Monday, December 2, 2019

महाराजा यशवंतराव होळकर समजून घेण्याची गरज.

🇮🇳🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🇮🇳
महाराजा यशवंतराव होळकर समजून घेण्याची गरज.
                      *डॉ प्रभाकर लोंढे*

           थोर राष्ट्रभक्त महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज जन्मदिवस! जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तित्व, कर्तुत्व, विचार, राष्ट्रभक्ती आणि पराक्रमाला सलाम करतो आणि या समाजव्यवस्थेतील पारंपारिक अप्रत्यक्ष जातीयवादी व्यवस्थेमध्ये जगत असताना थोर पराक्रमी यशवंतराव होळकर यांची जातीनिरपेक्ष खरी ओळख समजून घ्यावी ही विनंती करतो.

 *महाराजा यशवंतरावांचे श्रेष्ठत्व कशात आहे?*

              भारतीय इतिहासाला यशवंतराव नावाचं पान जोडला गेलं ते केवळ एक व्यक्ती म्हणून नाही किंवा एका राजवंशातील पुरुष म्हणून नाही तर विपरीत परिस्थितीमध्ये प्रसंगावधान राखून स्वतःच्या राजवंशाचा नाश थांबविण्याचा व होळकरांचे बलाढ्य साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी टपलेल्या गिधाडांना धडा शिकवून स्वतःच अस्तित्व कायम टिकविण्याचा, त्याही पेक्षा इंग्रजांचा धोका ओळखून राष्ट्रीय भावना जपण्याचा महाप्रलयकारी प्रयत्न *ज्या (दुर्दम्य आशावाद तसेच पराक्रमी) मनगटातून व स्वाभीमानी वृत्तीतून घडला तो म्हणजेच महाराज यशवंतराव होळकर.*

 *राजकीय परिस्थितीवर मात.*

    एकीकडे इंग्रजांच्या रुपाने भारतावरील संकट, पेशवाईचा (ब्राम्हण) उन्माद व मराठेशाहीचा (मराठे- शिंदे) अतिरेक झाला असताना होळकरशाहीची (धनगर) अस्मिता धुळीस मिळवण्याचा प्रयत्न कदाचित हेतुपुरस्सरपणे या दोघांकडून (शिंदे व पेशवे) संगनमताने सुरू होता. थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या  मृत्युपासूनच यांची नियत फिरलेली होती. राजमाता अहिल्याबाई होळकरांनी यांना जोरदार धडा शिकविला. त्यांच्या मृत्यूनंतर होळकर साम्राज्य सांभाळण्याचे कार्य तुकोजीराव होळकर यांनी केले. केवळ दोनच वर्षात *तुकोजीराव होळकर यांचा मृत्यू झाला. त्यांचे १) काशीराव, २) दुसरे मल्हारराव, ३) विठोजीराव व ४) यशवंतराव असे चार मुले होती.* परंतु त्यांना  दासीपुत्र, अनौरस संतती अशा नावाने हीनवण्याचा व होळकर वंशात भांडणे लागतील, या दृष्टीने वारंवार प्रयत्न केला जात होता. तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर वारसा संबंधाने होळकरशाही मध्ये हेतूपुरस्सर कलह माजवला गेला. त्यासाठी साम, दाम, दंड, नीती, भेद या सर्वांचाच सहारा घेतला गेला, यातून पेटलेला संघर्ष इतका महाभयंकर होता की, *पेशव्याकडून शनिवारवाड्यावर विठोजी राजेंचा निर्दयपणे खून करण्यात आला. शिंदे यांच्या सैनिकाकडून झालेल्या अचानक हल्ल्यामध्ये मल्हारराव दुसरा मारला गेला.* दोन कर्तबगार भाऊ मारले गेले. सोबतच होळकर वंशातील स्त्रिया- मुलांना बंदिवासात टाकण्यात आले. *काशीराव पेशव्यांच्या गोटात जावून बसला होता.* आता आशा बाळगू शकेल असा फक्त यशवंतराव बाकी होता. होळकर राजवंशाची वाताहत झाली होती. त्यामागे एकच उद्देश होता हे स्पष्ट होते, *तो म्हणजे होळकरांचा (धनगरांचा) राजकीय वारसा समाप्त करणे.*
           एकूण प्रकरणांत होळकर राजवंशातील अस्थिरतेला खतपाणी घालण्याचे सातत्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रयत्न पेशव्यांनी व दौलतराव शिंदे कडून झाले. त्यांची संपूर्ण नजर होळकर साम्राज्याच्या समृद्धीवर होती. त्यांनी *दुबळ्या काशीरावाला हाताशी धरून होळकरांचे एक एक महाल ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. तोपर्यंत मालक पेशवे आपल्याला होळकर राजगादीचा वारस घोषित करतील या खोट्या आशावादात होळकर वंशज काशीराव जगत होता* . त्याच्या माध्यमातून होळकरांचे प्रदेश, महाल ताब्यात घेण्याचा सपाटा शिंद्यांनी लावला होता, ही बाब त्याच्या लक्षात आली नाही.
     या सर्व बाबींमुळे *होळकरशाही लयास जाते की काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना तो यशवंतरावांच्या स्वाभिमानाला डिवचत होता.* त्यातून महान पराक्रमी यशवंतराव होळकरशाहीचा तारणहार म्हणून पुढे आला. त्यानी आपली सुटका करून घेतली व स्वत:च सैन्य उभारलं. *होळकरांचे शिंद्यांनी ताब्यात घेतलेले प्रदेश मुक्त करण्याचा विडाच उचलला. पेशवे शिंद्यांची दानादान उडवत होळकरशाहीला पुनर्वेभव मिळवून देत भारतात राष्ट्रीय भावना सुद्धा जपण्याचा प्रयत्न केला.* इंग्रज भारतात स्थिरावणार नाही, यासाठी *स्वातंत्र्य संग्राम उभारणारा प्रथम स्वातंत्र्ययोध्दा म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहासात उल्लेख केला जातो.*

 *_यशवंतरावांचे असामान्यत्व._*

         यशवंतरावांनी पेंढाऱ्याचं सैन्य उभं केलं. एकट्याच्या भरोशावर आपल्या होळकर राजघराण्यातील प्रश्र्न सोडविले, *भारत इंग्रजांच्या तावडीत जाणार नाही याचा पूरेपूर प्रयत्न केला. इंग्रजांच्या फौजेची दाणादाण उडवली. त्यावेळी पेशवे व शिंदे यांनी यशवंतरावांचं ऐकलं असतं तर इंग्रजांच्या नावाने दीडशे वर्षाचा इतिहास या भारत भूमी मध्ये लिहिला गेला नसता.* सोबतच अख्या महाराष्ट्रावरच नाहीतर संपूर्ण भारतावर आपल्या न्यायिक राजसत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या होळकरशाहीचं पुनरुज्जीवन केलं. म्हणून  *महाराजा यशवंतराव होळकर खर्‍या अर्थाने राष्ट्रपुरुष ठरतात* . त्यांचा पराक्रम, दुरदृष्टी, राष्ट्रीय भावना यांना आज मी विनम्र अभिवादन करतो. तो काळ पेशवाईचा होता. होळकर ( धनगर) संस्थान सर्वाधिक समृद्ध होत. त्याचा नाश व्हावा. सर्व संपत्ती, प्रदेश आपल्या अधिपत्याखाली यावा. असे शिंदे आणि पेशव्यांना मनोमन व कृतीतून वाटत होतं. त्या *घाण विकृत मनोवृत्तीला धडा शिकवून इंग्रजांसारखे परकीय येथे नकोत अशी राष्ट्रीय भावना जपणारा एक राष्ट्रपुरूष म्हणून यशवंतरावांकडे भारतातील इतिहासकारांनी पहावं.* हीच आजच्या प्रसंगी अपेक्षा.....

 *जय यशवंतराव !!*

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Sunday, November 24, 2019

एकूण राजकीय घडामोडी मध्ये धनगर कुठे?

👁👁👁👁👁👁👁👁👁
राजकीय घडामोडी मध्ये धनगर कुठे??*

               *डॉ प्रभाकर लोंढे*

            अख्खा महाराष्ट्र होरपळून निघत आहे, नाट्यमय घडामोडी घडत आहे. मात्र सत्ता कोणाची हे अजून निश्चित झालेलं नाही.  प्रत्येक चेहऱ्यावर, प्रत्येक मनामध्ये, प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच चर्चा,  प्रत्येकाच्या शब्दाचा आधार महाराष्ट्रातील राजकीय सत्ता व राजपटावर कोण बसणार? किती काळ बसणार? कोणाची महत्त्वाची भूमिका असणाऱ? या चर्चेमध्ये गल्ली बोळात, घरातल्या घरात, वाड्या-वस्त्यांवर, शेतात, जनावरां मागे *होणाऱ्या चर्चेत कदाचित धनगर सुद्धा सहभागी असेल. की जो आज राजकीय बाबतीत प्रवाहापासून दूर फेकला गेला* आहे.  पण या सत्तेचा हक्कदार कोण ठरणार? हे मात्र धनगर सह बहुजनांच्या हातात काहीही दिसत नाही.
                   मागे पडला आरक्षणाचा प्रश्न, संपून गेला उमेदवारीचा प्रश्‍न, मागे पडला शेतकऱ्यांचा प्रश्र्न, मागे पडला याचा प्रश्र्न, मागे पडला त्याचा प्रश्न, *आता फक्त प्रश्र्न व चर्चा . पवार, फडणवीस, ठाकरे, -------- आणि सत्ता व राजपद ? पण या सर्वांच्यामध्ये कुठेही धनगर रक्ताचा माणूस दिसत नाही.*
           कोणी म्हणेल महाराष्ट्र बदलला. आता लोकशाही आहे. नकळत मान्य करावेच लागेल. मात्र *सरंजामी थाटात वागणारे घराणे आजही महाराष्ट्रात दिसून येत आहे.* तेही स्विकारावे लागेलच. पूर्वी *पेशवे, होळकर, शिंदे, पवार, भोसले यासोबतच पांढरे , देवकते, आणि अनेक मरहट्टी धनगर सरदार घराणे या महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आपली महत्त्वाची भूमिका बजावत होते* . याठिकाणी त्याकाळी *धनगर सत्तेचे वाटेकरी होते,* एवढेच सांगायचे आहे.
                   तो काळ पेशवाईचा होता, पेशवे सर्वेसर्वा असले तरी महाराष्ट्रातील *पेशवाईच्या गादी पासून तर ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या राजगादीवर कोण बसेल? याचा निर्णय, तो राजकीय प्रश्न सोडवणे थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रभावात्मक अधिकार कक्षेत होता.*  यासंबंधाने सुभेदार मल्हारराव होळकरांचा निर्णय, शब्द व सल्ला शिरसावंद्य मानला जात होता.  त्यामुळे त्यांचा सल्ला हा त्यावेळच्या केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील सत्ताकारणाला दिशा देऊ शकत होता. *एवढी ताकद व व्यवस्थेवर प्रभाव, तो तसा सन्मान सुभेदार मल्हारराव यांच्या शब्दाला होता.* हे मी कल्पनेवरून नाही तर त्यांच्या पराक्रमाचा परिणाम म्हणून लक्षात आलेल्या बाबी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  हे आपल्याला मराठेशाहीच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल, की येथील वारसा हक्काचे व राजगादीचे अनेक प्रश्न, किल्ल्यांवरील अधिकाराचे प्रश्न, सुभेदार मल्हाररावांनी सल्लामसलत करून, प्रसंगी बळाचा वापर करून सोडविण्याचे अनेक दाखले मल्हाररावांच्या विषयी इतिहासामध्ये दिसून येतात.
                        यावरून मला एवढेच लक्षात आणून द्यायचं आहे, की *तत्कालीन पेशवाईमध्ये होळकर व इतर सरदारांच्या माध्यमातून तत्कालीन धनगर हा दखलपात्र होता. त्याचा तेव्हा दरारा होता. त्याचा या व्यवस्थेवर प्रभाव होता. महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये धनगरांचा फार मोठा मोलाचा वाटा होता.* या धनगर रक्ताला विचारात घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील निर्णय पूर्णत्वाकडे जात नव्हता. एवढा व्यवस्थेवर राज करणारा *धनगर आजच्या काळात पूर्णतः बेदखल कसा काय झाला ????* हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. प्रत्येक वाचकांने करावा, हिच या लेखामागची अपेक्षा आहे.
         आजच्या एकूण राजकीय घडामोडी व सत्ताकारणात धनगर कुठेच दिसत नाही.  सत्य आहे की, काळ बदलतो, व्यवस्था बदलते पण बदलत्या परिस्थितीत स्वत:ला प्रवाहित ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. काळाबरोबर पेशवाई गेली. *आज लोकशाही (घराणेप्रधान) प्रस्थापित झाली.* सत्तापद बदलली पण पदावरील मक्तेदारी मात्र कायम आहे, असं म्हटल तर चूकीचे होणार नाही.  या महाराष्ट्रातील पेशवाई पासून येथे राज करणारे पेशवे (ब्राम्हण), मुळ पेशवाईत दुय्यम स्थान असणारे मराठे आज सत्तेच्या आखाड्यात प्रथम स्थानी दिसून येतात. *आज मराठे व ब्राम्हण हे दोन्ही आज सत्तेची सुत्रे हालवितांना दिसून येतात.* तेव्हा येथील इतिहास पाहिला तर *धनगर, मराठे व ब्राम्हण या तिन समुदायांनीच महाराष्ट्रातील इतिहास घडविला ही बाब लक्षात येते.*
             पाणीपत युध्दात मराठ्यांचा पराभव झाला, या पराभवाचं खापर फोडण्यापुरतेच मल्हारराव मराठ्यांच्या इतिहासात नव्हते. अरे *पेशवाईचा खडा न खडा मल्हाररावांच्या विश्वासाने सुरक्षित होता. पेशवाईच्या बेंबीच्या देठापासून मल्हारराव पेशवाईला जाणत होते.* कारण तिचा मुख्य आधारस्तंभच मल्हाररावच होते.
            परंतु ऐतिहासिक प्रभावशाली असलेला धनगर मात्र आज सत्तेच्या आखाड्यात कुठेच दिसत नाही. ही गंभीर बाब होळकरांच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या धनगर व इतरांना विचार करायला लावणारी आहे.
 *सर्वांनी याचा विचार करावा. याची कारणं मिमांसा तपासून पहावी हिच या लेखाची पार्श्र्वभूमी....*


खूप खूप शुभेच्छा!!


 *एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश* .
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Thursday, November 21, 2019

केवळ धनगरांचीच हालत अशी का?

केवळ धनगरांचीच हालत अशी का?

                     डॉ प्रभाकर लोंढे

महाराष्ट्रातील धनगर जमात बहूसंख्य, ऐतिहासिक दृष्ट्या संपन्न, तरीही वर्तमानात राजकीय दृष्ट्या ती इतकी अस्पृश्य का? हा प्रश्न प्रत्येकालाच पडणे सहाजिकच आहे.

           आपणा सर्वांना एक माहिती आहे की एखाद्याला नियंत्रणात ठेवण्याची इच्छा आहे, परंतु त्याच्या अफाट ताकतीची जाणीव आहे, त्याच्या त्या ताकदीपुढे आपण टिकू शकणार नाही याची हमखास भिती आहे. तेव्हा समोरच्याला त्याच्या ताकदीची व त्याच्या अधिकाराची जाणीवच होणार नाही. यासाठी प्रयत्न केले जातात. दुसरीकडे त्याला संधीच मिळणार नाही यासाठी हेतुपुरस्सर डावलण्याचे तसेच त्याची शक्ती कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू असतात. त्याच्या कमजोरी शोधून त्याबाबतीत त्याला पुन्हा कमजोर कसा करता येतील यावर जोर दिला जात असते, कारण त्यांना माहित असते की, हे शक्य झालं तरच आपण समोरच्याला नियंत्रणात ठेवून त्याचा आपल्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे वापर करू शकतो. याचं उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर बैल या पाळीव प्राण्यांचं घेता येईल.

                मानवी विकास प्रक्रियेत त्याला बैलाची मिळालेली साथ समस्त मानव जात कधीच विसरू शकत नाही, परंतु त्याला नाकात व्यसन घातल्याशिवाय व त्याला निर्बीज केल्याशिवाय माणूस त्याच्या ताकतीचा वापर करण्याची हिंमत सुध्दा करू शकत नाही, हे माणसाला माहीत असल्यामुळेच माणूस स्वार्थापोटी बैलावर ही दोन अमानुष ( वेसन- नाकात दोरी घालणे व नपुसक करणे) कृत्य करीत असतो. तो बैल आपल्या नियंत्रणात (वेसन)राहिल  व त्याला त्याची क्षमता (नपुसक) सुद्धा वापरता येणार नाही. याची काळजी मानवाने घेतली. म्हणूनच पिढ्यानपिढ्या पासून मानवाची गुलामी  स्वीकारून बैल इमानेइतबारे मानवाच्या सेवेत रुजू आहे. एवढंच काय गुलामीची हद्द तेव्हा ओलांडली जेव्हा बैलाने नंदीबैल म्हणून माणसाच्या चरणी  संपूर्ण समर्पण केलं.
            यामध्ये त्या बैलावर अन्याय होत आहे हे जरी मानवाधिकारांच्या व प्राण्यांच्या हक्काच्या गोष्टी करणाऱ्या माणसाला मान्य असलं तरी त्याशिवाय बैलाच्या शक्तीचा वापर करण्याची लायकी आपल्यात नाही,  याची जाणीव/ भीती माणसाला वाटत असल्यामुळेच तो बैलांसाठी वेसनमुक्तीचा जाहीरनामा हा पशूप्रेमी माणूस कधीच प्रसिद्ध करणार नाही. बैलाच्या  नाकातील ती वेसन काढणार नाही. कारण मानवाने हे ओळखलं आहे की, त्यावरच यांच्या स्वामित्वाचं व बैलाच्या गुलामीचं सुत्र आधारलेलं आहे तसेच मानवी विकासाचं गुणसुत्र अवलंबून आहे.
   
