Sunday, December 3, 2017

भारतीय नेपोलियन
"""""""""""""""""""""""""


यशवंत तू
जयवंत तू.
या जगाचा गुणवंत असा
जगजेत्ता किर्तीवंत तू.

तूच शूर
तूच नरवीर.
युद्ध रनांगणातील दिव्यतेचा
तूच खरा प्रतिबिंब तू.

तूच राष्ट्रप्रेमी
तूच खरा मराठा.
शिवरायांच्या पराक्रमाचा
तूच खरा वारसा.

तूच जगजेत्ता
तूच खरा जाणता
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा
तूच खरा प्रणेता.

तूच एकमेव असा
पदवी संपन्न महाराजा.
महाराजाधिराज, अलिजा बहाद्दूर, राजाराजेश्वर
श्रीमंत यशवंतराव होळकर नावाचा वाजे सर्वत्र वाजा.



डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर

Tuesday, November 28, 2017

मृगांक्षी

मृगासम अंग अक्ष तुझे
मृगांक्षी तुझे नाव.
नामकरणाचा तुझ्या त्या
आनंदाने सोसलाय मी तणाव.

असू दे मृगासम चतुराई तू
पर नसावी बेभान तुझी धाव.
जीवनाच्या वाटेवर असावं
तुझं शांत स्वयंभू असं गाव..

तसंही नावात काय असते
तुला आत्ताच काय कळणार राव.
नाव कमावण्यासाठी आनंदाने
किती सोसावे लागते घाव..

कधी हातोडा बनून घाल तू घाव.
गरज असेल तिथे अवश्य तोरा दाव.
प्रसंगी घाव झेलूनी जपतांना
नसू दे प्रसन्न मनी कुठे तणाव.

मार्गातील प्रत्येक तत्पर तो
असतो करण्या तुझा पाडाव.
वाईट वाटून चालत नाही.
ज्याला कमवायचं असत नाव..

समाज हा असा विकृत जरी
त्याशिवाय नाही तुला नाही वाव
पडत झडत, सदा धडपडत
अर्थाशी समर्पक कर तुझं नाव...

मृगांक्षी! अर्थ भर नावात तू
तुलाही जाणवेल समाधानाचा भाव.
अभिमान वाटेल जन्म देण्याचा,
उज्वल होईल माझंही नाव....
समृध्द देश

अनेक भाषा, अनेक धर्म ,
अनेक इथले वेश.
एकाच भूमातेची लेकरं आम्ही,
बनवु समृद्ध आमचा देश..

जगी सर्व लोकी आम्ही,
देवु हा संदेश .
प्राणापेक्षाही प्रिय आम्हा,
आमचा समृद्ध भारत देश...

या देशाच्या समृद्धीची,
किर्ती पसरेल देश-विदेश.
जगात एकच समृद्ध अमुचा,
असेल भारत देश.

वसा समृद्धीचा या देशाचा,
आदर्श मानेल हर परदेश.
समाजमनाच्या दरिद्रतेला,
नसेल कधी इथे लवलेश.


डॉ . प्रभाकर लोंढे .गोंदिया-चंद्रपूर
झाड

माणसा रे माणसा!
गेला तो काळ.
रस्तो रस्ती, कडीकपारी
दिसत होते झाड.

झाडावरती पक्षी,
भोवती त्याच्या पाळ.
सावलीत झाडाच्या
खेळे तुझेच बाळ..

झाडं गेले, पाळ गेले
उजाड झालं माळ.
इंटरनेटवर खेळ खेळे
अफलातून तुझं बाळ..

समजून घेरे माणसा
झाडाशी तुझी नाळ.
झाडा विना मानवाचा
कोण करेल सांभाळ.

           डॉ . प्रभाकर रामाजी लोंढे
गजानन कॉलनी अंगुर बगीचा, रिंग रोड, गोंदिया .९६७३३८६९६३
कसायाचा बैल.

धनी तुम्ही जीवनभर
चारले आम्हाला घास.
 कसा काढू गळ्यातील
आता तुमचा तो फास..

राबराब राबले धनी,
होतो आम्हीच आसपास.
समजलं नाही अजून तरी
आम्हाशिवाय तुमचं कोण खास.

माणसं तुमची, तुम्हासारखी
त्यांना तर कमविण्याचाच ध्यास.
फिरत होती तुमच्या भोवती,
की होता नुसताच आभास.

कष्ट केले तुम्हासोबत
शेत पिकवून दिलं हमखास.
कत्तलखान्यात पाठविलं तरी सांगतो
आम्हीच होतो तुमचे स्वास.
माडर्न सूनबाई

काय म्हणलं सासूबाई,
मला भलतच वेड हाय.
मी मोबाईल वापरताना
तुमच्या पोटात दुखते की काय?

गेला तुमचा जमाना अन
नुसता टाटा, हाय- बाय.
दुनिया जोडतोय आम्ही
चालु ठेवुन व्हाय-फाय.

जगतोय आम्ही सुटाबुटात,
गळ्यात लावून मोठा टाय.
अभिमान आम्हाला आमचा
आमच्या जमान्यात काहीच कमी नाय!

बयताड होती दुनिया तुमची,
नाहीत दुसरं काय?
मरत होते कष्टापायी
सगळे करुन हाय हाय..

प्रश्नच पडला सासूबाई,
तुमच करू तरी काय?
नवरा सुद्धा म्हणतो आज
सासूपेक्षा वाचव तू गाय.

गायीमध्ये शोधतोय तो,
आपली हक्काची माय.
तुम्हाला जिवंत ठेवून आता,
तुमचं करू तरी काय?

डॉ . प्रभाकर लोँढे. गोंदिया-चंद्रपूर
साहित्यिकाची वणवण
"""""""""""""***"""""""""""


जेथ जात नाही कोणी
तेथं पोहचते साहित्यिकाचं मन
साहित्यधारेत वाहतांना
सर्वांयचं दुःखन माञ कॉमन.

उपाशी पोटी साहित्य कायचं
पोटात पाहिजे अन्नाचा कण.
साहित्यानं काही पोट भरत नाही
सर्वांयचं दुःख माञ कॉमन.

