Monday, May 7, 2018

*डॉ. महात्मे साहेब, एकदा खासदारकीच्या राजिनाम्याचा विचार करूनच पहा!*
-------------------------------------------
-------------------------------------------
(वाचकाने, ही माझी मागणी नाही विचारार्थ सुचना आहे.हे गंभीरपणे समजून घेवूनच वाचण्यास सुरूवात करावी. ही विनंती )

 समस्त धनगर बांधवानो! हे वाचून डॉ. साहेबांचे भक्त नाराज होतील. अनूयायी विचार करायला लागतील, विरोधक आनंदी होतील. तो त्यांचा प्रश्न आहे, पण एवढं नक्की  सांगतो,

१) या महाराष्ट्रातील व्यवस्था हालल्या शिवाय राहणार नाही. 

२) पंचवार्षिक मध्ये धनगराना काय दिलं याचा विचार सरकार व तुमचा बीजेपी पक्ष केल्या शिवाय राहणार नाही.

३) बीजेपीला जो आपल्या माध्यमातून धनगरांना मार्गाने लावल्याचा/  लावण्याचा विश्वास वाटतो आहे,  तो खंडित झाल्याशिवाय राहणार नाही.

४) आपण स्थापन केलेल्या  धनगर आरक्षण संघर्ष समीतीचे  बीजेपीशी काहीही देणेघेणे लागत नाही हे सिध्द होईल.

५) धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी आपणास खासदार बनविलं की बी.जे पी पक्षासाठी हे सुद्धा स्पष्ट होईल.

६) खासदारकीचा राजिनामा दिल्याने धनगर समाजाचं किंवा डॉ. साहेबांचं  खूप काही खाजगी  नुकसान होईल असं वाटत नाही. पण आपण स्विकारलेला पक्ष, सरकार, व ही व्यवस्था यांच्यावर धनगर जमातीचा नक्कीच दबाव निर्माण होईल.

७)  धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी धनगरानी ठरविलेला समाजनेता ही आपली मूळ भूमिका कायम राहील. व त्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सिध्द होईल.

८) आपण खासदारकी सोडल्याने आपल्या कार्यशैली तसेच  कार्यक्षमतेत कमी होईल असे नक्कीच वाटत नाही.

९) आपण समाजासाठी विशेष नेञतज्ञ पद्मश्री डॉ विकास महात्मे  म्हणून सन्माननिय आहात व नेहमीच असाल. त्यापेक्षा मोठ काम आपल्या हातून खासदार म्हणून ही व्यवस्था किंवा सरकार किंवा बीजेपी पक्ष होवू देईल असं आजतरी  मला वाटत नाही.

१०) विदर्भात महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असतांना व सोबतच धनगरांनी बीजेपीला मते दिल्याने सरकार स्थापन झाल्यानंतर, विदर्भात धनगर खासदार असतांना आपल्या बीजेपी पक्षाकडून धनगरांचा खूप मोठा राजकीय  फायदा झाला आहे. असे वाटत नाही,

११) विदर्भातील एकाही महानगरपालिकेत (विशेषतः नागपूर/चंद्रपूर) आपल्या  बीजेपी पक्षाने एकही उमेदवार धनगर दिला नाही. (नागपूर म. पालिका स्विकृत सदस्यत्वासाठी काय झालं हे आपल्यालाच माहित आहे)

 १२) जिल्हा परिषद /पंचायत समिती साठी इच्छुक धनगर नेत्यांनी उभे राहू नये  यासाठी आपणावर किती दबाव आला होता, हे मी आपणास सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

१३) आपल्या शब्दाचा/ खासदारकीचा मान राखून बीजेपी पक्षाने धनगर नेत्यांना उमेदवारी दिली, असं कधी लक्षात आलं नाही.

१४) आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आमच्या  (डॉ. तात्या साहेब लहाने यांच्या तोडीचा)  नेञतज्ञाला आदर्श मेंढीफार्म स्थापन करायला लावण्यास (धनगरांनी मेंढ्याच राखल्या पाहीजे) हे सरकार यशस्वी झाले , ही या सरकारने धनगरांना दिलेली सर्वात मोठी देणगी मला वाटायला लागली आहे. याचा सुद्धा विचार करावा.

१५) माझ्या या सुचना विचारात घेतल्याच पाहीजे ही बळजबरी नाही. माञ न पटल्यास क्षमा असावी.

१६) अशा सुचना करण्याचा मला व्यक्तीगत काहीही अधिकार नाही. पण धनगरांची ताकद पाहून बीजेपी ने आपणास खासदार बनविलं, याची आपणास जाणीव असल्याने व मी केवळ धनगर जमातीचा राजकीय अभ्यासक एवढाच माझा अधिकार वापरून मी या सुचना केलेल्या आहे.

ही माझी सुचना केवळ धनगर जमाती संबंधाने त्यांच्या पक्षापुरती जबाबदारी डॉ साहेबांवर, डॉ. साहेबांचा दबाव आता केवळ बीजेपी पक्षावर निर्माण व्हावा. दबावातून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर विदर्भातील तरी धनगर नेत्यांचा राजकीय विकास व्हावा. (विदर्भातील धनगर राजकीय सत्तेत नगन्य आहे)  एवढाच माझा निष्कलंकित हेतू आहे....


*जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!*

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*आपलाच*
*धनगर बांधवांचा शुभचिंतक*
डॉ. प्रभाकर लोंढे
गोंदिया-चंद्रपूर
९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment