Sunday, December 2, 2018

सत्तेत असलेल्यांनाच आंदोलने का करावी लागतात?*

*महाराजा यशवंतराव होळकर जयंती विशेष... विशेष शुभेच्छा*
🐉🐉🐉🐉🐉🐉🐉🐉
_________________________
 *सत्तेत असलेल्यांनाच आंदोलने का करावी लागतात?*
                     डॉ प्रभाकर लोंढे

       भारतीय लोकशाही अशी लोकशाही आहे, कि जिथे सत्ताधारी पक्षातील लोकच अलीकडे आंदोलनाचा पवित्रा घेतांना दिसतात. त्यामुळे कधी संशय येतो की ते सत्ताधारी आहेत की, पुन्हा काही??? मुद्दा राम मंदिराचा असो, की, शेतकऱ्याचा असो की पुन्हा मराठा आरक्षण दिल्यानंतर पेटण्याची शक्यता असलेल्या धनगर आरक्षणाचा असो .. ( सत्तारूढ पक्षाच्या जाहीरनाम्यात असलेल्या व पंधरा दिवसात अंमलबजावणी करणाऱ्या धनगर आरक्षणाचा असो), अशी अनेक उदाहरणे देता येईल.  की *सत्तारूढ पक्षात असलेले नेते रस्त्यावर उतरतांना दिसतात. तेव्हा असे का? असे कसे? व कशासाठी* ? असे अनेक महत्वपुर्ण प्रश्न डोक्यात थैमान घालतात.
           अलीकडे ऐकलं की धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बीजेपी च्या जाहीरनाम्याची होळी करणार!!! लय बरं वाटलं. चांगले आहे. पण थोडा उशीर झाला असं वाटतंय. कारण सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर  ते संशयास्पद आहे. असे असले तरी लोकशाहीमध्ये सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलने आवश्यक आहेच. असतातच पण *"तळ्यातही मीच, आणि मळ्यातही मीच" अशा लोकांची आंदोलने १००% फसवी असतात.* सामान्य माणसाच्या भावनेशी खेळणारी असतात. कारण असे नेते सत्तारूढ पक्षाच्या​ सोबत राहून, किंवा सरकारच्या आशिर्वादाने एखाद्या राजकीय पदाचा लाभ घेणारे नेते सत्तारूढ पक्षाच्या विरोधात खरा आंदोलनाचा पवित्रा घेऊच शकत नाही. घेत असेल तर ते नक्कीच एक नाटक आहे किंवा ते आंदोलन आरक्षणासंबंधाने असंतोषाची तिव्रता कमी करण्यासाठी किंवा दुसरा कोणी या असंतोषाचा/ जनभावनेचा फायदा घेऊ नये यासाठीच अशी आंदोलने होत असतात.  त्यामुळे आंदोलनाची चिकित्सा करणे सामान्य माणसाचा व नेत्यांचा, कार्यकर्ता​चा अधिकार असतो. तो अधिकार ते किती चांगल्या प्रकारे वापरतात यावर त्यांचे सर्वांचे भवितव्य अवलंबून असते.
       लोकशाहीत सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता हातात घेते. प्रत्येक राजकीय पक्ष बहुमतात येण्यासाठी जनहितार्थ सतत्येवर आधारित जाहीरनामा प्रसिद्ध करते.  सत्ता प्राप्त होताच जाहीरनामा अंमलात आणण्यासाठी​ प्रयत्नात असल्याचे सांगितले जाते. व प्रत्यक्ष काम करते. त्यासाठी ते तसे प्रयत्न सुध्दा करतात?  हे खरं असेल तर सरकारशी संबंधित पक्षांची व त्यामधील नेत्यांची सरकारच्या धोरणाच्या समर्थनार्थ काम करण्याची जबाबदारी ठरते.
      ते तसे करीत नसेल, सरकार च्या विरोधात  रस्त्यावर उतरत असेल तर त्यांचा सरकार सोबत राहण्याचा​ नैतिक अधिकार संपलेला आहे. परंतु तसे न करता जनतेमध्ये येवून जनभावना भडकविण्यासाठी व जनतेला आपल्या मागे लावण्यासाठी जनभावना भडकविणारे मुद्दे ते शोधतात. जनतेच्या भावना भडकवून सरकार संबंधी रोष व्यक्त करण्याचे केवळ नाटक करीत असतात. यामुळे नेते कायम असतात. जनतेचे प्रश्न जसेच्या तसेच राहतात.
             मात्र सरकार संबंधी जनतेमध्ये असलेला रोष नियंत्रित मार्गाने नियोजनबद्ध बाहेर काढला जातो... हा प्रकार सरकारसाठी, प्रस्तापित नेत्यांसाठी उत्तम दर्जेदार व दिर्घकाळ नेतृत्व ,  सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पोषक, हितकारक व दिर्घायुष्य देणारा असतो....
         *पण यामध्ये मरतो तो कार्यकर्ता!! सामान्य माणूस!! ज्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद झालेल्या आहे..*  कारण सामान्य माणसाच्या प्रश्नावर व कार्यकर्त्यांच्या भावनेवर नेत्यांच्या पिढ्यान् पिढ्या जगत असतात व जगवायच्या असतात...
 *तेव्हा विचार करा.!!*
*सरकार मधील किंवा​ सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज का पडते?*

____________________&&____

                                    जय मल्हार
 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Wednesday, October 17, 2018

धनगरानो! पुन्हा एखादा महान आत्मा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या..*

🇧🇦🇧🇦🇧🇦🇧🇦🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇦🇹🇦🇹
*धनगरानो! पुन्हा एखादा महान आत्मा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या..*
         
        *__ डॉ प्रभाकर लोंढे__*
________________________
          सर्वसाधारणतः​ धनगर समाज भावना प्रधान समाज आहे. त्यामुळे आपल्या जमातीला चिकित्सक विचार लवकर पटत नाही. *मात्र एखादा भावनिक मुद्दा/नेता आपल्या लोकांकडून लवकर डोक्यावर घेतला जातो. व त्यासंबंधी अंधभक्त म्हणून कामाला लागतो.* त्यामुळे या जमातीला लवकर फसवता येते, असा समज(गैर) महाराष्ट्रात सर्वत्र पहायला मिळतो. हा समज २०१४ मध्ये पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात धनगरांच्या बाबतीत हे सातत्याने घडत आल्याचे पहायला मिळते. परंतु आता हे अंतिम असावं, यासाठीच हा लेखनप्रपंच....
           घटनात्मक आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भावना. पण ते कसं मिळेल याचा तिळमात्र विचार न करता आपण समोरच्यावर अंधविश्वास ठेवून मोकळे होतो. आणि इथेच धनगरांचं घोड मारं खातं. *अशा अंधविश्वासाच्या संबंधाने कोणी चिकित्सक विचार मांडले तर त्याला आपण मुर्खात काढतो...त्याचा अवाजवी विरोध केला जातो. हा धनगरांचा सर्वात महाभयंकर महारोग.. की ज्या रोगामुळे  समाजरत्न बी. के. कोकरेंचा बळी गेला... यापुढे ही जाणार नाही हे सांगता येत नाही. जोपर्यंत आपल्या या प्रवृत्ती आपण बदलणार नाही तोपर्यंत धनगरांची फसवणूक होत आलेली आहे व होत राहणार आहे. म्हणून आमच्या वृत्ती मध्ये बदल होणै गरजेचे आहे*
         भावनेच्या भरात प्रस्थापितांवर किंवा त्यांच्या धनगर  तितरांवर आपण बिनधास्त विश्वास टाकतो. हा विश्वास  चिकित्सकपणे ठेवला तर आपण आपल्या अजेंड्यामध्ये नक्की यशस्वी होवू शकतो.. पण चिकित्सक विचार करणेच आम्हाला जमत नाही. त्यामुळे भावनेच्या भरोश्यावर घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची दाट शक्यता असते. भावनेच्या भरोशावर तिच्या आहारी जाऊन आपण २०१४ च्या निवडणुकीत निर्णय घेतले. भाजपाला आपला हक्काचा पक्ष म्हणून विश्वास टाकला. परंतु भाजपा एवढ्या खालच्या पातळीवर जावून धनगरांशी भावनिक खेळ खेळेल, याचा आपण विचारही केला नाही. भावनेच्या भरात आपण बीजेपीला भरभरून मते दिली.
       त्याचवेळी आपण आपला नेता म्हणून स्विकारलेला अराजकीय सामाजिक, उच्च विद्या विभूषित व्यक्तीत्व म्हणून नेता पुढे केला....जीवनातील पैसा, वेळ त्यासाठी बिनधास्त खर्च केला. जिथे (मेळावे, मोर्चे,सभा) बोलावले तिथे आपण उपस्थित राहलो. फक्त समाज हीत याशिवाय कोणताही वैयक्तिक विचार केला नाही त्यावेळी नेतृत्वाच्या व्यक्तीत्वाच्या छुप्या अजेंड्यावर चिकित्सक पणे विचार मांडणाऱ्यांच्या विचाराला पायदळी तुडविला. त्याचवेळी धनगरांचा नेता धनगरांच्या भावना, विश्वास, हीत यापेक्षा एखाद्या राजकीय पक्षाला, त्याच्या ध्येय धोरणाला बांधील होईल,  समाजातील सामान्य माणसाच्या लोकमताची/लोकहीताची अवहेलना करून स्वार्थाला प्राधान्य देईल याचा सामाजिक स्तरावर आपण कधी विचार सुध्दा केला नाही. होता तो फक्त अंधविश्वास!!!!
     एक उच्च विद्या विभूषित व्यक्तित्व म्हणून आदराची भावना बाळगणारी ही जमात राजकीय बाबतीत नेतृत्व या अर्थाने भावनिक झाली. अशा प्रकारची भावना जपत असतानाच आपण बुद्धीचा वापर करून जर विचार केला असता तर आज फसवणूक झाल्याची खंत कदाचित आपल्यात दिसली नसती.  असो!  इतिहास उगळायचा नसतो, तो गिळायचा असतो.. एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्यातच खरा शहाणपणा असतो.
           आज कोणी म्हणतात, धनगरांचं आंदोलन चिरडलं गेलं, धनगरांचं घटनात्मक आरक्षण अंमलबजावणीचं स्वप्न भंग झालं, धनगरांना देशोधडीला लावलं, टिसच्या अहवालाने धनगर पुर्णतः नाउमेद झाले.  ते कदाचित कोणाला खरंही वाटत असेल. परंतु ते मला खरं वाटणार नाही कारण सामान्य धनगर, खरे समाजहीतवादी, यांच्या अंतरात्म्याची आग मात्र अजूनही पेटतांंनी दिसत आहे. त्यांचा सत्याच्या विजयावरचा विश्वास आजही दृढ आहे.  त्याच आत्मविश्वासाने, त्याच ताकदीने तो लढायला तयार आहे. फक्त त्याने धनगर जमातीमधील तितरं ओळखायला शिकणे आवश्यक आहे... त्यांना खऱ्या नेत्याची गरज आहे. ते आजही त्या प्रतिक्षेत आहे.
         काही धनगर नेते कदाचित शांत झाले असेल, काही नेते इमानेइतबारे जमातीच्या भल्यासाठी काम करीत आहे. काहीं धनगर नेत्यांना स्वतः च्या राजकीय अस्तित्व निर्मिती साठी समाजाच्या भावनेचा वापर करण्याची ऊर्मी निर्माण झाली असेल. काहीतर प्रस्थापितांच्या इशऱ्यावर नाचत आहे (जमातीतील जानकार लोकांना हे लक्षात आलं आहे.) त्यामुळे धनगरांच्या भावनेशी खेळण्याची इच्छा, हिम्मतही ते करत असेल तर त्यातून खऱ्या नेत्याला ओळखण्याची गरज निर्माण झालेली आहे. व ते सहज शक्य आहे.
        प्रस्थापितांनी आपली पिलावळ धनगर जमातीत निर्माण केलेली आहे. पद, पदांची लालच, पैसा, छुपा अजेंडा देवून धनगरांना फसविण्यासाठी तयार केलं आहे, अशा या कामात आपली काही नेते मंडळी माहीर आहेत. धनगर जमातीमध्ये​ ते सक्रीयपणे काम सुध्दा करीत आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे जमात विभाजित होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे.असं असलं तरी धनगर निष्ठेपुढे मात्र प्रस्थापितांचे दलाल उघडे पडतील, हे निश्चित आहे. कारण सामान्य धनगर आता स्वाभिमानाला जागायला लागले आहेत.
           स्वाभिमानी लढाई तो जाणायला लागला आहे​. त्यामुळे प्रत्येक लढा तो स्वतःच्या हक्कासाठी लढतो आहे. लाचारी ची त्याला चिड आली आहे. तो गद्दारांना धडा शिकवायला तयार आहे. म्हणूनच तो स्वाभिमानाचे लढे उभारतो आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुढे यावे, याचीच केवळ वाट तो पाहतो आहे....अशाच नेतृत्वानी समोर यावे, जमात त्या नेत्यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहायला तयार आहे. *फक्त पुन्हा एखादा महान आत्मा पुढे येणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.*

कारण
दर पाच वर्षांनी धनगरांमध्ये
पुढे येतो एक नेता महान.
पाच वर्षांसाठी जमातीला
बिनधास्त ठेवून जातो गहान.