बायको म्हणते तुमचं काव्हय.
तुम्ही करता लय वन वन.
जमत नाही का तुमचं कोठं
साहित्यिकांच भजन.

समजलं नाही का तुले अजून
आमचं काय असते वजन.
आम्ही नसलो समाजात तं
समाज कोणाले पूजन.

लय झालं तुमचं आता
समाजातलं वजन-पूजन.
प्रश्न पडलाय मले मोठा
संध्याकाळी अन्न कसं शिजन.

-----------------------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
धनगर एकता

जय मल्हारचा नारा
धनगर गोळा झाला सारा...
व्यवस्थेच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा..
म्हणे धनगराच्या शब्दाशिवाय
दुसरा शब्द नाही खरा.

धनगरांच्या आवाजाला
दे तू सदैव थारा.
नाही तर होतील
लाथा बुक्यांचा मारा.

कर्तुत्ववान माणसांचा
यांचा वारसा आहे खरा.
पराक्रमाने  लिहीला आहे,
इतिहास यांचा राहील कसा कोरा?

हा असतो सदा थंड
नाहीतर वादळातील गारा.
फालतु विनोद करणाऱ्या
तावड्यांना करतो पुरा बरा.

म्हणूनच याच्या नादी लागू नये
असं म्हणतो संसार सारा.
प्रत्येक धनगर बोलतोय आज
धनगर है एक  हमारा......
*धनगर है एक हमारा......
शेतकरी दैना.

काव्हुन च्या बहीण
सरकार असं करते.
कास्तकार वाचला पाहिजे
अस नेहमीच म्हणते.
तरी बिचारा कास्तकार
तो रोजच मरते.

दिवसा मागून दिवस चालले.
तरी कास्तकार रोजच मरते.
समजलं नाही सरकार
त्यायच्यासाठी काय करते?
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

बिजाई, खात घेता घेता
पैसा कास्तकाराचा सरते.
त्याच्या नावाची सब्सिडी
सरकार कारखान्यात भरते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

कास्तकार करतो कष्ट
सरकार गोदाम भरते.
भाव देतानी मातर
मांग मांग सरते.
प्रशन माञर मलेस पडते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

हातच्याले सोडून सन्या
पळत्याले धरते.
कष्टकऱ्यांच्या राज्यात
असा कसा कास्तकार मरते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

बहीण द्यायची असन सबसिडी
तर  मी म्हणतो डायरेक
कास्तकाराले  द्यावी .
त्याच्या कष्टाच्या विम्यासह
जीवन मरणाची हमी सरकारनं घ्यावी.
धर्माची नशा
"""""""""""""""

कधी मला वाटलं.
आपल्या लोकांसाठी जगावं.
तेव्हा मला प्रश्न पडला ,
यांनी मला इतकं का छळावं?

तेव्हा मला वाटलं,
स्वतःसाठीच जगावं.
पण मला प्रश्न पडला,
यातच तुझं तू सर्वस्व पहावं?

का जगायचं? कसं जगायचं?
प्रश्न कधी संपलाच नाही.
जगायचं तर सर्वांसाठी!!
अर्थ अजून कळला नाही.

जगायचं तर
राष्ट्रासाठी जगायचं!
राष्ट्रासाठीच मरायचं!
पण प्रश्न पडला!
राष्ट्रासाठी कसं काय जगायचं ?
राष्ट्रभक्तांवर तर जग हसायचं!

म्हणून मी ठरवलं.
जगायचं तर धर्मासाठी!!
तेव्हा मला सर्वच काही मिळालं.
जगातलं भय दूर दूर पळाल.

पण अजून नाही कळालं.
धर्म ही अफूची गोळी आहे.
जेवढी घेतली तेवढी थोडी आहे.
नशेत असलेला देह,
न कधी कोणाला कळला आहे.
म्हणूनच या देशात,
साधू, सन्यासी, साध्वींचा
संसार फार मळला आहे.

धर्माच्या ठेकेदारांनो!!
ही जनता भोळी आहे.
वाकविली तेवढी थोडी आहे.
प्रसंग आला तर
बंदुकीची गोळी आहे.
पण काय करता,
तुम्ही एवढी नशा चढविली आहे की,
त्यावरच तुमची आजची पुरणपोळी आहे.

म्हणून म्हणतो, भक्तजनो!!
खूप झाले देव, धर्म .
भोंदूं साधूसंतांच्या नादी लागू नका.
जगात माय बापाच्या सेवेशिवाय
दुसऱ्या धर्माचा ठेका घेवू नका.

*********************

डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर..
 संसारारंभ

बघ! सखे ते जग आपुले.
दूरून दिसती चोहीकडे.
निळ्याश्यार ढगातून त्या
तव प्रितीचा थेंब गळे.

दूर डोंगराडपल्याड त्या
वाट कशी नागमोडी वळे.
सुख-दुःखाच्या पाऊलखुणांची
तुज साक्ष त्यात सापडे.

ते बघ! प्रेमाच्या दाट धुक्यातून
दर्शन सुर्यकिरणांचे घडे.
संसारवेलीच्या सुंदर फुलांवर
दवबिंदूचा तो सडा पडे.

बघ सखे ते, किती विचिञ असे,
दान्यांसोबतच पक्षी खाती खडे.
सुखासाठीच दुःख पचविण्याचे
निसर्गातूनच घे तू संसार धडे.

सुख काय असते ते
आज बघ तू माझ्या नयनाकडे
दुःखास म्हण तू आता,
तूझे वास्तव्य त्या क्षितिजापलिकडे.

सखे साथ मिळाली तुझी
भर तू संसारसुखाचे तळे.
आदर्श व्हावे जीवन अपुले
नसावे त्यात दुःखाचे खडे...
नवराञ

सांग ! माय माझे
तुझे जाते कसे नवराञ?
दुसरीकडे तुझीच बहीण
जगतेय जीवन गलितगाञ.