        हे सर्व गुणसूत्र महाराष्ट्रातील आजच्या धनगर जमातीच्या बाबतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लागू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. या भारतातील सर्वांगीण दृष्टीने सर्वाधिक बलवान जमात कोणती असेल तर धनगर जमात आहे, इतिहास,  समाज, संस्कृती, पराक्रम, धैर्य, मेहनत, व अत्यंत महत्त्वाची लोकाभिमुखता याबाबतीत परिपूर्ण असलेली महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारतातील धनगर जमात येथील समाजव्यवस्थेच्या विकासाचा आधारभूत केंद्रबिंदू आहे. हे या धनगर जमातीचं प्रमुख बलस्थान आहे.
                या देशातील संपूर्ण इतिहास व ऐतिहासिक पराक्रम, राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे याच जमातीच्या सभोवताल फिरतात. ही या जमातीची प्रमुख वास्तविकता. ती त्यांची ताकद येथील विशिष्ट गैरधनगर लोकांनी ओळखलेली आहे. ही बाब धनगर जमातीच्या लक्षात येवू म्हणून ते या जमातीच्या बाबतीत सातत्याने षडयंत्र रचून तिला दुर्बल करण्याचा प्रयत्न करतात. या जमातीला संधीच मिळणार नाही याची दक्षता घेतात.
        याठिकाणी आपण अलीकडील काळाचा विचार करू, पेशवाईच्या काळानंतर येथील प्रस्थापित व्यवस्था सुव्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी या धनगर जमातीतील लोक गुलाम मानसिकतेत, अदृश्य गुलाम म्हणून जगत राहले तरच ह्या व्यवस्थेतील विशिष्ट प्रस्थापितांच्या अस्तित्वाची सूत्र जुळते. ते सुत्र सतत कायम रहावे यासाठी या धनगर जमातीला अंधश्रद्धेच्या माध्यमातून, त्यांच्या पराक्रमी इतिहासापासून अनभिज्ञ ठेवून, तो इतिहास नष्ट-भ्रष्ट करून, यांच्या कर्तबगार स्त्री पुरुषांना देव- देवी बनवून, त्यांच्यासंबंधी दैविक, चमत्कारिक आख्यायिका बनवून,  त्यांच्यामध्ये कर्तबगार पुरुष निर्माण होणारच नाही याची दक्षता घेऊन केवळ वैचारिक नपुसक, आज्ञाधारी गुलाम पिढी जन्माला येईल अशी परिस्थिती सातत्याने टिकवून ठेवली जाते
                  त्या परिस्थितीमुळे धनगरांना स्वतःची, स्व अस्तित्वाची, स्वपराक्रमाची, स्वताच्या क्षमतांची जाणीवच होत नाही, परिणामी धनगर जमातीतील बहूतांश वर्ग मान्य करीत नसला तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक गुलाम म्हणून जगत असताना दिसून येतो. यावर काहींचा आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी सामाजिक आत्मपरीक्षणा शिवाय आपणाकडे पर्याय उरत नाही.
                 दुसरं असं की, या जमातीतील जे लोक सामाजिक दृष्ट्या धडपडतात, काही तरी करण्याची आकांक्षा ठेवतात, त्यापैकी काहींना नियंत्रित सत्तापद, संपत्ती, नोकरी याचे लाभ देवून किंवा काही वेळा नुसती प्रलोभने देऊन कायमची गुलामी लादण्याचा प्रयत्न सुरू असतो. जमातीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे गुलामांची फौज निर्माण होत राहील व ती सातत्याने टिकून राहील याचा सातत्याने प्रयत्न या प्रस्थापितांकडून सुरू असतो. त्यासाठी धनगर लोकांमधील काशिराव (कच्चे दुवे Under control लाभार्थी) हाताशी धरून स्वयंनिर्भर/स्वाभिमानी विठोजीचा राजकीय खून केला जातो.  आणि लाभार्थीच्या माध्यमातून संपूर्ण जमातीला भावनिक आव्हाने केली जातात व त्या बेसवर संपूर्ण जमात स्वत्व विसरून भावनिक होवून प्रस्थापितांच्या मागे फिरतात. याची उदाहरणे आज मी देण्याची गरजच नाही. प्रत्यक्ष अनुभवू शकता.
              म्हणूनच. आज गुलामीच्या वेसनी कापून अंधश्रद्धा, अंधभक्ती, प्रलोभने यांच्याआधारे हेतूपुरस्सर लादले  जाणारे राजकीय नपुंसकत्व ओळखून धनगरांच्या सामाजिक, ऐतिहासिक ताकदीची जाणीव करून देणारे विचार व नेतृत्वच धनगरांची राजकीय हालत सुधारू शकतात.
तेव्हा आपणास शून्यातून विश्व निर्माण करणारे मल्हारराव प्रेरणा देवू शकतात. पेशवाईचे शडयंत्र जाणणाऱ्या राजमाता अहिल्याबाई जगण्याचा संदेश देतात. सर्वांची पराक्रम गाजविण्याची क्षमता जाणणारे यशवंतरावच परिस्थितीवर मात करण्यासाठी मार्ग दाखवू शकतात.
           तेव्हा परिस्थितीला शरण जायचं व माझं भलं होईल याची अपेक्षा करीत स्वकियांना लाथाडून शडयंत्राला बळी पडत काशिराव म्हणून जगायचं?  की ती विदारक परिस्थिती लाथाडून यशवंतरावांसारखं पुणर्उत्थान करायचं?  ज्याचं त्यांनी ठरवायचं.......

खूप खूप शुभेच्छा!!


एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Saturday, October 26, 2019

धनगर जमातीत आता कोण यशवंतराव जन्माला येतो एवढेच बाकी..*

‌🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
 *धनगर जमातीत आता कोण यशवंतराव जन्माला येतो एवढेच बाकी..*
  (हडपसर युद्ध दिनविशेष)

                    *डॉ प्रभाकर लोंढे*

                     महाराष्ट्र विधानसभा निवडणूकाचा निकाल, त्यापूर्वीचे प्रचार, त्यापूर्वीच्या जागावाटप, त्यापूर्वीच्या धनगर नेते- लोकांच्या सभा,  त्यापूर्वीचे धनगर नेतृत्वाचे स्वतःचे निर्णय, कदाचित कोणी त्यांना ...... सुद्धा म्हणतील. निर्णय कुठलेही असो त्या निर्णयाची यथार्थता निकालानंतरच कळत असते. कधी नव्हे तेवढे धनगर उमेदवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. पण *निकाल काय तर .... सर्वांना माहीतच आहे.... लज्जास्पद!?*
          शेवटी धनगर बड्या नेत्यांचा पराभव, अख्या महाराष्ट्रातून एकमेव धनगर उमेदवार निवडून येणे, आ. महादेव जानकर साहेबांशी झालेली धोकाधडी, अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार निवडून येणे.
             धनगरांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महत्वाच्या पदावर असलेले धनगर नेतृत्व, शंभर उमेदवारी देण्याची घोषणा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी ने धनगरांना २0 उमेदवारी देणे, ऐनवेळी वंचित बहूजन आघाडीकडून महत्त्वाच्या धनगरांना तिकीट नाकारणे, वंचित बहूजन आघाडीचे काही धनगर मातब्बर  रणांगणातच न उतरणे, वंचित बहुजन आघाडीने ऐन वेळेवर आपली संशयास्पद रननिती बदलविणे,  आ. *आ. हरिदासजी भदे* सारख्या प्रगल्भ राजकीय नेतृत्वाचा पराभव होणे व त्यासाठी समस्त प्रस्थापित एक होणे, धनगरांचा बुलंद आवाज व स्वबळावर किल्ला लढवितांना निसटता पराभव पत्करावा लागला असे ते *आ. अनिल अण्णा गोटे* बीजेपी व प्रस्थापितांना पुरून उरले नसले तरी जिगरबाज लढले. संपते की काय अशा परिस्थितीत गेले.
         *नारायण आबा पाटील* यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारणे, अपक्ष लढले असता थोड्याफार फरकाने पराभव पत्करावा लागणे, *आदरनीय राम शिंदे* साहेबांच्या विरोधात पवार घराण्याने उमेदवार टाकणे व राम शिंदे सारखा बीजेपी मधील मजबूत धनगर चेहरा असलेल्या धनगर नेतृत्वाला पराभव पत्करावा लागणे. धनगर आरक्षणाच्या नावाखाली खासदार झालेल्या *डॉ महात्मे* साहेबांच्या भावाला सुध्दा बीजेपीने उमेदवारी नाकारणे. धनगरांच्या मतांवर मजबूत झालेल्या बीजेपीने अख्या धनगर जमातीलाच कमजोर बनविणे.
        सलग अकरा वेळा आमदारकीचा विक्रम करणाऱ्या *आ. गणपत आबा देशमुख* यांचा वारसा संपुष्टात येणे,
धनगरांच्या पन्नास पोरांना आमदार करण्याची वल्गना करणाऱ्या *गोपीचंद पडळकरांनी* बीजेपीला शंभर दिवसात बेजार करून धनगरांना एसटी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे नावावर धनगरांना मागे फिरवणे, शेवटी *बीजेपी व्हाया वंचित बहुजन आघाडीतून -बीजेपी मध्ये लोटांगण घेणे व बीजेपी म्हणेल तिथे म्हणजेच बारामती मध्ये उमेदवारी घेतल्याने स्वत:च डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत धनगरांच्या इज्जतीची लत्करे वेशीवर टांगणे.*
          धनगरांना उमेदवारी मिळवून देण्याच्या नावाखाली वंचित बहूजन आघाडी धनगरांच्या पुढाकाराने सुरू झालेली असताना,  धनगर नेतृत्व निर्णय प्रक्रियेत असतांनाच २० धनगर उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून न येणे.
           कोट्यावधी धनगरांचं विधानसभेत एकमेव प्रतिनिधित्व करणारे *आ्. दत्ता मामा भरणे* आमदार निवडून येणे, यामागे दत्ता मामांचं स्वतःचं वलय, स्वतःची कार्यशैली यासोबतच दौंड इंदापूर मध्ये *जानकर साहेबांचे* कार्यकर्ते बीजेपीवर नाराज असण्याचे परिणाम असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

     *या सर्व गोष्टींचा विचार करता पुढीलप्रमाणे बाबी समोर येते*

१) प्रस्थापितांनी धनगरांच्या राजकीय सत्यानाशाचा सुनियोजित कट केला होता.
२)धनगर उमेदवार व नेते सक्षम होणार नाही याची पुर्णतः दक्षता घेतली गेली होती.
३) धनगरांमध्ये असलेल्या -------आमिषाला बळी पडणाऱ्यांचा पुरेपूर वापर केला गेला आहे.
४) यापुढे धनगरांचा राजकीय लढा येथील धनगर विरोधी प्रवृत्तीशी लढणे आवश्यक आहे.
५) धनगर नेतृत्वाची ताकद भक्कम आहे. पण  नियोजन तसेच परस्पर समन्वय यांचा अभाव यामुळे ती नेहमी प्रमाणेच विभाजित झालेली आहे.
६) धनगरांच्या मतविभाजनाची काळजी सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यात वं. ब. आघाडीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ मिळाली आहे.
७) एकूण विचार करता धनगरांचा राजकीय खून केला गेला  आहे.
८) या निवडणुकीनंतर धनगर राजकीय अस्मिता धोक्यात आली आहे
९) धनगर अस्मितेवर गंभीर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे
१०) आतातरी रडणं बंद करून लढाईला सुरुवात करण्याची वेळ आली आहे
११) खऱ्या अर्थाने यशवंतराव समजून घेवून पराक्रम गाजविण्याची वेळ आली आहे
          *_आजच्या (२५ आक्टोबर) दिनी थोर पराक्रमी यशवंतरावांनी हडपसर मध्ये आपला भाऊ विठोजीराव यांच्या खूनाचा व होळकरशाहीवर वाकडी नजर ठेवणाऱ्या पेशवे व शिंदेचा बदला घेतला.  (२४ आक्टोबर २०१९ ला आधुनिक पेशवे आणि मराठे यांनी यशवंतरावाच्या वंशजाचा सत्यानाश केला) आज भारतीय लोकशाहीच्या आखाड्यात धनगर नेतृत्वांचा खून केला गेला आहे.  हा यशवंतराव होळकरांच्या रक्ताचा अपमान आहे. म्हणून ही निवडणूक धनगर अस्मितेवर प्रश्न निर्माण करणारी आहे._*
              *यावर लोकशाही मार्गाने बदला घेणारा स्वाभिमानी यशवंतराव व स्वाभिमानी धनगर मावळ्यांचीच गरज आहे. त्यासाठी कर्मप्रधान स्वाभिमानी राष्ट्रप्रेमी यशवंतराव वाचणे, समजून घेणे अत्यंत आवश्यक व प्रेरणादायी असणार आहे.*

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Wednesday, October 23, 2019

दोस्ती

दोस्ती

उन दोस्तो की मैफिल मे
मै जिता जागता रहा हर दिन.
ऐसे भी मिले दोस्त
जो जी न सके मेरे बिन.
फिर भी एक दिन ऐसा आया
जो न था मेरा और न किसी का.
दोस्तो से होकर भी घेरा,
मै पड गया था अकेला.
मौत ने छिन लिया इसे,
ऐसा कह रहा था हर दोस्त मेरा.
पर कुछ नहीं कर पाया
बन गया था वो बेचारा.
मौन हो कर देख रहा था मै
वह मेरे दोस्त कि हालात.
सिर्फ मौत से ही बचा न सका था,
मुझे वो जिगरवाला दोस्त मेरा.


उन मेरे दोस्तो को सलाम
जो मेरे व्यवहार को नही
मेरी सोच को मानते है!
मेरी वाणी को नही
जीवन का बदलना जानते है!

लक्षवेध

लक्षवेध

पाजळ तुझी शस्त्रास्त्र
अन् येऊ दे त्यास धार.
एकवटून सारं बळ
नेम धरून अचूक कर वार.
होवू दे आर या पार.
चालेल एकदाची व्यवस्था
झालेली थंडगार.
पुन्हा एकदा सांगतो,
असेल तुझ्यात हिम्मत
तर न चुकता
तो कोथळा बाहेर काढ.
येथील विकारग्रस्त व्यवस्थेचा.
जिथे अनेक मुखवटे
पोसले आहेत खाण्यासाठी भाड.
मात्र हे करताना
एकच लक्षात ठेव,
तुला ते करायचं आहे
तर ते केवळ
निर्विकार समाज अन्
निष्कलंकित मानवी मनासाठी.

   डॉ प्रभाकर लोंढे

संधीसाधू

संधीसाधू

याला बोलता येत नाही.
कुठे काय बोलायचं?
समजत नाही,
असं म्हणणारे,
वेळ येताच
तुमच्या बोलण्यावर
अलगद भाळून जातात.
संधी मिळताच तुमच्या
मार्गावर चालून जातात.
तेव्हा तो
तुमच्या वाणीचा नाही तर
यशस्वी कहाणीचा दोष आहे.
कारण
त्यांना तुमच्या
बोलण्यावर नाही
तर क्रियाशीलतेवर रोष असतो.

डॉ प्रभाकर लोंढे गोंदिया

अनुबंध

अनुबंध

समजत नाही तू अशी
नाकावर का खाजवतेस?
असं तर नाही ना?
हृदयातून तू मला खिजवतेस.

की नुसतच ब्युझी
असल्याचे वारंवार भासवते.
तुझं ते खाजवणं मात्र
हृदयातून मला फसवते.

तुझं नाक, माझं हृदय
तुझंच हृदय, तुझंच नाक
याचं सुत्र तू जूळवते
असं तर नाही ना
मला पाहून नाक तुझं खवळते.

विचार विद्रोही

विचार विद्रोही

तुम्ही बना गांधी
आम्ही बनतो इथे,
गरज पडेल तेव्हा
तो नत्थू , तो राम.

शांती, अहिंसा, सत्य
या तत्वांच्या पुजक
राज्यातील कदाचित
महाभयंकर हराम.

पण खबरदार!
आम्हाला हरामखोर म्हणणाऱ्यानो!
तुम्ही आम्हाला जास्तच गांधी
समजावत राहिलात तर
तुमचंही भारी करू काम.
कारण तो नत्थू, तो राम
आम्हीच जन्माला घातला आहे.

Saturday, August 24, 2019

निर्धार

निर्धार


समजून घ्या!
भा. ड. खावूनो!
तुमच्या दलाली ने
तुमच्या हजार पिढ्या
पोसल्या जाणार असल्या तरी,
अनेकांच्या जगण्याचे वांदे
निर्माण होणार असेल तर
तुमचा व आमचा धर्म वेगळा.
कारण गेचूडाच्या जगण्यात आता
गाईला कुठेच स्वारस्य राहिलेले नाही.

