी या धनगर जमातीला दिलेली आश्वासने यावर विश्वास ठेवुन महाराष्ट्रात सत्तांतरामध्ये महत्वाची भूमिका या जमातीने बजावली.
            आजचे माझे बीजेपी प्रणित  सरकार धनगरांमुळे प्रस्थापित झाले आहे ही बाब मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः कबूल केली. मात्र ज्या आश्वासनाच्या आधारे हे सर्व घडलं, ती आश्वासने मात्र या सरकारने हेतुपुरस्सर कूटनीती तून मार्गाला लावली. मात्र या बाबीची प्रचंड चीड आज या धनगर जमातीतील तरुण व जागृत धनगर बांधवांमध्ये दिसून येते. ही चीड  उत्पन्न होणे सहाजिक आहे कारण ज्या आशेवर व लेखी आश्वासनांवर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनीच विश्वासघात केला. कुणाशी दगाबाजी न करणारी ही जमात या दगाबाजी ची बळी पडली. त्यामुळे आज महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह बीजेपी शिवसेना या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची पण इभ्रत वेशीवर टांगल्या गेली .

    येत्या 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. प्रत्येकानी आपापले अंदाज बांधणे सुरू केले. रणनीती आखण्यास सुरुवात झाली. धनगर जमातीच्या ओटबँक संबंधाने विशेष योजना आखताना आता राज्य सरकार दिसत आहे. या जमातीचे कोणतेही प्रश्न न सोडवता हे राजकीय पक्ष या जमातीकडून मतदान घेता येईल यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करू लागले आहे. प्रत्येक पक्षामध्ये असलेल्या या जमातीचे नेते-कार्यकर्ते त्यासाठी काम करू लागले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना या पक्षाचे नेते, कार्यकर्ते या जमातीचा जखमी विश्वास संपादन करण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण कारण संपूर्ण जमात यापेक्षा वेगळ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे लक्षात येते.

आश्वासनावर विश्वास ठेवत जमातीची अख्खी पंचवार्षिक गेली.  (अपेक्षा, आश्‍वासनावर विश्‍वास, प्रतिक्षा व आपल्या माणसांचा मानसन्मान करण्यात....... ) ना सुटला आरक्षणाचा प्रश्न! ना सुटला नामांतराचा प्रश्न! वेळ मारून नेण्यासाठी केलेल्या हरकती, नेत्यांनी दिलेले स्टेटमेंट, प्रत्येक प्रश्नाला दिलेला राजकारण्याचा रंग, या सर्व बीजेपी सरकारच्या उपक्रमांमुळे जरी धनगर जमात आश्वस्थ असली तरी अंधविश्वास मात्र ठेवणारी राहीलेली नाही. राजकीय समीक्षा व सरकारी अजेंड्यांची सत्यता समजून घेण्याइतपत आज या जमातींमध्ये राजकीय जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पावले टाकणे, हा या जमातीतील  जाणकार लोकांचा मनोदय दिसून येतो आहे.

अशा परिस्थितीत यात धनगर जमातीला जर वेगळा सक्षम असा राजकीय पर्याय मिळाल्यास ही जमात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय क्रान्तिकारी बदल घडवून आणू शकते. तशा प्रकारची मानसिक तयारी व मनोबल या जमातींमध्ये विकसित झालेले असून अशा सक्षम पर्यायांच्या शोधात ही जमात दिसून येत आहे. मात्र असा पर्याय उभारणे हा महाराष्ट्रात अशक्य जरी नसला तरी फार कठीण परिस्थितीतून तो उभा  राहू शकतो. त्यादिवशी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ही धनगर जमातीच्या हातून फिरल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असेल यात कोणीही शंका घेऊ शकणार नाही. त्यादृष्टीने विचार, नियोजन व अंमलबजावणी साठी शुभेच्छा!!!


--------------------------------------------------------
धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक


डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
9673386963
धनगरांच्या राजकीय अस्मितेचा दीपस्तंभ :  आ. महादेव जाणकार

महाराष्ट्राची भूमी सर्वच परीने समृद्ध असली तरी तेथील सामाजिक- राजकीय परिस्थिती ही एखाद्या मेंढपाळाच्या मुलाला राजसत्ता व स्वयंभू राजकीय अस्तित्व निर्माण करता येईल, एवढी प्रगल्भता येथील सामाजिक मानसिकतेमध्ये नाही. अशा परिस्थितीत कोट्यावधी संख्येने असलेल्या धनगर जमातींमध्ये प्रस्थापितांचा विरोध पत्करून राजकीय अस्मिता जागृत करणे. यासाठी स्वतःच्या खाजगी जीवनाची तिलांजली देणे, व आहोरात्र समाजामध्ये धनगर बेड्यांवर, उपेक्षित वाड्या-वस्त्यांवर जावून राजकीय​ सत्तेतील वाटा मिळविण्यासाठी अस्मिता जागृत करणे, धनगर सोबतच समाजातील उपेक्षित जाती जमातींना​ राजकीय अस्तित्व मिळवून देण्यासाठी सर्व उपेक्षित  बहुजनांची मोट बांधणे, प्रस्थापितांची बरोबरी करता येईल, प्रस्थापितांना शह देता येईल, यादृष्टीने  स्वतःचा एक राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार  करणे व महात्मा फुलेंच्या विचारावर आधारित राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा पक्ष स्थापन करून राजकारणात सक्रिय सहभागी होणे असा एक खडतर यशस्वी ज्यांचा प्रवास आहे. या सर्व बाबींना खंबीरपणे न्याय देणारं व्यक्तीमत्व म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माननीय महादेव जाणकार साहेब!!!!!
आज त्यांचा वाढदिवस!!! वाढदिवसा निमित्ताने आमच्या लोंढे परिवाराकडून व समस्त धनगर बांधवांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा!!