तेव्हा दक्ष राहून येवू द्या
सर्वांना याचे भान.
स्वाभिमानी धनगरानो!
आता पेटवा तुम्ही रान.

सत्तेशिवाय धनगरांना
मिळणार नाही कुठे सन्मान.
मात्र त्यासाठी झुकवू नका
आपली स्वाभिमानी मान.

संघटित होऊन तुम्ही
आता करा मतदान.
इतिहास लिहीलं तेव्हा
तुमचं ते सुवर्णाक्षरी पान.


                               जय मल्हार
             *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Sunday, October 14, 2018

धनगरांनो! दसरा मेळाव्यात कोणाचा बळी घेणार!

धनगरांनो! दसरा मेळाव्यात कोणाचा बळी घेणार!

                 भारतीय समाज हा उत्सव प्रिय समाज आहे. अनेक सण उत्सव येथे साजरे केले जातात. यापैकीच एक विविधांगी रुप प्राप्त झालेला दसरा सण हा समाज परिवर्तनाचा दिवस म्हणून अलीकडे मोठ्या प्रमाणात गाजत आलेला आहेत. या सणाच्या माध्यमातून परिवर्तनाचे वारे निर्माण होताना पाहिले आहे. डा बाबासाहेबांचा धर्म परिवर्तनाचा निर्णय असो, बाळासाहेब ठाकरे ने आयोजित केलेल्या दसरा मेळावा असो. भगवान गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याला पुढे आलेल्या राजकारणाचे स्वरूप असो. त्यामाध्यमातून झालेलं राजकारण असो. मात्र अलीकडे या दसरा मेळाव्यात महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे अनेक आखाडे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर जमा होणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असो, किंवा सत्तेची आस ठेवून आयोजित धनगरांचा दसरा मेळावा मग तो आरेवाडी असो की जेजूरीचा असो, तो मात्र धनगरांच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणार हे निश्चित आहे.
      आज गेल्या चार-पाच वर्षांपासून चालू असलेल्या उपेक्षेचे व एकूण राजकारणाचे धक्के सहन करून धनगर जमातीला शहाणपण आल्यासारखं वाटायला लागलं आहे. ती आज स्वाभिमानी परिवर्तनाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. मागील काळात झालेली फसवणूक आणि वापर टाळण्यासाठी धनगर जमात राजकीय सत्तेच्या दिशेने  मार्गक्रमण करीत आहे.
         आज अलीकडे धनगर जमातीतील अनेक नेते दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर स्वतःचे अजेंडे सार्वजनिक करण्याच्या विचारात आहेत. हे अजेंडे मात्र कुणाचा बळी तर घेणार नाही ना? हाच मोठा प्रश्न मला पडलेला आहे. मग आरेवाडीचा दसरा मेळावा असो वा, जेजुरी गडावरील​ दसरा मेळावा असो, जमातीला एका विशिष्ट राजकीय वळणावर नेण्याचं काम करणार आहे. त्यात मोठा प्रलय येणार आणि या प्रलयात अख्खा महाराष्ट्र ढवळून  निघणार आहे. मात्र यामध्ये हे निश्चित की, कुणाचा न कुणाचा बळी जाणार आहे.  मग तो प्रस्थापिताचा असो की धनगर जमातीचा असणार आहे. बळी जाणार हे मात्र निश्चित आहे.
      आता फक्त धनगरांनी  ठरवायचे आहे,  बळी घ्यायचा कोणाचा? धनगरांच्या पिढ्यानपिढ्यांचा बळी घेणारी प्रस्थापित व्यवस्था पोसायची की धनगरांचे अस्तित्व निर्माण करणारी राजकीय सत्ता हातात घ्यायची? याचा निर्णय या मेळाव्यात झालाच पाहिजे. सामान्य धनगरांनो! या मेळाव्यातून तुम्हाला तुमची पुढची दिशा काय हे ठरवायची आहे. पुढे काय करायचं? कोणाच्या पाठीमागे जायचं? कोणाला मतदान करायचं? कोणाला जिंकून आणायचं? हे निश्चित करायचे आहे.  कारण धनगरांनी ठरवायचं आहे की आम्ही प्रस्तावितांच्या मार्गाने जायचं की  बहुजन आघाडी ला सोबत घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचं!! स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला संधी प्राप्त होईल.
    दसरा मेळावा आरेवाडीचा असो वा जेजुरीचा असो या मेळाव्यामध्ये धनगरांचं राजकीय अस्तित्व निर्मितीच्या खूणा त्यात दिसणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मेळावे एकत्र व्हावे हा आग्रह मी मुळीच करणार नाही. परंतु दोन्ही मेळावे हे धनगरांचा बळी घेणार नाही, ही अपेक्षा मात्र मी केल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही मेळाव्यामध्ये धनगर एकता प्रदर्शित व्हावी, ही दक्षता घेण्याची सुचना केल्या शिवाय राहणार नाही. कोणाचेही पावलं प्रस्थापितांना पोषक किंवा इशऱ्यावर पडणार नाही, याची तंबी सुध्दा दिल्या शिवाय राहणार नाही.
           आरेवाडीच्या मेळाव्याचा अजेंडा,  स्वतः ला जपत, वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याचा असेल तर धनगरांसाठी दूधात साखर पडल्याचा आनंद होईल. त्यातून धनगर एकता प्रदर्शित होईल. अगदी खरंच सांगतो, धनगरांची ताकद एवढी मोठी निर्माण होईल की, प्रस्थापितांना धनगरांची भरलेली धडकीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.. धनगरांची गोपीचंद पडळकर नावाची  मुलूख मैदानी तोफ  वंचितांच्या काफील्यात चमकल्या शिवाय राहणार नाही. मात्र ती प्रस्थापितांच्या आडोशाला जाऊन बसली तर स्वाभिमानी राणे बनल्याशिवाय राहणार नाही.
          सर्व दसरा मेळाव्यातील धनगरांच्या वेदना जर सारख्याच असेल तर  संवेदना सुध्दा सारख्याच असाव्यात, ही अपेक्षा करायला काहीच हरकत नसावी. कारण समान संवेदनेतून निर्माण झालेला अजेंडा हा वेदनेवर इलाज केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे धनगरांच्या बाबतीत व्यवस्थेमध्ये असलेल्या सर्वच व्हायरसचा निकाल लावल्याशिवाय समस्त धनगर वंचित एकता थांबणार नाही.
           वंचित बहूजन आघाडी सोबत गेल्याने प्रत्येक धनगर नेत्यांचे सर्वांगीण मुल्य वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण "स्वर्गातील कोतवालापेक्षा नर्कातील का होईना राजा कधीही महानच असतो." त्यामुळे धनगरांना राजा बनविण्याची ताकदच नव्हे तर संधी सोबतच नियत सुध्दा फक्त अन् फक्त वंचित बहुजन आघाडी मध्ये आहे.. तेव्हा संधीचा लाभ घेऊन सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रस्तापितांचा बळी घेण्याचा संकल्प दसरा मेळाव्यात एकमताने व्हावा, एवढी आशा बाळगायला कोणाचीही हरकत नसावी...

                एक धनगर भक्त.!!
                        मस्तक सशक्त!!


                               जय मल्हार
             एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
डॉ प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Saturday, October 13, 2018

बायो डेटा

बायोडेटा

संपूर्ण नाव   : डॉ प्रभाकर रामजी लोंढे
जन्मस्थान   : मु कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
जन्मदिनांक  : ०२/०५/१९७५
निवाशी पत्ता  : गजानन कॉलोनी अंगूर बगीचा रिंग रोड गोंदिया ४४१६१४
संपर्क क्रमांक : ९६७३३८६९६३ ८८०६२६१२३७
इमेल अद्द्रेस : dr.londhe25@gmail.com
शिक्षण      : एम ए बीएड बी लिब सायन्स , पीएचडी
नोकरी       : प्राचार्य, जिल्हा परिषद क महाविद्यालय परसवाडा जिल्हा गोंदिया
विशेष ओळख : शैक्षणिक अभ्यासक, प्रभावी वक्ता,कवी ,लेखक, संशोधक
विशेष ओळख : समाजसेवा,पर्यटन, काव्यलेखन
सदस्य :
Ø  महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मिती मंडळ
Ø  महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश नोंद्लेखक
Ø  जागतिक संसद व संविधान संघटना
Ø  झाडीबोली साहित्य मंडळ
पुरस्कार
·         कवी कुलगुरू रवींद्रनाथ सरस्वत पुरस्कार (कलकत्ता)
·         राज्यस्तरीय लोकमुद्रा पुरस्कार (पुणे)
·         भारत निर्माण साहित्य भूषण पुरस्कार (यवतमाळ)
·         राजे यशवंतराव होळकर विशेष कार्य पुरस्कार (बीड)
·         गुणवंत शिक्षक पुरस्कार (चंद्रपूर)
प्रकाशित पुस्तके
§  वेदना उपेक्षितांच्या (काव्यसंग्रह)
§  त्रीवेणाई (नाटय संग्रह)
§  आधुनिक नारीपुरण (हिंदी खंडकाव्य प्रकाशनाधीन)
§  कूरमार (संशोधनपर)
§  धनगरांची राजकीय दुरावस्था (संशोधनपर) 
इतर महत्वाचे लिखाण
ü  आंतरराष्टीय पातळीवर संशोधनपर लेखांचे प्रकाशन
ü  राष्टीय पातळीवर संशोधनपर लेखांचे प्रकाशन
ü  दैनिक वर्तमानपत्रातून संपादकीय लेखांचे प्रकाशन
ü  आकाशवाणी नागपूर साठी आलेख लेखन 
ü  आकाशवाणी नागपूर वरून विशेष मुलाखत
ü  राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सहभाग
ü  राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम
संस्थापक
v  त्रिवेणी संस्कार सार्वजनिक वाचनालय, कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v  अहिल्यादेवी भ.वि जमाती विकास संस्था कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v  श्री रामजी लोंढे कृषी संशोधन केंद्र कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v उन्नती नर्सरी अंड कोन्व्हेंट टेमुर्डा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
विशेष कार्य
§  शेती संशोधन, नवोपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्व.रामाजी लोंढे स्मृती किसानरत्न पुरस्काराची सुरवात
§  वडिलाच्या जयंती निमित्य दरवर्षी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
विशेष अभियान
       भटक्या लोकांसाठी ‘सामाजिक समृद्धीसाठी राजकीय आर्थिक अभियान’ (PEASA)
विविध स्तरावरील इतर महत्वाचे कार्य
§  यु जी सी द्वारा आयोजित राष्ट्रीय सेमिनार मध्ये संशोधनपर लेखांचे प्रकाशन
§  राज्यस्तरीय मासिकांमधून संशोधनपर लेखांचे प्रकाशन
§  साप्तहीकांमधून शैक्षणिक लेखन
§  राज्यस्तरीय युवा संमेलनात कवी म्हणून सहभाग
§  राज्यस्तरीय शिक्षक संमेलनात प्रमुख मार्गदर्शक
§  महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम अमलबजावणी प्रक्रियेतील तज्ञ मार्गदर्शक
§  राष्ट्रीय हरित सेनेतर्गत पर्यावरण कार्य विषयक विशेष
§  विज्ञान प्रदर्शनी सहभाग व प्राविण्य
        ) सातवे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
        ) आठवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
        ) नववे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
  विद्यार्थी कल्याण कार्यक्रम
v  सहकार्य वाचनालय प्रकल्प
v  अक्षर सुधार प्रकल्प
v  गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
v  शैक्षणिक समस्या व उपाययोजनात्मक लेखन
       उपरोक्त सर्व माहिती सत्य असून खोटी आढळ्यास मी जबाबदार असेल

दि ११/१०/२०१८                                         आपला विश्वासू    गोंदिया                     
                                                 डॉ प्रभाकर रामजी लोंढे





Thursday, October 4, 2018

धनगर नेत्यांनो! स्वतःच स्वतःचे शिल्पकार व्हा!