डॉ प्रभाकर लोंढे


लक्षवेध

लक्षवेध

पाजळ तुझी शस्त्रास्त्र
अन् येऊ दे त्यास धार.
एकवटून सारं बळ
नेम धरून अचूक कर वार.
होवू दे आर या पार.
चालेल एकदाची व्यवस्था
झालेली थंडगार.
पुन्हा एकदा सांगतो,
असेल तुझ्यात हिम्मत
तर न चुकता
तो कोथळा बाहेर काढ.
येथील विकारग्रस्त व्यवस्थेचा.
जिथे अनेक मुखवटे
पोसले आहेत खाण्यासाठी भाड.
मात्र हे करताना
एकच लक्षात ठेव,
तुला ते करायचं आहे
तर ते केवळ
निर्विकार समाज अन्
निष्कलंकित मानवी मनासाठी.

   डॉ प्रभाकर लोंढे

Thursday, August 15, 2019

धनगरांनो, असीरगड हिंदुस्थानचाच नाही धनगरांचा जिब्राल्टर

धनगरांनो, असीरगड हिंदुस्थानचाच नाही धनगरांचा जिब्राल्टर
                                   
                  डॉ प्रभाकर लोंढे

    "असीरगड" नावाचा किल्ला अनेकांना माहित असेल किंवा नसेल, काहींनी तो प्रत्यक्ष पाहिला असेल किंवा नसेल, परंतु या किल्ल्यापासून काय घ्यावं? हा अनेकांचा  मोठा प्रश्न असेल. काहींना तो महत्त्वाचा सुद्धा वाटत नसेल, तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी जेव्हा नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा एवढं नक्की लक्षात आलं की "असीरगड" धनगरांच्या कर्तुत्व, स्वाभीमान आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरांचा अप्रतिम वारसा आहे.
           "असीरगड" महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर पासून सीमेलगत मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून वीस किलोमीटर अंतरावर आहे.  प्रचंड तटबंदी आणि समुद्रसपाटीपासून २५० फुट उंचीवर सह्याद्री पर्वत रांगांवर असलेला हा किल्ला "हिंदुस्थानचा जिब्राल्टर" म्हणून ओळखला जातो.
प्रचंड दरवाजा, तटबंदी तसेच तेथील पाण्याचे व्यवस्थापन व शत्रूपासून सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेली काळजी या सर्व गोष्टी ने परिपूर्ण असलेला हा किल्ला "आसा अहिर" नावाच्या पशुपालकांने बांधला होता असा उल्लेख ऐतिहासिक पुरावे तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या दस्तऐवजावरून लक्षात येते.
     कोण होता हा आसा अहिर? तो असा व्यक्ती होता ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन होते, त्या पशुधनाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पंधराव्या शतकामध्ये त्याने या गडावर तटबंदी केली. तो तिथे राहू लागला. याशिवाय आसा अहिर हा धनगर होता हे सिद्ध होते कारण धनगरांमध्ये अहिर नावाची पोटजमात आहे. (आज प्रत्येक पोटजमात विसरली पाहिजे व केवळ धनगर म्हणून आपली ओळख जपली पाहिजे) आणि ती महाराष्ट्रातील जळगाव तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर या भागामध्ये प्रामुख्याने आढळून येते. पूर्वी भारतात प्रत्येकाला जातीच्या नावाने ओळखले जात होते. यावरून असीरगड चा निर्माता आसा आहिर व धनगर जमातीचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे आशिरगड धनगरांच्या स्वाभिमानाचा व आत्मीयतेचा प्रश्न आहे.
          आसा अहिरच्या काळात या गडाचा विकास झाला. त्यामुळेच त्या गडाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यामुळेच त्याच्या नावावरून पुढे (आसा + आहिर + गड = असीरगड)  अशा प्रकारे हा गड पुढे असीरगड नावाने ओळखला जावू लागला.  किल्ल्याच्या विकासामुळे तो इतका नावारूपास आला की, सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनला. त्याचे भौगोलिक स्थान सुद्धा एक महत्त्वपूर्ण असून त्याच्यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतात राज करण्यास सोईस्कर होते.
          अतिशय मजबूत आणि विशालकाय म्हणून ओळख असलेला हा असीरगड किल्ला जगातील निवडक सुप्रसिध्द किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जात होता. हा किल्ला सहजपणे जिंकणे खूप कठीण होते. त्यामुळेच या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही कर्तबगार व्यक्तीने स्वबळावर जिंकलेला नाही.  ज्यांनी ज्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्यांनी फंद फितुरी, पैसा, धोकेबाजी अशा मार्गानेच ताब्यात घेतलेला आहे. एवढा अपराजित कठीण गड "आसा अहिर" नावाच्या एका धनगराने बांधला. व नावारूपास आणला.
           पुढे या किल्ल्याचे महत्व एवढे वाढले की, हा किल्ला ताब्यात घेतल्या शिवाय कोणालाही दक्षिणेवर राज्य करता येणे शक्य नव्हते. म्हणून इतिहासकार या किल्ल्याला "बाब ए दख्खन" (दक्षिण द्वार) आणि "कलोदर ए दख्खन" (दक्षिण ची किल्ली) असा उल्लेख करतात.
              पुढे या गडाची कीर्ती इतकी पसरली की तो किल्ला म्हणजेच सर्वांच्या आकर्षणाचा व अधिपत्याखाली आणण्याची लालसा निर्माण करणारा ठरला. त्यातूनच सर्वप्रथम फिरोजशहा तुघलकाचा शिपाई मलिकचा पुत्र नासिर खा फारुकी ने आसा अहिर शी धोकाधडी करून हा किल्ला ताब्यात घेतला. त्यासाठी त्याने आसा अहिरच्या स्वभावाचा गैरफायदा उचलला कारण आसा अहिर उदार व्यक्तिमत्त्वाचा पराक्रमी पुरुष होता. दयाभाव हा त्याचा स्थायीभाव होता. ही बाब लक्षात घेऊन नासीर खा फारुकी ने कट रचला. व आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किल्ल्यामध्ये आश्रय द्यावा, अशी विनंती आसा अहिरला केली.  या विनंतीस आसा अहिर ने आपल्या स्वभाव गुणांनुसार परवानगी दिली. मात्र जेव्हा तो किल्ल्यामध्ये राहण्यास आला तेव्हा आसा आहिर व त्याची मुले नासीर खा फारुकीच्या स्वागतासाठी आली असता नासिर खा फारुकी च्या सहकाऱ्यांनी आसा अहीर व त्याच्या मुलांवर जोरदार हमला केला व मारून टाकले. अशाप्रकारे नसीर खा फारुकी ने फंदफितुरी व धोकाधडीने किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्याच्यानंतर आदिलशहा फारूखीने आपला कब्जा कायम ठेवला परंतु त्याच्या मृत्यूनंतर किल्ला निष्क्रीय अशा बहादूरशहा च्या ताब्यात गेला.
               तोपर्यंत मोगल सम्राट अकबराला सुद्धा या किल्ल्यासंबंधी आस निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी या किल्ल्याला सैन्यानिशी संपूर्णता वेढा दिला. सर्वत्र नाकेबंदी केली. परंतु सतत दहा वर्षे वेढा देऊन सुद्धा त्याला स्वतःच्या ताकदीवर तो किल्ला जिंकता आला नाही. तर दुसरीकडे त्या दहा वर्षात गडावर कोणतीही बाबीची कमतरता भासली नाही. यावरून आपल्याला गडाच्या समृद्धतेची कल्पना येते. शेवटी अकबराला सुद्धा हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी शूराला अशोभनीय बाबींचाच सहारा घ्यावा लागला व धोका धडी करून अकबराने बहादूरशहाला जखमी केले. त्याच्या मुलांसह त्याला बंदी बनवले व १७ जानेवारी १६०१ ला किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात राहिला. नंतर इंग्रज व आता भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याचे लक्षात येते.
           मराठेशाहीच्या काळामध्ये या किल्ल्यावर होळकरांचा ताबा असण्याची दाट शक्यता आहे. कारण येथे जे शिवमंदिर आहे त्या शिव मंदिराचे बांधकाम हे मराठेशाहीच्या काळातील वाटते. आणि होळकर हे शिव भक्त असल्याने या शिव मंदिराची स्थापना/ निर्माण होळकरशाहीच्या काळात झाली असावी असे त्या मंदिराचा कळस व एकूण बांधकामावरून मला वाटते. त्यासाठी पुन्हा संशोधन होण्याची गरज असून तोपर्यंत असीरगड किल्ला धनगर व्यक्तीला प्रेरणादायी असून प्रत्येक हरहुन्नरी व्यक्तिला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. असतो पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असला तरी त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने कातून प्रयत्न करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य ठरते.

(बाकी पुढील भागात)


जय मल्हार!!

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Monday, August 5, 2019

दोस्ती

दोस्ती

उन दोस्तो की मैफिल मे
मै जिता जागता रहा हर दिन.
ऐसे भी मिले दोस्त
जो जी न सके मेरे बिन.
फिर भी एक दिन ऐसा आया
जो न था मेरा और न किसी का.
दोस्तो से होकर भी घेरा,
मै पड गया था अकेला.
मौत ने छिन लिया इसे,
ऐसा कह रहा था हर दोस्त मेरा.
पर कुछ नहीं कर पाया
बन गया था वो बेचारा.
मौन हो कर देख रहा था मै
वह मेरे दोस्त कि हालात.
सिर्फ मौत से ही बचा न सका था,
मुझे वो जिगरवाला दोस्त मेरा.


उन मेरे दोस्तो को सलाम
जो मेरे व्यवहार को नही
मेरी सोच को मानते है!
मेरी वाणी को नही
जीवन का बदलना जानते है!

Saturday, August 3, 2019

धनगरांनो! हे घ्या स्पष्ट दिशानिर्देश..*

🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜
*धनगरांनो! हे घ्या स्पष्ट दिशानिर्देश..*
                 *डॉ प्रभाकर लोंढे*

                नुकताच माझा *"धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!"* हा लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये मूल्यमापनात्मक दृष्टिकोनातून विद्यमान धनगर सामाजिक - राजकीय परिस्थितीचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला.  त्या लेखात भुतकाळासह वर्तमान परिस्थितीचे विवेचन करीत असतांनाच धनगरानी यापुढे काय केलं पाहिजे याचे अप्रत्यक्ष स्पष्टपणे दिशानिर्देश करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी सामान्यातील सामान्य धनगराला ते समजावे यासाठी माझे मित्र *सोमनाथ गायकवाड (नाशिक)* यांनी त्यामध्ये सरळसरळ अधिक स्पष्टता आणण्याच्या प्रयत्न  करावा हा आग्रह केला त्यावरून हा लेखन प्रपंच करतो आहे.
              महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांच्या निर्णय प्रक्रियेत कोणताही धनगर नेता दिसत नाही. तसा नेता झाला नाही किंवा होऊ दिला गेला नाही असा सातत्याने आरोप आहे व तो सत्य आहे. याचा अर्थ आमच्या नेत्यांची *या पक्षांमध्ये केवळ वाहक हीच भूमिका राहिलेली दिसून येते.* हे वाहक नेते केवळ धनगर मतसंख्या या पक्षाकडे वळवण्याचे काम सतत करीत आलेले आहे. *त्याबदल्यात छोटे मोठे पद, आर्थिक लाभ मिळत गेले,* यामध्ये जमातीचे दिवस वाया गेले.  आज धनगर जमातीचं यापेक्षा वेगळं चित्र आहे, असे दिसत नाही. खोटी आश्वासने, फसव्या योजना,  यांच्या माध्यमातून धनगरांना खुष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. व त्यातून सदा लाचार धनगर निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. व या प्रस्थापित पक्षांना हेच अपेक्षित आहे.
        त्या ऐवजी या प्रस्थापित पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सत्तेचे मार्ग  चोखाळण्याचे प्रयत्न दिसत नाही. प्रस्थापित पक्षांपैकी कोणताही राजकीय पक्ष धनगराना २५ उमेदवार देतो, ५० देतो किंवा ७५ धनगर उमेदवार देतो, असं म्हणतानाही दिसत नाही.  *या पक्षांकडून जे धनगर नेते उमेदवारीची अपेक्षा करीत आहेत. त्यांना तरी उमेदवारी भेटेल की नाही ही शंका आहे. असो....  *हे प्रस्थापित पक्ष राजकीय सत्ता व सत्तेचे मार्ग(आरक्षण) सोडून तुम्हा धनगरांना सर्वच (सवलती, पैसा, हायमास्ट लाईट, समाज मंदिर) द्यायला तयार आहेत..  पुढे तशी परिस्थिती निर्माण झालीच तर ते आरक्षण(सवलती) (राजकीय सोडून) सुद्धा लागू करतील . पण सत्ता आपल्याकडेच ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतील.* आणि वास्तविकता आहे की ही खरी बिमारी प्रस्थापित पक्षातील धनगर नेता समजून घ्यायला व सामान्य धनगरांना सांगायला तयार नाही. आणि सर्वांना हे माझं मत पटत असेल, खरं वाटत असेल तर कशाला आपण आपला वापर होवू देता?.  _*स्वर्गातल्या कोतवाला पेक्षा नर्कातला का होईना, राजा कधीही महानच असतो.*_
           वंचित बहुजन आघाडीने जशा १०० धनगरांना उमेद्वारी देण्याचे घोषित केले. _तशी घोषणा बि जे पी ने करावी. शिवसेनेने करावी, राष्ट्रवादीने, काँग्रेस ने करावी. त्यासाठी त्या पक्षातील धनगर नेतृत्वाने प्रयत्न करावे._ पण या राजकीय पक्षांमधून असं कधीही होणार नाही. झालं तर ते उत्तम व धनगरांच खूप मोठ यश राहणार आहे.  *धनगर कोणत्याही पक्षाकडून का असेना सत्तेत गेला पाहिजे. राजकीय  सत्तेचे मार्ग त्याला खुले झाले पाहिजे. त्याचे हक्क त्याला मिळाले पाहिजे. सामान्य धनगरांचे जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजे,  धनगरांवरील अन्याय  थांबले पाहिजे.* आणि त्याआधी ``` ``` *आपल्याच माणसांकडून जमातीशी धोकाधडी थांबली पाहिजे.* एवढीच माझ्या सारख्याची अपेक्षा... *माझ्या सारख्या धनगरांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य दिशानिर्देश....* ते तुम्हाला किती पटतात तो तुमचा प्रश्र्न..
?????????????????????

 *घ्या ना तिसरा पर्याय..... (वंचित - बहुजन)*

 *_जेणेकरून_*

१) धनगरांचा स्वाभिमान टिकून राहील.

२) प्रस्थापितांना तुम्हा धनगरांची जाणीव पण होईल

३) तुमच्याशी धोकाधडी करणारा सुध्दा आवश्यक ते  समजून जाईल.

४) हक्काची उमेदवारी पण मिळेल.... त्यासाठी मागत बसण्याची गरज नाही.

५) धनगर वेगळा राजकीय पर्याय निर्माण करू शकतो, अशी धनगरांची ताकद व्यवस्थेला समजून येईल.....

६) धनगर समाजाला इतरांचे नेतृत्व करता येईल.( मोठी जमात म्हणून)

७)  महाराष्ट्रातील अप्रत्यक्ष असलेल्या जातीय बेस राजकीय समिकरणात धनगर जमातीला दखलपात्र बनविण्यासाठी.

८) धनगर सारख्या राजकीय दारिद्र्य असलेल्या वंचित उपेक्षित जमातीची मोट बांधून सत्तेमध्ये त्यांचे नेतृत्व करण्याच्या संधी चा लाभ घेण्यासाठी.

९) धनगरांमधील तरूण नेतृत्व विकास व त्यांना तशाप्रकारची संधी उपलब्ध करून देण्यासाठी.

१०) बहूसंख्य असलेल्या धनगर जमातीला बहूसंख्य उमेदवारी मिळवून आपली बहूसंख्या सिद्ध करणे. त्याआधारे सत्तेत जाणे, सत्तेत जावून जमातीचे प्रश्र्न सोडविणे, आरक्षण अंमलबजावणी संबंधात न्यायालयीन लढाईत सरकारचे सकारात्मक सहकार्य मिळावे, सरकारवर धनगर जमातीचा दबाव राहतील, या करीता महाराष्ट्रातील सरकार निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणे.....

             उपरोक्त सर्व मुद्दे हे धनगर जमातीच्या राजकीय उध्दारासाठी माझा दृष्टिकोन व  सोमनाथ गायकवाड यांच्या अपेक्षेप्रमाणे स्पष्ट दिशानिर्देश करण्यासाठी आहे....  ते कोणावर बंधनकारक आहे असं कोणीही समजू नये.  इतरांचे यापेक्षा वेगळे दृष्टिकोन व दिशानिर्देश असू शकतात....  *_मात्र सर्वोत्तम दृष्टिकोनातून धनगर जमातीने आपली राजकीय वाटचाल करावी, राजकीय दरिद्रता संपुष्टात आणावी , एवढीच अपेक्षा.....*_


जय मल्हार!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
 ~डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३~

Wednesday, July 31, 2019

धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!

धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!