    त्यांनी फुलेवादावर आधारित राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी करुन डिमांडर बनण्यापेक्षा कमांडर बनण्याचा संदेश बहुजनांमध्ये पेरला.  समस्त बहुजन तरुणांमध्ये राजकीय सत्तेची स्वप्ने निर्माण केली. प्रस्थापित पक्ष व नेत्यांकडे छोट्या मोठ्या उमेदवारी साठी वर्षेनुवर्षे उंबरठे झिजवत वय घालविणाऱ्या नेते कार्यकर्त्यांना हक्काचा राजकीय पक्ष दिला. सुरुवातीला फुलेवाद व माननीय कांशीरामजींच्या सहवासातून झालेल्या संस्कारांमुळे त्यांनी शाहू-फुले-आंबेडकर, उपेक्षितांचा राजकीय उद्धार या बाबींवर आपल्या पक्षाची कार्यप्रणाली व जाहीरनामा निर्धारित केला परंतु राजकारणामध्ये एवढं करूनही पक्षाची बांधणी व राजकारणात अपेक्षित यश येत नसल्याने तत्त्वांशी तडजोड करून आदरनीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहावरून भारतीय जनता पक्ष या परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षाशी युती केली. महाराष्ट्रात यातून त्यांच्यावर अनेक आक्षेप घेण्यात येत असले तरी या युतीमुळे पक्षाला बऱ्यापैकी प्रसिद्धी, सत्ता व मंत्रीपद मिळविता आले आहे.
अलीकडे त्यांच्यावर या संबंधाने अनेक आरोप होत असले तरी राजकीय अस्मिता निर्माण करण्यामध्ये जाणकार साहेबांचा वाटा अतुलनीय आहे असे म्हटल्यास यावर आक्षेप घेतला जाऊ शकत नाही. कारण प्रस्थापित पक्षांमध्ये आपले अस्तित्व अजमावणे पेक्षा स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करून राजकीय सत्ता मिळवण्याचा आशावाद धनगर जमातीमध्ये सर्वप्रथम कृतीतून आजचे मंत्री माननीय महादेव जाणकार यांनीच निर्माण केलेला आहे.
             आपल्या पक्षाचा बहुजनवादी चेहरा समोर आणण्यासाठी जानकर साहेब धनगर जमातीच्या प्रश्नांस म्हणावे तसे सार्वजनिक रित्या भूमिका घेत नसले तरी त्यांना धनगर जमातींना सोडून आपला पक्ष वाढवणे शक्य होऊ शकणार नाही.  एकट्या जमातीच्या आधारे राजकारणात उतरणे पक्षाला शक्यच नाही, असे असले तरी या महाराष्ट्रात जातीय समीकरणातून धनगर हा राष्ट्रीय समाज पक्षाचा हक्काचा मतदार आहे ही बाब विसरता येणार नाही.
                      मागील निवडणुकीमध्ये धनगर जमात बीजेपी कडे असल्यामुळे धनगर मतसंख्येचा त्याकाळात राष्ट्रीय समाज पक्षाला सुद्धा मोठा फायदा झालेला आहे. त्यामुळे धनगर जमातीने जाणकार साहेबांकडून काही अपेक्षा ठेवणे हे चुकीचे नाही. परंतु पुढील काळात सुध्दा आपल्या पक्षाच्या विचारसरणीशी तडजोड करून महाराष्ट्रात तरी बीजेपी सारख्या पक्षांसोबत रहाणे राष्ट्रीय समाज पक्षाला धोक्याचे ठरू शकते ही बाब परिस्थिती पाहता लक्षात येते.
 आदरणीय महादेव जानकर साहेब मुळात "जाणकार" आहेत त्यामुळे त्यांनी घेतलेली निर्णय अतिशय प्रगल्भ दृष्टीने घेतलेले असतात. या विश्वासातूनच त्यांच्या बहुजन ह्रदय सम्राट व्यक्तिमत्त्वाला जन्म दिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा !!!!!!

तूम जिओ हजारो साल!!!!

__________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३
धनगर नेत्यांनो! आरक्षणाच्या मुद्द्यावर​ जमातीला भ्रमित करू नका.
-----------------------------------------
                    डॉ. प्रभाकर लो़ंढे
------------------------------------------