नऊ दिवस उपास.
म्हणून ती पिते पाणी माञ.
तुझे तर उपवास म्हणजे
असते खाण्याचेच सञ.

देवीच्या नावावर उठवतेस
तू नऊ कन्याचे पाञ.
उपाशा पोटी निघून जाते
तिच्या मुलींची राञ.

अख्ख नवराञ निघून जाते
तुझं मटकनस अहोराञ.
पोट भरण्याच्या विचारातच
तिची निघून जाते राञ.

सांग नं ! माय माझे
देवीच्या कृपेसाठी ती
कशी काय झाली अपाञ?
साविञीच्या लेकीनो !! तुम्ही
कधी समजून घ्याल खरं नवराञ?


डॉ . प्रभाकर लोंढे ,गोंदिया-चंद्रपूर
*किती मारू लाथा?*
-----------------------

खूप झाले निषेध , मोर्चे
वा तोंडातील त्या बाता.
हृदयातून म्हणा एकदा
नराधमानो! किती मारु लाथा?

बलात्कार, हत्या करूनी
प्रसंगी जीव तिचा घेता.
आपल्याच माय बहिणींना
डोळ्यासमोर पुन्हा किती छळता?

होवु द्या!  वेदना बलत्काराच्या
वा शोधा त्यात आपली माता.
या वासनांध नराधमांकडून
पून्हा किती जीव घेता?

उगारा अन्यायाविरुध्द मुठ,
दाखवा मर्दानकीचा छाता.
आहेत तुमचा मर्दानी बाना तर
आता कोणास काय भिता?

समजू द्या! या अधमाना
स्ञीच आहे त्याची माता.
नराधमानो या भूमिवर
तुम्ही जन्मच कसा घेता?

खूप झाले निषेध , मोर्चे
वा तोंडातील त्या बाता.
हृदयातून म्हणा एकदा
नराधमानो! किती मारु लाथा?

💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽

*दि. १७/९/२०१७*
  *डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर*

Monday, November 27, 2017

बाप!
"""""""

बाप! बाप!!
सगळ्यांनाच असतो बाप.
वाटतोय कधी जो भला ताप.
कठीण समय येता मात्र
आठवतो प्रत्येकालाच बाप.

माय लेकराच्या सुखासाठी
लागते जेव्हा कधी धाप.
या जगात धाव धावणारा.
कळते तेव्हा सर्वानाच बाप ...

बाप असतो उधानलेल्या
खळाळणाऱ्या नदीचा किनारा.
प्रवाहपतित राहून सदा
प्रवाहाला सांभाळणारा....

असतो तो मृगाच्या अखंड धारा,
धारांनी भिजवी संसार सारा.
तर कधी तो असतो
उधाणलेला बेभान वादळवारा,
रक्त नात्यांना जपत
उंच उंच शिखरावर आदळणारा.
तर कधी पायथ्याशीच राहून
उंच शिखरांनाही रडविणारा....

नसतो तो कधी अगतिक
वा परिस्थितीला हरणारा,
असतो तो प्रसंगावधी.
प्रसंगावधान राखून
प्रसंगांनाच जपणारा.....

खरंच  बाप नसतो,
नुसताच बाप!!
वा हाडामासाचा पसारा.
घरी असो वा नसो,
असतो त्याचाच दरारा.....

तो असतो धिरोदात्त,
अनं सर्वगुणसंपन्न सारा.
खरं-खोटं, बरं - वाईट
सारंच काही पचविणारा...

शेवटी एवढंच सांगतो,
बाप! असतो बाप!
खडकाळ माळरानावर
सदा खळाळणारा.
घामेजलेल्या लेकरांसाठी
असतो तो थंड थंड वारा..
असतो तो थंड थंड वारा.....

-------------------------------

कवी डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
इंदोर मधील वैभवशाली लालबाग पँलेस.
,"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

 इंदोर, मध्यप्रदेशातील महत्त्वाचं शहर. या शहराचा इतिहास अभ्यासला असता होळकर साम्राज्याने या शहराच्या निर्मिती पासून तर शहराची किर्ती सातासमुद्रापार नेण्यात होळकरशाहीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मळवा प्रांताची राजधानी म्हणून होळकरांनी इंदोरचा विकास केला. इंदोरला आपल्या संस्थांनाची राजधानी बनविली. याचाच परिणाम  मराठेशाहीतील निर्णयात होळकरांच्या वर्चस्वामुळे या शहराला अतिशय महत्त्व होते. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर नंतर  खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, तुकोजीराव प्रथम, यशवंतराव यांच्या नंतर अनेक वारस होळकरशाहीच्या राजगादीवर आले. प्रत्येकाने आपल्या कारकिर्दित महत्त्वाचे योगदान दिले.  होळकरांच्या कार्यकाळात या शहराचा उद्योग , व्यापार तसेच सर्वांगिण विकास झाला. त्या सर्व बाबींच्या खूणा आजही इंदोर शहरात पाहायला मिळतात.  त्यामुळे या शहरातील प्रत्येक ऐतिहासिक वास्तु पाहणे म्हणजे  इतिहासाची पाने वाचण्यासारखीच वाटतात.  
        यापैकीच एक वास्तू म्हणजे फ्रेंच शैलीने बांधलेला, भारताचे विशेषतः होळकरशाहीचे इतिहासातील परराष्ट्रीय संबध स्पष्ट करणारा, होळकरशाहीच्या वैभवाची साक्ष देणारा पँलेस म्हणजे "इंदोरचा लालबाग पँलेस" ! इंदोर शहराच्या नैऋत्य दिशेला असलेला हा पँलेस खान नदीच्या किनाऱ्यावर बांधलेला आहे. संपूर्ण  बागेचे क्षेत्रफळ  ७१ एकर असून या राजबागेत हा पँलेस कौशल्यपूर्ण बांधला गेलेला आहे. व  इंदोर शहरातील ही सर्वात आकर्षक इमारत आहे.  त्यामुळेच त्याकाळात या पँलेसची भारतातील एकमेव अप्रतिम निवासस्थान (most stylish palace) अशी ओळख होती .

        महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय(इ.स १८४४-१८८६)  यांनी या पँलेसचे बांधकाम इ.स.१८८४ मध्ये सुरू केले. व शिवाजीराव होळकर यांच्या (इ.स.१८८९-१९०२) काळात पँलेसचे काम पुर्णत्वास गेले. या अप्रतिम पँलेसची निर्मिती इंग्लंड च्या मार्टीन एण्ड कंपनी व बर्नांड ट्रीग्स या वास्तुकला विशारद (architect) यांनी पाश्चात्त्य कलाशैलीने केलेली आहे. एकूणच हा पँलेस आंतरराष्ट्रीय बांधकाम व कलाशैलीचा तत्कालीन उत्कृष्ट नमुना आहे.

               या पँलेसची प्रमुख विशेषतः म्हणजे त्याचे मुख्यव्दार(gate) आहे.  हे मुख्यद्वार इंग्लंड मधील बँकींगहम पँलेसच्या द्वाराची(gate) आशिया खंडातील एकमेव प्रतिकृती आहे.  तीन मजली असलेल्या या इमारतीत रचना व  प्रत्येक  वस्तू गुणात्मक दृष्ट्या वाखाणण्यासारखी आहे. पँलेसमधील खोल्यांच्या भिंतीवर तसेच छताला असलेले  नक्षीकाम (decoration) आणि रंगरंगोटी (colouring)   अप्रतिम असून इटालियन व भारतीय शैलीचे मिश्रण आहे,  इटालियन संगमवर,  इटालियन पध्दतीची वालपेंटींग, कलात्मक रचना,  दर्जेदार   कार्पेटस,  मजल्यांचा एकदुसऱ्याशी संबंध, चढण्यासाठीचा जिना(stairs)व त्यावर टाकलेले कार्पेटस, जिन्याला असलेले नक्षीदार लोखंडी रेलिंग्स,  संपूर्ण इमारतीच्या उच्च प्रतीच्या लोखंडी खिडक्या तसेच तुकोजीराव ने त्यावर लोखंडाने निर्माण केलेली स्वतःची ओळखचिन्ह (symbol).  या सर्व बाबी कलात्मक दृष्टीने तसेच आर्थिक बाबतीत श्रीमंती स्पष्ट करते.
      पँलेसच्या खिडक्यांवर (इंग्रजी टी.आर.एच) (TRH-TUKOJIRAO HOLKAR) असा अर्थ असलेले  प्रतिक (symbol ) तुकोजीराव होळकर यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देते. याच प्रतिकाची पेंटींग काचावर सुद्धा केलेली आढळते.  खिडक्यांना असलेला  हा काच बेल्जियम मधून आयात केलेला आहे. यावरून होळकरशाहीच्या वैभवाची कल्पना येते.
        अप्रतिम अशा पाश्चात्त्य शैलीत नटलेल्या या भारतीय पँलेसचे व त्यातील होळकरशाहीच्या वैभवाचे जतन होतांना आज फारसे दिसत नाही. पण  पँलेसची प्रत्येक खोली होळकराच्या वैभवाची व समृद्धीची साक्ष देत अतांनाच संपूर्ण वास्तूच आज राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात आली आहे.  असे असताना  एका खोलीतील राष्ट्रीय,  ऐतिहासिक/ होळकरांचे वैभव हटवून सुरू झालेल्या तारांगण, उपक्रमामुळे  येत्या दहा विस वर्षात होळकरांच्या वैभवाची ओळख नक्की पुसली जाईल अशी शंका पाहणाऱ्याला सहज येते.

     होळकर राजानी बांधलेल्या  या राजवाड्याला आज "नेहरू राजबाग पँलेस" असे नामकरण केले आहे ही बाब व प्रवेशद्वारातच पंडित नेहरूंचा पुतळा ठेवणे हा तेथील मोठा आश्चर्याचा विषय वाटते. नेहरू व लालबाग पँलेस हे समिकरण न पचणारे वाटते. आज या पँलेसचे "तुकोजीराव होळकर राजबाग पँलेस" असे नामकरण झाले असते व प्रवेशव्दारात तुकोजीराव चा पुतळा असता तर त्यातून इतिहास, होळकरशाही व तुकोजीराव यांना आज न्याय मिळाला असता हे सत्य आहे.
             तुकोजीराव होळकर  द्वितीय यांनी निर्माण केलेल्या या अप्रतिम वास्तू मधून होळकरशाहीच वैभव नष्ट करण्याची कोणाला कुबुद्धी  सुचली तरी तुकोजीराव व्दितीय यांच्या दूरदृष्टीतून जागोजागी निर्माण केलेल्या प्रतिकामुळे (TRH) लालबाग मधील होळकरांच्या स्मृती पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रतिक(TRH) माञ नष्ट करणे सहज शक्य होणार नाही एवढे माञ निश्चित !!
             हा पँलेस भारतातील पाश्चात्त्य शैलीचा व आदर्श तसेच सुसज्ज वास्तुचा एक नमुना आहे. या पँलेसची रचना लक्षात घेता, पँलेसमध्ये राजदरबार, विशेष म्हणजे पाश्चात्त्य पध्दतीचे शुशोभित डायनिंग हाल, डायनिंग हालमधील अप्रतिम बैठक व्यवस्था व उच्च प्रतीचे राजेशाही थाटाचे साहित्य हे पाहणाऱ्या व्यक्तीला भूरळ पाडणारे आहे . लागूनच असलेला भारतीय पध्दतीने जेवण करण्याचा हाल भारतीय पध्दतीवरची होळकरांची निष्ठा स्पष्ट करते.  स्वयंपाकघर, स्वयंपाकघरातून  जेवणाचे हालमध्ये जेवण पोहचविण्याचा झुला(lift) कल्पनातित आहे,   ग्रंथालय, कार्यालय,  राजाची सल्लामसलतीसाठी बसावयाची खोली,  नर्तनगृह,  नर्तिकांसाठी सजण्याची ड्रेसींग रूम, खेळण्याची खोली,  महाराजाचे तसेच राणीसाहेबांचे स्वतंत्र शयनगृह, दोन्हीही शयनगृहांना जोडणारा मार्ग , अद्ययावत व  सर्व सोईनी परिपूर्ण अप्रतिम नहाणीगृह (bathroom) हे होळकरशाहीचा पाश्चात्त्य   दृष्टिकोन स्पष्ट करते.
       राजवाड्यात  विशेष आकर्षण पहायला मिळते.  एकूण आठ मोठे वाघ व एक चित्ता यांच्या शिकारीनंतर त्यांच्यामध्ये भुसा भरून त्यांना प्रदर्शनात ठेवलेले आहे. ह्या शिकार केलेल्या वाघांच्या भक्कम शरिरावरून होळकर राजांचे शौर्य  व हिम्मतीची कल्पना येते.  ते संपूर्ण वाघ आजही पँलेसमध्ये पहायला मिळते.