               डॉ प्रभाकर लोंढे

          वर्तमानात धनगरांची जेवढी राजकीय दुर्गती झाली आहे अशी दुर्गती इतिहासामध्ये कदाचित प्रथम झाली असेल. या दुर्गतीचे, आतापर्यंत झालेल्या अन्यायाचे दोषारोप ही जमात जरी इतर धूर्त माणसावर करीत असली तरी या आरोपात तथ्य नसल्याचे आज धनगरांनीच सिद्ध करून दाखवले आहे. "2014 मध्ये आरक्षणाच्या नावावर धनगरांची मते घेतली"  "विश्र्वासघात केला," असा आरोप माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जातो आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ने धनगरांना सत्तेपासून वंचित ठेवून धनगरांच्या सवलती मिळू दिल्या नाही.  किंवा धनगरांचा राजकीय नेता निर्माण होऊ दिला नाही, अशा प्रकारचा आरोप शरद पवार साहेबांवर केला जातो.( ते कदाचित खरे असावे) परंतु त्यामध्ये सुद्धा तथ्य नाही असे आज वाटायला लागले आहे. कारण धनगरांच्या नसा नसा त्यांनी ओळखल्या आहे.
                 हिंदी मध्ये एक म्हण आहे, "जब तक मुर्ख जिंदा है, तब तक अकलमंद मरता नहीं!" धनगरांवर अन्याय करून या धुर्त लोकांनी आपला राजकीय जिवंतपणा टिकवून ठेवला, यांचा अर्थ ते अकलमंद आहे. धनगरांवर त्यांनी राज केलं, अन्याय केला तेव्हा मी धनगरांना "मुर्ख" ठरवणार नाही पण त्यांचं त्यांनी ठरवावं. ते अकलमंद की मुर्ख...???  पण ते आज शाहण्या सारखे वागतांना सुध्दा दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या वरील अन्याय भविष्यात संपुष्टात येईल, असे म्हणता येत नाही.
           अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. समूहातील एखादा फितूर झाल्याशिवाय समुहावर अट्याक करता येत नसतो. धनगरांमध्ये फितूरांची संख्या तर काही कमी नाही. इकडे त्याने अन्याय केला म्हणून बोंबलायचं आणि पुन्हा ज्याच्या बोंबाबोंब केल्या, त्याचेच भांडे चाटायचे. ही धनगर विचित्र प्रवृत्ती येथील धुर्तांनी ओळखली. म्हणून चाटू धोरणाचे पायिक धनगर त्यांनी ओळखले व आपल्या पाठीशी लावले. निसर्ग नियम आपणांस माहीत आहेच, भांडे चाटणारं जनावर मालकावर कधीच गुर्रावत नसतं. कारण ते खावून तृप्त झालेल असतं आणि त्याच्या एवढं दुसरं लाचार नसतं.
         शिवसेना-बीजेपी प्रणित फडणवीस साहेबांचं सरकार गठित झाल्यानंतर अनेक धनगरांनी निर्णायक मेळावे घेतले. अक्षरशः या सरकारवर अनेकांनी तोंडसुख घेतले. आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर या सरकारला जगू देणार नाही. अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा दिल्या. "या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!" अशा प्रकारच्या महापराक्रमी निर्णायक घोषणा सुध्दा देण्यात आल्या. परंतु त्याच सरकारने धनगरांपैकीच आपल्या शुभचिंतकाच्या सहकार्याने पाच वर्ष बिंधास्त काढून घेतले. हे सरकार पुन्हा स्थापन व्हावे हे म्हणणारा एकही धनगर मिळणार नाही असं वाटत होते. परंतु तसं दिसत नाही.
             या सरकारच्या आशीर्वादाने जगणारी काही धनगर मंडळी उघड उघड जरी काम करीत नसले तरी शिवसेना- बीजेपी सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावे, या भावनेतून धनगर मतसंख्या बीजेपी शिवसेना पक्षाकडे जावी, यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे. आरक्षण सोडले तर धनगरांना खूप काही या सरकारने दिलं, हे धनगर जनमानसामध्ये बिंबवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. "आदिवासी प्रमाणे कोणत्या? सवलती" हा मोठाच प्रश्न असतांना त्या निवडणूक काळात?? कशाप्रकारे?? या सर्व बाबी बाजूला सारून बीजेपी सरकारच्या
दातृत्वाच्या कहाण्या.. सामान्य धनगर माणसांना ऐकविल्या जात आहे. मात्र  आरक्षण अंमलबजावणीची मुळ मागणी संबंधी यांची वाचा बंद पडलेली आहे.
          धनगर जमातीला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बीजेपीकडून राजकीय दृष्ट्या उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्नात आहे असे धनगर नेते लक्षात आले नाही. जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत पण दिसत नाही. याचे कारण धनगरांमधून जनपाठींब्यावर नेता विकसित होणे कोणत्याही प्रस्थापित पक्षाला न आवडणारी सत्य बाब आहे.
        आरक्षणासह सामान्य धनगरांना काय काय मिळालं? हा खूप मोठा प्रश्न असला तरी काही विशिष्ट धनगर लोकांना कदाचित खूप काही मिळालं असेल, म्हणून ते पक्षानिष्ठेशी इतके बांधील आहेत की, त्यांना त्यांचे शब्द सुद्धा आठवत नाही. समाज गेला खड्ड्यात, आरक्षण जाऊ दे गड्ड्यात पण कसाही करून धनगर मत हे बीजेपी शिवसेनेला मिळालेच पाहिजे, याचा काहींनी चंगच बांधलेला दिसतो आहे. अशी भिष्म प्रतिज्ञा घेणारे कार्यकर्ते धनगर जमाती मध्येच मिळू शकतात. हे या पाच वर्षांत सरकारने ओळखलं आहे. हे झालं मागील पाच वर्षातील अन्यायाचं धनगर जमातीच फलित.
           दुसरीकडे शरद पवार साहेब व प्रियंका गांधी धनगर मेळाव्याला मार्गदर्शन करायला येणार आहे म्हणे. तेही धनगर नेत्यांच्या बोलावण्यावरून !! वाह, पराक्रमी धनगर नेत्यांनो.. जेवढं तुमचं ......  करावं  तेवढं कमीच आहे.
कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना शिव्या देत देत बीजेपी शिवसेनेला सत्तेत बसवलं. आणि आता हा "मार्गदर्शन सोहळा" लय अजब वाटला बा..
पवार साहेबांचे कोणते मार्ग अन् कुठले दर्शन घ्यायचं राहीलं राव!!  आयोजक धनगर नेते कोणती गुरुदक्षिणा देणार आहे की गुरूदिक्षा घेणार आहे हे अजून समलेलं नाही. एखाद्या हिंस्त्र प्राण्यांनी धनगरांच्या पिढ्या खावून फस्त केल्या, त्यांचं मार्गदर्शन या देशात केवळ धनगरच घेवू शकतात. त्यामुळेच कदाचित धनगरांना "येडे धनगर" म्हणत असावे.
          प्रियंका गांधी वड्राचं मार्गदर्शन ज्या धनगर नेत्यांना महत्त्वाचे वाटते, त्यांनी आपला राजकारणाचा व वयाचा अनुभव, महाराष्ट्रातील सत्ताकारण तपासून पाहिलं तर खूप बरं होईल. काही चूका होत असेल तर दुरूस्त करता येईल. असो काहीही पण या सर्व प्रकरणांनी काही धनगर नेत्यांचे छुपे अजेंड्यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे हे नक्की.‌ काहींना तर या महाराष्ट्रात धनगरांवर एवढे अन्याय का होतात. याचे उत्तर सापडले.  "घर का भेदी लंका ढाये" ही हिंदी मध्ये म्हण आहे..... अशा घरभेद्यांनीच धनगरावर अन्यायासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य वेळोवेळी केलेले आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, धनगरांवरील अन्यायाचे कर्तेधार्ते केवळ धनगरच आहेत..... हे समजून घेत नाही तोपर्यंत बाकीच्यांना दोष देणे निरर्थक आहे.


जय मल्हार!!

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Monday, July 29, 2019

ऱ्हास माणूसकीचा

ऱ्हास माणूसकीचा

जा माणसा जा,
तू 🌒 चंद्रावर जा.
मंगळावर जा.
पुन्हा जिथे जिथे जाता येईल,
तिथे तिथे अवश्य तू जा.
आलेली एकही संधी गमावू नको.
विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात
तुझाचं झेंडा गाड.
आणि हिम्मत असेल तर
त्या सुर्यावर सुध्दा जावून पहा.
मात्र जिथे कुठे जाशील,
तिथे माणूस म्हणूनच रहा......

जीत जिंदगी की. बहोत बार देखा मैने,

जीत जिंदगी की.

बहोत बार देखा मैने,
हसते खिलते हुए खेत खलियानों को,
बरसते बादल और उलझते तुफानोंसे
धडाडसे गीरते पेडों कों,
फिर भी जिने की तमन्ना रखकर मैं
सोचता रहा मन ही मन में,
क्यू जिंदा है तू ?
क्या पडी है तुझे जिनें की इस दर्दभरी संसार में.
तब उम्मिदे जाग उठी,
और बोलने लगी,
"तू जिंदा है तो
जिंदगी की जित पर यकीन कर."

Wednesday, July 3, 2019

हाच तो राष्ट्रभक्त शिंग्रोबा धनगर.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*हाच तो राष्ट्रभक्त शिंग्रोबा धनगर.*


           *डॉ प्रभाकर लोंढे*
 
       भारतीय भूमी ही कर्तुत्वान माणसांची भूमी असली तरी येथील मनोवृत्ती ही कर्तुत्वान माणसाला देव बनविणारी आहे. माणसाला देव बनविल्यामुळे त्याच्या विषयी श्रद्धा मनामनात निर्माण होत असते,  असं असलं तरी त्याच्या देव रूपातून त्याचं कर्तुत्व मात्र कधी निसटून गेलं हे कळतच नाही. त्यामुळे कर्तुत्ववान माणसाचे पुतळे हे त्याच्या देवरूपापेक्षा कधीही प्रेरणादायीच ठरत असतात.
      खंडाळा घाटातील शिंग्रोबा चे मंदिर हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. महामार्गावरून येताना - जाताना प्रत्येकजन त्याला नतमस्तक झाल्याशिवाय समोर जात नाही, ही सुद्धा वास्तविकता आहे.  असं असलं तरी त्या नतमस्तक होण्यामध्ये त्याच्या देव रूपाला महत्व दिले जाते.  परंतु शिंग्रोबा सारख्या कर्तुत्ववान माणसाचं व्यक्तित्व, कर्तुत्व हे खऱ्या अर्थाने त्याच्या पुतळ्या मधूनच सार्वजनिक होत असतं व सर्वांना प्रेरणादायी ठरतं. म्हणून महान राष्ट्रभक्त, मुंबई- पुणे रेल्वेमार्गाचा संशोधक शिंग्रोबा धनगर यांचा पुतळा जर पाहायला मिळाला तर तो सगळ्यांसाठीच आनंददायी क्षण व प्रेरणादायी प्रसंग असणार आहे. त्यामधून खऱ्या अर्थाने शिंग्रोबाच्या व्यक्तित्वाची ओळख होणार आहे.

*शिंग्रोबाचा हा पुतळा कुठे आहे?*
             शिंग्रोबा चा पुतळा पुण्याजवळ जगप्रसिद्ध निसर्ग रम्य संह्यांद्री पर्वताच्या डोंगररांगांमध्ये लोणावळा परिसरात मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या लोणावळा रेल्वे स्थानकाच्या अगदी बाजूला लोणावळा वस्तीमध्ये एका चौकात हा पुतळा आपणास पाहायला मिळतो. *खांद्यावर घोंगडी, हातात लांब काठी, गुडघ्या पर्यंत धोतर, अंगावर बंडी, डोक्यावर फेटा, पायामध्ये चप्पल, राकट काळवंडलेला चेहरा व शरिरयष्टी पण चेहऱ्यावर झळकणारा दुर्दम्य आत्मविश्वास,* असा असलेला हा पुतळा नक्की धनगर वंशाच्या शिंग्रोंबाचाच असल्याचे सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे.
           नुकतीच २३ जून २०१९ ला खंडाळा, लोणावळा परिसराला मी सहपरिवार भेट दिली.  मुंबई वरून लोणावळा असा घाटमाथ्यांवरून तर कधी बोगद्यातून रेल्वे प्रवास सुरू असताना तसाही शिंग्रोबा डोक्यात घुमत होता. रेल्वे प्रवास लोणावळ्याला संपला व स्टेशनच्या बाहेर आलो. निसर्गरम्य परिसरात मन मोहून गेलं. रात्री मुक्काम केला. परिसरात फिरत असताना हा पुतळा दिसला. हा पुतळा व धनगर वेश याचा संबंध जुळत असल्यामुळे जिज्ञासा वाढली. व तेथे सर्वेक्षणास सुरुवात केली.  वयोवृद्ध माणसं पाहून त्यांना यासंबंधाने विचारणा केली. मुलाखती घेतल्या. अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यापैकी एक रागावला.  आज तो पुतळा "धनगर शेतकरी पुतळा" या नावाने ओळखला जातो.
दिवसभरात पंधरा व्यक्तींना विचारणा केली असता, त्यांच्या पैकी बहुतेकांनी या पुतळ्या संबंधीची खरी वास्तविकता लक्षात आणून दिली.
सर्वेक्षणात सारांश रूपाने त्यांना १) दादा हा पुतळा कोणाचा आहे?
२) हा पुतळा का बनवला गेला? ३) या पुतळ्याचा लोणावळा शी काय संबंध? अशा प्रकारचे प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारले.
त्यावर अनेकांच्या उत्तरांमधून सारांश रूपाने खालील प्रकारे उत्तरे आली.
१) तो धनगराचा पुतळा आहे. २) इंग्रजांनी याची हत्या केली.  ३) यांनी हा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी डोंगरातून रस्ता दाखवला ४) तो मुळात धनगर आहे परंतु अलीकडे त्याला धनगर मानलं जात नाही. ५) हा माणूस रस्ते दाखविणारा होय ६) काही लोक त्याला मावळा म्हणतात. ( एक चिडला व तुम्हाला काय करायचं आहे याचं? असं म्हणाऱ्याचं उत्तर)
याशिवाय सचिन नावाच्या एका वयस्क टॅक्सी चालकाने तर तेथील विशिष्ट सामाजिक वर्चस्ववादामुळे या पुतळ्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे असे स्पष्टपणे सांगितले.
             असो काहीही परंतु तोपर्यंत मी एका स्पष्ट निष्कर्षापर्यंत जावून पोहोचलो होतो,  हे माझे प्राथमिक स्वरूपाचे सर्वेक्षण असले तरी मी संशोधनाच्या अंतिम टोकापर्यंत जाऊन पोचलो होतो की *तो पुतळा शिंग्रोबाचाच असून धनगरांच्या राष्ट्रीय बाण्याचं, राष्ट्रभक्तीचं व अस्मितेचं प्रतिक आहे.*

 *कोण होता हा शिंग्रोबा?*

          शिंग्रोबा हा धनगर असून इंग्रजांना बक्षिसांच्या रुपात भारतीय स्वातंत्र्य मागणारा व राष्ट्रप्रेमापोटी शहीद झालेला महान राष्ट्रभक्त होता. ब्रिटिश राजवटीत इंग्रजांना मुंबई ठाणे  रेल्वे मार्ग पुणे पर्यंत जोडायचा होता. त्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांचं पथक नेमण्यात आलं होतं. गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना सह्यांद्रीच्या घाटमाथ्यावरंच कवडीचही ज्ञान नाही. तरी सर्वेक्षणाच काम सुरू झालं. बरेच दिवस काम सुरू होतं, डोंगरदऱ्यातून सोईसर रस्ता कुठुन टाकावं, हे त्यांना काही केल्या कळत नव्हतं.
         ही बाब रोज कड्या कपारीत माळरानावर शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या शिंग्रोबाच्या लक्षात आली. *धनगर कुठलाही असो, त्याला त्याच्या परिसराची इत्यंभूत माहिती असते. त्यामुळेच तो खरा धरतीपुत्र ठरतो. शिंग्रोबा सह्यांद्रीचा धरतीपुत्र होता, त्याला तेथील डोंगर माथ्यांची संपुर्ण माहिती होती.* त्यामुळे त्याच्यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना आपण मदत करू शकतो, त्यांचा प्रश्र्न सोडवू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. बऱ्याच दिवसांपासून सर्वेक्षणाचं काम करून यश येत नसल्याने  परेशान झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना तो बोलला. मी आपणास काही मदत करू शकतो काय?
             सर्वेक्षणात हा काय मदत करणार? हा कुश्चित प्रश्र्न पडलेले इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वत:ला सफलता येत (मरता क्या नहीं करता?)  नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून शिंग्रोबाची मदत घेतली. शिंग्रोबाच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणास सुरवात झाली. शिंग्रोबा पुढे, शेळ्या मेंढ्या त्याच्या मागे व सर्वात मागे इंग्रज अधिकारी हा डोंगर माथ्यांचा प्रवास सुरू झाला. *शेवटी शिंग्रोबाच्या मदतीने ठाणे ते पुणे रेल्वे मार्गाचा आराखडा तयार झाला.* इंग्रज अधिकारी खूष झाले. त्यांना शिंग्रोबा मुळे आपल्या जिक्रीच्या कार्यात यश आले होते.  त्यांना शिंग्रोबाच्या अतुलनीय मदतीबद्दल सार्थ अभिमान वाटला. त्याला आपण काही बक्षिस दिले पाहिजे, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. त्यांनी शिंग्रोबाला विचारले, " तुला काय बक्षिस पाहिजे?" राष्ट्रप्रेमानी ओतप्रोत भरलेला शिंग्रोबा इंग्रजांना म्हणतो, " *तुम्हाला काही द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या!"*
             शिंग्रोबाचे भारतीय स्वातंत्र्या विषयीचे राष्ट्राभिमानी शब्द ऐकताच ब्रिटिश अधिकाऱ्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. शिंग्रोबाला बक्षिस तर सोडा, तिथेच हत्या केली. शिंग्रोबा मेला, गेला, शहीद झाला, पण राष्ट्रासाठी काही देवून गेला. ब्रिटीशांना सबक शिकवून गेला. मुंबई पुणे रेल्वे मार्ग तयार झाला. त्यानंतर अनेक राष्ट्रभक्त, देशभक्त या देशात शहीद झाले. अनेकांचे स्मारक तयार झाले.  परंतु *राष्ट्रभक्त शिंग्रोबा का उपेक्षित राहीले?*  हा आज फार मोठा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या *अशिक्षित शिंग्रोबाला राष्ट्रभक्ती काय असते हे समजलं होतं, त्याची राष्ट्रभक्ती सुशिक्षित भारतीय व्यवस्थेला का समजू शकली नाही?* शिंग्रोबाच्या पुतळ्याला "धनगर शेतकऱ्याचा पुतळा" म्हणून उल्लेख करण्याची सामाजिक मानसिकता का निर्माण झाली?  लोहमार्गाला शिंग्रोबा लोहमार्ग म्हणून का ओळखला जात नाही? राष्ट्रभक्त शिंग्रोबा एक्सप्रेस या नावाने आगगाडी रेल्वे मार्गावर का धावत नाही? असे अनेक प्रश्न मनात घोळ करीत आहेत.
       लोणावळा परिसरात दिलेल्या भेटीमध्ये उघडकीस आलेला सत्य मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी आपापल्या परीने त्या संबंधाने अधिक संशोधन करून पुन्हा सत्य बाहेर काढून शिंग्रोबा च्या व्यक्तित्वाला व देशभक्ती ला न्याय देण्याचा प्रयत्न करावा या अपेक्षेने हा लेखन प्रपंच आपणापुढे मांडलेला आहे.

(आपल्या सुचना, अभिप्राय व मार्गदर्शन  ९६७३३८६९६३ या क्रमांकावर करावे . ही विनंती)

 *जय राष्ट्रभक्त शिंग्रोबा....*
_________________________
 *डॉ प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर*

Thursday, June 13, 2019

पुरोगामी विचाराचा महामेरू: डॉ. गजानन हुले

पुरोगामी विचाराचा महामेरू: डॉ. गजानन हुले
                  डॉ प्रभाकर लोंढे
                  महाराष्ट्र संतांची भूमी. विचारवंतांची भूमी. या भूमीमध्ये संत तुकाराम पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले छत्रपती शाहू, क्रांतीज्योती सावित्री, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा अशा विचारवंताचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीत झाला. या सर्व विचारवंतांनी येथील वाईट सामाजिक रूढी, प्रथा, परंपरांवर आपल्या विचार प्रक्रियेतून सडेतोड उत्तर देऊन सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढला.  आपल्या प्रगल्भ  विचारांचा वारसा समाजामध्ये पसरविला.  आपल्या विचारातून समाजामध्ये सर्वांगीण क्रांती होईल व या समाजव्यवस्थेतील दलित, पीडित, शोषित, वंचित, उपेक्षित या सर्वांचा उद्धार होईल यादृष्टीने आपला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला. अशा या विचार परंपरेमध्ये आपला महाराष्ट्र घडला. येथील अनेक राजे-महाराजे सुद्धा या विचारांनी प्रभावित होऊन समाज क्रांती साठी प्रेरित झाले. राजकीय सत्तेचा वापर सामाजिक समतेसाठी, समाज कल्याणासाठी केला जावा अशा प्रकारच्या विचारातून महाराष्ट्रात विश्ववंदनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव घडला. ती विचार परंपरा समाजपरिवर्तनाची, मानवी जनकल्याणाची, समतेवर आधारित समाज निर्मितीची कल्पना वास्तवात उतरविणारी संजीवनी ठरली. कृतीयुक्त विचारांची एक परंपरा या महाराष्ट्राला लाभली.
               या संत परंपरेचा, विचार पुरुषांच्या कार्याचा व विचारांचा प्रभाव आजही महाराष्ट्रावर दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक तरुण महापुरुषांच्या विचारांचे पाईक म्हणून जीवन जगताना दिसून येतात. या विचार परंपरेतील एक छोटासा विचार बिंदू म्हणजे डॉ.. गजानन हुले
          विचार काय करता?  प्रत्यक्ष कृती करा. असा संदेश शब्दा शब्दाला, क्षणा क्षणाला देऊन या भारतीय शासन व्यवस्थेतील वर्षानुवर्षाच्या शोषित, वंचित घटकाला, राजकीय सत्तेशिवाय त्यांच्या उद्धाराचा मार्ग नाही हे पटवून देणारा डॉ. गजानन हूले नावाचा तरुण आज महाराष्ट्राच्या मातीत जगताना दिसतोय. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील एका छोट्याशा गोभणी गावामध्ये जन्माला आलेला महाराष्ट्रातील शोषीत पिडीतांचे दुःख जाणणारा,  येथील राजकीय व्यवस्थेला पूर्णपणे समजून घेऊन व्यवस्थेची चिरफाड करणारा हा तरुण वंचितांच्या दुःखाचं कारण पटवून देतो. या महाराष्ट्रातील वंचित घटकांचा राजकीय सत्तेमध्ये जाण्याचा राजमार्ग सांगतो. प्रस्थापित व्यवस्थेला  न घाबरता प्रस्थापितांनी राबविलेल्या कूटनीतीचा, दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्याचे बळ आपल्या विचारातून वंचित, उपेक्षित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी धडपडतो. त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्रात वंचितांची राजकीय क्रांती होईल की माहित नाही. परंतु अशा व्यक्ती त्यामुळे महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचतील एवढं मात्र नक्की. त्यातून
परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.       
           महाराष्ट्रातील समाज व्यवस्थेमध्ये अनेक जाती-जमाती आजही राजकीय दृष्ट्या वंचित उपेक्षित राहिलेल्या आहे. अनेकांना त्यांचे घटनात्मक अधिकार/ हक्क मिळालेले नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. तरीसुद्धा हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. तो कदाचित येथील स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या घरांदाज सत्तापिपासू राजकारण्यांचा तो पुरोगामी महाराष्ट्र असेल. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश जनता शोषित उपेक्षित वंचित म्हणून जगत आहेत. तिथेच विशिष्ट घराणे या महाराष्ट्रात राज्य करीत आहे. असं असताना हा महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या विशिष्ट घराण्यां पुरता मर्यादित न राहता सामान्यातील सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाला सत्तेचा लाभ घेता यावा.  प्रत्येक सामान्य माणसालाही राजकीय व्यवस्था स्वतःची वाटावी, लोकशाहीमध्ये माझ्या मताला सुद्धा किंमत आहे.  माझे मत म्हणजे शासनव्यवस्थेचा श्वास आहे. सामान्य जनतेच्या मतानुसार येथील सरकारे बदलली पाहिजे. सरकार हे सर्वसामान्यांच्या इच्छाशक्तीवर चालले पाहिजे, या भूमीतील सामान्य माणूस हा स्वतः राजा बनला पाहिजे.  हा त्यांचा विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, यासाठी विशेष तळमळ डॉ. हूले यांच्या मध्ये दिसून येते.
        वैद्यकीय पेशा असला तरी आर्थिक विवंचने मध्ये जगणारा वैचारिक समृद्धी असलेला हा तरुण महाराष्ट्राच्या पुरोगामी विचार परंपरेला शोभून दिसतो. येथील प्रजा समाजाला राजा बनविण्याचा विचार सामान्य माणसाच्या डोक्यात बिंबवण्यासाठी प्रत्येक क्षण घालवितो. खऱ्या अर्थाने येथील पुरोगामी विचार परंपरेचा तो वारस वाटतो. 
           परिवर्तन कुठलेही असो त्याचा आधारस्तंभ हा विचार असतो, विचार रुजला की  त्यानुसार सामाजिक पार्श्वभूमी तयार होते व त्यातून विचाराला अपेक्षित असलेला समाज निर्माण होत असतो. विचारांच्या प्रक्रियेमध्ये सातत्य आवश्यक असते. आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या विचार परंपरेतील पुरोगामी विचार चक्र सातत्याने सुरू ठेवणार व्यक्तित्व म्हणजे डॉ. गजानन हूले असं म्हटलं तर याला कोणीही अतिशयोक्ती म्हणणार नाही असे मला वाटते..

                                          राजकीय अभ्यासक
                                             डॉ प्रभाकर लोंढे

Sunday, May 19, 2019

सावधान! वंचित बहुजन आघाडीमध्ये घुसखोरी होत आहे.*

🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
*(वंचित बहूजन दिन विशेष)*

 *सावधान! वंचित बहुजन आघाडीमध्ये घुसखोरी होत आहे.*

                        *डॉ प्रभाकर लोंढे*

              20 मे 2018 महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकीय पटलावर एक महत्वपूर्ण दिवस म्हणून ओळखला जाणार याची चिन्हे दिसू लागली आहे. या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्योत्तर काळात प्रस्थापित झालेली घराणेशाही व प्रस्थापितांच्या राजकीय षडयंत्राचा परिणाम म्हणून येथील अनेक जाती जमाती राजकीय प्रवाहापासून दूर फेकल्या गेल्या. आपल्या अधिकारापासून वंचित राहिल्या. सत्यता ही आहे की, काहींना तर हेतुपुरस्सर वंचित ठेवले गेले आहे. परिणामतः या महाराष्ट्रातील फार मोठा वर्ग अन्यायग्रस्त भावनेतून या दिवशी एकत्र आला. *यापैकी एक मोठा वर्ग म्हणजेच धनगर जमात* .
           या दिवशी महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या धार्मिक स्थळी अन्यायग्रस्त धनगर जमातीच्या पुढाकाराने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या वंचित उपेक्षित जमातींचे अनेक नेते कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले. विचार मंथनातून *राजकीय सत्ता संपादनाची भाषा आम्ही सुद्धा करू शकतो,* अशा प्रकारचा आत्मविश्वास व संदेश घेऊन घरी परत गेले. तिथून त्यांच्या अंतर्मनात निर्माण झालेली राजकीय सत्तेची आस येथील प्रस्थापितांचे आराखडे व झोप उडवणारे ठरले. वंचित बहुजनांवरील वर्षानुवर्षाच्या अन्यायग्रस्त भावनेला वाचा फोडणारी हक्काची राजकीय आघाडी व नेतृत्व लाभल्याचे समाधान अख्या महाराष्ट्रात व्यक्त होवू लागले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. परिणामतः अख्ख्या महाराष्ट्रात या वंचित बहुजन आघाडीचीच चर्चा होऊ लागली. प्रसारमाध्यमांना सुद्धा अपेक्षित नसताना अपरिहार्यपणे यांना चर्चेत घ्यावं लागलं. जशी की सत्तेची समीकरणे बदलविण्यामध्ये ही आघाडी नक्कीच आपला प्रभाव दाखवणार. त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी ला गृहित धरून आपली समीकरणे बदलावी लागली.
           महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती एवढी बदलली की, एकेकाळी टीका करणारे सुद्धा या वंचित बहुजन आघाडी कडे वळू लागले आहे.  बीजेपी-शिवसेने मधून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये किंवा रा.का- काँग्रेस मधून बीजेपी शिवसेनेमध्ये सत्तेसाठी पक्षांतर करणारे (गीरगीट) हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. परंतु या पक्षांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला आपली आघाडी म्हणून मानणारे व विचारांसाठी नाही तर केवळ उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये येणारे अनेक नेते आज वंचित बहुजन आघाडी च्या दारावर पादत्राणे झिजवितांना दिसत आहे.
               दिवसेंदिवस वाढतं वलय व राजकीय हालचाली पाहून काहींनी तर *बाळासाहेब आंबेडकर, हरिभाऊ भदे व अन्य धनगर नेते, असरउद्दिन ओवेसी* यांच्यावर अनेकांनी चांगलंच तोंडसुख घेतलेलं आहे. असो काहीही परंतु *वंचित बहुजन आघाडी ला फालतूपणा (माझ्याशी फोनवर बोलताना) म्हणणारे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी च्या तिकिटावर उभे राहिलेले मी पाहिले आहे.* त्यामुळे शिव्या खात का असेना निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी ही ताकदवान आहे. हे सिद्ध होते.
        *वंचित बहुजन आघाडी साठी सोशल मीडिया च्या माध्यमातून लिखाण करणाऱ्या लेखकांना सुद्धा काही महाभागांनी काही वेळा टारगेट केलेलं आहे.* वाईट याचं वाटतं की, यामध्ये पिढ्यानपिढ्या राजकीय दृष्ट्या पिचल्या गेलेल्या धनगर जमातीचे बीजेपी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आपली वफादारी जपणारे *अनेक धनगर नेते, कार्यकर्ते आहेत* . परंतु त्यांना सुद्धा सत्य स्वीकारण्याची वेळ आलेली आहे.
           लवकरच तीन दिवसानी २३ मे ला लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित केले जाते. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणारच असे जरी म्हणता येत नसले तरी एवढं मात्र नक्की की या आघाडीच्या उमेदवारांनी एकूण महाराष्ट्रात घेतलेली मतसंख्या ही विक्रमी राहणार आहे. त्यामुळे ही मतसंख्या लोकसभा निवडणुकी पेक्षा येत्या भावी काळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपला प्रभाव नक्कीच दाखवेल. याचे चित्र मात्र  लोकसभेचा निकाल स्पष्ट करणार आहे.
         याशिवाय हे वेगळे सांगण्याची गरज नाही कारण  अनेक संधीसाधू या वंचित आघाडी कडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी येऊ नये, असं कधीच कोणी म्हणणार नाही. कारण ही आघाडीच वंचितांची आहे, ज्यांना कुठेच राजकीय सत्तेसाठी थारा मिळाला नाही, उमेदवारी मिळाली नाही,  ज्यांचा नेहमीच प्रस्थापितांकडून वापर केला गेला आहे. अशां सर्वानाच या आघाडीमध्ये येता येईल. ( *येतांना मात्र केवळ स्वार्थाने नाही तर विचाराने या आघाडीमध्ये सामील व्हावे)* परंतु यांच्या येण्यामुळे वंचित बहुजन आघाडी चे *खरे आधारस्तंभ ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या कृतीतून, ज्यांच्या सत्यवादी धोरणातून तन-मन-धनाने ही वंचित बहुजन आघाडी उभी राहिली, ते मात्र या आघाडीपासून वंचित होणार नाही,* याची काळजी फक्त घेतली जावी हीच या ठिकाणी अपेक्षा !!
      भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

जय मल्हार

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Tuesday, May 14, 2019

धनगरानो ! खरंच .......दम असेल तर प्रस्थापितांविरुध्द लढा.*

🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺
*धनगरानो ! खरंच .......दम असेल तर प्रस्थापितांविरुध्द लढा.*             
                       