धनगर आरक्षण हा  मुद्दा विशेषतः भावनिक असल्यामुळेच सुरुवातीपासूनच त्याच्या आधारे अनेकांनी मते घेण्याच्या प्रयत्न केला आहे .राजकीय ताकद वाढवण्याच्या/ दाखवण्याच्या दृष्टीने त्याचा वापर केला आहे. हे विशेषतः गैरधनगर व धनगर नेत्यांकडून झालेले आहेत. त्यामुळेच आतापर्यंत आमचा हा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. यापुढे धनगर नेत्यांनी तरी त्याला जमातीची एक गंभीर समस्या माणून त्यावर इलाज करण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यास आपली संपूर्ण ताकद लावण्यास काही हरकत नाही परंतु घटनात्मक आरक्षणाच्या नावावर, त्याच्या अंमलबजावणीच्या नावाने सामान्य धनगर जनांपर्यंत जाणे व त्यांना भावनिक करून मोर्चे काढून, मेळावे घेऊन राजकीय पक्षांसमोर किंवा पक्षश्रेष्ठींपुढे ताकद दाखवण्यासाठी सामान्य धनगरांचा वापर थांबविणे हेच जमातीच्या हिताचे असेल. याचा अर्थ शुद्ध सामाजिक भावनेतून मोर्चे काढण्यास, मेळावे घेण्यास कोणाचीही​ हरकत असूच शकत नाही.
       सामान्य धनगर रानावनात आपला व्यवसायशी/जमातीशी प्रामाणिक राहून तुमच्या माझ्यासारख्याचच ऐकणार व करणार हे निश्चित असल्याने त्याच्याशी वागत असताना केवळ प्रामाणिकतेनेच वागणे हेच अत्यावश्यक आहे. नाहीतर आपणा सर्वां संबंधीचा अविश्वास निर्माण होईल व  प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला सुद्धा जमात जवळ येऊ देणार नाही.  जमातीचे प्रश्न जसेच्या तसे राहतील. राजकारणात सत्तेची पोळी भाजणारे पोळी भाजत राहतील व जमातीच्या​ मात्र रानावनात डोंगर दर्यात आरक्षणाची आस लावून पिढ्यान पिढ्या बरबाद होतील. अपवाद फक्त भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाही.
          अनेक नेते, सरकारे येतील, आश्वासने देऊन जातील. परंतु सरकारला जाब विचारणारी पिढी निर्माण होणार नाही, आणि जाब विचारला जात नाही किंवा जाब विचारला जाण्याची भीती सरकारला वाटत नाही. तोपर्यंत तुमचे प्रश्न सोडवण्याची गरज सरकारला वाटत नाही. म्हणून धनगर नेत्यांपैकी जे सरकारमध्ये किंवा सत्तारूढ पक्षामध्ये असेल त्यांनी सरकारला जमातीसाठी पोषक निर्णय घेण्यासाठी भाग पाडावे आणि सरकारबाहेर असेल तर शुद्ध अंतःकरणाने​ सरकारवर दबाव निर्माण होतील, असेच उपक्रम राबवावे.
   खरंच राजकारण हा खेळ आहे. पण जमातीच्या नेत्यांनी जमातीच्या भावनाशी/हिताशी खेळण्याचा खेळ नक्कीच नाही. राजकीय व्यवस्थेत सरकार दरबारी सत्तेचा खेळ चालू असताना तिथेसुद्धा जमातीचा नेतृत्वाचे दोन गट असले पाहिजे एक सत्तारूढ गट व दुसरा विरोधी गट. सत्तारूढ गटाने सत्तारूढ पक्षाला सत्तेत राहून जमात हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडावे. तर विरोधी पक्षात असणाऱ्या सर्वच जमात नेतृत्वानी जमातीमध्ये सरकारचे धोरण किती चुकीचे आहे हे दाखवावे. त्यासाठी मोर्चा, उपोषणाचे​ दबाव तंत्र चालेल.
          सत्तारूढ पक्षात काम करणाऱ्या जमात नेतृत्वांनी सरकारचे धोरण जमातीसाठी किती पोषक आहे हेच सांगावे, सत्ता हातात असल्याने सत्तेच्या भरोशावर जास्तीत​ वापर जमाती साठी करावा (सत्ताधारी यांना मोर्चे काढण्याची गरज नाही.) जेणेकरून जमातीला राजकीय शिक्षण मिळून जमात विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचून योग्य तो निर्णय घेण्यासाठी सक्षम होईल, त्यावेळेस प्रत्येक नेता खरा कोण? खोटा कोण? हे सांगण्याची गरजच​ पडणार ब जमातीचे वर्चस्व येथील प्रस्थापित व्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे धनगर जमातीचे सर्वच प्रश्न सरकार ला वाऱ्यावर सोडता येणार नाही.
          धनगर प्रश्नावर निर्णय घ्यावाच लागेल अशा प्रकारचा दबाव सरकारवर निर्माण होऊन आपले सर्वच प्रश्न हे सोडवण्यासाठी आपोआप पोषक वातावरण निर्माण होईल. त्यासाठी मात्र प्रत्येक नेत्याने मी कोण आहे, मी सत्तारूढ पक्षात काम करत आहे की विरोधी पक्षात काम करतो आहे हे ठरवूनच नंतर जमातींच्या  प्रश्नांकडे लक्ष द्यावे.  त्यासंबंधी आपल्या भूमिका व कार्य निश्चित करावे, असं असेल तरच आपल्या हेतूसंबधी कोणीही संशयी घेणार नाही. धनगरांच्या प्रत्येक नेत्याची सामाजिक प्रतिमा उंचावल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक प्रतिमा उंच असलेल्या धनगर नेत्यांचा येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये प्रभाव दबाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. व धनगरांच्या आरक्षणाच्या प्रश्नासोबतच इतर कोणतेही प्रश्न सुटल्या शिवाय राहणार नाही. त्यादिवशी धनगर सारखी राज्यकर्ती जमात कोणत्याही प्रश्नासाठी भीक मागताना दिसणार नाही.
म्हणून धनगर नेत्यांनो! दृष्टिकोन बदला जग बदलेल. याचा अर्थ सर्वच धनगर नेत्यांचा दृष्टिकोन हा घातक आहे, अशातला भाग नाही पण जमातीचा इतिहास, आजची काही नेत्यांचे धोरण पहाता अशा प्रकारच्या लेखनाची मला आवश्यकता​ वाटली म्हणूनच असा हा लेखन प्रपंच केला आहे. यामध्ये कोणाला काही आक्षेप असल्यास माझ्याशी चर्चा करावी.

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३
धनगर नेत्यांनो! आरक्षणाच्या मुद्द्यावर​ जमातीला भ्रमित करू नका.
-----------------------------------------
                    डॉ. प्रभाकर लो़ंढे
------------------------------------------