अवश्य वाचा.......
धनगर नेत्यांनो! स्वतःच स्वतःचे शिल्पकार व्हा!
------------------------------------------------------------
                                   डॉ. प्रभाकर लोंढे
  ----------------------------------------------------------
      इतिहासामध्ये राजकीय सत्ता उपभोगणाऱ्या, राजकीय व्यवस्थेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या धनगर जमातीला आजच्या लोकशाहीमध्ये स्वतःचे नेतृत्व का करता आलं नाही हा एक मोठाच प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याला कारण गेल्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये ही जमात कधी काँग्रेसच्या आघाडी मागे, कधी बीजेपी प्रणित आघाडीसोबत इमानेइतबारे राहिलेली आहे. या आघाड्यांचा हक्काचा वाहक म्हणून सातत्याने या जमातीने मतदान केलेले आहे. मात्र यामधून धनगरांचे एखादे प्रभावी नेतृत्व कधीही विकसित होऊ शकले नाही किंवा या आघाड्यांच्या नेतृत्वस्थानी या जमातीचा एकही नेता दिसला नाही. त्यामुळे या आघाड्या कडून जमातीचा वापर केला, एवढं रडण्याशिवाय धनगरांच्या हातात काहीच मिळालेले नाही. प्रस्थापितांची गुलामगिरी व घटनात्मक अधिकारांपासून वंचित, अशा स्वतःच्या अनेक समस्या निर्माण करून या जमातीने आपल्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतली आहे. यामध्ये त्या आघाड्यापेक्षा प्रथमता धनगर जमात व जमातीचा असंघटितपणा हा  दुर्गुण जबाबदार असल्याचे स्पष्ट होते.
         अलीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही सोबतच बीजेपी शिवसेनेच्या आघाड्यांचा किळस आलेली धनगर जमात नवीन राजकीय पर्याय च्या शोधात निघाली. अन्यायाचा प्रतिशोध घेते की काय अशी परिस्थिती पहायला मिळाली. मात्र हे करीत धनगरांनी आपल्या दुर्गुणाकडे  विशेष लक्ष दिले आहे, असे काही प्रसंगावरून वाटत नाही. त्यावर योग्य उपचारात्मक उपक्रम धनगर जमातीत दिसत नाही. तरी सुद्धा पडणारी पावलं चुकीची आहे असं ठामपणे म्हणता येत नाही.
         धनगरांमध्ये एक वेगळं राजकीय परिवर्तनवादी वातावरण निर्माण झालं असताना या परिवर्तनाला जो कोणी योग्य वळण देईल तो मात्र येथील सत्तेचा सत्ताधीश होईल हे सत्य आज कोणीही नाकारू शकत नाही. म्हणजेच २०१४ प्रमाणे यापुढे सुद्धा येथील सत्ता परिवर्तनामध्ये या जमातीचा मोठा वाटा राहणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.  हे जेवढं खरं आहे त्यापेक्षाही यापुढे जमातीचा कोणी वापर करून घेणार नाही याची दक्षता घेणे सुद्धा अत्यावश्यक आहे.
            अलीकडेच निर्माण झालेली व धनगरांच्या सहकार्याशिवाय अधुरी असलेली तिसरी भारिप बहुजन वंचित आघाडी, धनगरांना राजकीय सत्तेची दारं नक्कीच मोकळी करून देणार आहेत. यात काही शंकाच​ नाही. यापुर्वीच्या आघाड्यांनी धनगरांना सत्तेची दारं संपुर्णत: संकुचित करून ठेवली होती. (आता कदाचित जुण्या आघाड्या सुध्दा धनगरांना महत्व देईल)  परंतु ही बहूजन वंचित आघाडी कदापिही टाळू शकत नाही व ते करण्याची त्यांची क्षमता सुद्धा नाही.  अशावेळी आलेल्या संधीचा फायदा घेणे व त्या दृष्टीकोनातून धनगरांनी संघटित होऊन सत्ता संपादनासाठी काम करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नियोजन पुर्वक कार्यक्रम राबविणयाची गरज आहे. परंतु अशी परीपक्व पावले पडताना दिसत नाही (असल्यास सहर्ष स्वागत) त्यादृष्टीने सामाजिक, राजकीय, वैचारिक मंथन सुद्धा घडताना दिसत नाही.
                     धनगरांना आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर हीच(२०१९) परफेक्ट वेळ आहे आणि याठिकाणी, अशावेळी झालेल्या चुका धनगरांना अतिशय महागात पडणार आहे.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोबत असलेले सर्वच धनगर, राजकीय नेते, राजकिय/सामाजिक दृष्ट्या संघटित होऊन "धनगर परीवर्तन आघाडी" अथवा एखादा "राजकीय पक्ष"  रुपात भारिप वंचित बहुजन आघाडी सोबत गेले तर आघाडीमध्ये असलेल्या इतर पक्षांवर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा या धनगर एकतेचा मोठा प्रभाव/दबाव निर्माण होईल. त्यामुळे जुन्या आघाड्यांनी धनगरांशी केलेली फसवणूक करण्याची हिंमत ही आघाडी करणार नाही. वंचित बहुजन आघाडी सोबत सत्ता संपादनाचे कार्य करतांना धनगरांसाठी संघटित प्रयत्न होईल. अपरिहार्य पणे बाहेर पडताना सुद्धा संघटितपणे बाहेर पडता येतील. त्या दिवशी धनगर जमातीचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण झालेले असेल. त्या निर्माण झालेल्या अस्तित्वाला भारिप बहुजन महासंघ सुद्धा आव्हान देण्याची हिंमत करणार नाही.
         सत्तेचा माज कधी चढेल, कोणी नेता कधी गद्दार होईल, हे सांगता येत नाही. पुढे धनगरांच्या सहकार्याने भारिप ला सत्ता मिळाली,  तर धनगरांनी त्यांच्या बाबतीत बीजेपी सारखं गाफिल राहून चालणार नाही. तेव्हा धनगरांची संघटित ताकद उभी राहिली तर धनगर आघाडी संबंधीचा निर्णय घेताना  बहुजन महासंघाला सुद्धा विचार करावा लागेल. त्यामुळे धनगरांचा पुन्हा वापर करण्याची मानसिकता काय हिम्मत सुद्धा कोणामध्ये निर्माण होणार नाही. आज जरी इतरांच्या कुबड्यांचा आधार घेऊन स्वतःचे भवितव्य घडविण्याचा विचार करणाऱे धनगर नेते स्वतःच  स्वतःच्या भवितव्याचे सर्वेसर्वा व शिल्पकार झाल्याशिवाय राहणार नाही.
        यासाठी सर्वच धनगर बेस पक्ष, प्रस्थापित पक्षात घुसमट होत असलेले धनगर नेते,  ज्या धनगर नेत्यांचे प्रस्तापित पक्ष तिकीट कापण्याची भीती/शक्यता आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमयातून, धनगरांची एक मोट बांधली, हक्काच राजकीय विचारपीठ तयार केलं, धशगर नेतृत्वांची परस्परांशी बांधिलकी निर्माण होईल. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील​ धनगरांना राजकीय सत्तेतील हक्काचा, स्वाभिमानी वाटा मिळाल्याशिवाय राहणार नाही...


                                  ___एक धनगर____

                               सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

                                  जय मल्हार
             एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
डॉ प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

धनगरांचा भविष्यकाळ निर्धारित करणारा हाच तो वर्तमान काळ!!*

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
*धनगरांचा भविष्यकाळ निर्धारित करणारा हाच तो वर्तमान काळ!!*
-------------------------------------------
                         *डॉ. प्रभाकर लोंढे*
------------------------------------------
               हिंदी मध्ये एक म्हण आहे व सर्वत्र बोललं जातं "समय बलवान है!"  आणि ते खरंही आहे. प्रत्येक गोष्टीची विशिष्ट वेळ असते. वेळ आल्यानंतर संधी उपलब्ध होत असते. त्या वेळेचा/संधीचा प्रत्येकालाच फायदा घेता येतो आणि आलेल्या संधीचा/वेळेचा फायदा घेण्यात तो किती यशस्वी ठरतो, यावरून त्याचा भविष्यकाळ निश्चित होत असतो. म्हणूनच ती योग्य वेळ ओळखणे आवश्यक असते.  मग ती वेळ एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असो की एखाद्या समाज घटकाच्या बाबतीत असो, उपलब्ध परिस्थितीचा पुरेपूर विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच त्याचा भविष्यकाळ निर्धारित करीत असतो. मात्र यासाठी त्याला सतर्क राहून त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा उठवता येईल याचा विचार व त्यानुसार आचार करणे अत्यावश्यक असते. कारण त्यातूनच यशाचा मार्ग निश्चित होत असतो.
         एकदा हातात आलेली संधी गेली तर पश्चाताप करण्याशिवाय हातामध्ये काहीच नसतं. म्हणून आलेली संधी गमावली जाणार नाही, तिचा पुरेपूर फायदा घेऊन जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घेता येतील, यासाठी प्रयत्न करणं, यातचं खरा शहाणपणा असतो.  अशा प्रकारचा शहाणपणा धनगर जमातीमध्ये आता आला आहे. अस मत जर कोणी व्यक्त केलं तर ते चुकीचं होणार नाही. मात्र तो शहाणपणा प्रत्यक्ष आचरणात/ जीवनात उतरवणे, हे प्रत्येक धनगर नेता, कार्यकर्ता व सामान्य धनगरांच्या​ हातामध्ये आहे. मात्र किती टक्के शहाणपणा प्रत्येकाच्या वागण्यामध्ये प्रत्यक्ष दिसणार आहे, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. परंतु यावरच जमातीचा भविष्यकाळ निर्धारित होणार आहे.
       त्याचवेळी आलेल्या संधीचा फायदा घेऊन समाजहित साधायचं की स्वहित साध्य करायचं? की स्वहितासाठी समाजाचा वापर करायचा? की समाजाचा छुप्या पद्धतीने लिलाव करायचा? यांचा निर्णय मात्र नेत्यांवर अवलंबून आहे. परंतु आता यापुढे हे होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्या इतपत आजच्या धनगर नेत्यांनी आपली विश्वासार्हता वाढविली आहे, असं मी म्हटलं तर कोणत्याही धनगर नेत्यांची हरकत नसावी. ही आग्रहाची नम्र विनंती.
              महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या, राजकीय सामाजिक दृष्ट्या वंचित, उपेक्षित धनगर जमातीचा हा काळ अतिशय महत्त्वपूर्ण असून या जमातीच्या सर्वांगीण भल्याचा मार्ग शोधणारा हा काळ आहे. अशावेळी धनगर नेत्यांनी टाकलेली योग्य पावले ही
१) धनगरांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक उद्धार
नक्कीच करू शकते.
२) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर धनगर आपली अतिशय महत्त्वाची पकड निर्माण करू शकते.
३) एवढेच नाही तर महाराष्ट्राची राजकीय सत्ता सुद्धा हातात घेऊ शकते.
४) येथील राजकीय व्यवस्थेवर स्वतःचे वर्चस्व निर्माण करू शकते.
५) जमातीला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ शकते.
              परंतु आता जर  नियोजन चुकलं तर धनगर जमातीला पुन्हा मातीत सुद्धा घालू शकते. परंतु अशा प्रकारचे नियोजन चुकणार नाही एवढा विश्वास फक्त आपण व्यक्त करू शकतो.
         सध्या परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा विचार करता प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये धनगर नेते, कार्यकर्ते सक्रियपणे काम करताना दिसून येत आहे. सर्वांना आपला पक्ष हा प्रिय असून ते पक्षनिष्ठेने काम करणारे निष्ठावंत असल्याचेही लक्षात येते. आणि ते अत्यावश्यक सुध्दा आहे. असे असताना त्यांची जमातनिष्ठा सुध्दा कायम आहे. यापुढे ते पक्षनिष्ठेला प्राधान्य देतात की समाजनिष्ठेला हाच एक मोठा प्रश्न आहे. परंतु पक्षहिताला प्राधान्य देत असताना समाजहित व स्वहित बाजूला ठेवून चालणार नाही. त्याही पलीकडे आम्ही जर जमात विकासाच्या, जमात अस्तित्वाच्या गोष्टी जर हृदयातून करीत असू तर समाजहिताला प्राधान्य देऊन स्व हिताकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल अशा प्रकारची मानसिकता असलेले नेतेच आज धनगर जमातीचा भविष्यकाळ घडवू शकतात. व अशाच नेत्यांची धनगर जमातीला आज गरज आहे. सुदैवाने आज अशा नेत्यांचे प्रमाण धनगर जमातीत वाढले आहे. प्रत्येक नेता समाज हिताचा विचार सुध्दा करीत आहे.  धनगर जमातीच्या या संक्रमण काळामध्ये अशा प्रकारच्या धनगर नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वरवर दिसून येत आहे, ही जमातीसाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे परिस्थिती सापेक्ष धनगर हितवादी निर्णय परस्पर समन्वयाने धनगर नेते घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यास कोणतीही हरकत नसावी असं सुद्धा वाटते आहे
              प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये धनगर नेते, कार्यकर्ते सक्रिय असतानाच दुसरीकडे त्यांच्या पक्षातच त्यांची घुसमट होताना सुद्धा दिसून येत आहे. धनगरांना उमेदवारीच न देण्याची मानसिकता असणाऱ्या आपल्या पक्षांकडून आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही याची सुद्धा चिंता काही धनगर नेत्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अस्वस्थ मन असलेली धनगर नेते मंडळी पुर्ण ताकदीने स्वतःचे अस्तित्व अजमावण्याच्या प्रयत्नात​ सुद्धा दिसून येत आहे. स्वतःला. विविध पक्षांमधून अजमाविण्याचे धनगर नेत्यांचे प्रयत्न सुरू असले तरी काही अपवाद वगळता बहुतांश धनगर नेते परस्परांच्या संपर्कात आहेत. ही सुद्धा  धनगर नेत्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे अशा प्रकारे परस्पर संपर्कात राहून आपल्या समस्येवर धनगर नेते निश्चितपणे तोडगा काढू शकतात. ही धनगर नेते व समाजासाठी जमेची बाजू आहे. सर्वांनी विचार विनिमयातून काढलेला तोडगा अथवा विचार विनिमयातून केलेला स्वअस्तित्व निर्मितीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने जमातीमध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचा एक पहिला पायंडा असेल. त्यादृष्टीने सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!!!!!