  अशा या वैभवशाली पँलेसमध्ये होळकर वंशज इ.स१९७८ पर्यत राहत होते .  तुकोजीराव तृतीय हे  इ.स १९२६ मध्ये होळकर राजगादी त्यागणारे व मरेपर्यंत या पँलेसमध्ये राहणारे होळकरशाहीचे शेवटचे वंशज ठरले. आज हा पँलेस मध्य प्रदेश सरकारच्या आधिपत्याखाली असल्याचे लक्षात येते .

        या वैभवशाली पँलेसचे तेथील रचनेसह सर्व वैभवाचे रक्षण करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ती वास्तु आज इतर कामासाठी वापरण्यापेक्षा ऐतिहासिक वास्तू व ठेवा म्हणून जतन करणे केंद्र सरकार सह मध्यप्रदेश सरकार, प्रत्येक नागरिक व प्रशासन यांचे प्रथम कर्तव्य ठरते... आमची सर्व वाचकांची कर्तव्यनिष्ठाच आज राजबाग पँलेस व वैभव वाचवू शकते ...हे मात्र निश्चित !!!
-------------------------------------------------

    डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
9673386963

Wednesday, November 15, 2017

मायेची माया

राञंदिन करीत कष्ट
म्हणे लेकराले, भलं मोठं शिक.
शिकुन सन्या जगामंदी
बन एक्का इसपिक.

शिकत होतं मायपाशी
तवा होतं ठाकठिक..
कळलं नाही कधी गेलं
करपुन सारं पिक..

माय राहिली कष्ट करत
पोट्ट जावू लागलं पिकनिक.
अर्थपोटी कष्ट करून
माय भलतीस झाली विक.

दिवसा मागून दिवस गेले
पोट्ट्याचे शौक नाही ठराविक.
लाजही नाही राहीली त्याले
त्याची माय मागते भिक.

एकेक रुपयासाठी स्टेशनवर
रोज माय मागे भिक.
बिघडलेल्या लेकराले पाहून
म्हणे बापू! आता तरी काही शिक.



डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर 

Monday, October 30, 2017

इंदोर संस्थानाच्या संस्थापकाची इंदोरातच उपेक्षा!

*इंदोर संस्थानाच्या संस्थापकाची इंदोरातच उपेक्षा!*
        डॉ . प्रभाकर लोंढे, गोंदिया-चंद्रपूर

               सर्वानाच माहित आहे की, इतिहास प्रेरणा देतो,  एखाद्या कर्तबगार व्यक्तीत्वाचा पुतळा त्याच्या कर्तुत्वाच्या स्मृती जागृत करतो. त्यामुळेच पुतळे उभारण्याची प्रथा पडली.  परंतु कोणाचे, कुठे व का पुतळे उभारायचे? हा भारतात खुपच मोठा गहण प्रश्न बनलेला आहे.
एखाद्याच श्रेष्ठत्व नष्ट करण्यासाठी भलत्याचेच पुतळे बसविण्याचा भलताच प्रकार भारतातील रित बनलेली आहे     ( उदा. तुकोजीराव होळकर यांनी इंदोरात बांधलेल्या सुंदर अशा लालबाग पँलेसच्या प्रवेशदारात तुकोजीराव ऐवजी पंडित नेहरुंचा पुतळा!!,  पुण्यातील संभाजी गार्डन मधील हटविलेले पुतळा प्रकरण ) असो! पण मी म्हणतो,
          आपल्या कर्तृत्वाने सर्वत्र प्रभाव व दरारा निर्माण करणाऱ्या थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपला कार्यकाल गाजविला. अटक ते कटक पर्यत मराठेशाहीचे झेंडे फडकविले. आपलं इंदोर संस्थान स्थापन केलं, वाढविलं.संस्थानाचा सर्वत्र दरारा निर्माण केला. "इंदोर संस्थान व होळकरशाही" या समिकरणाची सर्वदूर  किर्ती पसरली. मराठेशाही वाढविणे, टिकवून ठेवण्यासाठी जिवाच रान केलं. हे सर्व वारसा हक्काने नाही तर कर्तृवाने निर्माण केलं. त्यामुळे त्यांना सर्वत्र सन्मान मिळाला. हे सर्व करीत असतांना आपली राजाधानी इंदोर बनविली. त्यांच्या कर्तुत्वाने इंदोरची ओळख सर्वञ निर्माण  झाली.  त्यांचा प्रभाव एवढा होता की, प्रत्यक्ष पेशवा त्यांच्याशी अदबीने वागत होता.
          राष्ट्रीय पातळीवर सर्वत्र सन्मान व निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या व त्यांच्या कार्यामुळेच इंदोर संस्थानाची ओळख सर्वत्र निर्माण करणाऱ्या सुभेदार मल्हाररावांची आज इंदोरातच एवढी उपेक्षा, दयनिय अवस्था  प्रत्यक्ष पहायला मिळाली. हा विचित्र पणा इंदोर वाशीयांनीच करणे हे केवढे लाजिरवाणे!!!
           इंदोरच्या प्रत्यक्ष भेटीत मिळालेल्या माहीतीनुसार, ज्यांच्या संस्थानाच्या गादीचा वारस  मल्हाररावांच्या सल्ल्याने ठरायचा, त्या ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधीयाचा पुतळा इंदोरात महत्त्वाच्या चौकात स्थापित झाला. परंतु  सुभेदार मल्हाररावांचा पुतळा स्थापन करण्यासाठी इंदोरातील एकही महत्त्वाचा चौक सापडला नाही,?.....  राजवाड्यात सुद्धा पुतळा अथवा प्रथम दर्शनी मोठा फोटो सुद्धा दिसला नाही.
          इंदोरात होळकरांची राजधानी राहिलेल्या  राजवाड्यातील संग्रहालयात होळकर साम्राज्याच्या थोड्याफार वस्तुशिवाय काही अनावश्यक इतर वस्तुचा संग्रह हा अनाकलनिय वाटला. म्हणजे इंदोरात होळकरांची ओळख जपण्यासाठी राजवाड्यात वा इतरञ फार मोठे उपक्रम राबविले जात आहे असं कुठेही आढळून आलेले नाही.
    काही महत्तविचारी विचारवंत म्हणतील, पुर्ण इंदोरच त्यांच्या स्मृती जागृत करतंय. पुतळ्याची गरजच काय??  होय. ठिक आहे, पण मी म्हणतो ज्यांचा संबंधच नाही अशांचे पुतळे कशासाठी ?? तेही महत्त्वाचे चौक, स्थळे या ठिकाणी ???  खरा इतिहास भ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे! असे जर कोणी म्हटले तर चुकीचे म्हणता येणार काय?....
काहींना प्रश्न पडेल, सुभेदाराचा पुतळा इंदोरात नाही काय?----  आहे.. पण कुठे ? त्याची अवस्था काय?
सुभेदारांचा पुतळा आहे इंदोरात !! लालबाग पँलेस ग्राउंडच्या एका कोपऱ्यात....  तोही अशा सोबतच्या चिञातील (बंद कटघर्यामध्ये भोवताली उकीरडँ.व गवत वाढलेलं. दुर्लक्षित असल्याचे कोणी सांगण्याची गरजच नाही)  अवस्थेत ..... बघा सहन होते काय तर...???
(गुगल मँपवर सुद्धा इंदोरमध्ये मल्हाररावचा पुतळा दिसत नाही... माधवराव सिधीयाचा माञ पुतळा  दिसतो)