धनगर आरक्षण हा  मुद्दा विशेषतः भावनिक असल्यामुळेच सुरुवातीपासूनच त्याच्या आधारे अनेकांनी मते घेण्याच्या प्रयत्न केला आहे .राजकीय ताकद वाढवण्याच्या/ दाखवण्याच्या दृष्टीने त्याचा वापर केला आहे. हे विशेषतः गैरधनगर व धनगर नेत्यांकडून झालेले आहेत. त्यामुळेच आतापर्यंत आमचा हा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. यापुढे धनगर नेत्यांनी तरी त्याला जमातीची एक गंभीर समस्या माणून त्यावर इलाज करण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यास आपली संपूर्ण ताकद लावण्यास काही हरकत नाही परंतु घटनात्मक आरक्षणाच्या नावावर, त्याच्या अंमलबजावणीच्या नावाने सामान्य धनगर जनांपर्यंत जाणे व त्यांना भावनिक करून मोर्चे काढून, मेळावे घेऊन राजकीय पक्षांसमोर किंवा पक्षश्रेष्ठींपुढे ताकद दाखवण्यासाठी सामान्य धनगरांचा वापर थांबविणे हेच जमातीच्या हिताचे असेल. याचा अर्थ शुद्ध सामाजिक भावनेतून मोर्चे काढण्यास, मेळावे घेण्यास कोणाचीही​ हरकत असूच शकत नाही.
       सामान्य धनगर रानावनात आपला व्यवसायशी/जमातीशी प्रामाणिक राहून तुमच्या माझ्यासारख्याचच ऐकणार व करणार हे निश्चित असल्याने त्याच्याशी वागत असताना केवळ प्रामाणिकतेनेच वागणे हेच अत्यावश्यक आहे. नाहीतर आपणा सर्वां संबंधीचा अविश्वास निर्माण होईल व  प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला सुद्धा जमात जवळ येऊ देणार नाही.  जमातीचे प्रश्न जसेच्या तसे राहतील. राजकारणात सत्तेची पोळी भाजणारे पोळी भाजत राहतील व जमातीच्या​ मात्र रानावनात डोंगर दर्यात आरक्षणाची आस लावून पिढ्यान पिढ्या बरबाद होतील. अपवाद फक्त भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाही.
          अनेक नेते, सरकारे येतील, आश्वासने देऊन जातील. परंतु सरकारला जाब विचारणारी पिढी निर्माण होणार नाही, आणि जाब विचारला जात नाही किंवा जाब विचारला जाण्याची भीती सरकारला वाटत नाही. तोपर्यंत तुमचे प्रश्न सोडवण्याची गरज सरकारला वाटत नाही. म्हणून धनगर नेत्यांपैकी जे सरकारमध्ये किंवा सत्तारूढ पक्षामध्ये असेल त्यांनी सरकारला जमातीसाठी पोषक निर्णय घेण्यासाठी भाग पाडावे आणि सरकारबाहेर असेल तर शुद्ध अंतःकरणाने​ सरकारवर दबाव निर्माण होतील, असेच उपक्रम राबवावे.
   खरंच राजकारण हा खेळ आहे. पण जमातीच्या नेत्यांनी जमातीच्या भावनाशी/हिताशी खेळण्याचा खेळ नक्कीच नाही. राजकीय व्यवस्थेत सरकार दरबारी सत्तेचा खेळ चालू असताना तिथेसुद्धा जमातीचा नेतृत्वाचे दोन गट असले पाहिजे एक सत्तारूढ गट व दुसरा विरोधी गट. सत्तारूढ गटाने सत्तारूढ पक्षाला सत्तेत राहून जमात हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडावे. तर विरोधी पक्षात असणाऱ्या सर्वच जमात नेतृत्वानी जमातीमध्ये सरकारचे धोरण किती चुकीचे आहे हे दाखवावे. त्यासाठी मोर्चा, उपोषणाचे​ दबाव तंत्र चालेल.
          सत्तारूढ पक्षात काम करणाऱ्या जमात नेतृत्वांनी सरकारचे धोरण जमातीसाठी किती पोषक आहे हेच सांगावे, सत्ता हातात असल्याने सत्तेच्या भरोशावर जास्तीत​ वापर जमाती साठी करावा (सत्ताधारी यांना मोर्चे काढण्याची गरज नाही.) जेणेकरून जमातीला राजकीय शिक्षण मिळून जमात विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचून योग्य तो निर्णय घेण्यासाठी सक्षम होईल, त्यावेळेस प्रत्येक नेता खरा कोण? खोटा कोण? हे सांगण्याची गरजच​ पडणार ब जमातीचे वर्चस्व येथील प्रस्थापित व्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे धनगर जमातीचे सर्वच प्रश्न सरकार ला वाऱ्यावर सोडता येणार नाही.
          धनगर प्रश्नावर निर्णय घ्यावाच लागेल अशा प्रकारचा दबाव सरकारवर निर्माण होऊन आपले सर्वच प्रश्न हे सोडवण्यासाठी आपोआप पोषक वातावरण निर्माण होईल. त्यासाठी मात्र प्रत्येक नेत्याने मी कोण आहे, मी सत्तारूढ पक्षात काम करत आहे की विरोधी पक्षात काम करतो आहे हे ठरवूनच नंतर जमातींच्या  प्रश्नांकडे लक्ष द्यावे.  त्यासंबंधी आपल्या भूमिका व कार्य निश्चित करावे, असं असेल तरच आपल्या हेतूसंबधी कोणीही संशयी घेणार नाही. धनगरांच्या प्रत्येक नेत्याची सामाजिक प्रतिमा उंचावल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक प्रतिमा उंच असलेल्या धनगर नेत्यांचा येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये प्रभाव दबाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. व धनगरांच्या आरक्षणाच्या प्रश्नासोबतच इतर कोणतेही प्रश्न सुटल्या शिवाय राहणार नाही. त्यादिवशी धनगर सारखी राज्यकर्ती जमात कोणत्याही प्रश्नासाठी भीक मागताना दिसणार नाही.
म्हणून धनगर नेत्यांनो! दृष्टिकोन बदला जग बदलेल. याचा अर्थ सर्वच धनगर नेत्यांचा दृष्टिकोन हा घातक आहे, अशातला भाग नाही पण जमातीचा इतिहास, आजची काही नेत्यांचे धोरण पहाता अशा प्रकारच्या लेखनाची मला आवश्यकता​ वाटली म्हणूनच असा हा लेखन प्रपंच केला आहे. यामध्ये कोणाला काही आक्षेप असल्यास माझ्याशी चर्चा करावी.