                         ___एक धनगर____

                           
                             जय मल्हार

     एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________

*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Friday, September 28, 2018

शिक्षकवाणी

शिक्षकवाणी

शब्दच पेरतो आम्ही
शब्दच उगवितो.
शब्दांच्या दुनियेत राहुन
शब्दांचेच पीकवितो.

शब्दच आम्हासाठी
शब्दच प्रसवितो.
शब्दांच्याच कवेत राहून
आम्ही शब्दांचेच गीत गातो.

शब्दच आम्हासाठी
कर्ता-करविता धनी.
हीच आम्हा शिक्षकांची
असीम कर्म कहाणी

पुजा कर विचारों की...

पुजा कर विचारों की...


भलेही मत ले नाम मेरा
तू पुजा कर विचारों की,
दुनिया याद करेगी तुझे
इसकी जिंदगी थी काम की!

है यहा तू जिंदा तो
बात कर विचारों की,
बदल जायेगी जिंदगी तेरी
बनेगी बडे काम की!

ना रख नाता तू जात से
सोच तू पूरे मानवता की
यही श्रध्दांजली होगी मुझे
मेरे सब सच्चे सपुतो की!

मेरा वंशज है वही
जो सोच रखे समानता की.
संकुचित विचार तोडकर
जो बात माने अपनी बाप की!!
_______________________
डॉ.प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
९६७३३८६९६३

सीमा

सीमा

स्वप्न तू, सत्य तू,
जीवनातील
अंधभक्त तू,
उधाणलेल्या
अथांग सागराची
क्षितिजा परी सीमा तू........

सदा आसक्त
जीवनातील​
अनासक्त महिमा तू,
बेधुंद जगणाऱ्या
या जीवास,
निवाऱ्याची
एक जागा तू......

या जीवाच्या संसाराचा
अखंड अविरत स्वास्थ्य तू
आस तू, आभास तू.
जीवनातील हरेक क्षणांचा
निष्कलंकित ध्यास तू..

डॉ प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर

जीवनात या
तुझे येणे.
शाश्वत, मृगांक्षीचे
अवतरणे,
काय सुंदर
हे जीवनगाणे.
तुझ्याच संगतीचे
ते कारनामे....

हुंकार समतेचा

हुंकार समतेचा

मरणाची तमा नाही
या अथांग अमर जगण्याला.
पडू दे! सडू दे!
वा तुडवू दे देह माझा,
पर अंकुर येवू दे विचाराला..

स्वास देहाच्या
समागमातून
फुटू दे वाचा
शोषित-उपेक्षितांच्या वेदनेला.
विचारांचे हुंकार फुटतील
साथ देत विचाराला.

या नश्वर देहाच्या
समाप्ती पुर्वी
नष्ट होवू दे
या जालिम विषमतेला.
समानतेचा सुगंध फुटतील
या देहाच्या मरणाला....

अंधार फार झाला

अंधार फार झाला

जगतो आहे अन्यायाचा भार घेवून
दुराचारी अधमाच्या दुनियेत.
आहेत उभे सत्य, विवेक, सद्बुध्दी
गुन्हेगारांच्या वांझोट्या आमसभेत.

विवेक-अविवेक,  सत्य-असत्य
भावंड कधी असे जुळे झालेत.
सगळेच कसे अंध दिव्यांग येथे
अविवेकी या अधमांच्या दुनियेत.

कधी मिळेल न्यायाला न्याय,
ऐकू तडे अन्यायाला गेलेत.
येईल कधी दिवस तो
सर्व म्हणेल, आता अती झालेत!

होवू द्या अन्याय कितीही,
वा निर्माण होवू द्या, साम्राज्य त्याचे.
मेनबत्ती मात्र जळत राहील
सत्य लढे लढत अस्तित्वाचे.

कोणी म्हणेल मेनबत्ती विझली
आता अंधार फार झाला.
कळून चुकेल तेव्हा त्याला,
तो काळ निघून गेला.
तो काळ निघून गेला...


 राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

बहूजन हृदयसम्राट! --------------------------

बहूजन हृदयसम्राट!
--------------------------

जो तो म्हणतोय
बहूजन हृदयसम्राट!
बहूजन कोणाच्याच हृदयात
कसा काय बसत नाही.
काय दिवस आलेत राव त्यांचे,
ते हृदयातही कोणाच्या दिसत नाही.

दुःख बहूजनांचं पाहून
हृदय कोणाचंच कसं फाटत नाही.
काय करावं यांचंही आता,
यांचा पाझरही कधी आटत नाही.
होता सावलीचाही धिक्कार ज्यांना,
यांच्या स्पर्शाने आता बाटत नाही.

समतेवर आधारित लोकशाही 
तरी कधीच यांना पटत नाही.
बहुजनांच्या वाट्याचे लोणी खाऊन
"
बहूजन हृदयसम्राट" म्हणतांना
यांना लाजही कशी वाटत नाही.

खूप झालेत देशात सम्राट,
सम्राटांचं अस्तित्व कधी मिटत नाही.
कोणी झाले हिंदू हृदय सम्राट,
खूप झालेत बहूजन हृदयसम्राट.
तरी बहूजनांच्या समस्या सुटत नाही.
कारण देशातील बहूजनांचा सम्राट,
त्यांना हृदयातून कधी भेटत नाही.

जीवनार्थ

दगड झालोच तर
त्या मंदिराचा होईल.
गरज पडलीच तर
शेंदूर फासून घेईल..

माणूस आहे मी,
माणूसकी साठी
मला हवा तो
आकार स्वत:ला देईल.

पुनर्जन्माच्या त्या
मानसिक दुनियेत,
पुनर्जन्म झालाच तर
माणूस म्हणूनच घेईल.

मात्र हे करण्याआधी
जीवनभर
जिवंत​ माणूस म्हणून
मनसोक्त जगून घेईल.


किती मारू लाता?*

खूप झाले निषेध , मोर्चे
वा तोंडातील त्या बाता.
हृदयातून म्हणा एकदा
नराधमानो! किती मारु लाथा?

बलात्कार, हत्या करूनी
प्रसंगी जीव तिचा घेता.
आपल्याच माय बहिणींना
डोळ्यासमोर पुन्हा किती छळता?

होवु द्या!  वेदना बलत्काराच्या
वा शोधा त्यात आपली माता.
या वासनांध नराधमांकडून
पून्हा किती जीव घेता?

उगारा अन्यायाविरुध्द मुठ,
दाखवा मर्दानकीचा छाता.
आहेत तुमचा मर्दानी बाना तर
आता कोणास काय भिता?

समजू द्या! या अधमाना
स्ञीच आहे त्याची माता.
नराधमानो या भूमिवर
तुम्ही जन्मच कसा घेता?

खूप झाले निषेध , मोर्चे
वा तोंडातील त्या बाता.
हृदयातून म्हणा एकदा
नराधमानो! किती मारु लाथा


 इशारा बैलांचा

येथेही नंदी, तेथेही नंदी.
सगळीकडे नंदीच नंदी.
 
देशामध्ये सर्वत्र पसरली
महाभयंकर आर्थिक मंदी.

मधातच आली तुमची
त्या जुन्या नोटांवर बंदी.
सगळ्यांनाच झाला त्रास
राहील कसे ते आनंदी.

देशात लागू झाली म्हणे
संपूर्ण सर्वत्र दारूबंदी.
तरी पोळ्यामध्ये माणूस डोले
जसा मोठा बैल नंदी.

येथे रोजच महागत आहे
खत, बियाणं, सोनं चांदी.
जगावं की मरावं यातच
शेतकरी मरतो विचारामंदी

जास्त पीक व्हावं म्हणून
त्यानं शेतासह पेरली बांधी.
माझ्या मेहनतीने पीकविलं सर्व,
वाढ झालीय राष्ट्रीय उत्पन्नामंदी

या पोळ्याच्या सणानिमित्त नं
मी सांगून देतो सर्व सज्जनामंधी
तुम्ही नका पडू माझ्या फंदी.
शेतकऱ्यांना वाचवता की नाही
सांगा! याच पोळ्या मंदी..
नाहीतर दिसेल तुम्हा
आम्हा बैलांची जात किती गंधी!


नववर्ष
...................................
नवीन वर्ष , नवीन जिव्हाळा
तोच दिवस, तोच उन्हाळा
तोच हिवाळा, तोच पावसाळा
प्रत्येक जीवास फक्त आभास निराळा .

नवीन वर्ष , नवीन आशा
प्रत्येक जीवाची नवीच अभिलाषा.
भूतकाळाच्या कठीण लहरींवर
वसावी उमेदीचीच भाषा.

क्षण येती, क्षण जाती
क्षणा क्षणानी दिवस भरती
दिवसा मागून दिवस जाती
अशास मानव वर्ष म्हणती...

वर्षा मागून वर्षे जाती
मानव तयाची करतो गणती
वर्षाकाठी हिशोब करुनी
आशा निराशेने निरोप देती.....

भारतीय नेपोलियन

यशवंत तू
जयवंत तू.
या जगाचा गुणवंत असा
जगजेत्ता किर्तीवंत तू.

तूच शूर
तूच नरवीर.
युद्ध रनांगणातील दिव्यतेचा
तूच खरा प्रतिबिंब तू.

तूच राष्ट्रप्रेमी
तूच खरा मराठा.
शिवरायांच्या पराक्रमाचा
तूच खरा वारसा.

तूच जगजेत्ता
तूच खरा जाणता
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा
तूच खरा प्रणेता.

तूच एकमेव असा
पदवी संपन्न महाराजा.
महाराजाधिराज, अलिजा बहाद्दूर, राजाराजेश्वर
श्रीमंत यशवंतराव होळकर नावाचा वाजे सर्वत्र वाजा.


                                
मृगांक्षी

मृगासम अंग अक्ष तुझे
मृगांक्षी तुझे नाव.
नामकरणासाठी तुझ्या त्या
आनंदाने सोसलाय मी तणाव.

असू दे मृगासम चतुराई तू
पर नसावी बेभान तुझी धाव.
जीवनाच्या वाटेवर असावं
तुझं शांत स्वयंभू असं गाव..

तसंही नावात काय असते
तुला आत्ताच काय कळणार राव.
नाव कमावण्यासाठी आनंदाने
किती सोसावे लागते घाव..

कधी हातोडा बनून घाल तू घाव.
गरज असेल तिथे अवश्य तोरा दाव.
प्रसंगी घाव झेलूनी जपतांना
नसू दे प्रसन्न मनी कुठे तणाव.

मार्गातील प्रत्येक तत्पर तो
असतो करण्या तुझा पाडाव.
वाईट वाटून चालत नाही.
ज्याला कमवायचं असत नाव..

समाज हा असा विकृत जरी
त्याशिवाय नाही तुला नाही वाव
पडत झडत, सदा धडपडत
सार्थक कर तुझं नाव...

मृगांक्षी ! अर्थ भर नावात तू
तुलाही जाणवेल समाधानाचा भाव.
अभिमान वाटेल जन्म देण्याचा,
उज्वल होईल माझंही नाव....

समृध्द देश

अनेक भाषा, अनेक धर्म ,
अनेक इथले वेश.
एकाच भूमातेची लेकरं आम्ही,
बनवु समृद्ध आमचा देश..

जगी सर्व लोकी आम्ही,
देवु हा संदेश .
प्राणापेक्षाही प्रिय आम्हा,
आमचा समृद्ध भारत देश...

या देशाच्या समृद्धीची,
किर्ती पसरेल देश-विदेश.
जगात एकच समृद्ध अमुचा,
असेल भारत देश.

वसा समृद्धीचा या देशाचा,
आदर्श मानेल हर परदेश.
समाजमनाच्या दरिद्रतेला,
नसेल कधी इथे लवलेश.

झाड

माणसा रे माणसा!
गेला तो काळ.
रस्तो रस्ती, कडीकपारी
दिसत होते झाड.

झाडावरती पक्षी,
भोवती त्याच्या पाळ.
सावलीत झाडाच्या
खेळे तुझेच बाळ..

झाडं गेले, पाळ गेले
उजाड झालं माळ.
इंटरनेटवर खेळ खेळे
अफलातून तुझं बाळ..