इंदोरच्या प्रत्यक्ष दुसऱ्या भेटी नंतर मला खुप मोठे प्रश्न पडलेले आहे.  त्यापैकी एक?? अस हे हेतुपुरस्सर तर केलं जात नाही ना???? असं करणारी एखादी छुपी यंञणा तर कार्यरत नाही ना?????

बघा निट!! विचार करा! सटिक....

स्वाभिमानी असाल तर.....बघा!  काय वाटते? तर....  

माझे विचार चुकीचे वाटल्यास माफी असावी... ही विनंती ...

Tuesday, September 26, 2017

*कचरावाट*

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा.
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा..

नको येवु माझ्या माघारी
तुला मिळणार नाही आसरा.
पोट कधी भरत नाही
इथे दिवाळी असो वा दसरा...

या निष्ठूर व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारतो आहे चकरा.
जीवन संपलय माझ सारं
आता दिवस उरलेय अकरा..

घे उंच भरारी तू
जसा उडे आकाशी शिकरा.
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा..

संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा.
कचरा वाटेवरुन चालताना
दिसू दे तुझा दरारा.

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा.

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
  *डॉ . प्रभाकर  लोंढे .*
           *गोंदिया* ९६७३३८६९६३

Sunday, July 23, 2017

*जातीविद्वेश*
-------------------


कोण म्हणतयं?
 तुमची जात आता संपवा.
संपविणारेच दिसताय आज
पेटवितांना जातीचा वनवा.

जाती धर्माच्या ठेकेदारानो!!
प्रथम तुमची ठेकेदारी थांबवा..
सर्व काही सोडून तुम्ही
माणूस स्वतःला बनवा.

जातीभेद मिटवायचा तर
खरच समतेनेच सर्वांना नांदवा.
जाती-धर्माच्या अहंकारावर
नको कधी कोणाला भांडवा.

थांबवा सर्वत्र उन्माद जातीचा,
मनुष्य जात सर्वांची नोंदवा.
मनुष्याच्या प्रत्येक पिल्यावर
फक्त मनुष्य प्रेम गोंदवा.

उधळून अथवा विझवुन टाका
येथील जातीभेदाचा वनवा.
मनुष्य वंशाचा अंश आपण
प्रथम मनुष्य स्वतःला बनवा.

शाळा, कॉलेज, विद्यापीठाच्या
दप्तरातील जात प्रकर्षाने हटवा.
कलूषित मनामध्ये दाटलेला
जातीद्वेश प्रथमतः घटवा.

समतेच राज्य हे
त्याला समताधिष्टित घडवा.
या व्यवस्थेतील उपेक्षित जे,
प्रथमतः मनुष्य त्यांना बनवा....

  *डॉ  प्रभाकर लोंढे*
गोंदिया-चंद्रपूर  9673386963

Tuesday, May 30, 2017

राजमाता अहिल्या


अहिल्या नाम की नारी थी,
दुश्मनोको भारी थी.
दुर्जनो का संहार करके
सज्जनोका सम्मान बढाते,
खूब लडी मर्दानी
वो तो इंदोरवाली महाराणी थी !!!

दीन दुःखीतो का दुःख हराती
जन जन का पालन करती
वो तो समग्र क्रांतिकारी थी.
दीन दुःखीयो का मनोबल बढाते
खूब लडी मर्दानी
 वो तो इंदोरवाली महाराणी थी !!!

स्वजन मृत्यू का दुःख सहती.
निराधार और निराश्रीत जीती,
विजयी पताका हात लेकर
होळकर राजवंश चलाते, 
खूब लडी मर्दानी
वो तो इंदोरवाली महाराणी थी !!!