 *डॉ प्रभाकर लोंढे*

          *ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनू शकतो.* असा संदेश आपल्या दैनंदिन जगण्यातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तुत्वाचा नाही पण रक्ताचा वारसा सांगणारी जमात म्हणून धनगर जमात सर्वत्र ओळखली जाते. परंतु महापुरुषांना किंवा कर्तुत्वान पराक्रमी योद्ध्यांना कधीच कोणती जात नसते ना धर्म असतो. केवळ कर्माच्या भरोशावर ते लोकाभिमुख जगत असतात. त्यापैकी एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांनी आपल्याकडे असलेल्या सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला. परंतु अशा या लोककल्याणकारी सत्ताधिश राणीचा वारसा सांगणारी धनगर जमात आज मात्र सत्ताहीन झालेली आहे.
          आज लोकशाही असली तरी घराणेशाही प्रस्थापित झालेली आहे. धनगरांचे छोटे मोठे नेते संपवण्याच्या मागे प्रस्थापित लागले आहे. धनगरांमध्ये नवीन नेता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वत्र घेतली जात आहे. नवखा रोहित पवार असो की सुप्रिया सुळे असो किंवा पुन्हा कोणी यांना मात्र धनगर नेतृत्व संपवूनच मोठे व्हायचे आहे असं वाटायला लागले आहे. प्रस्थापित पक्ष कोणताही असो मात्र त्यांना धनगर नेतृत्व उभंच राहू द्यायचं नाही आहे. त्या पक्षांमधून वास करणारी एक अदृश्य शक्ती हे धनगरांच्या जीवावर उठले आहे, आणि ते सत्य आहे. ही बाब प्रत्येक धनगर नेता, कार्यकर्ता व सर्वांनी ओळखणे आवश्यक आहे.
            असं असताना धनगर नेते कार्यकर्ते यांना ते कसं काय कळत नाही हाच मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. कदाचित ते कळत असलं तरी आचरणातून दिसत नाही हा त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे.  काही धनगर आपल्याच माणसांना ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्यात गुंग आहे. काही प्रस्थापितांची दलाली करताना दिसत आहे. काहींना तर धनगर नेतृत्वामध्ये आपले परस्पर शत्रुत्व दिसत आहे. काही आपल्याच धनगर नेतृत्वाची जिरवण्याची संधी शोधत आहे.. माझ्यापेक्षा तू कसा मोठा होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही तर पोटजातीचे विष कालविण्यात मस्त आहे. काहीतर खाऊन पिऊन मस्त सुस्त झालेले आहे. या कामात धनगरांची खर्च होणारी शक्ती जर वाचली व संघटितपणे काम करून एकत्र आली तर हा धनगर या व्यवस्थेवर राज करू शकतो याची जाणीव येथील प्रस्थापितांना असल्यामुळेच ते या धनगरांच्या भांडणाच्या आगीत पुन्हा तेल टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
                अशा परिस्थितीत हे सर्व समजून न घेण्याइतपत येडी असलेली धनगर जमात आज कोणालाच अपेक्षित नाही, कोणालाच मान्य नाही, असं असताना हे असं का घडतं? याचा विचार करतांनाही फारसा कोणी दिसत नाही. आज योग्य संकेत आहे की धनगरांमध्ये नवीन स्वाभिमानी नेतृत्वाचा उदय होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना जुन्या परस्परांमध्ये आपसात लढण्याच्या प्रवृत्ती धनगरानी सोडल्या नाही तर नवीन नेतृत्व सुद्धा निर्माण होण्याच्या आधीच ते संपल्या शिवाय राहणार नाही.
              आज धनगरांना आपसात नाही तर प्रस्थापितांशी लढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रस्थापितांचे मनसुबे ओळखून वाटचाल करण्याची गरज आहे. *महादेव जाणकार साहेब, राम शिंदे साहेब, दत्तामामा भरणे* अशा धनगर नेत्यांना संपवण्यासाठी प्रस्थापितांचे चाललेले षडयंत्र ओळखण्याची व एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. तेथे या नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही तर तो धनगरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे.  म्हणून तेथे पोटजाती आड येणार नाही, कोणाचा दुराभिमान आड येणार नाही, मात्र जातीय अस्मिता जपण्याच्या प्रयत्नांमध्ये परस्परांना सहकार्य करणे हेच आज प्रत्येक नेत्याचे व कार्यकर्त्याचे आद्य कर्तव्य आहे. धनगरांच्या एका नेत्यावर आलेलं संकट  परस्पर सहकार्याने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. प्रस्थापित व्यवस्थेतील धनगरांचे असलेले विरोधक हेरून त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. राजकीय सत्ता हस्तगत करण्याची अपरिहार्यता आहे.
         तेव्हा खरंच धनगरांनो ! मनगटात दम असेल व स्वतःला सुभेदार मल्हारराव, पराक्रमी यशवंतराव व सर्वगुणसंपन्न अहिल्याई चे वारस मानत असाल तर प्रथमतः प्रस्थापितांशी लढण्यासाठी दंड थोपटा *. "अपने गली मे तो कोई भी शेर बनता है!* " म्हणून आप आपसांत विरोधक निर्माण न करता, परस्पर सहकार्याने प्रस्थापितांना आपला दम दाखवा. की ज्यांनी पिढ्यानपिढ्या तुमच्याशी वैरत्व करून तुमच्या पिढ्या बरबाद केल्या आहेत. लोकशाहीतील तुमचे घटनात्मक अधिकार/ हक्क यापासून तुम्हाला वंचित ठेवलेले आहे. एक वंचित उपेक्षित जमात म्हणून तुमचं अस्तित्वच धोक्‍यात आणलं आहे. हे सर्व त्यांना यासाठी शक्य झाले आहे, कारण आपण आपसात लढलो. आपण आपल्या माणसाला शत्रु समजत आलो. त्यामुळे खरा शत्रु आपण ओळखू शकलो नाही. आज आपण सर्वांना आपल्या शत्रुची ओळख पटलेली आहे. तेव्हा *आपल्याला पावले उचलायची आहे ती, केवळ सत्तेसाठी!*
*तर उठा!  लढण्यासाठी! परस्परांच्या हक्कासाठी!! भावी पिढ्यांच्या रक्षणासाठी!!*

जय मल्हार

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

दुसरा लेखसंग्रह

दुसरा लेखसंग्रह

Tuesday, April 9, 2019

साहेब! माझा सुध्दा पाठिंबा कसा काय जाहीर केला?

साहेब! माझा सुध्दा पाठिंबा कसा काय जाहीर केला?

             एक सामान्य धनगराचा प्रश्र्न..

   भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.  हे मतदान कोणाला करायचे? निवडणूकीत कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा?  हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु  "मानिकराव ठाकरे यांना धनगर समाजाचा संपूर्णता पाठिंबा!* या नावाखाली पत्रके पाहून खरंच आश्चर्य वाटले.
 तेव्हा सामान्य धनगर म्हणून काही प्रश्न पडले कि,

१) धनगर समाजाचा सरसकट पाठिंबा कसा काय मिळाला?

२) असं कोणतं काम केलं कि, त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला?

४) यवतमाळ जिल्ह्यातील एकाही धनगर नेत्याला मोठं होवू न देणाऱ्या व्यक्तित्वाला धनगर समाजानी कसा काय पाठींबा दिला?

५) विशिष्ट लोकांनी संपूर्ण समाजाचा निर्णय घेण्याचा अधिकार अजूनही कसा काय संपला नाही?

३) वैयक्तिक फायद्यासाठी समाजाला विकण्याची प्रवृत्ती धनगर जमातीत अजूनही कशी काय जिवंत आहे?

६) अशा प्रकारचा लाचारीचा निर्णय समाजात स्वाभिमान निर्माण करणार आहे काय?

७) अशा प्रकारचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचा तुमचा निर्णय  सामान्य धनगर लोकांनी का स्विकारावा ?

८) तो उमेदवार ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षानी धनगर जमाती संबंधीचे कोणते चांगले निर्णय घेतले आहे?

९) त्यांच्या पक्षाने किती धनगरांना उमेदवारी दिली आहे?

१०) त्या उमेदवाराचा धनगर आरक्षणाच्या बाबतीत काय अजेंडा आहे?

११) त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सभागृहात किती वेळ मांडला आहे?

१२) त्यांच्या भोवताल फिरणारे कोण कोण मोठे धनगर नेते? कशासाठी जमा झाले आहेत?

                    आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर या प्रश्र्नांची उत्तरे आम्हा सामान्य धनगरापर्यंत येवू द्यावे. ही विनंती..

                               आपणचारात घेत नसलेला
                                आपलाच सामान्य धनगर बांधव

Wednesday, April 3, 2019

जयसिंग तात्यांचा त्याग समाजासाठी प्रेरक*

💐💐💐💐💐💐💐💐
*जयसिंग तात्यांचा त्याग समाजासाठी प्रेरक*

            डॉ. प्रभाकर लोंढे
_______________
 समाजसेवेच्या नावावर भोग भोगणारे नेते धनगर समाजामध्ये मागील काळात आणि विशेषतः जागृतीच्या पाच वर्षांमध्ये अनेक पाहिले असतील. प्रस्थापितांच्या शब्दांवर त्यांच्यासाठी आपल्या समाजाची/जमातीची बाजी लावणारे प्रसंगी एकांतात लिलाव करणारे धनगर नेते सुद्धा आपल्या निदर्शनास आले असतील. ते माफ करण्या पलीडचे आहे. *नाव घ्यायचे समाजसेवेचे आणि वैयक्तिक स्वार्थाचे, राजसत्तेचे* असे छुपे अजेंडे बाळगायचे, असे नेते सुद्धा आपण पाहिले असतील. परंतु *सेवा भोगात नाही तर त्यागात आहे व हीच खरी समाजसेवा असते,* याचा आदर्श जमाती समोर घालून देण्याचे कार्य प्रथमता जयसिंग तात्या शेंडगे यांनी केलेले आहे. एक दुसऱ्या साठी त्याग करण्याची  भूमिका आजच्या घडीला भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
 जयसिंग तात्यांनी सामाजिक भावना, एकोपा, समाजहित लक्षात घेऊन घेतलेली माघार धनगर नेते, सामाजिक कार्यकर्ते व समस्त धनगर बांधवांसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक व समाज सेवेच्या दृष्टीने आदर्श नमुना आहे.
एकीकडे धनगर जमातीला कोणी उमेदवारी देत नसताना वंचित बहुजन आघाडीने सामाजिक वातावरण बघून जयसिंग तात्यांना सांगली मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. ही उपलब्धीच जयसिंग तात्यांसाठी खासदारकीचा मार्ग मोकळे करणारी होती.   
                  *एखाद्या वंचित उपेक्षित बहुजनांना उमेदवारी मिळणे हे भारतीय लोकशाहीमध्ये किती दिव्य आहे,* हे संपूर्ण धनगर व उपेक्षित समाजाला कळून चुकले आहे. अशा परिस्थितीत सुद्धा हातात आलेल्या उमेदवारीचा सामाजिक भावनेतून परस्परांशी समन्वय, संगणमत व यशस्वी चर्चा करून सामाजिक दृष्ट्या योग्य तो निर्णय घेवून समाज बांधवासाठी त्याग करणे, हा मनाचा फार मोठेपणा आहे. धनगर समाजासाठी ती एक नवीन अत्याविषयक स्तुत्य बाब आहे. याचा पायंडा जयसिंग तात्यांनी पाडला व तो धनगर जमातीच्या राजकीय अस्तित्व निर्मितीसाठी दिशा देणारा आहे. शेंडगे परिवारातील आतापर्यंत झालेली परवड सुध्दा सुधारणारा आहे.
          *"धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा"* ही धनगरांच्या बाबतीत असलेली उपहासात्मक सत्य म्हण जयसिंग तात्या शेंडगेनी खोडून काढण्याचा प्रयत्न स्वतः केलेला आहे. यामुळे सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेण्याची सामाजिक प्रवृत्तीच समोर आलेली आहे. हा प्रयत्न कदाचित धनगरांच्या राजकीय समृद्धीतील  महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.  अशा सामाजिक सत्प्रवृत्तीचा खऱ्या अर्थाने अंगीकार व पुरस्कार सामाजिक लेवलवर व्हावा हाच या लेखना मागचा कळीचा मुद्दा आहे.
    यापुढे  धनगर जमात आपली राजकीय पावले सूत्रबद्ध टाकण्यासाठी सक्षम झाली आहे. परिस्थितीनुरूप आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी योग्य आहे ही बाब तो समाज प्रगल्भ झाला आहे, अशा प्रकारचा सामाजिक संदेश प्रस्थापितांपर्यंत पोहोचण्यासाठी जयसिंग तात्यांचा हा निर्णय ही अतिशय वाखाणण्याजोगा आहे. जयसिंग तात्या आपण यापुढे धनगरांच्या राजकीय हृदयासाठी आवश्यक असलेल्या समन्वयाचे मार्गदर्शक व दिशादर्शक असाल हा आपणास विश्वास देऊ इच्छितो.
प्रस्थापितांच्या नादी लागून भाऊ भावाचा काटा काढणारे धनगर नेतृत्व आपण सर्वांनीच पाहिले आहेत. काहींनी तर ते जवळून अनुभवले आहेत. *एक दुसऱ्याची जिरवण यामध्ये धनगरांनी किती सत्यानाश केला आहे* याचे उदाहरणे आपणा प्रत्येकाजवळ आहेत. परंतु स्वतःच्या हातात आलेली उमेदवारी, स्वतःच्या तोंडात आलेला घास आपला बंधू म्हणून गोपीचंद पडळकर सारख्या नवख्या नेतृत्वाला देणे ही जयसिंग तात्यांची भूमिका समस्त धनगर नेतृत्वाला, प्रगल्भ नेतृत्वाची, जमातीच्या पालकत्वाची भूमिका शिकवणारी, निभावणारी व भावी काळातील पिढी साठी आदर्श घालून देणारी आहे.
काहींच्या मते हा त्याग नगण्य असेल, परंतु वर्षानुवर्षांपासून उमेदवारी मिळतच नव्हती त्या जमातीसाठी उमेदवारी मिळणे व स्वत:ला मिळालेली उमेदवारी सामाजिक समीकरणे पाहून आपल्या समाज बांधवाला देणे ही कधी नव्हे ती फार मोठी त्यागाची गोष्ट आहे. आता गोपीचंद पडळकर सांगली मतदार संघातून खासदारकी मिळवून धनगर समाज व जयसिंग तात्यांना किती न्याय देते याकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहेत. त्यासाठी त्यांना जयसिंग तात्याकडून समस्त धनगर समाज व माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा!! व पुढील सर्व निर्णय सामाजिक हिताच्या दृष्टीने सामाजिक भावना लक्षात घेऊन घेतील ही अपेक्षा

जय मल्हार साहेब

 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Saturday, March 23, 2019

सु. मल्हाररावांच्या जीवनातील प्रसंग नेत्यांना मार्गदर्शक!!!!*

🇮🇳🇧🇦🇧🇦🇧🇦🇧🇦🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇮🇳
*सु. मल्हाररावांच्या जीवनातील प्रसंग नेत्यांना मार्गदर्शक!!!!*
                 
           *डॉ. प्रभाकर लोंढे*

 भारतातील सर्वांत समृद्ध संस्थान चे संस्थापक व मराठाशाहीचे आधारस्तंभ थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनातील प्रसंग आजच्या काळातील धनगर नेत्यांना मार्गदर्शक असून निवडणूक काळात यशस्वी निर्णय घेण्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. असा तो प्रसंग पुढीलप्रमाणे आहे.
            छत्रपतीच्या आज्ञेनुसार बाळाजी विश्वनाथाने १९ जून १७१८ ला दिल्ली मोहीम सुरू केली होती. त्या मोहिम मध्ये मल्हारराव प्रथमच सामिल झाले होते. त्यांना पेंढारी च्या पथकासोबत कोणतीही रसद न देता सामिल करून घेण्यात आले होते. *(धनगरांची सामाजिक दुरावस्था)* त्यामुळे त्यांना स्वत:च्या वाटखर्चासाठी स्वत:च व्यवस्था करावी लागत होती.
      अशा परिस्थितीत फौजा दिल्लीत पोहोचल्या.  एका महालाच्या खंडणीचा ऐवज ठरविला गेला. पण अट फक्त एकच, महालाच्या परिसरातील गवत काडी, किंवा शेते यांची नासधूस करु नये. ही अट तशी मल्हारराव होळकरांकडून पालन होणे कठीण होते. शेवटी मल्हाररावांच्या स्वारांनी शेतातील पिके कापून आणून घोड्यांना खायला दिले. ही बातमी बाळाजी विश्वनाथ पेशवे कडे गेली. तोच त्यांचा सतरा वर्षं वयाचा मुलगा बाजीरावने रागात येवून मल्हाररावांच्या बारगीरास काठी मारली. हा प्रसंग पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यावेळी संतापलेल्या मल्हाररावांनी हातात येईल ते *मातीचे ढेकूळ बाजीरावाच्या छाताडात हाणले.*
       याचा परिणाम बाळाजी विश्वनाथाने मल्हाररावांचा गोट दुसरे दिवशी लुटून घेण्याचा विचार केला. ही बातमी मल्हाररावांना कळताच त्यांनी धाडसाने आपले बारगीरांना सांगितले *, जे माझ्या मरणाच्या सोबत असेल त्यांनी राहावे आणि नसेल त्यांनी निघून जावे.* शेवटी फक्त बाविस सहकारी जवळ शिल्लक राहिले. त्या सर्वांना सोबत घेऊन *मल्हारराव सर्व तयारीनिशी टेकडीवर ढाल तलवार घेऊन जावून बसले.*
    या विषयीची माहिती मराठ्यांच्या सैन्यामध्ये असलेल्या  *पांढरे नावाच्या धनगर सरदारास मिळताच तो मल्हाररावांना येऊन भेटला आणि मल्हाररावांना त्यांनी धीर दिला. हिम्मत सोडू नको. हाटकर- खुटेकर धनगराचे बीज ज्याचे असेल तो तुजला सामील आहे, तुझी वाट ती आमची वाट आहे.(पोटजाती विसरा)*
        त्याच वेळी त्यांनी पेशव्याकडे जाऊन झाल्या प्रकाराचा निषेध केला व सांगितले, ठणकावले. सरदारी करू म्हणता आणि शिपायांची बरदास या प्रकारची!
 *तुम्हास ढेकूळ मारले तो तुमचे हरिपाचा(शत्रुचा) प्राण घ्यावयास कसा चुकेल, कदाचित धनगर मात्र त्यास सामील झाल्यास कसे पडेल?*
ही बाब पांढरे सरदाराने पेशव्याच्या निदर्शनास आणून देताच पेशव्यानी मल्हाररावांना लुटण्याचा विचार सोडून दिला. व त्याच्याशी दिलजमाई करण्यासाठी बाजीरावला सोबत घेऊन बाळाजी विश्वनाथ मल्हाररावांकडे पहाडीवर गेले. *तेथे मल्हाररावांना वस्त्रे देऊन 20000 रुपये नगदी पदरी घालून त्यांची घोडे ज्या गोटात गेली होती ती परत स्वाधीन केली. पुढे मल्हाररावानी पंचवीस घोड्यांची सव्वाशे घोडी केली.( स्वकर्तृत्वावर विश्वास)*
     काही दिवसांनी माघारी फिरताना *सिपरी कोल्हारस या ठिकाणी बाजीराव नाल्याच्या पाण्यात स्नान करीत असताना मल्हाररावानी बाजीरावास धडा शिकवण्याच्या दृष्टीने गराडा घातला आणि सरळ छातीला बाण लावला. तुझा वाली कोण? अशा शब्दांमध्ये त्याचा समाचार घेतला. त्यावर बाजीरावाने मल्हाररावांना भोजन करण्याचा आग्रह केला.( अपमानाचा बदला)*
परंतु मल्हाररावांनी नकार दिला. त्यावेळी बाजीराव बोलले. तुमची *आमची या अन्नाची क्रिया तूम्हाकडे स्वारी करणे समयी 5000 फौजेची सरदारी सांगू. (यशस्वी तडजोड)*
   अशाप्रकारे मल्हाररावांच्या *सरदारकी संबंधाने बोलण्याचे वचन बाजीरावाने मल्हाररावांना दिले.*
       हा प्रसंग मल्हाररावांना आदर्श मानणार्‍या प्रत्येक धनगर नेतृत्वाच्या स्वाभिमानी रक्ताला दिशा देणारा आहे. संपूर्ण प्रस्थापित व्यवस्था धनगर विरोधात असताना  धनगर नेत्यांना  राजकीय व्यवस्थेत आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यामधून खरंच खूप काही शिकण्यासारखे आहे. मात्र आम्ही आमच्या इतिहासापासून किती प्रेरणा घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
           यापुढे आम्ही इतिहासापासून प्रेरणा घेतली तरच आमचा राजकीय उदय होणार आहे. *युद्ध तलवारीचे असो की मतपेटीचे असो. नीती कौशल्य, विजूगिशी वृत्ती, स्वाभिमानी बाणा, संकट समय एक दुसऱ्याला साथ देण्याची वृत्ती.  एकात्मतेची भावना (पोटजातींचा विसर), शत्रूची अचूक ओळख, प्रसंगावधान, अचूक वेळ लक्षात घेऊन हीत साध्य करण्याची कला यासाठी मल्हाररावांच्या जीवनातील हा प्रसंग अतिशय मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.*
       धनगर नेत्यांनी या प्रसंगाचा सहसंबंध आजच्या काळातील *लोकशाही व्यवस्थेच्या संदर्भात समजून घेवून पोटजाती विसरून शत्रूच्या विरोधात संघटित होऊन लढण्यासाठी हा प्रसंग सर्वांसमक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे* ...