समजून घेरे माणसा
झाडाशी तुझी नाळ.
झाडा विना मानवाचा
कोण करेल सांभाळ.


कैवारी

धनी तुम्ही जीवनभर
चारले आम्हाला घास.
 
कसा काढू गळ्यातील
आता तुमचा तो फास..

राबराब राबले तुम्ही धनी,
होतो आम्हीच आसपास.
कळल नाही आम्हाशिवाय
तुमचं कोण होत तरी खास.

माणसं तुमची, तुम्हासारखी
त्यांना तर कमविण्याचाच ध्यास.
खरच होती तुमचीच ती
की होता नुसताच आभास.

कष्ट केले तुम्हासोबत
शेत पिकविलं हमखास.
अंतिम क्षणी सांगतो तुम्हा
होतो आम्हीच तुमचा स्वास.




माडर्न सूनबाई

काय म्हणलं सासूबाई,
मला भलतच वेड हाय.
मी मोबाईल वापरताना
तुमच्या पोटात दुखते की काय?

गेला तुमचा जमाना अन
नुसता टाटा, हाय- बाय.
दुनिया जोडतोय आम्ही
चालु ठेवुन व्हाय-फाय.

जगतोय आम्ही सुटाबुटात,
गळ्यात लावून मोठा टाय.
अभिमान आम्हाला आमचा
आमच्या जमान्यात काहीच कमी नाय

बयताड होती दुनिया तुमची,
नाहीतर दुसरं काय?
मरत होते कष्टापायी
सगळे करुन हाय हाय..

प्रश्नच पडला सासूबाई,
तुमच करू तरी काय?
नवरा सुद्धा म्हणतो आज
सासूपेक्षा वाचव तू गाय.

गायीमध्ये शोधतोय तो,
आपली हक्काची माय.
तुम्हाला जिवंत ठेवून आता,
तुमचं करू तरी काय?

साहित्यिकाची वणवण
"""""""""""""***"""""""""""

जेथ जात नाही कोणी
तेथं पोहचते साहित्यिकाचं मन
साहित्यधारेत वाहतांना
सर्वांयचं दुःखन माञ कॉमन.

उपाशी पोटी साहित्य कायचं
पोटात पाहिजे अन्नाचा कण.
साहित्यानं काही पोट भरत नाही
सर्वांयचं दुःख माञ कॉमन.

बायको म्हणते तुमचं काव्हय.
तुम्ही करता लय वन वन.
जमत नाही का तुमचं कोठं
साहित्यिकांच भजन.

समजलं नाही का तुले अजून
आमचं काय असते वजन.
आम्ही नसलो समाजात तं
समाज कोणाले पूजन.

लय झालं तुमचं आता
समाजातलं वजन-पूजन.
प्रश्न पडलाय मले मोठा
संध्याकाळी अन्न कसं शिजन.





शेतकरी दैना.

काव्हुन च्या बहीण
सरकार असं करते.
कास्तकार वाचला पाहिजे
अस नेहमीच म्हणते.
तरी बिचारा कास्तकार
तो रोजच मरते.

दिवसा मागून दिवस चालले.
तरी कास्तकार रोजच मरते.
समजलं नाही सरकार
त्यायच्यासाठी काय करते?
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

बिजाई, खात घेता घेता
पैसा कास्तकाराचा सरते.
त्याच्या नावाची सब्सिडी
सरकार कारखान्यात भरते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

कास्तकार करतो कष्ट 
सरकार गोदाम भरते.
भाव देतानी मातर
मांग मांग सरते.
प्रशन माञर मलेस पडते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

हातच्याले सोडून सन्या
पळत्याले धरते.
कष्टकऱ्यांच्या राज्यात
असा कसा कास्तकार मरते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

बहीण द्यायची असन सबसिडी
तर  मी म्हणतो डायरेक
कास्तकाराले  द्यावी .
त्याच्या कष्टाच्या विम्यासह
जीवन मरणाची हमी सरकारनं घ्यावी.

धर्माची नशा
"""""""""""""""

कधी मला वाटलं.
आपल्या लोकांसाठी जगावं.
तेव्हा मला प्रश्न पडला ,
यांनी मला इतकं का छळावं?

तेव्हा मला वाटलं,
स्वतःसाठीच जगावं.
पण मला प्रश्न पडला,
यातच तुझं तू सर्वस्व पहावं?

का जगायचं? कसं जगायचं?
प्रश्न कधी संपलाच नाही.
जगायचं तर सर्वांसाठी!!
अर्थ अजून कळला नाही.

जगायचं तर
राष्ट्रासाठी जगायचं!
राष्ट्रासाठीच मरायचं!
पण प्रश्न पडला!
राष्ट्रासाठी कसं काय जगायचं ?
राष्ट्रभक्तांवर तर जग हसायचं!

म्हणून मी ठरवलं.
जगायचं तर धर्मासाठी!!
तेव्हा मला सर्वच काही मिळालं.
जगातलं भय दूर दूर पळाल.

पण अजून नाही कळालं.
धर्म ही अफूची गोळी आहे.
जेवढी घेतली तेवढी थोडी आहे.
नशेत असलेला देह,
न कधी कोणाला कळला आहे.
म्हणूनच या देशात,
साधू, सन्यासी, साध्वींचा
संसार फार मळला आहे.

धर्माच्या ठेकेदारांनो!!
ही जनता भोळी आहे.
वाकविली तेवढी थोडी आहे.
प्रसंग आला तर
बंदुकीची गोळी आहे.
पण काय करता,
तुम्ही एवढी नशा चढविली आहे की,
त्यावरच तुमची आजची पुरणपोळी आहे.

म्हणून म्हणतो, भक्तजनो!!
खूप झाले देव, धर्म .
भोंदूं साधूसंतांच्या नादी लागू नका.
जगात माय बापाच्या सेवेशिवाय
दुसऱ्या धर्माचा ठेका घेवू नका.


संसारारंभ

बघ! सखे ते जग आपुले.
दूरून दिसती चोहीकडे.
निळ्याश्यार ढगातून त्या
तव प्रितीचा थेंब गळे.

सखे! दूर डोंगराडपल्याड त्या
वाट कशी नागमोडी वळे.
सुख-दुःखाच्या पाऊलखुणांची
बघ! साक्ष त्यात तुला सापडे.

ते बघ! प्रेमाच्या दाट धुक्यातून
दर्शन सुर्यकिरणांचे घडे.
संसारवेलीच्या सुंदर फुलांवर
दवबिंदूचा कसा तो सडा पडे.

बघ सखे ते, किती विचिञ असे,
दान्यांसोबतच पक्षी खाती खडे.
सुखासाठीच दुःख पचविण्याचे
निसर्गातूनच घे तू संसारी धडे.

सुख काय असते ते आज,
बघ सखे! तू माझ्या नयनाकडे.
दुःखास म्हण तू आता,
तूझे वास्तव्य त्या क्षितिजापलिकडे.

सखे साथ मिळाली तुझी
भर तू संसार सुखाचे तळे.
आदर्श व्हावे जीवन अपुले
नसावे कधी त्यात दुःखाचे खडे...

नवराञ

सांग ! माय माझे
तुझे जाते कसे नवराञ?
दुसरीकडे तुझीच बहीण
जगतेय जीवन गलितगाञ.

नऊ दिवस उपास.
म्हणून ती पिते पाणी माञ.
तुझे तर उपवास म्हणजे
असते खाण्याचेच सञ.

देवीच्या नावावर उठवतेस
तू नऊ कन्याचे पाञ.
उपाशा पोटी निघून जाते
तिच्या मुलींची राञ.

अख्ख नवराञ निघून जाते
तुझं मटकनस अहोराञ.
पोट भरण्याच्या विचारातच
तिची निघून जाते राञ.

सांग नं ! माय माझे
देवीच्या कृपेसाठी ती
कशी काय झाली अपाञ?
साविञीच्या लेकीनो !! तुम्ही
कधी समजून घ्याल खरं नवराञ?



बाप!!
बाप !! बाप !!
सगळ्यांनाच असतो बाप.
वाटतोय कधी जो भला ताप.
कठीण समय येता मात्र
आठवतो प्रत्येकालाच बाप.

माय लेकराच्या सुखासाठी
लागते जेव्हा कधी धाप.
या जगात धाव धावणारा.
कळते तेव्हा सर्वानाच बाप ...

बाप असतो उधानलेल्या
खळाळणाऱ्या नदीचा किनारा.
प्रवाहपतित राहून सदा
प्रवाहाला सांभाळणारा....

असतो तो मृगाच्या अखंड धारा,
धारांनी भिजवी संसार सारा.
तर कधी तो असतो
उधाणलेला बेभान वादळवारा,
रक्त नात्यांना जपत
उंच उंच शिखरावर आदळणारा.
तर कधी पायथ्याशीच राहून
उंच शिखरांनाही रडविणारा....

नसतो तो कधी अगतिक
वा परिस्थितीला हरणारा,
असतो तो प्रसंगावधी.
प्रसंगावधान राखून
प्रसंगांनाच जपणारा.....

खरंच  बाप नसतो,
नुसताच बाप!!
वा हाडामासाचा पसारा.
घरी असो वा नसो,
असतो त्याचाच दरारा.....

तो असतो धिरोदात्त,
अनं सर्वगुणसंपन्न सारा.
खरं-खोटं, बरं - वाईट
सारंच काही पचविणारा...

शेवटी एवढंच सांगतो,
बाप! असतो बाप!
खडकाळ माळरानावर
सदा खळाळणारा.
घामेजलेल्या लेकरांसाठी
असतो तो थंड थंड वारा..
असतो तो थंड थंड वारा.....



मायेची माया

राञंदिन करीत कष्ट
म्हणे लेकराले, भलं मोठं शिक.
शिकुन सन्या जगामंदी
बन एक्का इसपिक.

शिकत होतं मायपाशी
तवा होतं ठाकठिक..
कळलं नाही कधी गेलं
करपुन सारं पिक..

माय राहिली कष्ट करत
पोट्ट जावू लागलं पिकनिक.
अर्थपोटी कष्ट करून
माय भलतीस झाली विक.

दिवसा मागून दिवस गेले
पोट्ट्याचे शौक नाही ठराविक.
लाजही नाही राहीली त्याले
त्याची माय मागते भिक.

एकेक रुपयासाठी स्टेशनवर 
रोज माय मागे भिक.
बिघडलेल्या लेकराले पाहून
म्हणे बापू! आता तरी काही शिक.


*कचरावाट*

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा.
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा..

नको येवु माझ्या माघारी
तुला मिळणार नाही आसरा.
पोट कधी भरत नाही
इथे दिवाळी असो वा दसरा...

या निष्ठूर व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारतो आहे चकरा.
जीवन संपलय माझ सारं
आता दिवस उरलेय अकरा..

घे उंच भरारी तू
जसा उडे आकाशी शिकरा.
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा..

संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा.
कचरा वाटेवरुन चालताना
दिसू दे तुझा दरारा.

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा.

जातीविद्वेश*

कोण म्हणतयं?
 
तुमची जात आता संपवा.
संपविणारेच दिसताय आज
पेटवितांना जातीचा वनवा.

जाती धर्माच्या ठेकेदारानो!!
प्रथम तुमची ठेकेदारी थांबवा..
सर्व काही सोडून तुम्ही
माणूस स्वतःला बनवा.

जातीभेद मिटवायचा तर
खरच समतेनेच सर्वांना नांदवा.
जाती-धर्माच्या अहंकारावर
नको कधी कोणाला भांडवा.

थांबवा सर्वत्र उन्माद जातीचा,
मनुष्य जात सर्वांची नोंदवा.
मनुष्याच्या प्रत्येक पिल्यावर
फक्त मनुष्य प्रेम गोंदवा.

उधळून अथवा विझवुन टाका
येथील जातीभेदाचा वनवा.
मनुष्य वंशाचा अंश आपण
प्रथम मनुष्य स्वतःला बनवा.

शाळा, कॉलेज, विद्यापीठाच्या
दप्तरातील जात प्रकर्षाने हटवा.
कलूषित मनामध्ये दाटलेला
जातीद्वेश प्रथमतः घटवा.

समतेच राज्य हे
त्याला समताधिष्टित घडवा.
या व्यवस्थेतील उपेक्षित जे,
प्रथमतः मनुष्य त्यांना बनवा....


श्रमपुञ ....

पिढ्या गेल्या कष्ट करता
या काळ्याश्यार मातीत.
म्हणून आम्हा अभिमान तयांचा
आम्ही जगतोय तयांच्या छातीत.

उधळू जीवन, जावू मातीत.
जगू तयांच्याच पंगतीत.
अभिमान आम्हा, याजन्मीचा
जन्मलोय कष्टकऱ्यांच्या जातीत.

घेवु शिक्षण ,घडवु जीवन,
प्रसंगी शोधू मोती मातीत,
प्रियजनांच्या भल्यासाठी
करू कष्ट दिवस राञीत.....