अठ्ठाईस साल राज करती,
पराक्रमो से हिलती थी धरती.
वो तो महेश्वर की महाश्वेता थी,
नारी जाती का सम्मान बढाते 
खूब लडी मर्दानी
वो तो इंदोरवाली महाराणी थी !!!

   डॉ . प्रभाकर लोंढे
         गोंदिया-चंद्रपूर 

Wednesday, April 26, 2017

श्रमपुञ ....

पिढ्या गेल्या कष्ट करता
या काळ्याश्यार मातीत.
म्हणून आम्हा अभिमान तयांचा
आम्ही जगतोय तयांच्या छातीत.

उधळू जीवन, जावू मातीत.
जगू तयांच्याच पंगतीत.
अभिमान आम्हा, याजन्मीचा
जन्मलोय कष्टकऱ्यांच्या जातीत.

घेवु शिक्षण ,घडवु जीवन,
प्रसंगी शोधू मोती मातीत,
प्रियजनांच्या भल्यासाठी
करू कष्ट दिवस राञीत.....

कष्ट हाच  देव आम्हा
सुसंस्कारलो याच रितीत
घडलोय, बिघडलोय जरी आम्ही
जगलोय सत्याच्याच संगतीत.

कष्टकरी हा धर्म आमचा.
कधी न विभागू कोण्या जातीत.
निर्धनांच्या घरातील कुबेर आम्ही ,
वाढलोय कष्टकऱ्यांच्याच प्रितीत..

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

Friday, April 21, 2017

वेदना शेतकरी विधवेची

काय धनी तुम्ही बी
किती केलं हलक मन.
भरल्या आयुष्यामंदी तुम्ही
संपविलं आपलं जीवन..

तुमचा जिव माझ्यासाठी
होतं मोठं माझं धन.
असला उभा शेतामंधी तरी
वाटत होत समृद्ध जीवन.

तुमच्या सोबत जगली बाप्पा
घेवुन आशेचा किरण.
आज जरी झोपली उपाशी
उद्या पूर्ण पोट भरणं..

वाटलं नव्हतं धनी
तुम्ही असं कधी करणं.
गळ्याला फास लावुन
मध्येच पत्कारालं मरण.

असा कसा हरालाय धनी
तुम्ही पहाताय का माझा पण?
मी आहे रणरागीनी
सोडणार नाही रण..

वावर, वखर, बैलजोडी
जपलयं तुम्ही धन,
तुमच्या वाचून राहवत नाही
जळतयं सुकलेलं तन...

पोरं तुमची तुकड्याभराची
करतात चिमणीवाणी मन.
बाबाशिवाय त्यांना बी
नकोसं झालयं जीवन.

कसं सांभाळू स्वतःला आता
वेदना होत नाही सहन.
कधी वाटतयं मुलांसह
रचावं आपलं सरण....


डॉ . प्रभाकर लोढे गोंदिया-चंद्रपूर

Thursday, April 13, 2017

बाबा तुम्हारी याद मे

बाबा तुम्हारी याद मे
हम तो दिवाने हो गये,
दिलसे तो छोडो पर
दिमाख से पुरे सो गये!!

शिखाया था बाबा आपने
हमको तरिका जिनेका,
ओ जिना तो शिखा हमने पर
आपका तरिका ही भुल गये,
अपने माँ बापको ही भुल गये!

बाबा हम तो जी रहे आज
मनुवादियोकी चपेट मे,
उनकाही जहर निगल रहे
हर एक घोट मे,
नकारा था जिन्होने हमको,
नमक उनकाही आज
ले रहे हम पेट मे !

कैसे बताऊ बाबा आपको
शरम आती है बतानेमे,
हम आपके विचारो को छोडकर
नामके ही  दिवाने हो गये.
विचारो के अनुयायी के जगह
नामके ही भक्त बन गये!!

आपनेही कहा था बाबा
मट्टीपर नही खुर्चीपर बैठो,
खुर्ची तो ले ली बाबा हमने,
पर खुर्ची का मतलब ही नही समझे.
खुर्चीपर बैठकर खुलेआम
आपनेही लोगोंको लुट रहे!

समझायी थी बाबा आपने
जनतंञ मे किम्मत ओट की,
एकही चिज है बडे काम की.
उसको मजबुत बनाने को
हक्कसे बोला था आपने,
अहमियत जानो ओट की,
समझ तो गये बाबा आपका,
पर उसकोही बेच के  हम
कमाने लगे रोजीरोटी रोजकी..!!

उध्दार करने बहुजनो का बाबा,
एक ही तो था आपका नारा.
जनतंञ ही है मंञ हमारा.
जनतंञ ने घेर लिया देश सारा
पर नही पा सके हम अधिकार हमारा...
-----------------------------------

डॉ .प्रभाकर लोंढे  गोंदिया-चंद्रपूर

Monday, April 10, 2017

मुक्तीदाता

मुक्तीदाता

तूच सत्यशोधक
तुच  मुक्तीदाता.
आम्हा बहुजनांचा
खरा तुच विधाता,

सत्य हाच परमेश्वर.
मानले तु भगवंता.
सत्यानेच वागावे
हाच तुझा नियंता.

तूच राष्ट्रपिता
तुच विद्यादाता
आम्हा बहुजनांचा
तुच खरा परम् पिता.

मानव विकासाठी शिक्षण
माणले तू आत्मा.
शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा
तुच खरा महात्मा .

डॉ . प्रभाकर लोंढे   गोंदिया-चंद्रपूर

Tuesday, February 28, 2017

जय महाराष्ट्र

माय मराठी

दऱ्या खोऱ्यातून गुंजे मराठी
सह्याद्रीच्या काठी.
मराठीचा महाराष्ट्र तो,
आता ओलांडेल  साठी..

मराठमोळा बाना अन
स्वाभिमान ज्याचे ओठी.
मराठी बोलेल जो,
जागेल महाराष्ट्रासाठी.

'म' मराठीचा सांगेल जो,
त्याची नसेल गोष्ट छोटी.
मराठी बाण्याचा माणूस तो,
जगेल मराठीसाठी.