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३
*अँड.बाळासाहेब आंबेडकरांचा भारीप देवू शकतो धनगरांना राजकीय पर्याय.*
_________________________
               *डॉ.प्रभाकर लोंढे* ----------------------------------------

महाराष्ट्रामध्ये धनगरांच्या राजकीय सत्तेच्या आशा पल्लवित होत असतांनाच धनगर आरक्षण हा अतिशय मोठा मुद्दा बनलेला आहे. तरी यापूर्वी आरक्षणाच्या नावावर बीजेपी सारख्या पक्षाने धनगरांचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला आहे. महाराष्ट्रात बीजेपी ची सत्ता येताच पंधरा दिवसात धनगर जमातीच्या संविधानिक अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीचे आश्वासन देणाऱ्या बीजेपी ने धनगरांच्या बाबतीत जे  निर्णय? घेतले, त्यातून त्यांच्यावर असलेले धनगर जमातीचे उपकार विसरल्याचीच प्रचिती देऊ लागले. त्यासाठी बीजेपी ने आमच्या धनगर नेत्यांचाच कसा वापर केला याचे सुद्धा दाखले मिळू लागले. आरक्षण अमलबजावणीचे आश्वासन, टीसच्या माध्यमातून वेळकाढूपणा, दिलेली खासदारकी, सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण, गावोगावी समाज मंदिरे, हायमास्ट दिवे, धनगर आरक्षण आंदोलनाचे सामाजिक नेते डॉ. विकास महात्मे यांना बीजेपीच्या उपोषणाचे विदर्भातील नेतृत्व देणे, डॉ. महात्मे साहेबांना आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी करायला लावणे, या सर्व बाबीतून बीजेपी प्रणित सरकारने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे धनगरांच्या स्वाभिमानी आरक्षण आंदोलनाचा सत्यानाशच केला असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
गेल्या पंचवार्षिक मधील हा सत्यानाश होताना धनगर जमातीतील जागृत वर्ग उघड्या डोळ्यांनी पाहू लागला.  ही लाजिरवाणी बाब असली तरी मात्र झालेल्या चुकाकडे डोळस नजरेने पाहण्याची कधी नव्हती​ ती क्षमता त्यांच्यात विकसित झाली.
अशाप्रकारे असंतुष्ट पण फसवणूक झाल्याची खंत असलेल्या धनगर जमातीला व त्यातही तरुण जागृत धनगर वर्गाला फसवणूक झाल्याची खंत वाटणे साहजिकच आहे, त्याची चीड निर्माण होणे हा नैसर्गिक गुणधर्म आहे, अशा परिस्थितीत पुन्हा अशी फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे हाच एक शहाणपणा व उपाय त्यांच्याकडे राहिलेला आहे. त्यामुळे यानंतर धनगर जमात मात्र अशा फसवणूक करणाऱ्या कोणत्याही पक्ष/लोकांच्या मागे उभी राहणार नाही, हे मात्र निश्‍चित झाले आहे.
    महाराष्ट्रात धनगराच्या अनेक नेत्यांना ज्यांनी नेस्तनाबूत​ केले, पक्षनिष्ठा सांभाळतांना अनेक धनगर नेत्यांची अख्खी हयात गेली तरी धनगरांना उमेदवारी दिली नाही. असंही असतानी सातत्याने ६५-७० वर्षे ज्यांना मतदान केले, असे ते राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस ,बीजेपी, शिवसेना हे पक्ष धनगर जमातीला आरक्षण व इतर मुद्यासाठी झुलवत ठेवतात हे स्पष्ट झालं आहे, धनगरांच्या सत्यानाशातूनच हे पक्ष वाढलेले आहेत, त्यामुळे यापुढे  2019 च्या निवडणुकीमध्ये हे पक्ष धनगरांना राजकीय पर्याय देऊ शकत नाही हे सिद्ध झाले. त्यामुळेच नवीन राजकीय पर्यायाचा शोध धनगर जमातीत होऊ लागला.
       अलीकडे भारिप चे अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमाती समोर ठेवलेला राजकीय पर्याय तरुण धनगर वर्गाला योग्य वाटू लागला. त्याचे काय परिणाम होणार हे काळच ठरवणार असले तरी तो धनगरांसाठी राजकीय वरदानच ठरू शकते हे मात्र निश्चित! यामधून महाराष्ट्रातील​ राजकारणात कर्नाटकप्रमाणे धनगरामधून कोणीतरी सिद्धरामय्या जन्माला येऊ शकतो हा आशावादच नाही तर खात्री, हा राजकीय पर्याय निर्माण करून जातो.
मात्र हे सर्व घडत असताना धनगरांचा पुन्हा फुकटात वापर होणार नाही याची खबरदारी घेणे, व धनगर जमातीचे प्रस्थापित नेते राखून एकसूत्री कार्यक्रम राबवणे, धनगर जमातीला अगत्याचेच नाही तर हिताचे सुध्दा ठरणार आहे.
 त्यामुळे बाळासाहेबांशी राजकीय बाबतीत बोलणी करत असताना आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा न मानता राजकीय सत्तेमध्ये आपली माणसे कशी जातील या दृष्टिकोनातून बोलणी करणे व तशा प्रकारचे आराखडे आखणे हे प्रथम कर्तव्य व अत्यावश्यक बाब ठरते. कोणताही अजेंडा निश्चित करीत असताना त्याच्या दोन्ही बाजू लक्षात घेणे आवश्यक असते, की जो बीजेपीच्या बाबतीत बीजेपीला समर्थन देताना आपण कधीच केलेला नाही. यावेळी अशी चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली तरच बाळासाहेबांच्या राजकीय पर्यायाचा फायदा धनगरांना निश्चितच होणे शक्य आहे.
         बीजेपी ने ज्या पद्धतीने धनगरांची फसवणूक केली त्याप्रमाणे फसवणूक​ अँड बाळासाहेब आंबेडकर व भारिप करतील असे मात्र नक्कीच होवू शकत नाही. तशा प्रकारची ताकद त्यांच्याकडे नाही. धनगरां प्रमाणेच उपेक्षित वर्ग (दलित) ताकद असलेला हा पक्ष  प्रस्थापितांच्या (जे धनगरांना नेहमीच टाळतात) विरोधात लढताना धनगरांना नक्कीच साथ देईल. कारण दलित व धनगर यांना नेहमीच सामाजिक/ राजकीय पातळीवर नेहमीच डावलण्यात आलेले आहे.