कष्ट हाच  देव आम्हा
सुसंस्कारलो याच रितीत
घडलोय, बिघडलोय जरी आम्ही
जगलोय सत्याच्याच संगतीत.

कष्टकरी हा धर्म आमचा.
कधी न विभागू कोण्या जातीत.
निर्धनांच्या घरातील कुबेर आम्ही ,
वाढलोय कष्टकऱ्यांच्याच प्रितीत..


वेदना शेतकरी विधवेची

काय धनी तुम्ही बी
किती केलं हलक मन.
भरल्या आयुष्यामंदी तुम्ही
संपविलं आपलं जीवन..

तुमचा जिव माझ्यासाठी
होतं मोठं माझं धन.
असला उभा शेतामंधी तरी
वाटत होत समृद्ध जीवन.

तुमच्या सोबत जगली बाप्पा
घेवुन आशेचा किरण.
आज जरी झोपली उपाशी
उद्या पूर्ण पोट भरणं..

वाटलं नव्हतं धनी
तुम्ही असं कधी करणं.
गळ्याला फास लावुन
मध्येच पत्कारालं मरण.

असा कसा हरालाय धनी
तुम्ही पहाताय का माझा पण?
मी आहे रणरागीनी
सोडणार नाही रण..

वावर, वखर, बैलजोडी
जपलयं तुम्ही धन,
तुमच्या वाचून राहवत नाही
जळतयं सुकलेलं तन...

पोरं तुमची तुकड्याभराची
करतात चिमणीवाणी मन.
बाबाशिवाय त्यांना बी
नकोसं झालयं जीवन.

कसं सांभाळू स्वतःला आता
वेदना होत नाही सहन.
कधी वाटतयं मुलांसह
रचावं आपलं सरण....



 

मुक्तीदाता


तूच सत्यशोधक
तुच  मुक्तीदाता.
आम्हा बहुजनांचा
खरा तुच विधाता,

सत्य हाच परमेश्वर.
मानले तु भगवंता.
सत्यानेच वागावे
हाच तुझा नियंता.

तूच राष्ट्रपिता
तुच विद्यादाता
आम्हा बहुजनांचा
तुच खरा परम् पिता.

मानव विकासाठी शिक्षण
माणले तू आत्मा.
शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा
तुच खरा महात्मा .

माय मराठी

दऱ्या खोऱ्यातून गुंजे मराठी
सह्याद्रीच्या काठी.
मराठीचा महाराष्ट्र तो,
आता ओलांडेल  साठी..

मराठमोळा बाना अन
स्वाभिमान ज्याचे ओठी.
मराठी बोलेल जो,
जागेल महाराष्ट्रासाठी.

'
' मराठीचा सांगेल जो,
त्याची नसेल गोष्ट छोटी.
मराठी बाण्याचा माणूस तो,
जगेल मराठीसाठी.

प्रमाण मराठीच्या आसऱ्यात
बोली बदलतेय छोटी छोटी,
वऱ्हाडी, अहीराणी, कोकणी
अनं झाडीबोली नाही त्यात खोटी

शान, बान, मान मराठी
समृद्ध ती महाराष्ट्राची माती
भारतभूच्या कुशीत वाढतेय
शान महाराष्ट्राची मोठी ...


बिघडली म्हणे पोरं....*

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

कानामध्ये हेडफोन दिसे
 
जसा गळ्यामध्ये  दोरं...
दोरामध्ये अडकून बसला.
कसा राहीन त्यात जोरं.....
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

गळ्यामंधी गळा घाले
रस्त्यावरं पोरी- पोरं .
समजत नाही काय खाव,
आंबट आंबा की बोर..
उडवून देवु म्हणे आता,
तंग जवानीचा बारं.....
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोबाईल साठी पोरगं रडे,
सोडलं त्यानी सारं...
बाप म्हणे गेलं वाया,
बिघडून गेलं पुरं...
आता कसं होईन बाप्पा
सापडे ना त्याला सुरं....

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोठं स्वप्न पाहीलं होतं,
त्याला धाडीन  नागपूर .
माय म्हणे डोंगा डुबला,
राहीलं  स्वप्न अधुरं.
असं बोलताच मायेच्या
डोळ्यांत आला पूरं.....

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोबाईल मध्ये गुंग झाले
माय बाप अनं थोरं.
कुटूंबातलं सुञ संपल,
आँनलाईन झाल सारं.
कसे राहीन दूर आता
मोबाईलपासून पोरं.

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

नवरा म्हणे तुझं आता
हॉटस्पाट सुरु करं.
लाजून सन्या बायको म्हणे 
तुम्ही राहू नका दूर.
जुळलं नाही तुमचं तं
कराल नक्की  कुरबुर...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मायबापाचं मायाजाल पाहून
पोर झाले ढोरं.
आदर भावना संपल्यानं
भासतात जनावर.
बाप झाला चिंतीत आता
म्हणे पाप झालं घोरं..
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

उशीरा का होईना बापाची
आली अक्कल  ठिकाणावर.
जमणार नाही आता म्हणे
पोरं सोडून वाऱ्यावरं..
बायको म्हणे आपल्यामुळेच
वाया गेलं सारं.

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

आता सोडा सगळं तुम्ही
डेटा, इंटरनेट, सर्वर.
बिघडलेली पोरं पाहून
भरुन आला माहा उर...
रक्ताच्या नात्याला देवु
माया-प्रेम भरपूर ..

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

बायको म्हणे धनी,
मी आली भानावर.
वेळ नाही गेली अजून,
घडवू आपली पोरं .
पोरांच्या अधोगतीला,
आहोत आपणच जिम्मेदार...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

पोरांना पाहीजे अन्नपाणी,
माया अनं प्रेम भरपूर
मोहापायी मोबाईलच्या तू
सोडली पोरं वाऱ्या वर...
कळलं नाही काळजं आपली
गेली कधी दूरवर ...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .


अव्यक्त प्रेम

स्पर्श होताच तुझ्या नयनाचा
कळले मज तुझे प्रतिबिंब .
राहील कसा अनभिज्ञ मी,
जाहलो हृदयातुनी ओलाचिंब.

अंतरीचा जखमी भाव माझा
जरी झालाय तुझ्यात बेधुंद,
विवेकाचा जिवंतपणा सांगे,
आता बरा नव्हे हा सुगंध .

झाला उशीर आता,
व्यक्त करण्या तुझे प्रेमबंध.
जग तू निवांत आता.
नको लिहू  खोटा प्रबंध .

दिवस गेले निघून सारे
कधी न कळला प्रेमाचा गंध  .
तु तुझ्यात, मी माझ्यात
स्वतःतच होवु दंग.




*मिञानो!!! काल माझा मिञाने एटिएम च्या लाईन मध्ये उभा असताना कचरा वेचुन उदरनिर्वाह करणारी स्ञी आपल्या मुलीला शाळेत नेवुन पोहचवितांना पाहीली. मुलगी शाळेच्या ड्रेसवर. आई रस्त्याने कचरा (प्लस्टीक बाटल वगैरे ) वेचत रस्त्याने दोन्ही कामे कराताना पाहीली. त्याने तो अनुभव माझ्याशी शेअर केल्यावर मी माझ्या भावना शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला* बरा वाटला तर अवश्य सांगा.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*
कचरावाट*
------------------
जा गं पोरी शाळेत तु
तु शोध मार्ग दुसरा.
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा....!!धृ!!

नको येऊस माझ्या माघारी
मिळणार नाही तुला आसरा
इथे पोट कधी भरत नाही
दिवाळी असो वा दसरा ..
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारते आहे चकरा
संपलय माझं जीवन आता
दिवस उरलेय अकरा.
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

घे उंच भरारी तू
जसा आकाशी उडे शिकरा
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा..
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..
     

संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा
कचरा वाटेवरुन चालतांना
कळू दे तुझा दरारा.
             
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

*प्रधानमंञी साहेब !*

जनसेवेचा लावून रेटा
प्रधानमंञी साहेब!
आपण बदलविल्या नोटा.
पैसा असो खरा वा खोटा
तुमचा निर्णय माञ नव्हता छोटा..

नक्की खरं सांगतो
प्रधानमंञी साहेब!
तुमच्या धाडशी निर्णयानं
ढिला झालाय अनेकांचा फेटा.
सामान्य माणसांचा जरी
वाढलाय थोडा आटापिटा...

भारतातच काय
प्रधानमंञी साहेब !
बँकासमोर सामान्य माणसांचा
आज काय आहे तोटा?
गर्दी पाहून बँक मँनेजरला
यायला लागल्या फिटा..

आश्चर्य वाटलय तेव्हा
प्रधानमंञी साहेब !!!
मुलीच्या लग्नात पाचशे कोटी
खर्च करतात येथे जनार्धन रेड्डी.
दुसरीकडे सैराट मधून
नागराज मंजुळेंना दाखवावी लागते
गरीबाची फाटकी चड्डी..

सार्थ अभिमान वाटतोय
प्रधानमंञी साहेब आपला.
निर्णय क्षमतेमध्ये आज इथे
तुमच्यापेक्षा कोणी नाही मोठा.
समतेसाठी एकदा संपवून टाका
अदानी- अंबानी, बिर्ला अनं टाटा...

चिंता नका करु
प्रधानमंञी साहेब !
इथला सामान्य माणूस
कधी म्हणणार नाही,
झालाय माझा घाटा.
भडकलाच हा प्रभाकर म्हणेल
थांबुन जा रे बेटा..

नम्रपणे विनंती करतो
प्रधानमंञी साहेब !
घ्या निर्णय एकदाचा
जरी कोणी म्हणेल याला पिटा.
या सामान्य माणसासाठी,
काढा सर्व  धार्मिक स्थळांमध्ये
लपविलेल्या सोन्याच्या  विटा.


*मिञानो!!! काल माझा मिञाने एटिएम च्या लाईन मध्ये उभा असताना कचरा वेचुन उदरनिर्वाह करणारी स्ञी आपल्या मुलीला शाळेत नेवुन पोहचवितांना पाहीली. मुलगी शाळेच्या ड्रेसवर. आई रस्त्याने कचरा (प्लस्टीक बाटल वगैरे ) वेचत रस्त्याने दोन्ही कामे कराताना पाहीली. त्याने तो अनुभव माझ्याशी शेअर केल्यावर मी माझ्या भावना शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला* बरा वाटला तर अवश्य सांगा.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*
कचरावाट*
------------------
जा गं पोरी शाळेत तु
तु शोध मार्ग दुसरा.
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा....!!धृ!!

नको येऊस माझ्या माघारी
मिळणार नाही तुला आसरा
इथे पोट कधी भरत नाही
दिवाळी असो वा दसरा ..
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारते आहे चकरा
संपलय माझं जीवन आता
दिवस उरलेय अकरा.
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..

घे उंच भरारी तू
जसा आकाशी उडे शिकरा
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा..
           
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..
     

संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा
कचरा वाटेवरुन चालतांना
कळू दे तुझा दरारा.
             
जा गं पोरी शाळेत तू
             
तू शोध मार्ग दुसरा..



*पाटीलकी(प्रवृत्ती )*
------------------------------
काय पाटील तुमची लेकरं
किती निघाली वाह्यात,
तुमचीच खेटरं नाही
आज तुमच्या पायात.

घरी दारी, गावात गल्लीत
तुमचा भलताच होता तोरा,
म्हणाल का कधी तरी लेकराले
सुधरुन जारे पोरा.....

सोडा तुमचा परंपरेचा
पाटीलकीचा बाणा,
घरी खायले नाही दाना
अनं म्हणे मले पाटील म्हणा.

गेली पाटीलकी तुमची
राहीला नुसता माज,
मेलेल्या गाईला आता
कशाला चढवता साज......

समतेच राज्य आलं
आता समतेनच वागा...
गरिबाची लेकरं नाहीतर
दाखविल तुम्हाले जागा...

करा बंद ! वाजविणं
आता पाटीलकीचा वाजा.
होवु द्या! समाजव्यवस्थेला मान्य
सर्वांच्या  समान जागा.... सर्वांच्या  समान जागा...... 

*
मिञानो!! ही माझी कविता भारतीय समाजात समानता प्रस्थापित करण्यात महत्त्वाचा अडसर ठरलेल्या  प्रवृत्ती वर प्रहार आहे. की जी आजही लोकशाही व्यवस्थेत काही प्रमाणात मुळ धरून आहे.*

आई
सर्वस्व आहे तुझंच आई
काय आहे माझं
साथ तुझी या जीवास
कमी काय आज.....

घडलो बिघडलो आई
जसा चढेल जीवास साज
वागलो तसाच आई
तुला येणार नाही लाज....

शपथ तुला या तुकडयाची
जरी गेला तुझा आवाज
सर्व मिळाले तुझ्या कृपेने
तरी चढणार नाही माज....

रक्षाबंधन
-------------
पुढ कर रे हात दादा
बांधते तुला  राखी
रक्षाबंधनाच्या सणाची मी
वाट बघत होती सारखी........