जय मल्हार साहेब

 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Friday, March 8, 2019

धनगरांनो! तुमची कितवी पिढी राजकारणात आहे??*

👨‍👦‍👦👩‍👦‍👦💥👩‍👧‍👧👨‍👦‍👦💥👨‍👧‍👧👩‍👦‍👦💥👩‍👦‍👦👨‍👧‍👦
*धनगरांनो! तुमची कितवी पिढी राजकारणात आहे??*

              *डॉ.प्रभाकर लोंढे*

भारतीय लोकशाहीच्या सत्तर वर्ष यशस्वी कालावधीत सत्तेच्या विकेंद्रीकरणा सोबतच अप्रत्यक्षपणे सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे निदर्शनास येते.  जातीय वर्चस्ववाद आणि त्यातून निर्माण झालेली घराणेशाही यामुळे अहंकाराधिष्ठित राजकारण व द्वेशाधिष्ठित प्रवृत्तीमुळे भारतीय लोकशाहीला भयंकर किड लागली आहे.
          ही किड इतकी भयंकर आहे की, त्यामुळे धनगर जमाती सारख्या अनेक जाती जमाती समुह सत्तेपासून कोसो दूर फेकले गेले आहे. तर दुसरीकडे विशिष्ट घराण्यांकडे सत्तेचे केंद्रीकरण  पिढ्यान् पिढ्या चालू आहे. या घराण्यांची दुसरी तिसरी, चवथी पिढी राजकारणात प्रवेश केलेली आहे. त्यांच्याकडे आर्थिक सत्तेचे सुध्दा केंद्रिकरण झालेले आहे. त्यावेळी येथील लोकशाही वर महाभयंकर प्रश्न निर्माण होतो.  येथे समताधिष्ठित लोकशाही, न्यायाधारित समाज केव्हा निर्माण होईल व कायदे सर्वांसाठी समान या मानसिकतेतून राज्यघटनेची संपूर्ण अंमलबजावणी होईल, अशी लोकशाही कधी प्रस्थापित होईल,? हा प्रश्र्न असतांनाच लोकशाही अंतर्गत  पोसली गेलेली घराणेशाही ही सुद्धा मोठी समस्या आहे. त्यापैकी उदाहरणार्थ
१) *नेहरू/गांधी- पंडित- इंदिरा- राजिव/सोनिया- राहूल/प्रियंका)*
२) *पवार - शरद- सुप्रिया/अजित- पार्थ,)*
३) *ठाकरे - बाबासाहेब- उध्दव/ राज- अमित)*
४) *महाजन - प्रमोद - पुनम*
५) *राणे -नारायण- नितेश/निलेश)*
 *६) मुंडे गोपीनाथ-पंकजा/प्रितम/धनंजय)*
७) *तटकरे - सुनील- मुलगा तटकरे)*
ही सर्वपरिचित उदाहरणे मी माहिती साठी घेतली आहे. आपणास माहीत असलेली अशी अनेक उदाहरणे लिहू शकता.
त्याचवेळी धनगर जमात बहुसंख्येने असतांना आपण या धनगर जमातीच्या किती घराण्यांची कोणती पिढी राजकारणात आहे, किती कायम टिकून आहे याचा आपण विचार करू...
१)शेंडगे- शिवाजीराव-प्रकाश/रमेश-????
२) डांगे- अण्णासाहेब- ?????????
३). देवकाते- आनंदराव----?????
४). जानकर- महादेव...??????
५) वडकुते - रामराव---??????
६) रूपनवर- रामहरी...????
७) भदे.- हरीदास----????
८)
९)
१०)
असे आपण आपल्या माहिती प्रमाणे नावे लिहू शकता. या सर्व नावांचा विचार केला तर त्यांची सर्वांची पहीलीच पिढी राजकारणात दिसते. किंवा काही राजकारणाच्या/सत्तेच्या बाहेर फेकल्या गेल्याचेही लक्षात येते. यांच्या पैकी बहूतांश लोकमताच्या आधारे निवडून आलेले नाही तर बहुतेक नेत्यांनी प्रस्थापितांच्या दयेवर म्हणजेच विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळविलेले आहे/ नेतृत्व केलेले आहे. महाराष्ट्रातील घराणेशाही प्रमाणे त्यांची दुसरी पिढी प्रभावीपणे तर सोडा राजकारणात सक्रिय असायला हवी होती. परंतु तसे दिसत नाही. याचा अर्थ सर्व धनगर नेते कार्यकर्ता व सामान्य धनगर लोकांनी ही बाब समजून घेण्यासारखी आहे. मनाला लागण्यासारखी आहे.
परंतु कोण किती मनावर घेणार ही बाब धनगर तरूणांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून आहे. त्यावरुनच पुढचे भवितव्य निश्चित होणार आहे.
       धनगर तरुणांनो! तुमचे भवितव्य, राजकीय अस्तित्व तुमच्या हातात आहे. तुमचा उज्वल राजकीय, सामाजिक भवितव्यासाठी आपली प्रथम पिढी राजकारणात उतरवा.  तुमच्या दहा पिढ्या सत्ता गाजवतील. ही बाब आपल्या ऐतिहासिक राजकीय वारसा वरून लक्षात येईल. आतापर्यंत आपल्या समस्या सोडविण्यासाठी दुसऱ्यांना विनंती केली. आंदोलने केली, प्रस्थापितांचे झेंडे, खुर्च्या उचलल्या.. परंतु आम्ही खुर्च्या मध्ये बसण्याचा विचारच केला नाही. आता आपण आपली पहिली पिढी सत्तेत बसवून *भारतीय लोकशाहीला धनगर रक्ताच्या राष्ट्रप्रेमाचा, सत्याधारित राजपटाचा वारसा देवू* ....  वारसा घडवू....
 *प्रस्थापितांवर टिका करत बसण्यापेक्षा आपणच प्रस्थापित होऊ....*

जय मल्हार!!!!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Saturday, March 2, 2019

होय पवार साहेब!! धनगरांनी मत इतरांनाच दिली....*

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
*होय पवार साहेब!! धनगरांनी मत इतरांनाच दिली....*

         *डॉ प्रभाकर लोंढे*
-------------------------------------------
      खरंच पवार साहेब।। आपले खूप खूप धन्यवाद.. आपण जीवनाच्या अंतिम टप्प्यात जगातलं सत्य सार्वजनिक रित्या कबुल करीत जगासमोर मांडलं. " *धनगर इतरांना मतदान करतात."* करमाळ्याच्या सभेत आपल्या मुखाग्नीतून तावूनसुलाखून निघालेलं हे सत्यवचन जगाने ऐकलं. आपल्या उतार वयात प्रगल्भ अनुभवातून हे वाक्य आपल्या मुखातुन आम्हाला ऐकायला मिळणं, हे आम्ही सर्व अन्यायग्रस्त धनगर आमचं अहोभाग्यच समजतो. कारण आम्हाला आज पुन्हा एकदा सत्याची जाणीव झाली की, खरंच धनगर इतरांना म्हणजेच(बीजेपी, शिवसेना, रा. कांग्रेस, कांग्रेस पक्ष) यांना व त्यांच्या नेत्यांनाच मतदान करतात, आणि सातत्याने करीत आलेले आहे. तरी सुद्धा गेल्या सत्तर वर्षाच्या कालावधीत हे पक्ष कधीच आमचे धनगरांचे झालेले नाही. या पक्षांनी आम्हाला उमेदवारी सूध्दा दिलेली नाही. आमचा कोणताच नेता मोठा होवू दिला नाही. याचाच अर्थ ते पक्ष व नेते (आपणसुद्धा) आमचे कधीच नव्हते. तरी सुध्दा *आम्ही मतदान मात्र या पक्षांनाच व आपणास करीत आलो आहे,* म्हणजेच जे आमचे कधीच नव्हते, ज्यांनी आम्हाला कधीच उमेदवारी दिली नाही, ज्यांनी आम्हाला कधीच आपल्या पंगतीला येऊ दिले नाही. त्या *इतरांनाच  आम्ही आपले मतदान केले आहे.*
    आपण अगदी बरोबर बोललात, पवार साहेब! आपण स्वतः याची जाणीव ठेवली, असल्या सत्याची आपण आम्हाला जाणीव ऐनवेळेवर निवडणूक काळात करून दिली, आपण तसे जाणीवेचे पक्के!? आपण धनगर जमातच काय, इतर अनेक छोट्या-मोठ्या जमातींच्या सहकार्याची किती मोठ्या प्रमाणात जाणीव  ठेवलेली आहे, असं कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही, त्यामुळेच कदाचित या महाराष्ट्रातील काही अ जाणते लोक आपणास "जाणता राजा" म्हणतात म्हणे. असो साहेब! कोणाला काय म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  पण *आपणास धनगरांनी काय म्हणायचं? हा मोठाच प्रश्न उभा राहिलेला आहे.* साहेब! आपण आपली तिसरी पिढी राजकारणात आणली आहे.  धनगर उदार दिलाने स्वागत करणार आहे, यावर काही शंकाच घेवू नका कारण *धनगर नेहमीच इतरांना मतदान करीत आलेले आहे.*
          आदरनिय पवार साहेब! आपण आपले राजकीय अस्तित्व व वाटचाल सुरु केली ती माढा, बारामती मतदारसंघातून !! की जे धनगर बहूल मतदारसंघ आहेत. तरी सुध्दा धनगर इतरांना मतदान करतात असे आपण म्हणणे किती संयुक्तिक आहे हे आपल्या अनुभवी नजरेतून ठरवावे. एखाद्या वेळेस धनगरांनी बीजेपी शिवसेनेला (आपल्याच शिष्यांना)  मतदान केले म्हणून काय झाले, सुप्रियाताईना तर बारामतीत निवडून (जानकर साहेबांना हरवून)आणण्याचे कार्य धनगरांनीच तर केले, यावरून तरी आमची पवार घराण्यासंबधी निष्ठा लक्षात असू द्या साहेब.. आपण मान्य करा नाही तर नका करा, साहेब, तुमची व तुमच्या रक्तनातेवाईकांची तिसरी पिढी राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी या *धनगरांनी निष्ठेने आपणास मतदान केलं आहे* साहेब..  तुमच्या पिढ्यांना सत्तेत पाठविण्यासाठी धनगरांनी, धनगर रक्ताच्या उमेदवारांना कसं मातीत घातलं आहे, याची आपणास चांगली कल्पना आहेच. याचे आपण सदेह साक्षीदार आहात साहेब... *इतरांच्या तिसऱ्या पिढ्या राजकारणात सक्रिय होत असताना अख्या महाराष्ट्रातून धनगरांची अजून पहीली पिढी सुध्दा राजकारणामध्ये प्रवेश केलेला नाही.* अशा परिस्थितीत सुद्धा अलीकडे आपल्या पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारी मध्ये एकाही धनगराला उमेदवारी जाहीर केली नाही. असं का होतं? हे मला अजून कळलं नाही, साहेब! पण असं नेहमीच झालेलं आहे, त्यामुळे आमचे (धनगर) उमेद्वारच नसल्याने आम्ही इतरांनाच मतदान केलेले आहे. म्हणूनच आपण जे बोललात ,ते अगदी खरं बोललात साहेब.  आणि आपण नेहमी अनुभवातूनच बोलत असता. त्यामुळे आपली कोणीही बरोबरी करू शकत नाही.
        आपल्या एवढा अनुभवी नेता महाराष्ट्रात नाही. असा तो आपला अनुभव आज साक्षीदार आहे, धनगर किती निष्ठावंत आहे, हे आपण इतरांना उत्तम प्रकारे उदाहरणांसह  स्पष्ट करून सांगू शकता. *धनगरांनी नेहमीच इतरांना मतदान केले आहे,* याचा आपल्या एवढा जीवंत साक्षीदार कोणीही नाही.
भलेही धनगरांचे हक्क, आरक्षण मिळाले नसतील परंतु आपल्या दुसऱ्या पिढी पर्यंत आम्ही धनगर नेहमीच आपल्या पाठीशी राहिलो आहे.  आपले नातू पार्थचे सुध्दा राजकारणात पदार्पण होत असताना भव्य स्वागत करावे ही कदाचित आपली अंतिम राजकीय इच्छा असेल, आपण म्हणाल तर ती आम्ही धनगर ती पुर्ण करूनही देवू, कारण *आम्ही आता पर्यंत इतरांनाच मतदान करीत आलो आहे.*
         साहेब! आपणास जाणीव आहेच, आपलं राजकीय अस्तित्व धनगरबहूल मतदानातून निर्माण झालेलं आहे. तोपर्यंत कोणीही धनगर नेता मोठा झाल्याचे उदाहरण दिसत नाही. धनगरांनी बीजेपी शिवसेनेला मतदान करायचे असे ठरविले असताना सुध्दा मागील लोकसभेत आपल्या सुकन्या *सुप्रिया ताईंना धनगरांनी निवडून आणलं,*  त्यासाठी धनगरांनी स्वजातीय श्रीमान महादेव जानकर साहेबांना पाडलं. यावरून तर आपलं म्हणणं सिध्दच झाले आहे साहेब, *धनगर इतरांनाच मतदान करतात* . अगदी बरोबर बोललात साहेब..... आपण शक्य तोवर खोटं बोलत नाही साहेब.... आणि जे बोलता ते खरंचं विचार करायला लावणारं बोलता... धनगर विचार करीत नाही,  हा त्यांचा गुणधर्म आहे.
      मागील विधानसभेत अजीत दादांना विययी करण्यासाठी श्रीमान ---- गावडे या धनगर उमेदवारांला पराभूत केले आहे साहेब.. हे सुद्धा आपल्या धनगर बहुल बारामती मध्ये घडले आहे. हा एक आपला अनुभव असल्यानेच तसेच असे अनेक अनुभव आपल्या पाठीशी असल्याने आपण, *धनगर इतरांना मतदान करतात.* असे बोललात ते अगदी खरं बोललात साहेब....
            यापुढे  सुध्दा धनगर इतरांना मतदान करून पार्थ बरोबरच तुमची तिसरी पिढी सुध्दा राजकारणात मजबूत करण्यासाठी मतदान करणारच आहे. यापुढे धनगरांवर शंका घेण्याची गरजच नाही, कारण यांना आपला माणूस चालतच नाही,  म्हणून *ते इतरांनाच मतदान करतात.* आणि आपण हा धनगरांचा दुर्गुण चांगला ओळखता.  म्हणूनच आपण महाराष्ट्रात विश्वासपुर्ण राजनीती करता....  तेवढ्याच विश्वासाने सांगतो साहेब, हे *धनगर नेहमीच इतरांना मतदान करतात. आणि घटनात्मक आरक्षण मागत पिढ्या बरबाद करतात...*

 *जय मल्हार साहेब*

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Wednesday, February 13, 2019