प्रमाण मराठीच्या आसऱ्यात
बोली बदलतेय छोटी छोटी,
वऱ्हाडी, अहीराणी, कोकणी
अनं झाडीबोली नाही त्यात खोटी

शान, बान, मान मराठी
समृद्ध ती महाराष्ट्राची माती
भारतभूच्या कुशीत वाढतेय
शान महाराष्ट्राची मोठी ...

डॉ . प्रभाकर लोंढे, गोंदिया-चंद्रपूर

Monday, February 27, 2017

*बिघडली म्हणे पोरं....*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

कानामध्ये हेडफोन दिसे
 जसा गळ्यामध्ये  दोरं...
दोरामध्ये अडकून बसला.
कसा राहीन त्यात जोरं.....
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

गळ्यामंधी गळा घाले
रस्त्यावरं पोरी- पोरं .
समजत नाही काय खाव,
आंबट आंबा की बोर..
उडवून देवु म्हणे आता,
तंग जवानीचा बारं.....
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोबाईल साठी पोरगं रडे,
सोडलं त्यानी सारं...
बाप म्हणे गेलं वाया,
बिघडून गेलं पुरं...
आता कसं होईन बाप्पा
सापडे ना त्याला सुरं....

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोठं स्वप्न पाहीलं होतं,
त्याला धाडीन  नागपूर .
माय म्हणे डोंगा डुबला,
राहीलं  स्वप्न अधुरं.
असं बोलताच मायेच्या
डोळ्यांत आला पूरं.....

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोबाईल मध्ये गुंग झाले
माय बाप अनं थोरं.
कुटूंबातलं सुञ संपल,
आँनलाईन झाल सारं.
कसे राहीन दूर आता
मोबाईलपासून पोरं.

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

नवरा म्हणे तुझं आता
हॉटस्पाट सुरु करं.
लाजून सन्या बायको म्हणे
तुम्ही राहू नका दूर.
जुळलं नाही तुमचं तं
कराल नक्की  कुरबुर...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मायबापाचं मायाजाल पाहून
पोर झाले ढोरं.
आदर भावना संपल्यानं
भासतात जनावर.
बाप झाला चिंतीत आता
म्हणे पाप झालं घोरं..
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

उशीरा का होईना बापाची
आली अक्कल  ठिकाणावर.
जमणार नाही आता म्हणे
पोरं सोडून वाऱ्यावरं..
बायको म्हणे आपल्यामुळेच
वाया गेलं सारं.

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

आता सोडा सगळं तुम्ही
डेटा, इंटरनेट, सर्वर.
बिघडलेली पोरं पाहून
भरुन आला माहा उर...
रक्ताच्या नात्याला देवु
माया-प्रेम भरपूर ..

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

बायको म्हणे धनी,
मी आली भानावर.
वेळ नाही गेली अजून,
घडवू आपली पोरं .
पोरांच्या अधोगतीला,
आहोत आपणच जिम्मेदार...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

पोरांना पाहीजे अन्नपाणी,
माया अनं प्रेम भरपूर
मोहापायी मोबाईलच्या तू
सोडली पोरं वाऱ्या वर...
कळलं नाही काळजं आपली
गेली कधी दूरवर ...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .



Friday, February 24, 2017

*अव्यक्त प्रेम*
💞💞💞💞💞💞💞
स्पर्श होताच तुझ्या नयनाचा
कळले मज तुझे प्रतिबिंब .
राहील कसा अनभिज्ञ मी,
जाहलो हृदयातुनी ओलाचिंब.

अंतरीचा जखमी भाव माझा
जरी झालाय तुझ्यात बेधुंद,
विवेकाचा जिवंतपणा सांगे,
आता बरा नव्हे हा सुगंध .

झाला उशीर आता,
व्यक्त करण्या तुझे प्रेमबंध.
जग तू निवांत आता.
नको लिहू  खोटा प्रबंध .

दिवस गेले निघून सारे
कधी न कळला प्रेमाचा गंध  .
तु तुझ्यात, मी माझ्यात
स्वतःतच होवु दंग.

Saturday, February 11, 2017

*गद्दारो की दुनिया*
--------------------------

मत कर माफ इस दुनिया को
यह दुनिया है बडी बेईमान !
इस बिघडी हुई  दुनिया मे
झुट ही है जीवन की कमान !

रास्ते रास्तेपर मिल जाऐंगे तुझे
गद्दार, लाचार और बेईमान
चोरी, डकेती, लबाडी मे ही है
उनके जिंदगी की शान और मान.

यहा जिंदादिल ईन्सान हो रहा
हरदिन कमजोर और परेशान.
जिने के लायक नही रहा वो
जो रखे और जिये तत्वज्ञान..

दौलत और पैसे की लालच मे
कोई बेचता दिख रहा ईमान.
पुस्दिल और दलिंदरो के बाजार मे
हरदिन बेचा जा रहा है इन्सान....

----------------------------------------

*डॉ.प्रभाकर लोंढे. गोंदिया. चंद्रपूर*
*पैसे की लालच*
----------------------------------

इस तुकडाभर जिंदगी मे
पैसा तो बहोत कमा लिया मेरे भाई.
व्यवहार देखकर तेरा न बोले तुझे
वो जा रहा है कसाई!

जाहीर है की जिने के लिए
ईन्सान को जरुरी है पैसा और कमाई
पर पैसो  के नामपे दुनिया मे
तुटा जा रहा हरदिन भाई से भाई.

तुझे देखकर लग रहा है मुझे
पैसा कमाने की तुने कसम खायी.
तेरी लालच की दौड मे
भुका रह जाए तेरा भाई..

वो भी क्या काम की
तेरी वह पैसो की कमाई .
जिसे पाने मे गँवा दी तुने
तेरी हरचंद जिन्दगानी....

जिंदा है तो जी ले जिंन्दगानी
 बन जाए मशहूर तेरी कहानी.
या तो पैसो की लालच मे
नही पी सकेगा बुंदभर भी पाणी.....


-------------------------------------

*डॉ.प्रभाकर लोंढे. गोंदिया-चंद्रपूर*