साक्ष आहे या नात्याची
साथ माञ जन्माची
या राखीच्या धाग्यानेच
रक्षिली रे लाज बहीणीची......

समजू नकोस याला तू
एक अर्थहीन धागा.
सांगी हृदयात या बहीणीच्या
प्रथम तुलाच  रे जागा......

तुटला जरी हा धागा
मखमली रेशमाचा.....
जपून ठेव ठेवा
या बहीणीच्या अतुट प्रेमाचा....

सर्वच दिलं दादा  तू
पुन्हा काही नाही बाकी....
पुढं कर रे हात दादा
बांधते  तुला  राखी....... बांधते तुला राखी.....


कर्तव्यदक्ष जवान

मी राष्ट्रसेवक
मीच खरा देशभक्त
राष्ट्रसेवेच्या अग्नीकुंडात
सदा अर्पितो माझं रक्त.

देश असो वा परदेश
सदा शत्रू कडेच लक्ष.
राष्ट्र कार्यातच दक्ष मी.
मात्र संसारातच दुर्लक्ष​.

राष्ट्रच माझं कुटुंब,
तेच जीवनाचे मर्म.
माणूसकीला जपणारे
सदा करतो मी कर्म.

राष्ट्रसेवा-जनसेवा
हाच मी मानतो स्वधर्म
सीमेवर लढतांना
फक्त जानतो राष्ट्रधर्म.


गद्दारानो!!

देशोदेशीचे
संपविले पुतळे
म्हणून  काय
विचार संपविणार तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही ?


आदर करताच येत नसेल तर
त्यांचा अपमान तरी
का करता तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही?

सिमेंट दगडांचे तोडले पुतळे
म्हणून माणसं
बदलविणार काय तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही?

विरोधी विचारावर
विश्वासच नसेल तर
पुतळ्यांना प्रतिक
का मानतात तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही ?

जन्मालातुम्ही
माणूस म्हणून तर,
माणसावर विश्वास
कधी ठेवणार तुम्ही?
या मातेच्या गद्दारानो !
कधी सुधारणार तुम्ही?




((कर्मयोगी गाडगे बाबा जयंती निमित्ताने त्यांच्या निष्काम कर्मसाधनेला व समाज सेवेला वंदन करुन त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या संतांना माझा सलाम )

लज्जित संतपरंपरा


खूप झाले आता बाबा!
साधू, संत अन् बापू.
लागले दिसू त्यांच्यामध्ये
चोर, लुटेरे, खिसेकापू

जिकडे तिकडे दिसतात बाबा!
साधू साध्वी अन् महान बापू.
सत्संग, किर्तनाच्या नावावर
लागले अमाप पैसा छापू.

पैशाच्या गाद्यांवर बाबा
लागले संत आमचे झोपू.
घेतला आखून प्रत्येकानेच
हक्काचा आपला टापू.

प्रत्येकाच्या टापू मध्ये बाबा!
लागला भक्तगण रात्रंदिन खपू.
भक्तांच्या परीश्रमावर संतांचा
लागला व्यापार विश्व व्यापू.

सत्संगाच्या नावावर बाबा!
बनविले यांनी आपले कम्पू.
गोमुत्र, औषधच काय?
विकू लागले लिपस्टिक-शाम्पू .


संत नावाचा व्यापार पाहून बाबा!
वाटते कधी चांगले यांना झापू.
भिती ही वाटते बाबा यांची
काही बाळगतात धारदार चाकू.

महाराष्ट्राच्या संत परंपरेला
लागलेला कलंक पाहून,
डोकं माझंही लागलं तापू.
लाजही वाटते गाडगे बाबा
आधुनिक संत परंपरेत
तुमचं नाव कसं छापू.......


शिवराय

माय मराठी, माती मराठी
सह्याद्रीच्या काठी
शिवनेरीवर बाळ जन्मले
स्वराज्य निर्माणा साठी.

शिवराय त्याचे नाव ठेवले
दनकट होती काठी.
स्वराज्य निर्मिले त्याने
देश कल्याणा साठी.

रयतेचा विश्वास जिंकला
त्याने राष्ट्रप्रेमा पोटी.
युद्धनीती अन् राज्य चालविले
केवळ जनकल्याणा साठी.

स्वराज्याचा छत्रपती तो
बनला रयतेसाठी.
मराठीचा प्रत्येक मावळा
लढला छत्रपती शिवरायासाठी.


डॉ . सुधीर तारे

चमकदार सदा आपण
जोपर्यंत असेल
चंद्र सूर्य अन्  तारे
गगनात घुमती जसे
सुसाट नक्षत्र अन् वारे.

अविरत चालणारे
आपले संशोधन ते
सदा बुद्धीला बळ देणारे.
देश विदेशाशी नाते सांगताना
स्वत्वाचे गीत गाणारे.

अखंड झळकू द्या.
तो आसमंत अनं
वाहू द्यावे आपलेच सदैव वारे.
सलाम करतील आपणास
सिनेतारका अन्  तारे.

ख्यातीने व्यापले आता
देश परदेश अन् विश्व सारे
अभिमान आम्हाला आमचा
असे आहेत कोण तर
एकमेव आमचेच डॉ. सुधीर तारे.
तळपता तारा


अनंत उपकार आपले साहेब
काय वर्णावे आपल्या कार्या.
आम्हा सोबत असे एक तारा
सांगावे वाटते आता त्या सुर्या.

दिवसराञ जो असतो प्रकाशित
आपणास खरी जगाची चिंता.
विश्वकार्यात सदा तत्पर आपण,
आदर्श असे आम्हा बुध्दीवंता.

कधी न विझेल आमचा तारा.
जोपर्यंत असेल चंद्र, सुर्य, वारा.
विश्वकार्यात दिपस्तंभ आम्हास
असेल डॉ. सुधीर नावाचा तारा....

       
आपल्या विचाराचा अनुयायी
                 
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया

”kCn eghek

“kCnp vlrkr lqbZ /kkxk
Rkj d/kh /kkjnkj dk=h
Okkijk lnSo R;kauk
d:u izlaxkphp [kk=h-

fopkjkarh fu?kkysyk “kCn
g`n;k”kh tkoqu fHkMrks
lqbZ /kkxk c.kwu ek.klkryk
Ekk.kwl ek.klkyk tksMrks-

HkkousP;k Hkjkr fu?kkysyk “kCn
d/kh dk=hizek.kss dkirks-
fujijk/k eukyk NsMwu
Ik”pkrki djk;yk ykorks-

“kCn vlkok usgeh izseG
vla izR;sd thokyk okVr;a
dGr ukgh xksM cksyk;yk
dk dks.kkpa dkGht QkVra;








 सज्जन...


वास्तवाची कास! सत्याचा तो ध्यास !!
करावा अभ्यास ! सज्जनानी..!!!!

सज्जन तो देव ! सांगे सत्यदेव !!
करावा प्रचार ! सज्जनानी !!!!

सत्याचे जयास ! व्हावे अपचन !!
त्यास न भान ! कार्याचे!!

समजून घ्यावे! त्यांचे ते संघटन
ठेवावी जाण ! सज्जनानी !!!!

करी जो सत्याचा! प्रचार प्रसार
उपहास तयांचे ! जीवनाचे सार

पदोपदी जरी ! होई अपमान
सोसावा संसार !!  सज्जनानी  !!!!

विरोधक लाविती! पदोपदी लांच्चन!!
द्यावा सन्मान !! सज्जनानी !!!!

भासवी दुर्जन ! जसे ते सज्जन
पूजती सारे जन ! दुर्जनाशी !!

अवती भोवती ! दुर्जनाचे वन !!
न सोडावा गुण ! सज्जनांनी

एकाकी जगता ! समाजी जीवन !
न ढळावे मन ! निश्चल

नसावी ती खंत ! सज्जनाशी

राग वा लोभ
निधळ्या छातीने ! री जो वर्तन
त्यास म्हणे सारे ! सज्जन !!




अर्थ वैधव्याचा..

सांग तुझ्या वैधव्याचा
मी काय काढू अर्थ.
स्वप्न तुझे साकारतांना
जीवन गेलं काय माझं व्यर्थ ...

तुझ्याच साठी जगणे-मरणे,
होता काय कधी माझा स्वार्थ?
तुच समजू शकते सखे
माझ्या जीवनाचा सत्य परमार्थ.

समजून चुकली असेल तर
सखे, जगास सांग एकदा!
माझ्या जगण्याचा मतितार्थ.
तुझ्याच सुखाशिवाय शोधला का
माझ्या जीवनाचा सर्वार्थ.

आज मुडदा पडलो तरी
ऐक माझ्या आत्म्याची हाक आर्त.
प्रत्येक क्षण जगलो मी
जो कधीच नव्हता व्यर्थ .

सांग सखे! माझ्या मरणाचा
तू काय काढलास अर्थ.
मी जगलो असेल तुझ्याच साठी
तर आता का रडते व्यर्थ ?









सत्यधर्म
-----------

जगी असावा एकची
माणूसकीचा धर्म
सत्याने वर्तावे
हेच त्याचे मर्म ....

सत्य हाच देव
मानावा सदैव
असा ज्याचा भाव
त्याचाच खरा देव ......

देव नाही दगडी
बदलावा मनोभाव
देवाचा सहवास
मनालाच ठाव.......

जाणून ब्रम्हांड
सोडा सर्व पाखंड
होतील सर्व थंड
जगातील धर्ममार्तंड.

एकची पिता परमेश्वर
सांगी सर्व धर्म
आचरावा सर्वांनी
सार्वजनिक सत्यधर्म.........



”kCn eghek

“kCnp vlrkr lqbZ /kkxk
Rkj d/kh /kkjnkj dk=h
Okkijk lnSo R;kauk
d:u izlaxkphp [kk=h-

fopkjkarh fu?kkysyk “kCn
g`n;k”kh tkoqu fHkMrks
lqbZ /kkxk c.kwu ek.klkryk
Ekk.kwl ek.klkyk tksMrks-

HkkousP;k Hkjkr fu?kkysyk “kCn
d/kh dk=hizek.kss dkirks-
fujijk/k eukyk NsMwu
Ik”pkrki djk;yk ykorks-

Anudanq

0Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man


ixkuun sv+n va!lay hota
saheb, maStrkIca man
gavam.dI srjI Mh`Un
va!lI hotI xan
kay kamacI xan man
saheb, po3asa#I pahIje
wajI wakrIc dan
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man

bap Mh`e vy zal.
6rat sun Aa`
posUn 6e{n lek Mh`Un
AxI Aahe mazI qandan
Laaj va3lI teVha saheb
Baayko posu xkt nsLyacI
zalI jeVha ja~a
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man

qup paihlIy SvPn
saheb, maStr Mh`Un
]wI krIn Mh`l,
Aayu*yacI kman
A@yaR Aayu*yam@yec Aata
zuklIy k.br Aa`. juban
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man


AjunhI ve; gelI nahI saheb
Aata trI ´a Anudan
bakI kahI nahI p~a
ix_(ak Mh`Un trI
ko`I bap krel kNyadan
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man-

lok. Mh`e smajam@ye
maStrkIca mo#a man
k;Un cukly jIvnat saheb
iktI 7o3a Asto ANnape(aa man
[kDehI La(a ´a saheb
wrLya po3an. im;iv`. Mh`to
maStrkIca sNman
Anudan deta ka
Saaheb Anudan,
Yaa AnudanapayI Aata
zuklIy mazI man-



Ekrhghu ek.klk

cSy Eg.ks, cSrkGk!
vla dla >kya
brda pkaxya thou     
vkiY;k uf’kch vkya-

fi<;kafi<;k xsY;k vkiY;k
xkMs vks<w vks<w
okVya uOgra d/kh
vki.k vkiya dke lksMw

d”V करु करू ek.klk
thou dla cstkj केya
‘ksoVP;k {k.kkys rj
Vde/;s चढवून दिya-

rjh Eg.kya ek.klkys
vkiyh n;k d’kh vkyh
letwu pqdya vkrk
R;kph erh [kjkc >kyh

thouHkj ?ksrys d”V
jDrkpk Fksac ua Fksac ‘kks”kyk-
gkMekl [kk.;klkBh vkrk R;kus
ek>k nsggh dRry[kkU;kr vkuyk-

dk; js fopkjh ek.klk rw
bRkdk dlk y;kyk xsyk
vUunkR;kpkp okij rw
ljkZl [kk.;klkBh lq: dsyk---------




“kCn vlkok usgeh izseG
vla izR;sd thokyk okVr;a
dGr ukgh xksM cksyk;yk
dk dks.kkpa dkGht QkVra;


शिक्षक बिनपगारी

काय सांगू भाऊ आता
शिक्षकाची बिनपगारी व्यथा
फुकटामंदी दिवस चालले
खाता खाता लाथा..

शाळा,संस्था,  मंञालयात
आता चाले त्याच्याच बाता
बिनपगारी करायची आहे का
घरी जाता आत्ताच्या आता...