         भारिप सत्ता आल्यानंतर बीजेपी चे रूप घेईल किंवा अँड. बाळासाहेब यांच्या दबावाखाली धनगर काम करतील हे मात्र होऊच शकत नाही. धनगरांना राजकीय पर्याय नसल्यामुळे आज "अकोला पटर्णचा" वापर करून धनगर संपूर्ण महाराष्ट्रात आपली सत्ता नक्की स्थापन करू शकते. (याचा दाखला म्हणून अकोला मध्ये धनगरांचे अनेक पंचायत समिती/जिला परिषद सदस्य व एक माजी आमदार श्री हरिभाऊ भदे आपणास पाहायला मिळते) त्यासाठी केवळ एकता कायम ठेवून पुढील आराखडे अँड. बाळासाहेबांना मोहरा करून धनगर +दलित वोटबंक एकत्र होवू शकते.
महाराष्ट्रात आजच्या परिस्थितीत दलित + धनगरvote बँक खेचणारे प्रभावी नेतृत्व आजतरी दलितामध्ये अँड बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता पालट करून प्रस्थापितांना हलविण्याचे कार्य केवळ दलित+ धनगर vote bank नक्कीच करू शकते. व होणारा सत्तापालट हा धनगरांसाठी अतिशय निर्णायक व महत्वपूर्ण ठरणारा असेल. *धनगर किसीको भी पलटा सकता है!* ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे व्यवस्थेच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
    आजच्या परिस्थितीत  हीच एक धनगरांची राजकीय खेळी यशस्वी होऊ शकते व आतापर्यंत ज्यांनी अपमानास्पद वागणूक दिली,  धनगर नेत्यांना उमेदवारी टाळली, अशा शिवसेना बीजेपी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या पक्षांमध्ये धनगरांविषयी फार मोठी दहशत निर्माण होवू शकते. या पक्षांमध्ये होणारा धनगरांच्या नेते कार्यकर्त्यांचा  बिनधास्त वापर नक्कीच थांबवला जाऊ शकते. धनगरांचे उपद्रवमूल्य या पक्षांना कळू शकते. हे पक्ष सुध्दा धनगरांना उमेदवारी देण्यासाठी विचार करू शकते.. फक्त कोणी कुठली उमेदवारी घ्यायची व टाळायची हे मात्र एकमताने धनगरांनी प्रथम निश्चित करणे अत्यावश्यक आहे.
    राजकीय सत्तेसाठी तळपणारे धनगर हात महाराष्ट्रातील​  सत्ता हातात घेऊ शकते. हा राजकीय पर्याय केवळ राजकीय नाही तर सामाजिक उपक्रम म्हणून मुलांसाठी अत्यावश्यक असून पुढील राजकीय उद्धारासाठी हा एकमेव पर्याय आहे. असे मला वाटते. शेवटी माझं हे मत असल्याने सर्वांनाच ते पटेल ही मात्र माझी तिळमात्र अपेक्षा नाही.
      आज धनगर रक्ताच्या माणसाच्या ह्रदयाची आस असलेला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न या पर्यायामुळे सोडवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकते.  हा पर्याय धनगरांना फारच  उपयोगी असून प्रस्थापित धनगर नेत्यांना निवडून आणत असतानाच​ भारिपच्या राजकीय पर्यायातू निवडून आलेले, असे एकूण ३०/४०  धनगर आमदार विधिमंडळात गेले तरी कोर्टाच्या माध्यमातून चाललेल्या आरक्षण अंमलबजावणी खटल्यात सरकारला आपली खरी/खोटी बाजू मांडण्यासाठी भाग पाडू शकते. आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणू शकते. तेव्हा आजच्या सरकारप्रमाणे, सरकारकडे भीक मागणे ची गरज धनगरांना नक्कीच नसेल.. कारण देणाऱ्या हातांमध्ये धनगरांचेच मजबूत हात असेल........

*एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

कृपया शांतपणे पुर्णतः​ वाचावे​.
🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹👫🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹
*प्रस्थापित पक्षातील धनगर नेत्यांनो!!तुमच्या पक्षांना धनगरानी मतदानच का करावे??*
_______________________________
                 *डॉ.    प्रभाकर लोंढे*
------------------------------------------------
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे राजकीय पक्ष सातत्याने राजकीय सत्तेचा आस्वाद घेत आलेले आहेत. अशा या राजकीय सत्ता भोगवादी पक्षांनी आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धनगर सारख्या बहुसंख्य, साध्या, भोळ्या जमातीचा बळी दिलेला आहे. या जमातीत कोणताही नेता हा सदासर्वकाळ सत्ताधीश राहणार नाही किंवा निर्माणच होणार नाही, याचा त्यांनी सातत्याने विचार सोबतच कसोशीने प्रयत्न केलेला आहे. व ही बाब आज धनगरांमधील सर्वांनाच कळून चुकलेली आहे.  याचे अनुभव या पक्षातून काम करणारे धनगर नेते, कार्यकर्ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील. आजही सर्व प्रस्थापित पक्ष भावी काळात सुद्धा या धनगरांचा वापर करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे.
          असे असताना अलीकडील काळात धनगर जमातीमध्ये विकसित झालेली स्वाभिमानाची, अस्मितेची भावना, अन्यायाविरुद्ध​ तरुणांमध्ये खदखद निर्माण करत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे मनसुबे या जमातींच्या तरुण वर्गामध्ये दिसून येत आहे. प्रस्थापित पक्षांनी केलेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न हा तरुण वर्ग करीत आहे. त्यातूनच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना या प्रस्थापित पक्षांना धनगरानी मतदानच का करावे ??       
           कोणी म्हणेल, याशिवाय दुसरे पक्ष तरी कोणते?? या प्रस्थापित पक्षांनी तुमचं एवढं काय बिघडवलं.? आम्ही, आमचे आदरनीय नेते त्या पक्षात आहे, (कोणत्या पक्षात राहायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे) आमच्या दोन/तीन पिढ्यांपासून या पक्षात काम करीत आहे. आपण धनगरांनी या पक्षांना सोडून कधीच मतदान केलं नाही.(याचाच तर माजं या पक्षांना आलेला आहे) त्यामुळे आमच्याकडे पाहून,  तरी या पक्षांना मतदान करा.  *पण प्रश्न येतो का??  कोणासाठी???  कशासाठी????*
       कोणत्याही पक्षातील सच्चा धनगर नेत्यांना मतदान करणे, त्यांना जपणे भलेही धनगरांचे आद्यकर्तव्य आहे व धनगर नि:संदेह ते पार पाडेल, यात शंकाच नाही. परंतु कोणी म्हणेल,धनगर बांधवांनो!आमच्या या प्रस्थापित पक्षांना मतदान करा. तर  मी म्हणेन,तर ते शक्य नाही, कारण तो अधिकार या पक्षांनी गमावलेला आहे. हे चुकीचे वाटत असेल तर ते स्पष्ट (टिका नाही) करण्याचा अधिकार प्रत्येकालाच​ आहे.
                वास्तविक परिस्थिती पाहता लक्षात येते की, हे प्रस्थापित पक्ष आमच्या धनगर नेत्यांना उमेदवारीच देत नाहीत(इतिहास). या पक्षांमधून आजपर्यंत आमचा कोणताही नेता मोठा होऊ दिला नाही (वैयक्तिक पातळीवर स्वतःला कोणी मोठा समजत असेल तर त्यांच स्वागत व आम्हाला नक्कीच अभिमान.) या प्रस्थापित पक्ष्यांमध्ये काम करणाऱे धनगर नेते सुद्धा धनगर प्रश्नावर आपली/ पक्षाची सार्वजनिक भूमिका सार्वत्रिकरित्या स्पष्ट करताना दिसत नाही. (केली असल्यास प्रसार होणे अत्यावश्यक) . या पक्षांचे अस्तित्वच महाराष्ट्रातील धनगरांच्या सत्यानाशातूच बलशाली झालेलं आहे. त्यामुळे धनगरांना न्याय देवून हे पक्ष स्वःताच्या पायावर कुर्हाडी मारुन घेणार नाही हे  त्रिकालाबाधित सत्य!!!!
                     त्यामुळे या पक्षांच्या व्यतिरिक्त इतर राजकीय पर्याय शोधून स्वाभिमानाच्या​ भूमिकेत यापुढे निवडणूकी​त उतरण्याची मानसिकता धनगर तरुणांमध्ये दिसून येत आहे. त्याला विरोध करणारे सुध्दा फार थोडे आहे परंतु त्यांनी अजून पर्यंत आपली भूमिका(अजेंडा) स्पष्ट केलेली नाही. तात्विक दृष्टीकोनातून तरी अजून पर्यंतचा त्यांचा विरोध सार्वजनिक केलेला नाही. त्यानी तो विरोध तात्विक दृष्टीकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला तरी तो या प्रस्थापित पक्षांच्या समर्थनाचा असूच शकत नाही.
        अशा परिस्थितीत या प्रस्थापित पक्षांमध्ये काम करणाऱ्या धनगर राजकीय नेते व कार्यकर्त्यांची फार मोठी गोची होतांना दिसून येते.  त्यामुळे ते आज आपली नक्की भूमिका व्यक्त करीत नसले तरी  त्यांनी आपली जमाती संबंधी भावी काळासाठी भूमिका स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे. त्याआधी जमातीच्या प्रश्नासंबंधी आपल्या पक्षाची भूमिका काय? हे प्रथमतः सार्वजनिक करणे आवश्यक आहे. तरच....................
            धनगरांच्या आरक्षणासारख्या घटनादत्त अधिकारासंबंधी हे राज्यघटनेचे रखवाले? म्हणविणारे  हे राजकीय पक्ष कधीच सार्वजनिक भूमिका घेताना दिसत नाही. कधी रस्त्यावर उतरतानाही दिसत नाही.
    त्यामुळे यापुढे 2019 या निवडणुकीमध्ये प्रस्थापित पक्षातील धनगर नेत्यांनी केवळ स्वतःच्या मतदारसंघात स्वतःला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे परंतु इतर मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाच्या गैरधनगर उमेदवारांसाठी मतदानाची अपेक्षा करू नये. पक्षश्रेष्ठींचा दबाव येत असेल तर पक्षश्रेष्ठींना सुद्धा आपल्या पक्षा संबंधात जमातीची भूमिका स्पष्ट करून सांगावी, जेणेकरून त्याचा परिणाम त्यांच्या लक्षात येईल. पक्षश्रेष्ठी त्यांच्या पक्षात असलेल्या धनगर नेत्यांना आपल्याकडे खेचून ठेवण्यासाठी  त्या पक्षातील  धनगर नेत्यांच्या मागण्या अवश्य मान्य करतील. कारण पक्षातून हाकलून देण्याची भीती आज धनगर नेत्यांनी तरी बाळगू नये. कारण आज यापैकी प्रत्येक पक्षाला धनगर अस्मितेची कल्पना आलेली आहे. त्यामुळे *धनगर नेत्यांना पक्षातून ढकलण्याचा निर्णय घेण्याची रिस्क आजतरी असा कोणताही पक्षश्रेष्ठीं घेणार नाही* . घेतल्यास त्यांना महागात पडल्या शिवाय राहणार नाही. ही धनगर नेत्यांची दहशत बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये व पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
            म्हणून या प्रस्थापित पक्षातील धनगर नेत्यांनी आपल्या पक्षाला 2019 निवडणुकीमध्ये धनगर मतदान मिळेल अशी आशाही बाळगू नये, शक्य तो तसे प्रयत्नही करू नये. गरज पडल्यास प्रयत्नांचा आभास मात्र निर्माण करता येतील परंतु आपल्या पक्षातील अथवा इतर पक्षांतील धनगर नेतृत्व कसे निवडून येईल याचा विचार मात्र नक्की करावा. *धनगर  कोणत्याही पक्षात का असेना, काही मतभेद का असेना परंतु त्याला 2019 या निवडणुकीमध्ये मतदान होईल यासाठी प्रयत्न करावा.* यामुळे भलेही तुमच्या पक्षाचे उमेदवार पडतील पण धनगर जमातीचे उमेदवार निवडून येतील. विधिमंडळात धनगरांची संख्या वाढतील आणि ख-या अर्थाने धनगरी स्वाभिमान प्रस्थापितांना कळून चुकल्या शिवाय राहणार नाही........
*धनगर एकता-- धनगर भाग्यविधाता !!!*
*एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बरं वाटल्यास शेअर करावे