धनगरां मधील आर्थिक सम्राटानो!!* *आता सत्तेसाठी थोडे हात मोकळे करा!*

🇦🇹💰💰💰💰💰💰💰💰🇦🇹
 *धनगरां मधील आर्थिक सम्राटानो!!*
*आता सत्तेसाठी थोडे हात मोकळे करा!*

                              *डॉ. प्रभाकर लोंढे*

                  लोकशाहीमध्ये सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त करायची असते, त्यासाठी निवडणुका हे शांततामय मार्गाने सत्तांतर करण्याचे माध्यम आहे. म्हणून दर पाच वर्षांनी निवडणुका घेणे हे प्रत्येक लोकशाहीला आवश्यक असते. ह्या निवडणुका लोकमताच्या आधारे जो बहूमतात येईल, त्यालाच सत्तेचा मार्ग मोकळा करीत असतात. पण भारतीय लोकशाहीचा गेल्या सत्तर वर्षातील निवडणुकांचा अभ्यास केला तर येथील मतसंख्येवर इतर काही बाबींचा प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. त्यातील *प्रथम महत्त्वाचा घटक म्हणजे जात!!* तिचे चटके आज पर्यंत धनगरांनी सहन केलेले आहे. त्यामुळेच आमचे राजकीय नेते सत्ताधारी बनू शकले नाही.
कायद्याने जात नष्ट केल्याच्या कोरड्या आरोळ्या आम्ही मारत असलो तरी मात्र याच जात फ्याक्टरचा वापर करून येथील लोकशाहीमध्ये येथील अनेक भुरटे राजे, *जाणते राजे* बनले आहे.
            *दुसरा घटक म्हणजेच पैसा* की जो निवडणूकांमध्ये अप्रत्यक्षपणे खूप मोठी महत्वाची भूमिका पार पाडत असतो. *पैशाने(MONEY) मत निर्माण करता येत नसले तरी मत परीवर्तीत मात्र करता येतं,* हे भारतीय समाज व्यवस्था व लोकशाहीचे वास्तव आहे.
पैशाच्या बाबतीत असं म्हटलं जातं.
         *पैसा, पैसा तू खूदा तो नहीं है,*
                 *पर यह भी सच है कि,*
                 *तू खूदा से भी कम नहीं है!*
                            असं जे पैशाच्या च्या बाबतीत बोललं जात, ते भारतीय सार्वत्रिक निवडणूक काळात तर सिध्दच होत असतं. तो कदाचित सर्वांचाच अनुभव असू शकतो.
             भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर *तिसरा घटक मनुष्यबळ/कार्यकर्ता (Musul) (तोही निष्ठावंत)* महत्त्वाचा असतो. *सत्तेतून पैसा, पैशातून कार्यकर्ता व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतसंख्येच्या आधारे राजकीय सत्ता, हा प्रस्थापितांच्या सत्तेचा यशोमार्ग आहे.* त्याच आधारे ते आजही यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त करताना  दिसतात. ही बाब प्रथम धनगर तरूणांनी समजून घेणे आवश्यक आहे.
       आज धनगर तरुण राजकीय सत्तेच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. जातिवंत निष्ठावंत धनगर तरुणाईचा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याच्या दृढनिश्चय दिसतो आहे. *लोकसभा असो की विधानसभा आता फक्त पिवळा भंडारा उधळायचाच!!*  या विचाराचे धनगर कार्यकर्ते सुध्दा दंड थोपटत आहे. जशा काही यशवंतरावांच्या फौजा आपलं गतवैभव पुनर्स्थापित करण्याचा चंग बांधून आहे. परिणामतः दुसरीकडे शत्रु भांबावलेल्या स्थितीत दिसतो आहे. मात्र *धनगरांचे हे सर्व यशवंतराव व त्यांचे मावळे एकाच गोष्टीत कमी पडण्याची भिती वाटते आहे, तो म्हणजे पैसा!!*  त्यामध्ये ते कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आपण सर्व धनगर बांधवांची आहे.
           निवडणुकीसाठी पैसा उभारायचा कसा? हा मोठाच प्रश्न आहे. परंतु वास्तविकता ही आहे  की, भारतीय निवडणूक *लढविण्यासाठी पैसा उभारणीचे काही प्रकार येथे प्रचलित आहे,*
१) प्रस्थापितांकडून घेणे
२) उद्योगपती कडून घेणे
३) निष्ठावंत कार्यकर्ता, हितचिंतक, नोकरदार व सामान्य मतदार यांचे कडून घेणे.
       यामध्ये हे मात्र सत्य की, ज्याच्या कडून पैसे घ्याल, त्याच्यासाठी काम करावे लागणार. आजपर्यंत आपण प्रस्थापितांकडून पैसा घेतला म्हणून त्यांनी आपल्यातील कार्यकर्त्यांचा(त्यांच्या तितरांचा) वापर त्यांच्यासाठी करून घेतला. त्या बदल्यात धनगरांना काय मिळालं/ दिलं. किती प्रश्न सुटले की समस्या वाढल्या?  याचा तुम्हीच सर्वांनी विचार करावा. या देशातील उद्योगपतींनी तर धनगरांना कधीच पैसा दिला नाही किंवा धनगरांनी घेतला नाही.  *सामान्य धनगर बांधव, कार्यकर्ते, नेते, नोकरदार, मेंढपाळ यांनी मात्र सामाजिक आंदोलनासाठी नेहमीच सढळ हाताने मदत केलेली आहे. परंतु त्यांनी ज्यांना पैसा दिला, ते सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांच्या कडून धनगरांना आरक्षणासह काहीच मिळू शकले नाही.*
     आता मात्र आपली *लढाई राजकीय सत्तेसाठी* आहे. व ती लढाई लढण्याचा यापुर्वी आपण कधीच यशस्वी प्रयत्न केलेला नाही. जर आपण धनगर राजकीय अस्तित्व निर्माण करायला निघालो आहे. तर ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजपर्यंत च्या अन्यायाविरुद्ध *लढण्याची तळमळ असलेल्या धनगर उमेदवारांनी राजकीय सत्ता मिळवावी असं जर वाटत असेल तर त्या प्रत्येकांनी त्यांना जमेल तशी आर्थिक मदत करणे अत्यावश्यक आहे ‌.* नाही तर ते (धनगर उमेदवार) येथील प्रस्थापित मस्तवाल राजकीय सांडाच्या विरोधात लढताना टिकू शकणार नाही.
             आर्थिक समृध्दी असलेल्या धनगर उद्योगपतींनी तर सढळ हाताने मदत करावी. कारण सत्तेचे लाभ मिळण्यासाठी आपल्या(धनगर) माणसांच्या हातात सत्ता असणे आवश्यक असते. हे अंबानी सारख्या उद्योगपतींनी तत्त्व अंगीकारलं आहे. येथील सरकारवर नेहमीच त्यांचा प्रभावच नाही तर दबाव राहिलेला आहे. 
        धनगर जमातीमध्ये सुध्दा *आर्थिक समृद्धी असलेले अनेक उद्योगपती, कारखानदार, व्यावसायिक आहेत, सोबतच धनगर रक्ताच्या सर्वांनीच  आपल्या धनगर उमेदवारांना सढळ हातानी आर्थिक मदत करावी, उमेदवारांनी सुध्दा  आपली सामाजिक बांधिलकी जपावी. ही आग्रहाची नम्र विनंती. मात्र आपल्या मतदारसंघात एकच धनगर उमेदवार उभा राहिल. याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.*
👬👬👬👬👬👬👬👭👭🇦🇹
                          जय मल्हार

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
 *डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Thursday, January 31, 2019

रा. नेतृत्व विकासाची क्षमता होळकरशाहीच्या इतिहासातच

🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹
*रा. नेतृत्व विकासाची क्षमता होळकरशाहीच्या इतिहासातच!*   

                 डॉ प्रभाकर लोंढे

         भारतातील धनगर जमातीसह सर्वच बहूजन समाजाची अवस्था पाहीली तर या समाजाला *राजकीय क्रांतीची गरज आहे* . त्याशिवाय त्यांची प्रगती होणे शक्य नाही, हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. असे असले तरी ही *क्रांती रक्तविहीन क्रांती होणे* आवश्यक आहे. कारण भारतात लोकशाही आहे. लोकशाही मध्ये राजकीय क्रांती ही केवळ निवडणूकीच्या माध्यमातून शक्य आहे. येथे प्रत्येक निवडणूक जनमताच्या आधारे जिंकली जात असते, असं म्हटलं जातं, त्यामुळे येथील *धनगर सह बहूजन उमेदवारांपासून तर कार्यकर्ते व मतदारांना एका व्हिजन (दृष्टी)ची गरज आहे.* त्यांना एका कल्याणकारी विचारसरणीची आवश्यकता आहे. अशी ही *समाजोपयोगी, सर्वकल्याणकारी दृष्टी विकसित करण्याची ताकद मात्र फक्त होळकरशाही, तिचा इतिहास व तिच्या त्या नऊ रत्नांमध्ये आहे.* याची ग्वाही होळकरांचा इतिहास व तत्कालीन समाजव्यवस्था आपणा सर्वांना देते. त्यासाठी सर्वांनी तो इतिहास वाचनाची आवश्यकता आहे.
            भारतीय समाजातील धनगर सह बहूजनांपैकी आजच्या प्रत्येक नेत्यांना त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्या राजकीय अस्मिता जपायच्या असेल तर *स्वबळावर शून्यातून विश्व निर्माण करणारे थोर सुभेदार मल्हारराव होळकर डोक्यात ठेवावे लागेल..... त्यांचा स्वबळावर स्वअस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प  समजून  घ्यावा लागेल.  त्यांच्या सारखी पराक्रमाची  शर्थ लावावीे लागेल. त्यांचा गनिमी कावा लक्षात घेऊन तो तलवारीच्या नाही तर मतसंख्येच्या भरोशावर वास्तवात उतरवावा लागेल. मल्हाररावांचा बानेदारपणा, कठोर परिश्रम करण्याची तयारी, समय सुचकता, ध्येयाप्रती निष्ठा व निष्ठेपोटी असलेली कटीबध्दता* समजून घेणे आवश्यक आहे.
         आज धनगर सह बहुजन समाजामध्ये समाजहित केद्रित नेत्यांची कमतरता आहे, असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही कारण नेतृत्वाच्या कर्तुत्वाचा परिणाम दिसत नाही. व वास्तविकता ही आहे की, हा बहुजन समाज राजकीय सत्तेपासून व त्याच्या लाभापासून आजही वंचित आहे. त्याला केवळ नेतेच जबाबदार नाही तर येथील परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. मात्र या परिस्थितीवर मात करूनच बहूजन समाजाचा विकास शक्य आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने संघटित प्रयत्न होणे आवश्यक आहे. असे प्रयत्न करण्याची ताकद देण्याची क्षमता फक्त होळकरशाहीच्या इतिहासात आहे.  विपरीत व प्रतिगामी सामाजिक, राजकीय परिस्थिती असताना खाजगी जीवनातील दुःखाचे भांडवल न करता राजकीय सत्ता  हातात घेऊन *बहुजन नेत्यांना स्वबळावर लोकाभिमुख, लोकहितवादी  राज्यकारभार करायचा असेल व लोकांच्या गळ्यातील ताईत बनायचे असेल तर महाराणी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श पुरेसा आहे...*
                   होळरशाहीतील महापराक्रमी *यशवंतराव होळकरांचा इतिहास तर आजच्या सर्वच प्रश्र्नांचे उत्तर देणारा आहे* . सोबतच लढण्याची ताकद निर्माण करणारा आहे. स्वराज्यातील संकटांच्या मालिकांमुळे स्वराज्याची घडी विस्कळीत झालेली असताना स्वबळावर स्वराज्य पुनर्गठित  करण्याचे कार्य पराक्रमी यशवंतराव होळकरांनी केले. राष्ट्रीय भावना जपत समान दुखितांना संघटित करून  शत्रुवर वार करण्याचे कार्य केले. हे सर्व समजून घेण्यासाठी  मात्र शूरवीर यशवंतराव वाचावा लागेल.
       स्वजनांच्या उद्धारासाठी काही करायची खरी इच्छा असेल, धनगरांच्या घरातील दुरावस्थे बरोबरच जमात व राष्ट्रावर आलेली संकटे ओळखून राष्ट्र वाचवायचे असेल सोबतच *आजच्या संकटसमयी एकत्र येऊन शत्रूवर जरब निर्माण कराविशी वाटत असेल तर  मन, मनगट व मस्तकात महाराजा यशवंतराव होळकर व त्यांचा पराक्रम, दुर्दम्य आशावाद, प्रचंड इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.*
              थोडक्यात सांगायचे झाले तर धनगर जमातीच्या नेते, कार्यकर्ता यांनी होळकरशाहीच्या संस्थापकाची दूरदृष्टी व पराक्रम, मातोश्री अहिल्यामातेची लोकाभिमुखता व कल्याणकारी दृष्टीकोन, यशवंतरावांचे प्रसंगावधान व धडाडी सोबतच राष्ट्रीय भावना समजून घेतले तर *धनगर सोबतच सर्वच बहूजन जमातीतून सक्षम नेतृत्व विकसित होऊ शकते.* ..... *प्रस्थापितांची मुजोरी खतम होवू शकते...*

                त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

           जय मल्हार
 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Friday, January 11, 2019

धनगराना आता राजकीय क्रांतीशिवाय पर्याय नाही!*

*धनगराना आता राजकीय क्रांतीशिवाय पर्याय नाही!*

    *डॉ प्रभाकर लोंढे*

     धनगर जमातीच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख लक्षात घेता या जमातीच्या सर्व प्रश्‍नांचे मूळ जमातीच्या राजकीय सत्तेपासून दूर असण्यामध्ये आहे. सोबतच जमात नेतृत्वाच्या राजकीय आकांक्षेच्या अभावात आहे. त्यामुळे जमातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजकीय सत्ता अत्यावश्यक असताना या जमातीने स्वतःला राजकीय सत्तेपासून अनपेक्षित अनभिज्ञ ठेवलेले आहे.  परिणामतः भारतीय लोकशाहीमध्ये बहुसंख्येने असलेली धनगर जमात एक राजकीय उपेक्षित जमात असल्याचे आजही लक्षात येते *. "धनगर जमात वेडी" की "प्रस्थापितांची खेळी" असो काहीही, मात्र आज धनगर जमात व्यवस्थेच्या नेहमीच गेली बळी....* 
          अलीकडे धनगर जमात वेडी तर राहीलेलीच नाही शिवाय त्यांनी आज प्रस्थापितांची खेळी ओळखली आहे. त्यामुळे आता बळी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
              धनगर तरुणाईचा ध्यास व भारतीय राजकारणाचा अभ्यास या दोन गोष्टी मुळे धनगर जमाती मध्ये राजकीय नवचैतन्य निर्माण होताना दिसत आहे. धनगर जमातीने अभ्यासातून आज महाराष्ट्रीयन राजकारणाची नस ओळखली आहे. धनगर जमातीच्या सर्वच प्रश्नाचे आकलन व कारणमिमांसा या पर्यंत धनगर जमातीचे अभ्यासक जावून पोहचलेले आहे.  त्यांच्या अध्ययन, संशोधन, विश्लेषण व लेखन यातून धनगर जमातीला विकासाचा एक सूर गवसलेला आहे. व यापुढे राजकीय सत्तेशिवाय धनगर जमातीला पर्याय नाही, हा निष्कर्ष धनगर नेतृत्वापासून सामान्य धनगर माणसांपर्यंत जावून पोहोचला आहे.  सोबतच सर्वांनी तो सहजपणे स्विकारलेला आहे. आता पर्यंत झालेल्या चुका, अन्याय, अत्याचार, नुकसान या सर्व बाबींची खंत वाटायला लागली आहे. त्यांनी धनगर जमातीचे नुकसान करणारे जंत ओळखलेले आहे. त्या जंताच्या अंतातूनच धनगराचा  राजकीय उदय आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे धनगर जमातीमध्ये राजकीय क्रांती शिवाय दुसरा पर्याय नाही, हा आत्मविश्वास धनगर जमातीमध्ये अलीकडे सातत्याने पहायला मिळतो आहे.
            तरुण धनगर नेतृत्वांची राजकीय सत्तेच्या दृष्टीने लोकशाहीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुध्दा झालेली आहे. यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात धनगरांचा मोठा राजकीय प्रलय निर्माण होणार हे निश्चित आहे. यामध्ये प्रस्थापित धनगर नेत्यांसह अनेक बड्या गैर धनगर नेत्यांचे राजकीय गणित कोलमडणार हे नक्की आहे. धनगरांचे प्रस्थापित नेतृत्व व नवोदित नेतृत्व यांच्या मधील समन्वयातून धनगर राजकीय क्रांती शक्य आहे.
     एवढं मात्र निश्चित की, यापुढे धनगरांच्या राजकीय क्रांती शिवाय पर्याय नाही, ही बाब सर्वमान्य झालेली आहे. त्यामुळेच धनगर समाजानी आता केवळ राजकीय सत्तेसाठी आपली नीती आखावी. आरक्षणासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करीत असतांनाच राजकीय सत्तेसाठी आपले तन, मन, धन संघटितपणे खर्च करणे आवश्यक आहे. परस्पर सामंजस्य व सहकार्य या तत्त्वावर आधारित समाजाचा राजकीय जाहीरनामा प्रसिद्ध करून जमातीच्या  योजनाबध्द वाटचालीतून धनगरांची ही राजकीय क्रांती शक्य आहे..

                     *जय मल्हार*

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*