दिवसा मागून दिवस चालले
झिजलाय पायातला ज्युता.
तरी हरामखोर संस्थापक म्हणे
अजून दिला नाही चवथा हप्ता....

केस झाले पांढरे शुभ्र
किड लागली दाता.
बिनपगारी जीवन चाललय
संपल्या नाही व्यथा....

बायको  गेली माहेरी
विचारी तिला तिची माता
जावयाले पगार नाही
भाकर कशासोबत खाता..

बायको बिचारी परेशान झाली
ठनकलाय तिचा माथा
चला धनी मरु दोघ बी
संपवु सारी कथा .... संपवु सारी कथा...

हिम्मत नका हारु मालकीन
आहे शिक्षकी बाना
समजून घ्या सावित्री स्वतःला
आता मला ज्योतिबा माना.....

सोबत रहा तुम्ही तरी
घडवुया राष्ट्राचा कना
आपण मेल्याने वांझ व्यवस्थेला
कधी फुटणार नाही  पान्हा.....

जिवंत राहू मरेपर्यंत
शिक्षणाचा चालवु कारखाना
नसावी कधी शब्दांत लाचारी
दाखवू शिक्षकी बानेदारपणा

---+-++++++++++
  डाँ प्रभाकर  लोंढे    गोंदिया-चंद्रपूर
---------------------------


धर्माची नशा
"""""""""""""""

कधी मला वाटलं.
आपल्या लोकांसाठी जगावं.
तेव्हा मला प्रश्न पडला ,
यांनी मला इतकं का छळावं?

तेव्हा मला वाटलं,
स्वतःसाठीच जगावं.
पण मला प्रश्न पडला,
यातच तुझं तू सर्वस्व पहावं?

का जगायचं? कसं जगायचं?
प्रश्न कधी संपलाच नाही.
जगायचं तर सर्वांसाठी!!
अर्थ अजून कळला नाही.

जगायचं तर
राष्ट्रासाठी जगायचं!
राष्ट्रासाठीच मरायचं!
पण प्रश्न पडला!
राष्ट्रासाठी कसं काय जगायचं ?
राष्ट्रभक्तांवर तर जग हसायचं!

म्हणून मी ठरवलं.
जगायचं तर धर्मासाठी!!
तेव्हा मला सर्वच काही मिळालं.
जगातलं भय दूर दूर पळाल.

पण अजून नाही कळालं.
धर्म ही अफूची गोळी आहे.
जेवढी घेतली तेवढी थोडी आहे.
नशेत असलेला देह,
कधी कोणाला कळला आहे.
म्हणूनच या देशात,
साधू, सन्यासी, साध्वींचा
संसार फार मळला आहे.

धर्माच्या ठेकेदारांनो!!
ही जनता भोळी आहे.
वाकविली तेवढी थोडी आहे.
प्रसंग आला तर
बंदुकीची गोळी आहे.
पण काय करता,
तुम्ही एवढी नशा चढविली आहे की,
त्यावरच तुमची आजची पुरणपोळी आहे.

म्हणून म्हणतो, भक्तजनो!!
खूप झाले देव, धर्म .
भोंदूं साधूसंतांच्या नादी लागू नका.
जगात माय बापाच्या सेवेशिवाय
दुसऱ्या धर्माचा ठेका घेवू नका.

*********************

डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर..


dtZekQh

dk okjaokj tkghj djrk
lkgsc rqEgh “ksrdÚ;kyk dtZekQh
v'kh ;kstuk cuoqu Vkdk
th vlsy loZO;kih-

rqeph dtZekQh Lohdk:u
vkrk ykpkj cufo.;k f”kok;
“ksrdÚ;kr mjya dk; ckdh
fdrh fnol ns.kkj lkgsc
lqdysY;k >kMkys ik.kh-
rqeph fjdkeh Vkdh


LoRo

dk txrsl\
esa<jk lkj[kh-
tx.ka rq>a cnywu Vkd-
utjsr Hkjsy vla thou]
,dnk rjh txwu igk-

,dkdh txfyl rjh
dks.kh Eg.ksy] ok?kh.k rqyk-
dj.kkj ukgh Logk-
thou dla ok?kklkj[ka]
{k.kHkj rjh txwu igk-

thouokVsoj txrkauk
[kqi HksVrhy esa<ja rqyk
Lotkrh; letwu 
Eg.krhy R;kaP;kizek.ks jgk
lkscr vkgs ok?kkph rw
vksG[k vkiyh tir jgk-

ts dkgh txf’ky
tso<a dkgh txf’ky
vLrhRo vkiya tiwu jgk-
vLrhRokP;k y<kbZr rqb;k]
avksG[k rq>h nk[koqu tk



मायेची माया

राञंदिन करीत कष्ट
म्हणे लेकराले, भलं मोठं शिक.
शिकुन सन्या जगामंदी
बन एक्का इसपिक.

शिकत होतं मायपाशी
तवा होतं ठाकठिक..
कळलं नाही कधी गेलं
करपुन सारं पिक..

माय राहिली कष्ट करत
पोट्ट जावू लागलं पिकनिक.
अर्थपोटी कष्ट करून
माय भलतीस झाली विक.

दिवसा मागून दिवस गेले
पोट्ट्याचे शौक नाही ठराविक.
लाजही नाही राहीली त्याले
त्याची माय मागते भिक.

एकेक रुपयासाठी स्टेशनवर 
रोज माय मागे भिक.
बिघडलेल्या लेकराले पाहून
म्हणे बापू! आता तरी काही शिक.



डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर 

निर्धार

क्षणालाही घाबरत नाही
जरी उभं केलं मृत्युच्या दारात.
यमालाही परत पाठविण
एवढी हिम्मत ठेवतो उरात.

हिम्मत आहे सत्याची
ज्याचे संस्कार झाले घरात.
मोडेल पण वाकणार नाही
वाढलोय अशांच्या उदरात.  

होवू द्या वेदना कितीही
जोपर्यंत जीव असेल जीवात.
तत्वांशी ती तडजोड नाही
या उभ्या जन्मभरात. 

विरोधक असो वा विध्वंसक
असू दे कितीही जोरात.
अगतिकता वा लाचारी
नसेल कधी स्वरात.

होवू दे आघात कितीही
वा निघू दे मृत्यूची वरात.
ईश्वराशिवाय कोणालाही
भिक मागणार नाही पदरात.

 डां प्रभाकर लोंढे गोंदिया ९६७३३३८६९६३


eq[;ea=h lkgsc

Lkkaxk eq[;ea=h lkgsc
rqEgh dqBya [kkrk vUUk-
rqeph /kksj.ka ikgwu ek>a
eLrd >ky; lqUu-

rqEgkyk dla dGr ukgh
‘ksrdjh jkT;kpa vax vfHkUu
‘ksrhlkBh ejh ejrks rks
fnlrks; vkt dkGk dfHkUu-

tkghjukekrwu okVya gksra lkgsc
rqEgh vkEgkis{kk ukgh dqBs fHkUu
i.k okVr; vkrk ‘ksrdÚ;kys
rqEgh djrk fNUu fofNUu

d/kh nkcqu ikgya dk lkgsc!
‘ksrdÚ;kaP;k gkrkrya :eUUk
d”B d:u vkY;koj jk=h
d’kh >ksi ykxrs lUu-

‘ksrdÚ;kapaa dtZekQh djrkauk
jkT;kph frtksjh vkgs Eg.krk BUu-
jsYosLVs’kuoj Qzh ok;QkW; ykorkauk
rqeph frtksjh d’kh oktrs [kUu

RkqeP;k jkT;kr lkgsc
‘ksrdÚ;kuh txkoa dh ejkoa\
,dnk Li”Vp Lkakxwu |k !
rqepa dk; vkgs Eg.kua-

rqeP;k fodklkfHkeq[k
jkT;kryk ‘ksrdjh esyk rj
m|ksxirh] dkj[kkunkj
fidfo.kkj vkgs dk vUu-

rqeph /kksj.ka ikgwu lkgsc
ek>a eLrd >kya; lqUu-

gsgh vo’; lkaxk lkgsc
;k vkiY;k dk;|kP;k jkT;kr
fot; ekY;k vkua pksj yqVsjs
yqVwu fons’kkr dls iGrkr nUUk-

rqeph /kksj.ka ikgwu lkgsc
ek>a eLrd >ky; lqUu-

eh Eg.krks rqEkP;klkj[ks
m/nkjdrsZ ‘ksrdÚ;kaps\
vlkos lnk izlUu-
R;kP;klkBh rjh tkxk lkgsc!
T;kpaa [kkrk vUu-

lRrk ;srkp rqEgh lkgsc
cksyr gksrs dls lUu
rqeph /kksj.k ikgwu okVrs
‘ksrdÚ;kauh can djkoa rqepa vUu


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
dk; lkaxq xq:th rqEgkys
Egk;k ckG;kph xr
nksu o”kkZiqohZ gksrka dlk\
>kyak vkrk izxr-

‘kkGsr djrk rqEgh
R;kph jkst vkokHkxr-
dj.kkj vkgs Eg.ks rqEgh
laiq.kZ egkjk”V izxr

ikVh&iqLrd] nIrkjkauh]
ukgh eqykapa vkrk Hkkxr-
dsya Eg.ks R;kuah
fMthVy bafM;kpa Lokxr

vla dk; djrk lj
cksyqu] fygwu]xkoqu
O;Dr djrks rks Loxr

?kjh nkjh R;kpa lq:

dla jkghua vizxr
loZ >kya Loxr


Lokeh

/kU; eh
lkekU; eh
nqfu;sP;k pdzO;qOgkrhy
pdkdrk rkjk eh-------

nkVrk, ngkMrk
Lor%rhy Lo;aHkw eh-
czEgkaMkrhy ladze.kkr
fo’o’kDrhpk izsf’kr eh---

lalkj lkxjkr
osnuk, laosnuk eh
thouosyhP;k Qqykryk
lqxaf/kr rks edjan eh---

fuekZR;kpk va’k eh ]
R;kpkp rks na’k eh]
l”VhP;k fnXn’kZdkyk
visf{kr uVlezkV eh---

O;ogkj
O;ogkj
gk O;ogkj vlrks
d/kh m?kM
rj d/kh
iM|k vkM vlrks---

rks d/kh lR;klkBh
vfojr pkyysyh /kMiM
rj d/kh
lR; yifo.;klkBhph
ykacypd iGkiG vlrks -                            
dks.kh dks.kk’kh dlk
djkok rks O;ogkj
gk rj T;kpk R;kpk
iz’u [kktxh vlrks---
i.k [kja lkaxq
izR;sdkpk izR;sd O;ogkj
brjkauk izHkkfor d:u tkr vlrks   --------------------------------
Eg.kwu Eg.krks
O;ogkj vlkok vkRefu”B
Uklkok rks vrh fDy”B
rqEgh  vlk Js”B ok dfu”B
O;ogkj vlw |k lnk lR;fu”B ---------------------------------





f’k{k.k eghek

fo|sfo.k ekuo
rks rj Ik’kqleku
d:uh lokZauh fo++|ktZu
djkos vKkukp ektZu! ~

f’k{k.kkps lkoZf=dj.k
ekukok lektkpk ik;kHkj.k
``````````````````````````````tk.kwuh fodklkps dkj.k
vk[kkoh r’kh /kksj.k!~`````````````````

fL=;kauk rs f’k{k.k
|kos iq:”kk leku
f’kf{kr v’kk lektkr 
ckyds tUerhy xq.koku

misf{krkaP;k nq%[kkps dkj.k
fofo/kkaxh rs R;kaps vKku
ek.kwu r;kl nq%[kkps dkj.k
djkos r;kps ifjektZ.k !

t;k vaxh Kkuxq.k
u igkoh R;kph mRiRrh[kku
Ogkok R;kpk loZ= lUeku
Lkkaxqu xsys T;ksfrjko egku


Lkekt cusy   
vkgs rks dqVwackpk Lokl
lk/kko;k lektkpk fodkl
/kjkoh lokZauh R;kph dkl      

u ikGkoh vLi`’;rk
dGkoh lokZauk lokZaph O;Fkk
Kkuh gksoquh lokZauh
loZKk pj.kh Vsdkok ekFkk !``````````````````````````````````````````````````````````` T;ksrh Eg.ks






लगीनगाठ
आहोत साक्षीदार आम्ही
अनमोल या क्षणांचे
फुलावे बहरावे आपण
असे सुभाशिष सर्वांचे.


जगावे बेधुंद  जीवनात
कधीही क्षण नसावे दुःखाचे
सुखात जरी नसलो साथ
दुःखात स्मरण असावे सर्वांचे

फडफडू द्या पंख अपुले
सरभरल्या संसाराचे.
उदंड जगा आयुष्यमान ते
सार्थक व्हावे जीवनाचे.

स्वीकारा पतीपत्नी उभयता
व्हावे आदर्श समाजाचे.
अभिमान वाटावा आम्हा
आम्ही साक्षीदार आपल्या लग्नाचे     




जरी नसलो साथ
 आपण