Friday, May 4, 2018

दिल की बात

जिंदगी का सफर कब किस मोडपर आयेगा यह कोई बताही नही सकता|  वैसेही मेरी जिंदगीमे मेरा गोंदिया, इस महाराष्ट्र के मध्यप्रदेश छत्तीसगढ सीमापर हिंदी भाषिक मराठी जिले मे आना मेरे लिए बहुतही कारागर साबित हुआ|  मै जन्म से मराठी भाषिक चंद्रपूर जिले का रहनेवाला होने के बाद पिछले पंधरह साल की सामाजिक सहवास से हिंदी भाषा से मेरा अवगत होना, मै मेरा विशेष सौभाग्य समजता हू|  मूलतः मराठी भाषिक होकर भी हिंदी मे एक खंडकाव्य लिखने का श्रेय, मै मेरा हिंदी भाषिक सहवास, सभी दोस्त, विद्यार्थी, सहपाठी और मेरे पितृतुल्य साहित्यिक गुरुजन इन सबको देना चाहता हू|
  यह मेरी साहित्यिक रचना धरतीपर मनुष्य जाती का एक आवश्यक अंग होने वाले नारी जाती की बरसों साल पुरानी जीवन कहानी को, उसके क्षमताओ कों उजागर करती है| उसकी पराधीनता के साथ साथ  दर्दभरी दास्तान को भी सामने लाने का प्रयास करती है|
नारी की कोख से जनम लेने वाली दुनियाने अपनेही मा, बहन, बेटी को कैसे गुलाम बनाया| उसकी क्षमताओं का  उसको कैसे पताही नही लगने दिया, इस बात को सामने लाते हुए उसकी जिम्मेदारी को भी निर्धारित किया| उसकी सालोसाल की गुलामगिरी से निकलने का सही रास्ता बताया| आज की शिक्षित नारी जीवन मे क्रांतीज्योति सावित्री और महात्मा फुले दाम्पत्य का योगदान की समस्त नारी जाती को याद दिलाने की कोशिश किया| नारी की भूत-वर्तमान स्थिती जानकर भविष्य की संभावनाओं को प्रतिबिंबित किया|
          नारी शिक्षा के कारण नारी जीवन मे आया बदलाव ऐतिहासिक तौरपर वर्तमान से जोडने का प्रयास करते, उसकी अधिकार-कर्तव्य के साथ साथ मिली स्वतंत्रता, स्वाधीनता का अहसास दिलाते  स्वैराचारी न बनने का नारी को आदेश भी दिया |
        यह मेरी रचना समाज जीवन मे नारी की अहमं भूमिका को न्याय दिलाने के लिए जरूरी सामाजिक वातावरण बनाने मे सफल रहेगी, यह मै आज विश्वास के साथ कहना चाहुंगा| इसलिए यह मेरा खंडकाव्य भारतीय नारी की दर्दभरी दास्तान खतम करके पूरे संसार की नारी जाती को जीने का नया रास्ता अवश्य दिखाएगा, रह मेरा वादा है|
   इस खंडकाव्य के माध्यम से मेरा यह हिंदी साहित्यिक योगदान सामाजिक और साहित्यिक तौर पर अवश्य स्विकार किया जागा, इस आशा के साथ यह मेरा खंडकाव्य पाठकों कें हवाले करने जा रहा हू|
       जिनकी कृपादृष्टी पर मेरा सब क्रियाकलाप चालता है, उन पिताश्री स्व. रामाजी लोंढे को मैत्री कमी नजर अंदाज नहीं कर सकता| इस अद्वितीय साहित्य कृती को साकार करणे मेरी मेहनत को जिन्होने सहयोग दिया, वो मेरी अर्धांगिनी सीमा, जिसकी ममता से मेरा जीवन सुगंधित हुआ, वो मेरी मा, बहन, भाभीजी का आशीर्वाद इन सब ने मुझे इस साहित्य कृति को लिखने के लिए मजबूर कर दिया, क्रांतिज्योती सावित्री को अपेक्षित नारी विकसित करने, योगदान देने का मन बनाया| जिसको मै सावित्री और महात्मा फुले को अपेक्षित नारी बनाने का मन ही मन मे सपना देखता हू, वो मेरी बेटी मृगांक्षी ने समय समय पर नारी गरिमा का अहसास दिलाया| इसके अलावा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जिन्होने सहयोग दिया, उन सभी का मै बहोत बहोत आभारी हू|
     इस साहित्यकृती को साकार करणे आदरनिय गुरुवर्य हिंदी साहित्यिक डा.जे.पी बघेल साहब ने प्रस्तावना लिखने का कष्ट उठाया| गोंदिया के जेष्ठ साहित्यिक छगन पंचे साहब ने  उसे सुधार, संशोधन एवं अवलोकन करके उसको निर्दोष करने का मोर्चा संभाला| बंडी दुवाओ के साथ हिंदी साहित्य मे कदम रखने हिम्मत दिया| मेरी आन बान शान मेरा बेटा शाश्वत ने भी मुझे सहयोग दिया| मेरे हिंदी भाषिक दोस्त खुमेंद्र कटरे, सुनिल बोपचे के साथ बहोत सारे दोस्त एवं छात्रोंने भी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मेरा हिंदी भाषा का ज्ञान बढाया|  त्रिवेणाई प्रकाशन, नागपूर ने प्रकाशित करणे वादा किया| इन सबका इस साहित्य कृति को प्रकाशित करणे मे बडा योगदान होने के कारण मै सभी का दिलसे बहुत आभारी हू|

०२/०५/२०१८                  डा. प्रभाकर
                               त्रिवेणाई/ रामाजी लोंढे